(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री कनकधारा स्तोत्रम् – ५

    बाह्वन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभेया हारावलीव हरि‍नीलमयी विभाति।कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
    कल्याणमावहतु मे कमलालयाया:।।५।।

    बाह्वन्तरे- बाहू म्हणजे हात. त्यांच्या अंतरे म्हणजे आत मध्ये. दोन हातांच्या आत असणारा अवयव म्हणजे छाती.

    मधुजित:- मधु नावाच्या राक्षसाला जिंकणारे. भगवान श्रीविष्णु.

    विश्व रचनेच्या आरंभी भगवान श्रीविष्णूच्याच कानातून निघालेल्या मळा च्या दोन थेंबांमधून मधु आणि कैटभ या नावाचे दोन राक्षस जन्माला आल्याची कथा आहे. त्यांच्याशी युद्ध करून श्रीविष्णूंनी त्यांना मारले.

    श्रितकौस्तुभेया- कौस्तुभ हे भगवान विष्णूच्या गळ्यातील रत्नाचे नाव. त्याने अलंकृत.

    एकत्रित अर्थ पाहता, मधू राक्षसाचे विनाशक भगवान श्रीविष्णूंच्या वक्षस्थलावर रुळणाऱ्या कौस्तुभ मण्याने अलंकृत.

    आई जगदंबेची दृष्टी वारंवार भगवान श्रीहरीच्या हृदयावर जात असल्याने तेथे असणाऱ्या कौस्तुभमण्याने ती दृष्टी अलंकृत होते असा भाव.

    हारावलीव हरि‍नीलमयी विभाति- हरी म्हणजे हिरवा तर नील म्हणजे निळा. हिरवे रत्न पाचू तर निळे रत्न नीलम. महालक्ष्मी चे डोळे तसे हिरवट निळे आहेत. जणु त्या मण्यांची माळ तयार केली तर ती जशी दिसेल तशी आईची कटाक्ष मालिका विभाति म्हणजे शोभून दिसत आहे.

    कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला- भगवंताला देखील जी काम म्हणजे प्रेमभावना प्रदान करते अशी ती कमलालयाया:- कमळामध्ये निवास करणाऱ्या आई महालक्ष्मीची कटाक्षमाला- वारंवार टाकलेले कटाक्ष यांची जणू माला.

    कल्याणमावहतु मे - मला कल्याण प्रदान करणारी होवो."

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 14, 2020


  • कोलेस्टेरॉल

    चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.

    कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.
    रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      February 13, 2017


  • भारताच्या हवाई इतिहासातील महत्वाचे टप्पे

    भारताच्या हवाई इतिहासात तीन टप्पे महत्वाचे आहेत. त्यातला पहिला टप्पा हा ब्रिटिश विमानांचा व तो सुद्धा पिस्टन इंजिनांच्या विमानाचा! दुसरा टप्पा हा जास्त वाहतुकीची क्षमता असणारा व मध्यम आणि कमी पल्ल्याच्या विमानांचा आणि तिसरा टप्पा हा जेट विमानांचा.

      July 21, 2023


  • अपेंडिक्स

    अपेंडिक्सची शस्त्रक्रिया ही नेहमी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. आतड्यातील अपेंडिक्स नावाच्या छोट्या शेपटीला सूज आल्यामुळे, पोटात तीव्र दुखणे सुरू झाल्यास शस्त्रक्रिया करून ही शेपटी काढून टाकावी लागते. असे दुखणे होऊन; पण त्याचे योग्य निदान न झाल्याने किंवा भीतीपोटी काही वेळा ही शस्त्रक्रिया वेळेवर केली गेली नाही, तर रुग्णाचा जीव धोक्यानत येतो. जेथे लहान आतडे संपून मोठे आतडे सुरू होते तेथे शेपटीसारखा बाहेर आलेला आतड्याचाच एक भाग मोठ्या आतडीच्या सुरवातीला असतो. त्यालाच अपेंडिक्स अथवा आंत्रपुच्छ म्हणतात. याची लांबी एक ते पाच इंच असू शकते, तसेच हा अवयव जन्मत:च आपल्या पोटात असतो. मात्र माणसाची पूर्ण वाढ झाल्यावर अपेंडिक्सची वाढ होत नाही. हा अवयव उदर-पोकळीत उजवीकडे खाली असतो. अपेंडिक्सला सूज येणे यालाच अपेंडिसायटीस असे म्हणतात व ही सूज नक्कीड कशामुळे येते हे अजूनही समजलेले नाही, त्यामुळे या विकाराचा त्रास न होण्याकरिता काही काळजी घेऊनही हा आजार टाळता येत नाही. जंतुसंसर्गामुळे संपूर्ण आंत्रपुच्छाला सौम्य सूज येऊ शकते. मात्र ती फार झपाट्याने वाढत नाही व बऱ्याच वेळा औषधोपचारांनी कमी होऊ शकते, तसेच वारंवार सौम्य सूज येऊ शकते. यात आंत्रपुच्छ फुटण्याचा धोका तसा कमी असतो, तसेच वरचेवर अपेंडिक्सचे ऍटॅक येऊ शकतात. भूक न लागणे, कधीतरी पोटात दुखणे, पचनक्रिया नीट न होणे, यालाच अपेंडिक्समुळे होणारे अपचन म्हणतात.

    अपेंडिक्सची लक्षणे, उपचार आणि शस्त्रक्रिया
    1) अचानक पोटात दुखणे, दुखण्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणे किंवा अनेकांना उलट्या होतात, तसेच भूक न लागणे, अपचन, अन्न खावेसे न वाटणे, मळमळणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे होत.

    2) सुरवातीला आलेला थोडा ताप, इलाज न केल्यामुळे गुंतागुंत होऊन वाढू शकतो. साधारणपणे पोटाच्या उजव्या खालच्या भागात दाब दिल्यास वेदना होतात व तो भाग कधीकधी कडक होतो. अशा वेळी पोट अजिबात चोळू नये किंवा जुलाबाचे औषध अजिबात घेऊ नये.

    3) रोगनिदानासाठी रक्तय तपासणी (पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढले का बघण्यासाठी) तसेच मूत्र तपासणी - जंतुबाधा किंवा मूतखडा नसल्याची खात्री करण्यासाठी शौच तपासणी - आतड्यास जंतुबाधा झाली आहे का हे पाहण्यासाठी; तसेच पोटाची सोनोग्राफी करावी. जास्त सुजलेले अपेंडिक्स असल्यास किंवा त्या-भोवती पू जमा झाला असल्यास व पोटदुखीची इतर कारणे समजण्यास किंवा पोटाची दुर्बिणीतून तपासणी करून 100 टक्के निदान होऊ शकते.

    4) उपचारामध्ये काही वेळा तात्पुरता औषधोपचार केला जातो. यात प्रतिजैविके, सूज व वेदना कमी होणारी औषधे, शिरेतून ग्लुकोज - सलाईन देणे आदी इलाज केले जातात. मात्र शस्त्रक्रिया हाच सर्वमान्य व सर्वोत्तम उपाय आहे. कारण शस्त्रक्रिया जितकी लांबणीवर टाकावी तेवढे गुंतागुंतीचे प्रमाण वाढू शकते, तसेच अपेंडिक्स भोवती आतडी चिकटणे व त्याचा गोळा तयार होणे, आंत्रपुच्छ फुटणे, त्याभोवती गळू तयार होणे किंवा पू पोटात सर्वत्र पसरणे आदी गोष्टी होऊ शकतात.

    अपेंडिक्स ची शस्त्रक्रिया कशी करतात व त्यानंतर काय काळजी अपेक्षित आहे.
    अपेंडिक्सची शस्त्रक्रिया दोन पद्धतीने करता येते
    1) पोट उघडून वा 2) दुर्बिणीच्या साहाय्याने.
    पोट उघडून शस्त्रक्रिया करताना पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागावर 2 ते 3 इंचाचा तिरका किंवा आडवा छेद घेऊन सुजलेले आंत्रपुच्छ काढले जाते. ही शस्त्रक्रिया अर्धा ते एक तास चालते. इतर गुंतागुंत असल्यास जास्त वेळ लागू शकतो. ही शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन अथवा फक्ते कंबरेखालील भागाला बधीर करून केली जाते. नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे दुर्बिणीच्या साहाय्याने अपेंडिक्स काढता येतो, यामध्ये पोटावर तीन ठिकाणी लहान छेद घेतात व त्यातून दुर्बिण व शस्त्रक्रियेकरिता लागणारी उपकरणे पोटाच्या पोकळीत घालून शस्त्रक्रिया करतात व त्यातूनच अपेंडिक्स बाहेर काढले जाते. सहसा पूर्ण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करतात. दुर्बिणीतून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर दुखण्याचे प्रमाण कमी असते व रुग्ण लवकर बरा होतो. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण 2-3 दिवसांत घरी जाऊ शकतो, तसेच त्यानंतर डॉक्टंरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती व औषधोपचार अत्यंत गरजेचे आहेत; तसेच एकदा काढलेले अपेंडिक्स पुन्हा कधीही वाढत नाही व अन्नपचनावर कायमचा कोणताही परिणाम संभवत नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.सकाळ / डॉ. नितीन उनकुले

      January 5, 2017


  • अल्झायमर जागरुकता दिन (२१ सप्टेंबर)

    २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो . अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अ‍ॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो.

    संपूर्ण जीवशास्त्रामध्ये मान्य झालेला ‘युज इट ऑर लूझ इट’ हा अलिखित कायदाही सर्वसामान्यांनानाही चांगलाच ज्ञात आहे. त्यानुसार आपल्या शरीरातील अवयवबाह्य तसेच अंतर्गतही पुरेपूर वापरात गेला नाही तर हळूहळू दुर्बल होऊ लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होऊन तो विकृत होऊ लागतो. या कारणानेच व आपली संपूर्ण शरीर प्रकृती उत्तम, निकोप राहावी यासाठी नित्य नियमित व्यायामाचे महत्त्व वैद्यकीय, आरोग्यतज्ज्ञ आपणास विशद करतात त्याबद्दल आग्रह करतात. योग्य व नियमित व्यायाम, योगासने, प्राणायामाने आपण खूपच निरोगी राहातो इतकेच नाही तर विकृत झालेले अवयव पण पुन्हा प्राकृत होऊ लागतात असा अनुभव येऊ लागतो. स्थूलता, मधुमेह, हृद्रोग यासारख्या दुर्धर कष्टसाध्य आजारातपण हाच अनुभव घेता येतो. आपला मेंदू हा पण एक अत्यंत महत्त्वाचा अंतर्गत अवयवच आहे. ‘युज इट ऑर लूझ इट’ हा सिद्घांत याबाबत लागू होतो. योग्य, अचूक व्यायामाच्या अभावामुळे मेंदूमधील चेतापेशींची कार्यक्षमता कालांतराने कमी होते व अंतिमत: त्या अकार्यक्षम, निकामी होतात. हे आता शास्त्रसंगत आहे.

    अल्झायमर विकारातील चेतातंतूची स्थिती:
    अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती व विसराळूपणा येतो. रुग्ण तोच तो प्रश्न विचारत राहतो, नेहमीचा रस्ताही विसरतो. स्थितिज्ञान जाते. हळूहळू भूतकाळ हरवतो. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू र्‍हासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. प्रतिकारशक्तीही हळूहळू क्षीण होते. बहुधा न्यूमोनियाने या रुग्णाचा अंत होतो.

    अल्झायमर रुग्णांचे शवविच्छेदन केले असता पुढील बाबी आढळल्या आहेत: रुग्णाच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी कमी होतात. चेतापेशीच्या बाहेर अपसामान्य प्रथिने असतात आणि चेतापेशींमध्येही या प्रथिनांचे तंतू आढळतात. त्यात ए-६८/टाऊ नावाचे प्रथिन आढळते. हिप्पोकॅंपस व प्रमस्तिष्काचे बाह्यक यांत चेतापेशींचा र्‍हास जास्त झालेला आढळतो. बाह्यकातील अनेक प्रथिने कमी होतात, तसेच अ‍ॅसेटिल कोलीन हा चेताप्रक्षेपक कमी होतो. चेतापेशींच्या र्‍हासाबरोबरच चेतापेशींपासून निघणार्‍या अक्षतंतूंभोवती पिष्ठाभर्‍हास (अ‍ॅमिलॉइडर्‍हास) दिसतो. या र्‍हासात बीटा-अ‍ॅमिलॉइड प्रथिनांचा थर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर व अक्षतंतूंभोवती आढळतो. सामान्य वृद्धांत ही अ‍ॅमिलॉइड प्रथिने आढळत नाहीत.

    अल्झायमर रोगाचे सुरुवातीस निदान करणे कठिण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चालताना पाय अडखळतात. स्नायूंचा ताठरपणा इतर हालचालींत अडथळा आणतो. वार्धक्य व आनुवंशिकता यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते. चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (एम्.आर्.आय्. - मॅग्नेटिक रेझोनन्स इमेंजिंग) व सी. टी. स्कॅन (कॉम्प्युटरराइज्ड टोमोग्राफी) या तपासण्यांमध्ये मेंदूच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा र्‍हास दिसतो. पी.ई.टी. (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) चाचणीत मेंदूच्या दोन्ही बाजूंचा र्‍हास दिसतो.

    लक्षणे:
    आत्यंतिक भोळेपणा, सहज गोंधळून जाणे, अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहाणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नाविन्याबद्दल अनास्था वाटणे, ताज्या घटनांची विस्मृती होणे, स्वत:च्या विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने वारंवार अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते. अशा अवस्थेमधील रुग्णाची शुश्रुषा करणे किती कठीण असेल याची कल्पनाही येत नाही! एकदा जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे आणि अजून तरी हा रोग असाध्य आहे.

    या रोगावर उपचाराचे खास परिणामकारक औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या कुटुंबियांना या रोगाची माहिती देणे आवश्यक असते. अशा रुग्णांची काळजी नीट घ्यावी लागते. हे काम कठिण व धीराचे असते. सध्या तरी टॅक्रीन हे एकच औषध या रोगावर आहे. ते सुरुवातीला दिल्यास रुग्णात परिणाम होऊ शकतो. यासोबत पूरक म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात.

    या सर्व क्लेषकारक वर्णनास एक आश्वासक, सुखद किनार अशी आहे की प्रतिबंधक उपचारांनी या आजारापासून बचाव करून राहाणे शक्य आहे व ते उपाय पूर्णत: निर्धोक, सहज अवलंबनीय व विनामूल्य आहेत. म्हणून ते सर्वानी म्हणजे किमान वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींनी आचरणांत आणावेत असे वाटते. नित्य नवे विषय, मुद्दे समजून घेणे, समजलेले स्मरण, चिंतन करणे, दुसऱ्यास समजावून देणे, पाठांतर करणे- याविषयी माझा विशेष, व्यक्तीगत आग्रह आहे कारण भगवत्गीता, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी हे जगमान्य ग्रंथ सहज घरोघरी उपलब्ध असतातच, त्यांचा वापर करता येतो- मित्र परिवारांत गप्पा-टप्पा मारण्यासाठी अवश्य सहभागी होणे. हास्यक्लबमध्ये जाणे, सहलीस जाणे, कोडी सोडविणे, विश्वासू व्यक्तीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करणे असे विविध उपचार करण्याने आपल्या मेंदूमधील संबंधित चेता पेशींना चांगला व्यायाम घडून त्या कार्यक्षम राहतात.

    सध्या जगभर माणसाची सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे ८५ वर्षांवरील सु. ५० % वृद्ध अल्झायमरग्रस्त आढळून येतात. विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थांकडून अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : शशिकांत प्रधान kumar vishvkosh, डॉ. रमाकांत गोवंडे - लोकप्रभा

      January 6, 2017


  • स्वार्थी राजकारणी आणि लोकांचा बेजबाबदारपणा

    “आज सर्व सुजाण नागरिकांनी या लोकप्रतिनिधींना आपला देश, किंवा आपले राज्य कसे चालवलं पाहिजे ? कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे ? याच विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरण आणि ते पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करून ते सत्यात उतरवणं म्हणजे खर जागृत राजकारण होय.”

      June 27, 2023


  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग २

    आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत.

      January 8, 2020


  • सौंदर्य व लावण्य असलेला : ताम्हण वृक्ष

    ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो.

      November 3, 2024


  • कॉटन ग्रीन..’

    मुंबईची हार्बर रेल्वे लाईन पश्चिम व मध्य रेल्वेवर राहणाऱ्या मुंबईच्या पांढरपेशा समाजाच्या दृष्टिनं काहीशी दुर्लक्षितच..या हार्बर लाईन मुळे आपल्याला दाना-पाण्याची रसद मिळत असते याची जाणीव फार थोड्या मुंबईकरांना असते.

      July 29, 2016


  • बाली द्वीपकल्पातील – द्विभूज गणेश मूर्ती (अग्निरूप स्वरूपातील)

    दक्षिण बालीत जम्बरन येथे असलेली व अग्निरूप म्हणून ओळखली जाणारी ही गणेशाची पाषाणमूर्ती दोन हाताची असून ती सातव्या किंवा आठव्या शतकातील असावी. बलीत इतरत्र ब्रान्झ धातूच्या मूर्ती असताना हीच मूर्ती फक्त पाषाणाची आहे, हे पहिले वैशिष्टय होय.

      June 19, 2012