वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नोटा छापणारांन मधील काही काही ” पुणे लुटतात सातार्याला दान करतात ” दानशूर पणा दाखवता… असचं वर्तन सरकारचं पण आहे… करदात्याचा पैसावरच परस्पर फुकट्या योजना राबवत आहे…
January 15, 2024
‘व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो’, असे प्रसिध्द लेखक वपु काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.
August 27, 2010

तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत करता येईल, अशी खात्रीशीर भूकंपपूर्व ‘लक्षणं’ संशोधकांना सापडलेली नाहीत. त्यामुळे भूकंपाच्या पुरेसा वेळ अगोदर, भूकंपाचं भाकीत वर्तवणं अजून तरी शक्य झालेलं नाही.
August 21, 2023
फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात.
March 21, 2025
पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते.
पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना अन्य दुसरी अनावश्यक कामे बंद करणे अपेक्षित असते.
आता खरे पाचन सुरू होते. आपल्याला हवे तसे आपण संस्कारीत करून घेतले, दात जीभेला जे हवे तसे भरडून आत उतरवले, इथपर्यंत पचनावर आपला ताबा असतो. जे काही अपेक्षित बदल आहेत ते इथपर्यंतच. एकदा घश्याखाली अन्न उतरले की आपला अंमल संपला. डिपार्टमेंटच बदलले. आता त्याला हवे तसे योग्य ते बदल तो करू लागतो. आधीच ठरवलेल्या फाॅर्म्युल्याप्रमाणे योग्य ती पाचक द्रव्ये तिथे आणली जातात. नीट घुसळली जातात. सर्व रस एकजीव होतात. अग्निनारायण मदतीला असतोच. रंजक पित्त, पाचक पित्त, समान वायु, बोधक कफ हे मदत करीत असतात. त्या सर्वांचं एक मिश्रण तयार होते, आणि हळुहळू पुढे सरकू लागते. पोटाच्या म्हणजे जठराच्या अगदी सुरवातीला आणि शेवट असलेले दोन्ही दरवाजे बंद केले जातात. एकदा मिक्सर सुरू झाला की दरवाजे मधे उघडू नयेत.
आणि पोटाचे स्नायु उलट सुलट फिरू लागतात. म्हणजे मधेच उलट मधेच सुलट. अगदी पुरण यंत्राप्रमाणे, जेव्हा पुरण खाली पडायचे बंद होते तेव्हा मधेच दोन तीन वेळा उलट फिरवले की कसे, जाळीला चिकटून बसलेले पुरण कसे सोडवले जाते, तसे.
किंवा इमारतीला स्लॅबसाठी आवश्यक असलेले सिमेंट, वाळू, खडी, पाणी जसे अगोदरच ठरलेल्या प्रमाणात, त्या मोठ्या मिक्सरमध्ये घालून फिरवले जाते, आणि योग्य वेळानंतर दुसऱ्या बाजूला ओतले जाते, एक वेगळेच मिश्रण तयार झालेले असते.
अगदी तस्सच पोटात अन्नरस तयार झालेला असतो. त्यात अजूनही काही स्राव मिसळणे बाकी असते. हे पचन जिथे चालते त्या अवयवाचे नाव ग्रहणी असे आहे. पोट आणि लहान आतडे यांच्यामधे अर्धकंसाच्या ( आकाराचा हा अवयव असतो.
या अवयवाच्या दुष्ट होण्यामुळे किंवा अन्य दोषांच्या परिणामामुळे ग्रहणी नावाचा आजारही होतो, जो आजार चिकित्सेसह फक्त आयुर्वेदात वर्णन केला आहे.
कोण म्हणतं नावात काही नाही म्हणून ???
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.03.2017
March 28, 2017
विल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली.
October 16, 2021
अग्नि महत्वाचा !
'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !
पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.
हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )
सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.
एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.
गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.
एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.
अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !
विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.
अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !
घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.
काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.
आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.
एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.
वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !
मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.
आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
याला काय अर्थ आहे ?
आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
January 8, 2017
अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं
चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् |
हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं
मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖
कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत.
आद्यं - जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे प्रथम तत्व आहेत. आदि तत्व आहेत.
परं तत्त्वम् - जे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. अंतिम सत्ता आहेत.
अर्थं- जे खऱ्या अर्थाने प्राप्त करावी अशा प्रकारचे तत्व आहे. मिळवण्याचे अंतिम स्थान आहे. जीवाने शरण जाण्याचे परमश्रेष्ठ स्थान आहेत.
चिदाकारम्- ज्यांचे स्वरूप म्हणजेच काही चैतन्याचे प्रगटीकरण आहे. निर्गुण निराकार चैतन्याचा सगुण साकार अविष्कार आहेत.
एकं - ज्यांच्या समान अन्य कोणीही नाही. एकमेवाद्वितीय. अतुलनीय.
तुरीयं - तीन गुणांच्या अतीत असणारी चौथी समाधी अवस्था असणारे. सदैव त्याच अवस्थेत स्थिर असणारे.
त्वमेयम् -मेय म्हणजे मोजमाप. अमेय म्हणजे याचे मोजमाप करताच येत नाही असे. अपरंपार. अमर्याद.
हरिब्रह्ममृग्यं- हरी म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव यांच्याद्वारे मृग्य म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा शोध घेतला जातो असे.
पुराणकथेनुसार ज्यावेळी भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट होतात त्यावेळी भगवान विष्णू कासवरूपात खाली तर भगवान ब्रह्मदेव हंसरूपात वर त्यांचा शोध घेतात. पण त्या दोघांनाही यांच्या स्वरूपाचा अंतपार लागत नाही.
परब्रह्मरूपं- परब्रह्मस्वरूप असणारे.
मनोवागतीतं- मन आणि वाइनच्या आतीत असणाऱ्या, महःशैवमीडे - भगवान शंकराची मी स्तुती करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 11, 2020

सपुष्प वनस्पतींच्या मध्ये फुलांचे वेगवेगळे आकार, प्रकार, रंग, वास, अधिवास असतात. अगदी टाचणीच्या टोका पासून १-२ मीटर व्यास असणारी रेफ्लेशिया सारखी फुले बघायला मिळतात. त्यामध्ये ऑर्किडच्या फुलांची रंगविविधता, फुलांची आकर्षक रचना, मन मोहित करते. ऑर्किड फुलांची सौंदर्य, जटिलता आणि अविश्वसनीय विविधता वनस्पती जगात अतुलनीय आहे. या विदेशी सुंदरतेमध्ये पृथ्वीवरील फुलांच्या रोपांच्या सर्वात मोठ्या कुटूंबाचा समावेश आहे, त्यामुळे उच्चभ्रू लोकांच्या समारंभांमध्ये आवर्जून भेट देण्यात येणारे पुष्पगुच्छ असोत, पंचतारांकित हॉटेलमधील सजावट असो किंवा घरगुती गणपतींच्या मखरांमध्येही ऑर्किडच्या फुलांचा वापर वाढला आहे.
आपल्याकडील पश्चिम घाट ऑर्किडने समृद्ध असून, तेथे शंभरहून अधिक जंगली ऑर्किडच्या प्रजाती आढळतात. भारतात सर्वात ज्यास्त संख्येने ऑर्किड्स मेघालय व अरुणाचल प्रदेशात मिळतात.
सपुष्प वनस्पतींच्या ऑर्किडेसी या कुलातील ऑर्किड (आमर) ही एक वनस्पती आहे. अंटार्क्टिका तसेच वाळवंट सोडून सर्व वनप्रकारांमध्ये ऑर्किड आढळतात. उष्णकटिबंधात यांच्या अनेक जाती आढळत असून त्या अपिवनस्पती (दुसर्या वनस्पतींच्या आधारे वाढणार्या वनस्पती) आहेत. मात्र, त्या परजीवी नाहीत. समशीतोष्ण भागात ही वनस्पती जमिनीवर वाढते. काही ऑर्किड मृतोपजीवी असून त्या पर्णबुरशीसारख्या मृत सेंद्रिय पदार्थांवर वाढतात. अपिवनस्पती प्रकारातील या जातीची हवाई मुळे (roots) आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. ऑर्किडच्या जमिनीवर वाढणार्या जातींमध्ये आभासी कंद आढळतात. बहुतेक ऑर्किड वनस्पतींना लहान फुले येतात.
निसर्गाने निर्माण केलेल्या अनेक अद्भूत रहस्यांमध्ये फुलांचे विश्व नेहमीच मन आकर्षून घेते. रंगाने, आकाराने चटकन लक्ष वेधून घेणारी ही फुले म्हणजे निसर्गाचा चत्मकारच आहे. पावसाळ्यानंतर बहरणाऱ्या फुलांच्या ताटव्यांबद्दल लेखक, कवींनी विपुल लेखन केले आहे. अनेक नामवंत चित्रकारांची सुरुवात फुलांच्या चित्रांपासून झाली, अलीकडे हौशी फोटोग्राफरना विविधरंगी फुले म्हणजे हक्काचे ऑब्जेक्ट वाटते. ही मंडळी फुलांसाठी नवनवीन कल्पना लढवतात. पुराण काळापासून फुलांना धार्मिक महत्त्व असून, ती शुभकार्याचे प्रतीक मानली जातात. देशात फुलांच्या बाजारपेठेतील उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. त्यात ऑर्किड फुलांचा फार मोठा वाटा आहे. सध्या यांची निर्यातही करण्यात येते. ही पण मोठी संधी आहे.
स्थानिक भाषेत ऑर्किडला आमरी म्हणतात. महाराष्ट्र राज्यात ११० पेक्षा जास्त आमरींची नोंद झाली असून, दर काही वर्षांनी नवीन जाती सापडतात. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये वनसंपदेतील प्रचंड वैविध्य पहायला मिळते. सह्याद्रीच्या या पट्ट्यात ९० हून अधिक प्रकारची जंगली ऑर्किड पाहायला मिळतात. महाराष्ट्रात एंडेमिक (दुसरीकडे न आढळणाऱ्या) ४१ प्रजाती ह्या ३० जातीमध्ये विभागलेल्या आहेत. याशिवाय हबेनारिया च्या २० प्रजाती, डेंड्रोबियमच्या ११, प्रजाती आहेत. पावसाळा सुरू झाला की ऑर्किडचा हंगाम सुरू होतो आणि थंडीच्या अखेरपर्यंत ही फुले उपलब्ध होतात.
पारंपरिक फुलांच्या बरोबरीने गेल्या दहा ते बारा वर्षांत ऑर्किडच्या फुलांनी ग्राहकांच्या मनात घर केले आहे. रंगाने आकर्षक आणि अतिशय नाजूक अशी ही फुले ग्राहकांच्या चटकन नजरेत भरतात. सुरुवातीला ही फुले महाग असल्याने उच्चभ्रू वर्गापर्यंतच मर्यादित होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे ऑर्किडची शेती सुरू झाल्याने फुलांची उपलब्धता वाढली आहे. अलीकडच्या काळात ऑर्किड्स उतिसंवर्धनाने सुद्धा वाढवले जाते. सध्या देशात विक्री होणाऱ्या ऑर्किडमधील सत्तर टक्के फुले थायलंड आणि मलेशियातून येतात. आयात होणाऱ्या ऑर्किडच्या तुलनेत आपल्या कडील ऑर्किडचे उत्पादन अतिशय अत्यल्प आहे. गुजरात सरकारने अलीकडेच ऑर्किड उत्पादनासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, शहरातील इमारतींच्या गच्चीवर आता ऑर्किडची बाग लावण्यात येत आहे. याचाच परिणाम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुललेल्या बाजारपेठेत बघायला मिळाला. स्थानिक फुलांच्या बरोबरीने ऑर्किडची फुले, त्यांचे हार छोट्या फूलविक्रेत्यांकडेही उपलब्ध होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरात केलेल्या मखरांमध्ये ऑर्किडचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आगामी काळात ऑर्किड फूल जरबेरा आणि इतर परदेशी फुलांना मागे टाकेल, असे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.
ऑर्किडच्या चाहत्यांची संख्या वाढत असली तरी, सध्या बाजारात मिळणारे फूल हायब्रिड आणि विदेशी जातीचे आहे, हे अनेकांना माहितीच नाही. जगभरात ऑर्किडच्या असंख्य जाती आढळतात. त्यातील काही जातींना बाजारपेठेत स्थान मिळाले असून, अजूनही ९० टक्के ऑर्किडची फुले आजही जंगलातच पाहायला मिळतात.
या फुलांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतागुंत असून परागीभवन घडून येण्यासाठी विशिष्ट फुलपाखरे किंवा कीटक विशिष्ट प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होतात. ऑर्किडच्या २०० जातींमध्ये स्वयंपरागीभवन घडून येते. मात्र हवा किंवा पाणी यांच्यामार्फत त्यांचे परागीभवन होत नाही. ऑर्किडमध्ये कीटकांद्वारे परागीभवन घडून येते. फुलातील सामान्य व त्यापेक्षा अनेकविध आढळणारी जटिल संरचना परागकणाच्या या खात्रीच्या व काटकसर साधणाऱ्या पद्धतीशी सुसंगत असते. त्यापासून ऑर्किडचा पुढे फार मोठा बीजप्रसार व जातींचा प्रसार घडून आलेला आहे. या कुलातील अनेक वनस्पतींचे शोभेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. मात्र, या कुलातील फक्त व्हॅनिला ही जाती आर्थिक दृष्टया फायद्याची आहे. या जातीपासून मिळणारा व्हॅनिला हा सुंगधी अर्क आइस्क्रीममध्ये मिसळतात. जगभर ऑर्किडची लागवड हा एक हरितगृह उद्योग झालेला आहे. त्यामुळे ऑर्किडचे हजारो संकर निर्माण झाले असून त्याच्या बागा फुलविण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत.
उष्णकटिबंधात यांचे प्रमाण मोठे असून बहुतेक अपिवनस्पती आहेत. समशीतोष्ण कटिबंधात त्यामानाने प्रमाण कमी असून तेथे त्या भूमीवर वाढणाऱ्या असतात. अपिवनस्पती प्रकारातील जातींची हवाई मुळे आश्रयी वनस्पतींच्या सालीतील भेगांतून पाणी शोषून घेतात. तर जमिनीवरच्या जातींत कंद किंवा ग्रंथिक्षोड आढळतात. काही अपिवनस्पतींत आभासी कंद असतात. पाने साधी, जाडसर, लांबीत अधिक, मध्ये पन्हाळी व बहुधा दोन रांगांत असतात; क्वचित त्यांचा ऱ्हास होऊन ती खवल्यांसारखी होतात. व्हॅनिला नावाच्या जातीपासून (व्हॅनिला प्लॅनिफोलिया) मिळणारा व्हॅनिला नावाचा सुगंधी अर्क प्रसिद्ध आहे.
बर्याच वेगवेगळ्या वाढत्या परिस्थितीत फळ देणा ऱ्या ऑर्किडच्या अनेक प्रकारांसह, आपण पुरवू शकणार्या परिस्थितीस अनुकूल असलेल्या ऑर्किड शोधणे तुलनेने सोपे आहे – मग ते स्वयंपाकघरातील खिडकी किंवा पूर्ण आकाराचे ग्रीनहाऊस असले तरीही.
बहुतेक लागवड केलेले ऑर्किड मूळचे उष्णकटिबंधातील आहेत. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ते स्वतःला झाडाची साल किंवा इतर वनस्पतींच्या पृष्ठभागाशी जोडतात. त्यांचे जाड, पांढरे मुळे ओलावा आणि विरघळलेले पोषकद्रव्य शोषण्यासाठी विशेषतः अनुकूलित केले जातात. कारण या उष्णकटिबंधीय ऑर्किड सामान्यत: जंगलाच्या मजल्याऐवजी झाडे उंच वाढतात, परंतु ते चांगल्या हवेच्या अभिसरण आणि भरपूर प्रमाणात प्रकाश मिळवतात. त्यांना संपूर्ण वर्षभर १२-तासांचा दिवस आवडतो, आणि समशीतोष्ण प्रदेशांमधील मिडसमर परिस्थितीसारखेच – जास्त तीव्रतेच्या प्रकाशाची आवश्यकता असते.
ऑर्किड वाढण्यास कठीण आहे का?
हो, बऱ्यापैकी कठीण आहे. खरं तर, ऑर्किडचे डझनभर प्रकार आहेत आणि शेकडो संकरित आहेत, जे सनी विंडोसिल वर किंवा दिव्याखाली खाली वाढत आहेत.
ऑर्किड्स कसे वाढतात?
ऑर्किड्स सहसा दोन विस्तृत श्रेणींमध्ये विभागल्या जातात ज्या त्यांच्या वाढण्याच्या सवयींचे वैशिष्ट्य दर्शवतात. मोनोपोडियल ऑर्किड्समध्ये एकल, सरळ स्टेम असतो आणि पाने स्टेमच्या बाजूने एकमेकांच्या विरुद्ध अशी व्यवस्था असते. वरच्या पानांच्या पायथ्यापासून फुलांचा काटा दिसतो. या वाढीच्या सवयी असलेल्या ऑर्किडमध्ये फॅलेनोप्सीसचा समावेश आहे.
या ऑर्किड्स क्षैतिजरित्या वाढतात, जुन्या रायझोम वरून नवीन शूट तयार होते. नवीन शूटच्या शीर्षस्थानी पाने आणि फुलांचे स्केप्स तयार होतात. बर्याच सिमोडियल ऑर्किड्स स्यूडोबल्ब बनवतात. या वनस्पती दीर्घकाळापर्यंत दुष्काळापासून बचावासाठी पाणी आणि पोषकद्रव्ये साठवतात. सिम्पोडियल ऑर्किड्समध्ये फोरसिया, सायंबिडियम, ऑन्सीडियम आणि डेंड्रोबियम असतात.
ऑर्किड्सचे त्यांच्या मूळ वस्तीद्वारे देखील वर्गीकरण केले जाऊ शकते. हे ओर्चीड आढळले म्हणजे त्या भागातील तापमान, आर्द्रता आणि प्रकाश पातळी यांचे संकेत देते. फ्लेनोप्सीस आणि पॅफिओपेडिलम सारख्या आर्द्र उष्णकटिबंधीय मूळ ऑर्किड्स, दिवसाच्या तापमानात ७३°-७५° डिग्री फॅरनहाइट तापमान पसंत करतात, ज्यामध्ये आर्द्रता ८०-९० टक्के असते.
सिंबिडियम आणि डेन्ड्रोबियमसह उबदार-हवामान ऑर्किड्स सरासरी तापमान ५५°-७०° फॅ. आर्द्रतेचा स्थिर पुरवठा आणि चांगल्या हवेचे अभिसरण दर्शवतात. दक्षिणेकडील विंडोमध्ये ते सामान्यत: आनंदी असतात, तरी त्यांना उन्हाळ्याच्या काळात थोडेसे शेडिंगची आवश्यकता असू शकते. मासदेवॅलिया आणि एपिडेंड्रमसारख्या उच्च उंचीच्या ऑर्किड्स मेघालयाच्या जंगलात वाढतात जिथे सरासरी तापमान ५५°-ते ७०° फॅ असते आणि आर्द्रता खूप जास्त असते. हे ऑर्किड फिल्टर केलेले प्रकाश पसंत करतात जे जास्त तीव्र नसतात.
ऑर्किडची काळजी कशी घ्याल?
ऑर्किडच्या 30,000 वेगवेगळ्या प्रजातींसह सामान्य काळजी आणि लागवडीच्या सूचना देणे अशक्य आहे. तथापि, ऑर्किड कसे दिसते ते प्रकाश, पाणी आणि वाढत्या माध्यमासाठी त्याच्या प्राधान्यांचा संकेत देऊ शकतो.
जर त्या झाडाला काही पाने किंवा चामड्याची पाने (बहुतेक फ्युसिया आणि ऑन्सीडिअम प्रमाणे) असतील तर त्या झाडाला जास्त प्रकाशयुक्त वातावरण हवे असेल. जर पाने मऊ आणि कोमल असतील (काही फॅलेनोप्सीस आणि बहुतेक पेफिओपिडिलम सारखे) तर झाडे बहुधा हलके-संवेदनशील आहेत आणि त्यांना दक्षिणेस तोंड असलेल्या खिडकीवर ठेवू नये.
जर ऑर्किडमध्ये चरबीयुक्त स्यूडोबल्ब असतील तर ते थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. अशी झाडे लाव्हा (lava) खडकाच्या खडबडीत भागांवर वाढवावे. जर ऑर्किडला स्यूडोबल्ब नसतील तर त्याला वारंवार पाण्याची गरज भासू शकते, किंवा स्फॅग्नम मॉस सारख्या अधिक आर्द्रतेने वाढणार्या माती मध्ये पीक घ्यावे.
प्रकाश:
सामान्य नियम म्हणून, ऑर्किड हलक्या प्रकाशाच्या सहवासात वाढतात. उत्कृष्ट परिणामांसाठी, त्यांना वर्षाकाठी १२-१४ तासांचा प्रकाश मिळाला पाहिजे. उष्णकटिबंधीय वातावरणात, नैसर्गिक प्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता समशीतोष्ण हवामानात बदलत नाही. या कारणास्तव, हिवाळ्यातील महिन्यांत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम प्रकाश पुरवला पाहिजे.
दक्षिण-आणि पूर्वेकडे असलेल्या खिडक्या सामान्यत: ऑर्किडसाठी सर्वोत्तम स्थान असतात. पश्चिम खिडक्या खूप गरम असू शकतात आणि उत्तर खिडकी सहसा खूप गडद असतात. आपल्याकडे आपल्या ऑर्किडसाठी विंडोसाठी चांगले स्थान नसल्यास, ते कृत्रिम दिव्याखाली वाढण्यास आनंदी असतील. चार फूट फ्लूरोसंट बल्बच्या संचापासून आर्किड ६ ते ८ इंचा पेक्षा जास्त अंतरावर स्थित असावेत. फक्त पांढरे, कोमट पांढरे आणि फिकट बल्ब वाढविण्याच्या फायद्यांविषयी मतभिन्नता आहे. नवीन पूर्ण-स्पेक्ट्रम बल्ब बहुदा सर्वात चांगली निवड आहे. टेफ्रियल ऑर्किड्स, जसे पेफिओपीडिलम्स आणि काही सिम्बिडीयम्स, मातीमध्ये वाढतात.
परंतु बहुतेक उष्णकटिबंधीय ऑर्किड्स एपिफाइट्स असतात, याचा अर्थ ते मातीऐवजी हवेत वाढतात. त्यांच्या मांसल मुळांना वेलामेन नावाच्या पांढऱ्या पेशींच्या थराने झाकलेले असते, जे पाणी शोषण्यासाठी स्पंज म्हणून कार्य करते. कोटिंग देखील मुळे उष्णता आणि ओलावा कमी होण्यापासून वाचवते.
ऑर्किड वाढणार्या माध्यमामध्ये हवेचे अभिसरण चांगले असणे आवश्यक आहे आणि पाणी लवकर निथळण्याची सोय आवश्यक आहे. यास मुळांना चिकटून राहण्यासाठी काहीतरी सुरक्षित सोय असावी. ऑर्किडच्या प्रकारानुसार, ते पीट मॉस, त्याचे लाकूड, झाडाची साल, वाळलेल्या फर्न मुळे, स्फॅग्नम मॉस, रॉक लोकर, पेरलाइट, कॉर्क गाळे, दगड, नारळ फायबर, लावा रॉक किंवा या मिश्रणामध्ये बरीच मिश्रित सामग्री तयार करतात. काही एपिफायटीक ऑर्किड्स ट्री फर्न किंवा कॉर्कच्या स्लॅबवर देखील वाढवले जाऊ शकतात.
पाण्याची व्यवस्था कशी असावी?
बहुतेक ऑर्किड जास्त प्रमाणात ओलावा सहन करण्यापेक्षा दुष्काळ सहन करतात. ऑर्किडला पाण्याने भांड्यात बसण्यापेक्षा काहीही जलद मारत नाही. पुरेसे हवा अभिसरण न करता, वनस्पती गुदमरल्यासारखे मरेल.
ऑर्किड्सचा प्रसार:
बियाण्यापासून ऑर्किडचा प्रचार करणे फार कठीण आहे. इतर वनस्पतींच्या बियासारखे नाही, ऑर्किड बियाण्यांमध्ये पौष्टिक संचय उती नसतात.
बर्याच ऑर्किड वर्षातून एकदा फुलतात, परंतु जर त्यांची नीट निगा घेतली तर अधिक वेळा फुलतील. जर आपल्याला एखाद्या विशिष्ट हंगामात फुलणारी ऑर्किड हवी असेल तर त्या वेळी बहरलेली एखादी वनस्पती खरेदी करणे सर्वात चांगले. जेव्हा ऑर्किड फुलते तेव्हा ते सहसा सहा ते दहा आठवड्यांपर्यंत पूर्ण उमलते.
प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी पश्चिम घाटातील ऑर्किडची सविस्तर माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. त्याबद्दल डॉ. पांडे म्हणतात, ‘पश्चिम घाटात ऑर्किडचे वैविध्य मोठे आहे. जमिनीवर येणारी तसेच झाडांवर येणारी दोन्ही प्रकारची फुले आपल्याला तिथे बघायला मिळतात. पुणे परिसरात, लोणावळा, खंडाळा, मुळशी, ताम्हिणी, पुरंदर या भागात उत्तम प्रकारची ऑर्किड फुलतात. तसेच कोल्हापूर भागात गगनबावडा , पाटगाव, आंबोली, फोंडा घाट, आंबा घाट या परिसरातही वैविध्यपूर्ण ऑर्किड सापडतात.
अशी बहुरंगी ऑर्किड्स कोणाला आवडणार नाहीत बरे?
संदर्भ:
मराठी विकिपेडिया - डॉ. वा .द, वर्तक
गुगल वरील अनेक लेख
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
९.०६. २०२४
______________________________________________________
July 31, 2024
दशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे ! परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे
July 13, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti