(User Level: User is not logged in.)

मनोरंजन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी चित्रपटसृष्टीचे ‘महाखलनायक’ निळू फुले : गाजलेले चित्रपट, अजरामर संवाद

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी नावे आहेत, ज्यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. या यादीत सर्वात अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे ‘निळू फुले’. भारदस्त आवाज, डोळ्यांतील तीक्ष्ण भाव, चेहऱ्यावरील हुशार आणि धूर्त हावभाव आणि संवादफेकीची अफाट शैली यांच्या जोरावर निळू भाऊंनी तब्बल चार दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या जिवंत असायच्या की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचा. हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा विजय होता.

  • भारतीय संगीतसृष्टीचा अजरामर सुवर्णकाळ: एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांचा सांगीतिक प्रवास

    भारतीय संगीतसृष्टीचा अजरामर सुवर्णकाळ: एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांचा सांगीतिक प्रवास

    भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात बर्मन घराण्याचे योगदान अतुलनीय आहे. वडील सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) आणि मुलगा राहुलदेव बर्मन (आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा) या पिता-पुत्राच्या जोडीने मिळून भारतीय संगीताला पारंपारिक लोकसंगीताच्या सुरांपासून ते आधुनिक पाश्चात्य फ्युजनपर्यंतचा एक विहंगम प्रवास घडवून आणला. निसर्ग, अथांग सागर आणि मानवी भावनांचा मिलाफ या पिता-पुत्राच्या गाण्यांमध्ये प्रकर्षाने जाणवतो.

  • अभिजात संगीत नाटकांकडे

    मला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.

  • जन्म दिला मज ज्यांनी

    माझ्या वडिलांचं नाव गडबडनाथ. हे नाव ऐकायला जरा हटके आणि थोडंसं विनोदी वाटतं. ते कसं व का ठेवण्यात आलं याचा खुलासा- किस्सा मला आजीकडून समजला तो असा की, त्या दिवशी घरात श्राद्धाची गडबड होती. सर्वजण धावपळीत होते. या गडबडीत माझ्या वडिलांचा जन्म झाला म्हणून गडबडनाथ ! माझ्या आजोबांना चार मुलं ! गडबडनाथ, त्रिंबकनाथ आणि छोटू (याचं खरं नाव माहीत नाही) आणि मोहन या नावाची मुलगी (दोन नंबर). माझ्या वडिलांना तीन मुलं. रामचंद्र, सुलोचना आणि मी अरविंद शेंडेफळ !

    आई लग्न करून पिळगांवकरांच्या घरात आली. इथेही बऱ्यापैकी मोठं एकत्र कुटुंब. पणजोबा रामचंद्र राजाध्यक्ष हेही दत्तक घेतल्यामुळे (आत्याने) वडील आणि आडनाव दोन्ही बदलली आणि रामचंद्र -नारायण- मंगेश पिळगांवकर असं दत्तक नाव झालं. न्या. तेलंगांना सख्ख्या काकांनी दत्तक घेतल्यामुळे आडनाव बदललं नाही. पुढे हे तेलंग घराणं बनारसला गेलं आणि तिथेच वास्तव्याला राहिले. न्या. तेलंगांची बरीच प्रॉपर्टी लोणावळ्याला आहे. त्यात त्यांचा बंगला व बरीच जमीन होती. तिथे आता कॉलनी बांधली गेली आहे. द्वारकानाथ तेलंग शेवटी शेवटी हे सर्व सांभाळत होते. त्यांचा पोशाख रवीद्रनाथ टागोर यांच्या सारखा होता. लहानपणी त्यांना पाहिल्याचं स्मरतं. आम्हा मुलांना ते बागेतील गुलाब देत असत.

  • कोऽहम्

    आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांशी वादविवाद, मारामाऱ्या कराव्या लागल्या. कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला वाचवायला खोटं बोलावं लागलं. अनेक आजारपणांना तोंड द्यावं लागलं. बसच्या अपघातांना तर तोटाच नव्हता. अर्थात असे प्रसंग सर्वसामान्य माणसांच्या तसे कलाकारांच्या आयुष्यात येतातच.

  • सौभद्र’ ची ऐतिहासिक जुगलबंदी

    सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.

    १९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.

  • ये कौन आया

    ये कौन आया

    अवचित काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात घडत असतात.त्या आपल्याला कायम आठवणीत रहातात. एखादी मैफल असेल,तर त्याची रंगत काही औरच असते. तसा माहोल पुन्हा जमून येईलच,असं नाही.आपापसातील आनंद,प्रेम,आस्था वृध्दींगत करण्यासाठी एकत्र यायचं असतं,तिथे. नाहीतर एखादं विशिष्ठ निमित्त असतं. ते गुपित घोषित करण्यासाठी हा सारा जामानिमा असतो. अशातच कुणीतरी “खास” अवतरलंच तर,त्याला विशेष महत्त्व असतं.तो आल्यापासून मैफिलीला एक वेगळाच रंग चढलेला असतो. त्याच्या येण्याने “प्रफुल्लीतपणा” सर्वदूर पसरत जातो. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आणि आकर्षक असतं की,सर्वांची नजर त्याच्याकडे आपसूक वळत असते.त्याचा रुबाब,त्याचा थाट हा त्याचा जलवा असतो.

  • नयन तुझे जादुगार

    खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.

  • संत कान्होपात्रा

    १९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.

  • जिंदगी का सफर

    जिंदगी का सफर

    जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.