वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते.
आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्यामागच्या काही सवयींविषयी सांगत आहोत.
लघवी रोखणे
जर तुम्ही जास्त प्रमाणात लघवी रोखून धरत असाल तर ही सवय तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे.
यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते आणि किडनी खराब होते.
यामुळे लघवी कधीही दाबून ठेवू नये.
पाणी कमी पिणे
जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पीत असाल तर किडनीला रक्त शुद्ध करण्यासाठी लिक्विड लागते ते पर्याप्त प्रमाणात मिळणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये जमा झालेली घाण तुमच्या शरीरातच राहील.
यामुळे निश्चितच तुमची किडनी लवकर खराब होऊ शकते.
मीठ जास्त खाणे
शरीराला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मीठ म्हणजेच सोडियमची आवश्यकता असते.
जर तुम्ही फळ, भाज्या नियमितपणे खात असाल तर त्यामधून तुम्हाला पर्याप्त प्रमाणात हे तत्व मिळते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचे ब्लडप्रेशर वाढेल आणि किडनीवर अतिरिक्त दबाव टाकेल.
दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम घेऊ नये.
कोल्ड्रिंक्स
जर तुम्ही कोल्ड्रिंक्स पीत असाल तर हे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी किती घातक ठरते याचा तुम्हाला अंदाज नसेल.
जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्यास तुमच्या शरीरातील प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडते. याचा अर्थ तुमची किडनी त्यावेळी योग्यप्रकारे काम करत नाहीये किंवा डॅमेज झाली आहे.
पूर्ण झोप न घेणे
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा किडनीच्या नवीन पेशींचे नवनिर्माणहोते.
यामुळे तुम्हाला पूर्ण आणि शांत झोपेची आवश्यकता असते.
जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर या क्रियेमध्ये बाधा निर्माण होईल आणि तुमच्या किडनीवर याचा वाईट प्रभाव पडेल.
मांसाहार
मांसाहार केल्यामुळे किडनीच्या मेटाबॉलिज्मवर जास्त दबाव पडतो.
जर तुम्ही आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर याचा अर्थ तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागेल.
जे भविष्यात तुम्हाला विविध अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.
दारू आणि सिगरेट
जास्त प्रमाणात आणि नियमितपणे सिगरेट, दारू सेवन करणे तुमच्या लिव्हर आणि किडनीवर अत्यंत वाईट प्रभाव टाकतात.
या सवयी तुम्हाला मृत्युच्या खूप जवळ घेऊन जातात.
आहारात पोषक तत्वांची कमतरता
आहारामध्ये ताजे फळ, भाज्या असणे किडनी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप आवश्यक आहे.
किडनी फेल आणि स्टोन होण्यामागे मुख्य कारण आपल्या आहारातील मिनिरल्स आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आहे.
मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत.
डॉ.प्रवीण भा. रेडकर
M. Ch Urology
मुत्रविकार तज्ञ,
युरोकेअर हॉस्पिटल, मुंबई
January 18, 2017
शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी
नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी ।
तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी
सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥
आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी.
चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या दोन्ही रूपात नटलेली.
ज्योतिर्मयी- ज्योती अर्थात तेज स्वरूपिणी.
वाङ्मयी- वाणी स्वरूप असलेली. मानवी विकासाचा महान बिंदू आहे वाणी. विचार तर पशूच्या मस्तकात देखील असतात. पण त्याचे सुयोग्य प्रगटीकरण केवळ बुद्धीमंताला करता येते. वाणी या स्वरूपात या विकासाचा श्रेष्ठबिंदू असणारी.
नित्यानन्दमयी- अखंड आपल्याच आनंदात असणारी. निरञ्जनमयी- अंजन म्हणजे काजळी. मळ. घाण. याचा लवलेश देखील नसलेली. परम शुद्ध.
तत्त्वंमयी - शास्त्रात परब्रह्मालाच तत्व असे म्हणतात. परब्रह्मस्वरूपिणी.
चिन्मयी - चैतन्य अर्थात तेज, ज्ञान हेच जिचे स्वरूप आहे अशी.
तत्त्वातीतमयी- शास्त्रात अन्न, प्राण आदी गोष्टींना देखील विवेचना पुरते ब्रह्म म्हणजे तत्व म्हटले जाते. अशा सर्व तत्त्वांच्या अतीत असणारी. परमतत्त्व स्वरूपिणी.
परात्परमयी - पर म्हणजे श्रेष्ठ. सगळ्या श्रेष्ठ गोष्टींमध्ये देखील परमश्रेष्ठ.
मायामयी - विश्वाला संचालित करणाऱ्या माया रूपात लीला करणारी.
श्रीमयी- श्री म्हणजे वैभव. शास्त्रामध्ये ऐश्वर्य, वीर्य,यश,श्री, ज्ञान आणि वैराग्य या सहागोष्टींना षडैश्वर्य असे म्हणतात. या सगळ्या रूपात लीला करणारी.
सर्वैश्वर्यमयी- सर्व प्रकारच्या वैभवांनी युक्त .
सदाशिवमयी - भगवान सदाशिव यांची सहधर्मचारिणी. अतीव पवित्र.
मां पाहि मीनाम्बिके - हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
जय श्री मीनाक्षी !
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 1, 2020
त्यांचं वेड जगावेगळंच ,
अनाकलनीय आहे सगळंच.
विचार वेगळा वेगळंच जगणं,
कृतीत प्रत्यक्ष, न पोकळ बोलणं.
September 8, 2022
देशात कुठे अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाला, हत्या झाली की काही दिवस प्रिंट मिडिया पासून ते इलेक्ट्रोनिक मिडीयात डॉक्टर, मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकांच्या मुलाखती आणि चर्चा सत्र रोज झडत असतात पण त्या बाबतचे ठोस पाऊल ना शासन, एनजीओज् आणि शाळा/कॉलेजेस उचलताना दिसतात किंवा त्या बाबत एखादा पाठ/लेसन/धडा त्यांच्या पाठ्यपुस्तकात असतो.
February 28, 2015
विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे.
April 13, 2022
… आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ निकाल पुनःस्थापित केला.
August 20, 2010
इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते.
September 23, 2023
ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन करायची ताकद चांगली आहे, पण ताण सहन करायची ताकद नाही.
January 31, 2023
आदर्श परिस्थितीत प्रत्येक शैक्षणिक धोरण चांगलेच असते, त्याचा निकाल लावणे हे राबविणारऱ्यांच्या हातात असते. आता सरसकट पास करण्याचे धोरण बंद होणार. केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा साठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
December 28, 2024
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती अथवा शंकराची पिंड काढून देणारे बाबा म्हणून काहीसे संशयाचे अथवा विस्मयाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर त्यांनी स्थापन केलेली सेवाकार्ये, शिक्षण, आरोग्य, ग्रामसुधार आदी क्षेत्रांमधील कामांमुळे तसेच मोठमोठय़ा दानांमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. आपण शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे अवतार आहोत, असे जाहीर केलेल्या सत्यसाईबाबांचे अनुयायी अक्षरश: जगभर पसरले होते.
भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत होते. सत्यसाईबाबांची बहुतांश सेवाकार्ये आंध्र प्रदेशात आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे. त्यांची संपत्ती ४० हजार कोटी ते तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सत्य साईबाबा यांचे निधन २४ एप्रिल २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
November 23, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti