(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारताचा जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर

    भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच "०७ मार्च १९८७"रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या.

    अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला.

    पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत असतांना 'एजाज फकी' च्या गोलंदाजीवर स्लीप मधे बॉल ढकलुन एक धाव काढली आणि समोर(नॉनस्ट्राइकरएंड वर) उभ्या असलेल्या किरण मोरेनी धावत जाउन सुनीलचं अभिनंदन केलं. एक क्षण सुनीलला समजलच नाही की आपलं शतक झालं नाही तरी हा इतका खुश का झाला आहे. पण किरणनी जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत तेव्हा मात्र सुनील आपला आनंद लपवु शकला नाही. संपूर्ण भारतात आनंदाचं उधाण आलं. कारण साऱ्या भारतीयांचं स्वप्न सुनीलनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेक ठिकाणी पेढे/मिठाई वाटुन लोकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली, जणु काही स्वत:च्याच घरात काही खास घडलं होतं. याला कारण सुनील गावस्कर - तो होताच मुळी सर्वांचा लाडका.

    सुनीलच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे भारताचा क्रिकेट जगतात दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेट आणि खेळाडु याबद्दल क्रिकेट खेळणाऱ्या देशातील रसिक आदराने पाहु लागले कारण सुनीलनी आपल्या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं होतं.

    अशा या महान फलंदाजाचं आपण सारे मिळून कौतुक करुया!!!

  • आहारातील बदल भाग ८ – शाकाहारी भाग तीन

    काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.

    जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.

    जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.

    पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.

    शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.

    जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.

    कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !

    मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.

    जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
    जगणेच संपले असते.

    जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
    पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
    अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!

    "HE" is simply great !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    29.09.2016

  • दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे

    १६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महा मुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे ‘हिराॅईन्स’चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली.

  • एमी पॅक, माता हरी,- काही महिला हेर

    हेररगिरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वभावविशेषच वेगळे असावे लागतात. मूळ पिंडच सर्वसामान्य माणसांपेक्षा दुर्मीळ स्वरूपाचा असावा लागतो. पोलादी रक्तवाहिन्या, धाडसी वृत्ती, मृत्यूविषयी बेपर्वा वृत्ती आणि वेगळे काही करून दाखविण्याची तीव्र ओढ, हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीत असावी लागते. त्याखेरीज इतर अनेक स्वभाववैशिष्ट्यांचीही अपेक्षा असते.

  • दैव भोग !

    दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या कर्माने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं दैव त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. काय करावं शेतकऱ्याने?

  • निरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य

    एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे.

  • मलेरिया लस निर्मिती

    वैद्यकीय शास्त्राने विविध रोगांविरुद्ध लस निर्माण करण्यात गेल्या शतकात अशी गरूड भरारी मारली की ज्यामुळे अनेक रोग आज इतिहासजमा झाले आहेत . प्लेग , देवी , कांजण्या , पोलिओ , घटसर्प , डांग्या खोकला अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर परिणामकारक लसीची निर्मिती झाली . अर्थात मग मलेरिया या रोगावर लस का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला कोड्यात टाकतो .

    मलेरियाच्या परोपजीवांचे माणसाच्या शरीरात येईपर्यंत व आल्यानंतरही अनेक अवस्थांतून संक्रमण हाते . त्यामुळे मलेरियाच्या रोगासाठी लस एक किंबहुना अनेक पद्धतींनी बनवावी लागेल . तसेच मलेरियाची लस दिल्यानंतर माणसाला त्यापासून कायमचे अभयत्व मिळते किंवा नाही ही महत्त्वाची अडचण आहे . हे सर्व अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न असून त्यावरून सरळ सकारात्मक उत्तर मिळणे हे आजमितीला तरी दुरापास्त दिसते . म्हणून या विषयाची केवळ तोंड ओळखच या प्रकरणात दिली आहे .

    लस निर्मितीमध्ये खालील पद्धतीचा अवलंब केला आहे .
    १ ) मलेरिया परोपजीवांच्या विविध स्थिति ( Stages ) मधील प्रतिजनांच्या ( Antigens ) सखोल अभ्यासाच्या निष्कर्षातून जवळजवळ ३० वेगवेगळी प्रतिजने विविध पद्धतीने मिसळून त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंडे ( Antibodies ) निर्माण केली गेली आहेत . ही सर्व प्रतिजने ( P. Falciparum ) पासून तयार केलेली आहेत .

    २ ) डासांच्या लाळेमधून माणसाच्या शरीरात शिरणाऱ्या Circumspores वा Sporozoites पासून तयार केलेली प्रथिने ( Proteins ) प्रतिजन म्हणून वापरून त्याविरुद्ध ( CSP Antigen ) प्रतिपिंडे तयार केली गेली . ह्या प्रतिपिंडांची योजना यकृतामध्ये परोपजीवी शिरू शकणार नाहीत व त्यातूनही थोडे ( Sporozoites ) चकवून यकृतात शिरलेच तर त्यांचा नायनाट ही प्रतिपिंडे व शरीरातील अभयत्व देणाऱ्या T. lymphocytes पेशी करतील या भूमिकेतून आखली होती . या प्रयोगातून Sporozoites निकामी ठरल्यानंतर पुढच्या स्थितीतील परोपजीवी निर्माणच होणार नाहीत हा हेतू होता . परंतू या पद्धतीच्या लसीला शरीरातून योग्य प्रतिसाद मिळाला नाही . यामुळे यात नवीन तांत्रिक बदल केले गेले आहेत .

    ३ ) CSP Antigen व Hepatitis B Virus ( एका पद्धतीचे कावीळीचे विषाणू ) ज्याचा वाहक म्हणून उपयोग करून लस बनविण्यात आली आहे .

    ४ ) परोपजीवांतील जनुकांमधील DNA , रासायनिक वाहक , आणि T. lymphocytes या तिघांच्या मदतीने प्रतिबंधकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे .

    ५ ) Pattrraya लशीमध्ये परोपजीवांमधील विविध प्रथिनांचे मिश्रण ( Cocktail ) बनविले आहे ज्यामध्ये 35KD , 55KD , 83KD असे प्रतिजनांचे मुख्य घटक आहेत . या विरुद्ध तयार झालेली प्रतिपिंडे तांबड्या रक्तपेशींभोवती ढालीसारखा पडदा निर्माण करतात ज्यायोगे परोपजीवांना तांबड्या रक्तपेशीत शिरताच येत नाही . या पद्धतीप्रमाणे Glaxo SKF कंपनीने Mosquirix नावाची लस तयार केलेली असून आतापर्यंत याच्या निर्मितीसाठी ३०० दशलक्ष डॉलर्स खर्च झालेला आहे . प्राथमिक प्रयोग अफ्रिकेतील लहान मुलांवर करण्यात येत असून ५५ ते ६० टक्के यश हाती येईल असा कंपनीचा दावा आहे .

    ६ ) भारतात हैद्राबाद येथील Bharat Biotech मधील शास्रज्ञ डॉ . चेतन चिटणीस यांनी गेली १० वर्षे या विषयावर सखोल संशोधन केलेले आहे . परोपजीवी कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींना भेदतात . या संशोधनावर आधारित ह्या लसीची निर्मिती केलेली असून २०१२ सालापर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे . या त्यांच्या बहुमोल कामाबद्दल Infossys या कंपनीने २०१० मधील ५० लाख रुपयांचे विज्ञान पारितोषिक या लस संशोधनासाठी दिले आहे .

    ७ ) परोपजीवांचा मनुष्य - डास - मनुष्य हा प्रवास खंडित करण्याचे महत्त्वपूर्ण काम लसी मार्फत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू आहे . ह्या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे मलेरिया झालेल्या रुग्णाला ही लस टोचल्यावर त्याचे परिणाम त्याच्या शरीरात न होता , त्या रुग्णाला जे डास चावतील त्यांच्यावर होऊन मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र थांबविण्यात यश मिळेल

    लस निर्मितीतील संभाव्य अडचणी अशा आहेत .

    १ ) मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींवर पोसले जात असताना या परोपजीवांच्या भोवती अतिशय पातळ प्रथिनांचे आवरण निर्माण होते . त्याचप्रमाणे प्रत्येक परोपजीवाच्या आवरणात सूक्ष्म स्वरूपातील रासायनिक विविधता असते . या विविधतेसाठी लागणारा रासायनिक बदल हा परोपजीवांमधील जनुकांमार्फत दिला जातो . या समस्येमुळे एकाच रासायनिक सूत्राचे प्रतिजन बनविणे कठीण असल्याने लस बनविण्यात तांत्रिक अडचणी उत्पन्न होतात .

    २ ) प्रतिजनांमधील विविधतेमुळे शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे तयार होतानाच कमकुवत असतात . त्यांची रक्तातील पातळी कायम न राहता हळूहळू कमी होत जाते व क्षमताही कमी होते .

    ३ ) परोपजीवांच्या गुणसूत्रात विविध औषधामुळे सतत रासायनिक बदल होत असतो .

    ४ ) मलेरियाचे परोपजीवी शरीरात वाढत असताना काही वेळा ते एवढ्या मोठ्या संख्येने तयार होतात की औषधांचा मारा तिथे अपुरा पडतो . त्यामुळे त्यांचे उत्पादन पूर्णपणे थांबविण्यात औषधे असफल ठरतात . यामधूनच परोपजीवांची तयार होणारी नवी पिढी औषधांना तर प्रतिसाद देत नाहीच परंतु वापरण्यात येणाऱ्या लसीचा शरीरातील अभयत्वासाठी होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणते .

    आजमितीला निसर्गाने परोपजीवांना झुकते माप देत लस निर्मितीच्या कार्यक्रमात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत .

    मलेरियावरील प्रभावी लस निर्मिती - ऑक्टो . २०११

    ग्लॅक्सो SKF कंपनीचे प्रमूख वैज्ञानिक डॉ . जो . कोहेन यांनी RIS , S / AS02A या नावाची लस मलेरियासाठी शोधून काढली आहे . या लसीचा उपयोग अफ्रिकेतील ५ ते १७ महिन्यांच्या ६००० बालकांमध्ये करण्यात आला . परिणामी ५७ टक्के बालकांना मलेरियापासून मुक्तता मिळाली व शंभरातील ४७ मुलांना झालेल्या मलेरियाची तीव्रता अतिशय कमी स्वरूपाची आढळली .

    अफ्रिका खंडातील बर्कोना , फासो , गॅबॉन , केनिया , मालावी , मोझांबिक , टांझानिया अशा सात देशात अकरा ठिकाणी २ वर्षांच्या कालावधीसाठी चाचण्या घेण्यात आल्या . अशा या चाचण्यांच्या निरीक्षणामधून निघालेल्या सकारात्मक निष्कर्षांमुळे मलेरिया विरुद्ध निघालेली पहिली लस अशी जगन्मान्यता या लसीला मिळाली आहे . दहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून या लसीचा शोध लावण्यात आल्याने आता मलेरिया निर्मूलनासाठी अंतिम दरवाजा उघडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे . २०१५ सालापर्यंत जगभर ही लस वापरण्यास सुरवात होईल असा ठाम विश्वास डॉ . जो कोहेन यांनी व्यक्त केला . आजपर्यंत कोणत्याही परोपजीवाविरुद्ध लस निर्मिती झालेली नसल्याने जगभरातील मनुष्यप्राण्याला पछाडणाऱ्या मलेरिया या रोगाविरुद्ध लस मिळाल्याचे सांगताना डॉ . कोहेन यांचे डोळे पाणावले होते . पुढच्या टप्यातील चाचणी १५४६० नवजात बालकांमध्ये घेतली जात आहे . तीन वेळा क्रमाने दिल्या जाणाऱ्या या लसीला इतर रोगांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींसोबत देण्याची योजना आखली गेली आहे . लस शीतपेटीत ठेवण्याची गरज आहे . सर्वात मुख्य समस्या ही लसीच्या किमतीशी निगडीत आहे . जोपर्यंत १०० टक्के यश येत नाही तोपर्यंत देणगी दाते पुढे येण्यास कचरतात . परंतु आजच्या या निष्कर्षांमुळे त्यांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकतेत बदलत आहे , अर्थात हेही नसे थोडके ! उदाहरणार्थ बिल गेट फाउंडेशन सारखी श्रीमंत संस्था या उपक्रमाला मदत देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे .

    या पार्श्वभूमीवर आमच्या मुंबई शहरातील ही बातमी वाचा .

    जुहू गल्ली , मुंबई येथे ३०० मुलांना मलेरियाविरुद्ध लस देण्याची फसवेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे . अजूनही बाजारात जी लस उपलब्धच नाही अशा लसीचे इन्जेक्शन मुलांना देण्यात आले व सोबत बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्येक मुलाला दिले गेले . त्यानंतर कांही मुलांच्या पालकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना ही प्रमाणपत्रे दाखविली व त्यातून हा घोटाळा उघडकीला आला आहे . मुले मलेरियापासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत अशी पालकांची चुकीची समजूत करून देण्यात आली होती .
    - ( Midday या वृत्तपत्रातील १० नोव्हेंबर २०११ मधील बातमी ) A80 खरे तर लस बाजारात येण्यास किमान दोन वर्षे तरी लागतील.

    --डॉ. अविनाश वैद्य

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३९

    प्रशंसनीय पाणी भाग चार

    आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण.....
    काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
    आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?

    हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
    आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !

    उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !

    गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.

    पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.

    सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.

    मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.

    हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.

    पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
    मधे पाणी कशासाठी ?
    मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.01.2017