(User Level: User is not logged in.)

मनोरंजन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सौभद्र’ ची ऐतिहासिक जुगलबंदी

    सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.

    १९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.

  • ये कौन आया

    ये कौन आया

    अवचित काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात घडत असतात.त्या आपल्याला कायम आठवणीत रहातात. एखादी मैफल असेल,तर त्याची रंगत काही औरच असते. तसा माहोल पुन्हा जमून येईलच,असं नाही.आपापसातील आनंद,प्रेम,आस्था वृध्दींगत करण्यासाठी एकत्र यायचं असतं,तिथे. नाहीतर एखादं विशिष्ठ निमित्त असतं. ते गुपित घोषित करण्यासाठी हा सारा जामानिमा असतो. अशातच कुणीतरी “खास” अवतरलंच तर,त्याला विशेष महत्त्व असतं.तो आल्यापासून मैफिलीला एक वेगळाच रंग चढलेला असतो. त्याच्या येण्याने “प्रफुल्लीतपणा” सर्वदूर पसरत जातो. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आणि आकर्षक असतं की,सर्वांची नजर त्याच्याकडे आपसूक वळत असते.त्याचा रुबाब,त्याचा थाट हा त्याचा जलवा असतो.

  • १९७० च्या दशकातील मनोरंजनाची साधने

    १९७० च्या दशकातील मनोरंजनाची साधने

    १९७० च्या दशकात आजच्यासारखे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा सॅटेलाइट टीव्ही (डिश टीव्ही) नव्हते. त्यामुळे त्या काळातील मनोरंजनाची साधने अतिशय मर्यादित होती. पण जी काही होती, ती माणसांना एकमेकांशी जोडणारी होती. एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क असायचा.

  • एस. डी. बर्मन यांच्या अजरामर गाण्यांचे पडद्यामागील रंजक किस्से

    एस. डी. बर्मन यांच्या अजरामर गाण्यांचे पडद्यामागील रंजक किस्से

    भारतीय चित्रपट संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) हे केवळ एक थोर संगीतकार नव्हते, तर त्यांचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारी एक अद्भूत अनुभूती होती. बर्मन दादा व्यावसायिक पार्श्वगायक नसले, तरी त्यांनी चित्रपटाच्या पार्श्वभूमीत (Background) स्वतः गायलेली गाणी कथेला आणि पात्रांच्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. गाण्यातील भाव आणि वातावरण हुबेहूब जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या या संगीतवेडाचे पडद्यामागील काही अत्यंत रंजक आणि भावनिक किस्से

  • ‘जिंगल म्हणजे नक्की काय?’

    ‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात.

  • कोऽहम्

    आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांशी वादविवाद, मारामाऱ्या कराव्या लागल्या. कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला वाचवायला खोटं बोलावं लागलं. अनेक आजारपणांना तोंड द्यावं लागलं. बसच्या अपघातांना तर तोटाच नव्हता. अर्थात असे प्रसंग सर्वसामान्य माणसांच्या तसे कलाकारांच्या आयुष्यात येतातच.

  • मराठी चित्रपटसृष्टीचे ‘महाखलनायक’ निळू फुले : गाजलेले चित्रपट, अजरामर संवाद

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी नावे आहेत, ज्यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. या यादीत सर्वात अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे ‘निळू फुले’. भारदस्त आवाज, डोळ्यांतील तीक्ष्ण भाव, चेहऱ्यावरील हुशार आणि धूर्त हावभाव आणि संवादफेकीची अफाट शैली यांच्या जोरावर निळू भाऊंनी तब्बल चार दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या जिवंत असायच्या की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचा. हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा विजय होता.

  • नयन तुझे जादुगार

    खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.

  • मी नाटकाचे पार्श्वसंगीत करतो

    त्याचवेळी विजय तेंडुलकर लिखित ‘एक हट्टी मुलगी’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे ठरले. निर्माते मोहन तोंडवळकर, संस्था ‘कलावैभव’. नाटकाचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे. प्रमुख भूमिकेत विनोदी अभिनेते म्हणून गाजलेले शरद तळवलकर. भेंडेंना पार्श्वसंगीताची जबाबदारी नंदू भेंडे या त्यांच्या मुलाकडे द्यायचं मनात होतं. परंतु जयंत सावरकरांच्या प्रयत्नांमुळे ते काम करण्याची संधी मला मिळली. अर्थात मला त्या कामाचा अनुभव नव्हता. प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत वापरतात एवढंच ठाऊक होतं. देवाचं नाव घेऊन सुरुवात केली. नाटकाच्या तालमी पाहताना आवश्यक तेवढ्या जागा निश्चित केल्या. मध्यांतराआधीच्या प्रसंगानुरूप मिश्र शिवरंजनीचा एक पीस कंपोझ केला. त्यात सतारीची आवश्यकता होती. के. के. जीजीना ( तबलजी आबान मिस्त्री यांचे गुरू) यांनी ते करायचं कबूल केलं. त्याचं रेकॉर्डिंग झालं आमच्या फॅमिली डॉक्टर सुंदरताई गावस्कर – केंकरे (प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची आत्या ) यांच्या घरी. रात्री दहानंतर हे रेकॉर्डिंग केलं होतं. इतर वादक कोण होते ते आठवत नाही. पण जीजीना साहेबांनी ‘आपने ये पीस बहुत खूबसुरत कंपोझ किया है। इसे मै मेरे प्रोग्रॅम में इस्तेमाल करूंगा,’ अशी दाद दिली.

  • अनोखा भीमपलासी

    आपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना "अचाट" असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे विचार वारंवार मनात येतात - या रागाची नेमकी ओळख काय? एका दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या संस्कृत ग्रंथात प्रत्येक रागाचे आणि पर्यायाने स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केल्याचे वाचायला मिळते परंतु त्याला शास्त्राधार फारसा मिळत नाही. अर्थात, परंपरेने निर्माण केलेले संकेत, संस्कार याचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या विचारांची ठेवण देखील याच अनुषंगाने होत असते. रागाचा समय, ही संकल्पना देखील याच दृष्टीकोनातून तपासून घेणे, गरजेचे आहे. असो, हा भाग सगळा "वैय्याकरण" या विषयाच्या अधिपत्याखाली येतो.
    भीमपलास रागाचा विचार करता, याचे "औडव-संपूर्ण" स्वरूप तर लगेच ध्यानात येते. आरोहात, "रिषभ" आणि "धैवत" स्वर वर्ज आहेत तर अवरोही सप्तकात, सगळे स्वर लागतात. अर्थात, "कोमल निषाद" आणि "कोमल गंधार" हे स्वर या रागाची खरी ओळख ठरवतात. अर्थात' "मध्यम" स्वराचा "ठेहराव" हे सौंदर्यलक्षण आहे. भीमपलास म्हटला की एक किस्सा वारंवार वाचायला मिळतो - बालगंधर्वांचा "स्वकुल तारक सुता" या गाण्यात आरोही स्वरातील "धैवत" स्वराचा वापर. भारतीय संगीत एका बाजूने शास्त्राला प्रमाणभूत मानणारे आहे पण तरीही कलाकार तितकाच तोलामोलाचा असेल तर "वर्जित" स्वराचा वापर करून, त्याच रागाची नवीन "ओळख" करून दिली जाते. हेच गाणे जरा विस्ताराने विचारात घेतले तर आपल्याला भीमपलास राग समजतो.
    बालगंधर्व "लयकारी" गायक होते, हे फार ढोबळ वर्णन झाले. केवळ ताल आणि त्याची पातळी लक्षात घेतली तरी तालातील कुठलाही "कालबिंदू" चिमटीत पकडावा तसे ते नेमका पकडीत असत, तसेच मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. सुरावटींचा पुनरावतार असावा पण पुनरावृत्ती टाळावी, हे ध्यानात येते. एका मागोमाग एक आणि एका वेळेस एक स्वर घेणे, हे बहुतेक गायकांच्या बाबतीत संभवते परंतु एकाच वेळेस एका स्वराबरोबर इतर स्वरांच्या सान्निध्यात वावरणे, हे फार अवघड असते. वास्तविक हा भाग "श्रुती" या संकल्पनेत येतो. आवाज फार बारीक नव्हता पण लगाव नाजूक होता पण अस्थिरता नव्हती.
    "स्वकुलतारक सुता" या गाण्यात बालगंधर्व नेमके याच पद्धतीने गायले आहेत. गाण्याच्या अगदी पहिल्या सुरांपासून नखशिखांत भीमपलास राग. या गायनातील "ताना","हरकती" इत्यादी अलंकार ऐकायला घेतले तर, मी जे वर मांडले आहे, त्याचीच सुयोग्य प्रचीती येऊ शकते. गायनात, तालाच्या प्रत्येक मात्रेबरोबर बालगंधर्व खेळ खेळत आहेत पण असा खेळ खेळताना, शब्दोच्चाराकडे चुकूनही दुर्लक्ष होत नाही आणि गायनाच्या क्रीडेत या गोष्टीला फार महत्व आहे. बरेचवेळा, बहुतेक गायक, गायनाच्या आहारी जाताना शब्दांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात पण असे बालगंधर्वांच्या बाबतीत अपवादात्मकरीत्या घडते.
    आता आपण पंडित कुमार गंधर्व यांचा भीमपलासी विचारात घेऊया. " ये ना, आज तू जानु रे" या रचनेत देखील आपल्याला, "ध, नि सा" अशी अफलातून स्वरसंगती ऐकायला मिळते. एकूणच कुमार गंधर्वांचे गायन म्हणजे रागाच्या व्याकरणावर किंवा क्रमवारतेकडे लक्ष न वेधता, रागाच्या भावस्थितीवर ध्यान केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्न असायचा. मघाशी मी म्हटले तसे, "वर्जित" स्वरांशी सलगी करून त्यांना, त्यांचा रागांत प्रवेश करवून, त्या रागाचे सौंदर्य आणखी वेगळ्या दृष्टीने वाढवायचे, असा गायनाचा बराचसा कल होता. रागाचे आलाप, बोल-आलाप, बोलतान आणि तान असा प्रवास त्यांना फारसा मान्य नव्हता. आवाज पातळ, टोकदार होता आणि लयीचे बारकावे टिपू शकणारा होता. तसे बघितले तर गायनात बरेचवेळा, "ग्वाल्हेर","जयपुर","किराणा" इत्यादी घराण्यांची गायकी दिसते आणि तरी देखील "भावगर्भता" आढळते. बरेचवेळा असे जाणवते, यांच्या गायकीवर "टप्पा" पद्धतीचा प्रभाव आहे. टप्पा चमकदार असतो, क्रमाक्रमाने सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन मग पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे आहे, हीच त्यांच्या गायकीचे खरी ओळख वाटते आणि हे सगळे या रचनेत आपल्याला अनुभवता येईल.
    "है चांद सितारो में चमका तेरा बदन की
    हर फुल से आती है मेहेक तेरा बदन की
    "है चांद सितारो मे चमका" ही थोडी अनवट, अप्रसिद्ध गझल मी इथे घेतली आहे. "अहमद हुसेन","मुहमद हुसेन" या जोडीने ही गझल गायली आहे. हल्ली गझल गायन म्हणजे "गायकी" असा एक प्रघात बनला आहे. सगळ्यांनाच तसे गायन करणे जमत नाही आणि बरेच वेळा तशा प्रकारचे गायन फार "वरवरचे" होते. गझल भावगीताच्या अंगाने देखील गायली जाऊ शकते - तलत मेहमूद याचे उत्तम उदाहरण. इथे देखील त्याच अंगाने गझल गायली गेली आहे.
    अर्थात जरी भावगीताच्या अंगाने गझल गायली तरी, लयीचे वेगवेगळे बंध, वाद्यमेळातून चालीची खुमारी वाढवायची तसेच निरनिराळ्या हरकतीमधून "अवघड" गायकीचा प्रत्यय देता येतो. मोजकीच वाद्ये असल्याने, रचनेचा "कविता" म्हणून आस्वाद घेता येतो आणि रचना आपल्याला अधिक समृद्ध करून जाते.
    आता लताबाईंचे एक अतिशय गाजलेले आणि तरीही दर्जाच्या दृष्टीने अतुलनीय असे गाणे आपण ऐकायला घेऊया. भीमपलासी रागाची ओळख या गाण्यातून फार जवळून घेता येते.
    "नैनोंमे बदरा छाये, बिजली सी चमके हाये
    ऐसे में बलम मोहे गारवा लगा ले".
    सतारीच्या पहिल्याच सुरांतून आपण या रागाची ओळख करून घेऊ शकतो. गाण्याची चाल तर श्रवणीय नक्कीच आहे पण, गाण्यात अनेक "जागा" अशा आहेत, तिथे गायला केवळ हाच "गळा" हवा, याची खात्री पटते. "नैनो मे बदरा छाये" हेच ते गाणे. संगीतकार मदन मोहन आणि लताबाई यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत तरी या गाण्याची "लज्जत" काही और आहे.
    गाणे जरा बारकाईने ऐकणे जरुरीचे आहे कारण, इथे प्रत्येक शब्दामागे किंवा ओळ संपताना अतिशय नाजूक, बारीक हरकती आहेत, ज्या केवळ चालीचे सौंदर्य वाढवीत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्ध करीत आहेत. राजा मेहदी अली या शायराची कविता आहे आणि कविता म्हणून देखील अतिशय वाचनीय आहे. वास्तविक,मदन मोहन म्हणजे चित्रपटातील गझलेचा "बादशाह" अशी प्रसिद्धी आहे आणि तशी ती गैरलागू नाही पण तरीही प्रस्तुत गाणे त्या पठडीत बसणारे नाही आणि तसे नसून देखील अतिशय श्रवणीय आहे. या गाण्यावर खरे तर विस्ताराने लिहावे, अशा योग्यतेचे गाणे आहे.
    मराठी गाण्यात एकूणच सोज्वळता अधिक आढळते आणि तसे ते संस्कृतीला धरून आहे परंतु काही गाण्यांत विरोधाभासातून उत्तम निर्मिती झाल्याचे दिसून येते. माडगूळकरांचे शब्द आणि बाबूजींची चाल, याचा या गाण्यात अतिशय सुंदर मिलाफ झालेला दिसतो.
    "धुंद येथ मी स्वैर झोकितो" हेच गाणे मी इथे विचारात घेतले आहे. दोन अत्यंत विरुद्ध टोकाच्या भावनांची सुरेख चित्रे कवितेत वाचायला मिळतात. भीमपलासी रागाची अत्यंत समर्थ तसेच वेगळ्याच अर्थाचे अनुभूती हे गाणे देते.
    "कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली;
    विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली".
    मघाशी मी "विरुद्ध टोकाच्या भावना" असे जे म्हटले ते याच ओळीच्या संदर्भात. माडगूळकरांच्या रचनेत, बरेचवेळा संस्कृतप्रचुर शब्द येतात जसे इथे "कनकांगी" हा आहे आणि काही वेळा, त्यांच्यातील न्यूनत्व दाखवण्याच्या मिषाने पण, असे शब्द वापरणारे, माडगुळकर एकमेव कवी नव्हेत. एक मात्र नक्की मान्यच करावे लागेल, भावगीतासाठी लागणारी शब्दरचना जर का "गेयतापूर्ण" असेल तर चाल बांधायला हुरूप येतो. अर्थात, कवितेची चिकित्सा करणे, या लेखात अभिप्रेत नसल्याने, इथेच पुरे.
    मराठीतील अप्रतिम भजन रचनांमध्ये "इंद्रायणी काठी" हे गाणे फार वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. या गाण्याची लोकप्रियता, इतकी वर्षे झाली तरी तसूभर देखील कमी नाही. किंबहुना, ही शब्दकळा माडगूळकरांची आहे की कुण्या संतांची आहे, इतका संभ्रम पडावा, इतकी गेयतापूर्ण आहे आणि कवी म्हणून हे माडगूळकरांचे निश्चित श्रेष्ठत्व म्हणावे लागेल.
    "इंद्रायणी काठी, देवाची आळंदी,
    लागली समाधी, ज्ञानेशाची"
    अभंग वृत्तात नेमकी चपखल बसणारी रचना, संगीतकार पु.ल.देशपांडे यांच्या हातात आली आणि त्यांनी, चाल बांधताना, भीमपलास रागाचा "अर्क" म्हणावा, अशी सुरावट शोधून काढली आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या हाती दिली. आज या रचनेला जवळपास ५० वर्षे होऊन गेली तरी देखील चालीचा गोडवा जरा देखील कमी होत नाही. गाण्याला चिरंजीवित्व मिळते, ते असे. गाण्याच्या सुरवातीपासून या रागाची आठवण येते पण तरीही शास्त्रोक्त बाजू पडताळली तर रागापासून किंचित फटकून अशी या गाण्याची चाल आहे.
    अशाच प्रकारचे एक सुंदर गाणे "नौबहार" चित्रपटात आहे. गाण्याची चाल भीमपलास रागावर निश्चित आहे तरीही गाणे म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.
    "एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने कोई"
    अतिशय शांत चाल आहे. संगीतकार रोशन यांची चाल आहे आणि चाल बांधताना, शब्दांचे औचित्य सांभाळण्याची कसरत अप्रतिमरीत्या संगीतकाराने केली आहे. ही बाब वाटते तितकी सहजशक्य नसते. लताबाईंचा कोवळा,नाजूक आवाज या गाण्याला कमालीचा खुलवतो. भीमपलास रागाची हीच कमाल आहे. एकाबाजूने प्रणयी भावनेचा अत्युत्तम आविष्कार घडवतो तर दुसऱ्या बाजूने विरही भावनेची व्याकुळता देखील तितक्याच तरलतेने आविष्कृत करतो. भारतीय रागसंगीत फारच श्रीमंत होते, ते अशा वैविध्याने.
    - अनिल गोविलकर