हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासोबतच, संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी बॉलिवूडला दिलेली दिग्गज गायकांची पिढी. १९७० आणि ८० च्या दशकात जेव्हा चित्रपटसृष्टीतील मोहम्मद रफी, मुकेश यांच्यासारख्या महान गायकांचे पर्व संपत आले होते, तेव्हा या संगीतकार जोडीने देशाच्या कानाकोपऱ्यातून नव्या प्रतिभेचा शोध सुरू केला. केवळ गाणी बनवण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी नवीन कलाकारांच्या सुरांना पैलू पाडले आणि त्यांना स्टार बनवले. त्यांनी सुरू केलेला ‘लिटल स्टार्स’ (Little Stars) आणि ‘लिटल वंडर्स’ (Little Wonders) हा मुलांचा ग्रुप म्हणजे संगीत विश्वातील नव्या ताऱ्यांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरला.
August 3, 2026
२००० नंतरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी अधिक कॉर्पोरेट झाली. याच काळात ‘व्हॅम्प डान्स’ किंवा ‘स्पेशल गाणे’ या शब्दांची जागा अधिकृतपणे ‘आयटम नंबर’ (Item Number) या शब्दाने घेतली. हे गाणे आता चित्रपटाचा एक स्वतंत्र भाग मानले जाऊ लागले, ज्याचा वापर चित्रपटाच्या पहिल्या टीझर किंवा ट्रेलरच्या आधी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता (Hype) निर्माण करण्यासाठी केला जाऊ लागला.
August 24, 2026
संगीत हे मानवाच जीवनावश्यक असे घटक आहे. कारण भारतीय अभिजात संगीत हे पुरातन काळापासून देव दैत्य दानव अशा प्रत्येक व्यक्तीला आवडणारे व त्यात प्राविण्य असणारे असे हे संगीत आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि तोच वारसा घेऊन आम्ही हे संगीत पुढे नेत आहोत. ज्यात आमच्या म्हणजे मानवाच्या प्रत्येक एक्टिविटी मध्ये संगीते अत्यावश्यक आहे .
April 21, 2021
‘बाबला ऑर्केस्ट्रा’ने लाईव्ह परफॉर्मन्स, फ्युजन म्युझिक, पारंपरिक संगीताला आधुनिक रूप देण्याच्या आणि स्वतंत्र संगीताच्या (Non-film music) क्षेत्रात निर्माण केलेले स्थान आजही अढळ आणि मार्गदर्शक मानले जाते. आजचे अनेक गरबा किंग, रिदम अरेंजर्स आणि लाईव्ह बँड्स हे बाबला यांनाच आपले आदर्श मानतात. भारतीय चित्रपट संगीताच्या पलीकडे जाऊन जगाला आपल्या तालावर नाचवणारा एक ‘रिदम किंग’ म्हणून बाबला यांचे नाव संगीताच्या इतिहासात नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.
August 4, 2026
खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti