वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयपीएल क्रिकेटचे वस्त्रहरण करून त्यामागचे बटबटीत नग्न सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न आम्ही या लेखांतून केला आहे.
June 9, 2010
मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
August 14, 2015
राघोबा दादांनी नारायणला ‘धरावे’ असा आदेश गारद्यांना दिला आणि आनंदीबाईंनी ‘ध’चा ‘मा’ करीत पेशव्यांच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट प्रकरणाला जन्म दिला. केवळ अक्षर बदलले आणि शनिवारवाड्याच्या भिंती कोवळ्या, निष्पाप नारायणाच्या रक्ताने न्हाऊन निघाल्या. एखादे अक्षर, एखादा शब्द किंवा एखादे वाक्य!
December 26, 2004
नमन माझे आद्यकवीला । रामायण ग्रंथ रचित्याला ।।
प्रतिभावंत कवि अवतरला । ह्या जगती ।।१।।
रामायणासारखा ग्रंथ । श्रेष्ठत्व मिळे ह्या जगांत ।।
अप्रतीम ते काव्य होत । कवि श्री वाल्मिकीचे ।।२।।
महाकवि वाल्मिकी । जीवन ज्याचे सार्थकीं ।।
प्रभूचरणीं अर्पित मस्तकी । इतिहास घडविला ।।३।।
सरस्वति प्रसन्न झाली । लेखणीतून अवतरली ।।
महान काव्य रचना झाली । वाल्मीकीकडून ।।४।।
कमळ उपजे चिखलांत । तैसा हिरा कोळशात ।।
अज्ञानासी ज्ञानी बनवित हिच लिला प्रभूची ।।५।।
वाल्याचा वाल्मिकी झाला । अज्ञानाचा ज्ञानी बनला ।।
विश्वामध्ये महाकवी ठरला । कथा त्याची ऐकावी ।।६।।
वाल्या कोळ्याची कथा । बनत असे जीवन गाथा ।।
आदर्श त्याचा चित्तीं ठेवता । सर्व जनांनी ।।७।।
वाल्याकोळी होता क्रूर । छंद त्याचा लूटमार ।।
चालवित असे परिवार । दुसऱ्याच्या धनावरी ।।८।।
चोरी लबाडी हा धंदा । खून करी तो अनेकदा ।।
पर धनावरी नजर सदा । वाल्याची असे ।।९।।
त्राही करूनी सोडिले । सर्वासी दु:ख दिले ।।
निर्दयतेनें दुसऱ्यांसी छळले । वाल्या कोळ्याने ।।१०।।
नारद मुनींची स्वारी । जात असता रस्त्यावरी ।।
वाट तयांची रोखूनी धरी । वाल्या कोळी ।।११।।
मागू लागला खंडणी । वाट त्याची अडवूनी ।।
चकीत झाले नारदमुनी । वाल्याकडे बघती ।।१२।।
नारायण नाम मुखी । होत आसे सदा सुखी ।।
थांबविता हरीनाम एकाएकी । नारद विचारी ।।१३।।
असूनी गरीब ब्राह्मण । नसे मजजवळी धन ।।
टाळ चिपळ्या नि नारायण । हीच माझी संपत्ती ।। १४ ।।
प्रभूची भक्ती । हीच माझी शक्ती ।।
कसे देवू धनाती । नारद बोलले ।। १५।।
वाल्यासी हवे धन । काय त्यासी जाण ।।
कसे ओळखी ते महान । तत्त्वज्ञान जिवनाचे ।।१६।।
नारद पुसतां वाल्याला । कां ठेविसी लोभ धनाचा ।।
करित असे पाप कर्माला । मिळविण्या ते धन ।। १७ ।।
धनामाजी सुख समजसी । लुटूनी ते स्वकीयांस वाटसी ।।
आनंदी तयांनी करिसी । पर धनाने ।।१८।।
सुखाचे सारे सोबती । परि पाप तूंच भोगती ।।
कुणी न देई संगती । तुझ्या कुकर्मात ।।१९।।
धनाजवळी सारे जमती । दु:खामध्ये साथ न देती ।।
सर्व स्वार्थी आसती । सगे सोयरे ।।२०।।
पुण्याचे असती वाटेकरी । पाप पडते तुझ्याच पदरीं ।।
हीच असे रीत खरी । जीवनाची ।।२१।।
तुझ्या कर्माचे फळ । भोगसी येतां वेळ ।।
दु:खमय वाटे तो काळ । विचार करावा मनीं ।। २२।।
कुणी न असती नाते गोते । मित्रमंडळीहि दूर जाती ।।
वाटेकरी नसती पापा तें । तुझ्या कर्माच्या ।। २३ ।।
मानव जन्म मिळाला । कां दवडिसी आयुष्याला ।।
सोडूनी घ्यावे लोभाला । प्रभूसी शरण जावे ।। २४।।
धनी न व्हावे पापाचे । सार्थक करावे जीवनाचे ।।
स्मरण ठेवावे प्रभूचे । अविरत ।। २५।।
विवेक जागृत ठेवावा । अज्ञानाचा पडदा फाडावा ।।
ज्ञानाग्री प्रज्वलित करावा । हेच सार्थक जीवनाचे ।। २६।।
अंतर्यांमी करावा विचार । उघडावे ज्ञान भांडार ।।
विचारांना द्यावा आकार । स्मरण करूनी प्रभूचे ।। २७ ।।
विवेकाच्या गोष्टी चार । वाल्याच्या बिंबती मनावर ।।
नारदासी करी नमस्कार । गुरू समजूनी ।।२८ ।।
पश्चाताप झाला मनी । आयुधे दिली टाकूनी ।।
शरण जाई वाकूनी । नारदा समोरी ।।
अंधकार नष्ट झाला । अंतर्यामी प्रकाश पडला ।।
जागृती झाली मनाला । वाल्याच्या ।। ३० ।।
नारदासी वंदन केले । गूरुमंत्र देण्या विनविले ।।
आशीर्वाद तयाचे मागितले । वाल्या कोळ्यांनी ।। ३१।।
रामनाम मुखे घ्यावे । चिंतन त्याचे करावे ।।
अंतर्मनी भक्ती ठेवावे । श्री रामाची ।।३२ ।।
वाल्यास उपदेश देवूनी । नारद गेले निघूनी ।।
ज्ञानाचा अग्नी पेटूनी । वाल्याचे चित्ती ।। ३३।।
राम नामाचा जप । घेऊन करावे तप ।।
पेटवावा ज्ञानदीप । हाच उपदेश नारदाचा ।।३४ ।।
तपश्चर्या करण्यासी । बैसला झाडापासी ।।
जपे राम नामासी । मनोभावे ।। ३५।।
राम नामाचा जप सतत । देहाचे भान जात ।।
पाला-पाचोळा जमत । शरीराभोवती ।।३६।।
पाला पाचोळा वर । मातीचे पडती थर ।।
वारूळाचा मिळे आकार । वाल्या देहा भोवती ।।३७।।
मातीचे ढीग जमूनी । देह जाय झाकूनी ।।
परी नाम मुखे घेवूनी । भक्ती केली प्रभूची ।।३८।।
परत नारद जात असता । स्तब्ध झाले राम नाम ऐकता ।।
वारूळातूनी राम नाम येतां । चकीत झाले ।।३९।।
दूर सारतां माती । आंत वाल्यासी बघती ।।
आश्चर्य चकीत होती । नारदमुनी ।।४०।।
वाल्यासी बघती ध्यानस्त । डोळे नी मुख बंदीस्त ।।
झाला देह रामनामस्थ । रोम रोम हुंकार देयी ।।४१।।
रामनामाचा हुंकार । देवू लागले शरीर ।।
कवच राम नामाचे वर । रक्षण करी देहाचे ।।४२।।
झाला वाल्या राममय । तपसामर्थ्य महान होय ।।
आशिर्वादूनी नारद जाय । वाल्यासी ।।४३।।
अपूर्व इच्छाशक्ती । जागृत झाली प्रभू भक्ती।।
रात्र-दिनी नाम घेती । मनोभावे ।। ४४।।
नामाचा महिमा आगाळा । भक्तीची साथ मिळता त्याला ।।
पाशानही लागती तरंगण्याला । पाण्यावरी ।। ४५।।
प्रभू नामाचे मोठेपण । तपोबल त्यासी मिळोन ।।
जात असे उद्धरून । आपल्या जीवनी ।। ४६।।
पाहूनी त्याची भक्ती । राम नामाची शक्ती ।।
प्रभू आशीर्वाद देती । वाल्या कोळ्यास ।। ४७।।
सत्य आणि तप । प्रज्वलित करी ज्ञानदिप ।।
अज्ञानाचा होई लोप । ज्ञानाग्री पेटतां ।। ४८।।
प्रसन्न झाली सरस्वती । त्याचे चित्ती ज्ञान देती ।।
अंतर्मयी प्रकाश पाडती । वाल्याच्या ।। ४९।।
करविता धनी । आसे तो कुणी ।।
घ्यावे तुम्ही जाणोनी । हीच प्रभूची लिला ।। ५०।।
***
ऐके दिनी सकाळी । जात वाल्मीकी अंघोळी ।।
क्रौंच पक्षाची जोडगोळी । बघे झाडावरी ।। ५१।।
रास क्रीडा बघून । आनंदले मन ।।
जात असे विसरून । स्वत:सी ।।५२।।
क्रौंच पक्षावर । मारीला तो तीर ।।
समजोनी शिकार । एका पारध्याने ।।५३।।
लागता तीर माथी । तत् क्षणी पडला धरतीं ।।
गतप्राण होवून जाती । एक क्रोंच पक्षी ।।५४।।
आनंदी पक्षी होते । एक गमवी प्राणाते ।।
विरह मिळे दुसऱ्याते । विचित्र झाली घटना ।।५५।।
सारे अघटित घडले । दु:खाश्रू नयनी आले ।।
चित्त भावनावश झाले । वाल्मीकीचे ।।५६।।
शब्द पडले मुखातूनी । भावनेस आकार देवूनी ।।
काव्यमय वाक्य होवूनी । प्रथम कविता जन्मली ।।५७।।
शारदा अवतरली काव्यातून । वाल्मीकेच्या वाणीतून ।।
आद्य कवी त्यास बनवून । मान मिळे ।।५८।।
( कवी वाल्मीकीचे प्रथम शब्द मा निषाद प्रतिष्ठां त्वमगत: शाश्वती समा: ।। यत्क्रौंच मिथुनादेकमवधी : काम मोहितम ।।
अर्थ – निर्दय पारध्या । त्या सुखी क्रौंच पक्षाला मारून त्याच्या स्त्रिला विपत्तीत लोटलेस, या पातकाबद्दल तू शंभर वर्षे नरक यातना भोगशील .)
चेतना जागृत झाल्या । विचार लहरी उमटल्या ।।
लेखणीतून वाहू लागल्या । वाल्याच्या ।।५९।।
विचारांचा धबधबा । झेप घेता नभा ।।
बनूनी एक प्रतीभा । महाकाव्य झाले ।।६०।।
ज्ञानाची गंगोत्री । पावन करी धरत्री ।।
सागर त्याचा बनती । रामायण रूपे ।।६१।।
महाकाव्य रामायण । वाल्मीकीचे अपूर्व देण ।।
हेच खरे त्याचे धन । मिळविले असे ।। ६२ ।।
वाल्याचा वाल्मीकी झाला । महाकवी मान मिळविला ।।
लोखंडाचे सोने बनला । परिसामुळे ।।६३।।
शुद्र आणि लहान । तोही मिळवितो मोठेपण ।।
इच्छा शक्ती महान । पाहीजे तेथे ।।६४।।
मार्ग सदाचे असती । परी अज्ञानाने न दिसती ।।
विवेक ज्ञानाची संगती । ध्येय देयी गाठूनी ।।६५।।
तुमचा गुरू अंतरमनी । त्यास घ्यावे समजोनी ।।
का शोधता बाहेरूनी । वाया जाई आयुष्य ।।६६।।
वाल्मीकी ऋषींचे काव्य । रामायण ग्रंथ दिव्य ।।
प्रतीभा ती भव्य । स्फूर्ती देयी सर्वांना ।।६७।।
रामायण ग्रंथ थोर । आदर्श जीवनाचे सार ।।
सार्थकी आयुष्याचे द्वार । तुम्ही उघडावे ।।६८।।
।। शुभं-भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१०- ३११०८३
January 14, 2018
लावण्याधिकभूषिताङ्गलतिकां लाक्षालसद्रागिणींसेवायातसमस्तदेववनितां सीमन्तभूषांन्विताम्।
भावोल्लासवशीकृतप्रियतमां भण्डासुरच्छेदिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।६।।
लावण्याधिकभूषिताङ्गलतिकां- लावण्या मुळे जिची अंगलतिका अधिकच सुशोभित झाली आहे अशी.
सौंदर्य म्हणजे अवयवांचे प्रमाणबद्ध स्वरूप. त्याने व्यक्ती सुंदर दिसते. मात्र ही प्रमाणबद्धता लहान लेकरा पासून वृद्धा पर्यंत असू शकते. तारुण्याच्या काळात त्यात येणारे विशेष आकर्षण म्हणजे लावण्य. आधीच अत्यंत सुंदर असणारी आईची अंगयष्टी या तारुण्यागत लावण्याने अधिकच सुंदर दिसत आहे.
लाक्षालसद्रागिणीं- हाताला आणि पायाला लावण्याचा लाल रंगाचा अळिता म्हणजे लाक्षारस. त्याने अधिकच शोभून दिसणारी.
सेवायातसमस्तदेववनितां- समस्त देवतांच्या वनिता म्हणजे स्त्रिया, जिच्या सेवेकरिता आलेल्या आहेत अशी. सीमन्तभूषांन्विताम्- सीमा म्हणजे भांग. त्यात सौभाग्याचे प्रतीक म्हणून शेंदूर लावल्याने अधिक सुंदर दिसणारी. परम सौभाग्यसंपन्न.
भावोल्लासवशीकृतप्रियतमां- भाव अर्थात आपल्या हावभावाने, उल्हासाने, आपल्या प्रियतम भगवंताला वशीभूत करणारी. भण्डासुरच्छेदिनीं- पुराणामध्ये आलेल्या कथेनुसार भगवान कामदेवांच्या भस्मातून भंडासूर नामक राक्षस निर्माण झाला. भगवान शंकरांच्या
वरदानाने उन्मत्त झालेल्या राक्षसाचा विनाश आई जगदंबे केला. त्यामुळे तिला भण्डासुरच्छेदिनीं असे म्हणतात.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई भ्रमरांबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 8, 2020
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो.
November 1, 2017
गणपतीच्या पारंपारिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.’अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे.
July 1, 2025
झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात.
December 23, 2016
सकाळचे वर्तमान पत्र उघडताच भ्रष्टाचाराच्या बातम्या ह्याची पण आपणास सवय झाली. प्रत्येक जण त्यां बद्दल बोलतो पण सध्याच्या बिघडलेल्या परिस्थिती मध्ये कोणीही कसलेही पाऊल उचलणयास धजत नाही.
भ्रष्टाचार हा काहीं भारतातच आहे असे नाही तर सबंध जगात तो बोकाळ लेला आहे. जर का देशाची प्रगती सर्वांगीण साधायची असेल तर सरकारला भ्रष्टाचार रुपी राक्षसास समूळ नष्ट करावे लागेल. त्या साठी काहीं कठोर पावले उचलावी लागतील तसेंच वेळ पडल्यास स्वकीयावर कारवाई करण्यास कुचराई करतां कामा नये .
गेली ६० वर्षे आपण बघतो आहोत कि हा भ्रष्टाचार रुपी राक्षस असा वाढला कि त्याला मारणे किवां काबूत ठेवणे पण कठीण होऊन गेले. ह्या चें मुळ कारण देश भक्ती,सदाचार, सच्चेपणा, निष्कलंकता , आत्मीयता ,जिव्हाळा,तसेंच निस्वार्थ बुद्धी अशा सर्वच गुणांचा झालेला ऱ्हास.सध्याची बदललेली राजकीय समीकरणे , राजकीय नेते,सरकारी अधिकारी,प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष व ईतर उच्च पदावर असलेले प्रतिष्ठीत ह्या सर्वांची स्वहित जपण्याची प्रवृत्ती त्यामुळे सगळीकडे भ्रष्टाचार माजलेला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सरकारी क्षेत्रात पारदर्शकता व आकाउंटीबिलीटी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहे ती जर अमलात आणली तर, हा भ्रष्टाचार चा राक्षसास समाप्त करणे कठीण जाणार नाही.जगात अशी पण उदाहरणे आहेत कि जेव्हा भ्रष्टाचाराचा विळखा सर्वत्र पसरला तर जनतेस जगणे अशक्य होऊन जाते तेव्हां ,जनतेचा राग कोणीही थांबू शकणार नाही. सर्व भ्रष्टाचारी मंडळींची काय गत होईल ते देवच जाणे.
भारतीय जनता फारच शोशिक आहे पण कां एकदा त्याचा अंत झाला कि मग परिस्थिती काहीं वेगळीच होईल. तेव्हां सर्व राजकर्त्यांनी,सरकारी अधिकारि,आणि उच्च पदस्थ लोकांनी वेळीच सावध होऊन स्वहित जपणे सोडले पाहिजे नसता लोक क्षोभास समोरे जावे लागेल हें पक्के.
भारत सरकारने मग ते कोणत्याही पार्टीचा कां असेना UNO convention against curruption चा ठराव कडकरीत्या आमलात आणले पाहिजे व आपल्या राजकारणी नेत्यांनी " स्वहित " बाजूला सारून किवां त्यागून जनतेच्या भल्यासाठी ,देश प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्या कामात पारदर्शकता, जवाबदारी च्या भावनेनी वागले पाहिजे नसता पुढचा काळ त्यांचा अंधारमय होईल.
जगातील काहीं देशांनी आपला कारभारात पारदर्शकता व जवाबदारीने करून आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर आणल्याची उदाहरणे आहेत. डेन्मार्क,न्यूझीलंड,आणि सिंगापोर ह्या देशांनी कठोर कारवाई, पारदर्शकता,जवाबदार वृतीने काम करून भ्रष्टाचाराचा नाश करून जागतिक क्रमवारीत वरच्या कृमंकावर जाऊन पोहचली आहेत. ह्या वरून असे दिसून येते कि स्वछ राज्य कारभार, लोक उपयोगी कामे, आत्मीयता,आणि देशासाठी समर्पण भावना ठेऊन राष्ट्र हिताची कामे केली तर टप्या , टप्याने भ्रष्टाचार रुपी राक्षसाचा नाश करणे साध्य होईल.
वर उध्रत केल्या प्रमाणे जागतिक भ्रष्टाचारचा आलेख व क्रमवारी Transparancy International ह्या संथेने जगातील १७८ राष्ट्राचा अभ्यास व पडताळणी करून एक अहवाल तय्यार केला आणि त्यांत सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे व सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे ह्यावरून त्यांनी सर्व देशाची क्रमवारी केली. कोण कोणती राष्ट्रे किती भ्रष्टाचारी आहेत ते ० ते १० यां माप पट्टी ने मोजून क्रमवारी दिली आहे. आपणा साठी तो आलेख व माप पट्टी कृमांक देत आहे. ह्या क्रमवारीत भारत देश ( इंडिया ) ८६ कृमंकावर आहे व माप पट्टी मध्ये भ्रष्टाचार मोजणी ३.३ आहे.
आपण आशा करुया कि भारतीय राजनीतिक नेते ह्या पासुन काहीं शिकतील व आपला देश पण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त होईल.
-- मा.ना. बासरकर
February 23, 2011
२०१९ च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.
August 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti