खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
अवचित काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात घडत असतात.त्या आपल्याला कायम आठवणीत रहातात. एखादी मैफल असेल,तर त्याची रंगत काही औरच असते. तसा माहोल पुन्हा जमून येईलच,असं नाही.आपापसातील आनंद,प्रेम,आस्था वृध्दींगत करण्यासाठी एकत्र यायचं असतं,तिथे. नाहीतर एखादं विशिष्ठ निमित्त असतं. ते गुपित घोषित करण्यासाठी हा सारा जामानिमा असतो. अशातच कुणीतरी “खास” अवतरलंच तर,त्याला विशेष महत्त्व असतं.तो आल्यापासून मैफिलीला एक वेगळाच रंग चढलेला असतो. त्याच्या येण्याने “प्रफुल्लीतपणा” सर्वदूर पसरत जातो. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आणि आकर्षक असतं की,सर्वांची नजर त्याच्याकडे आपसूक वळत असते.त्याचा रुबाब,त्याचा थाट हा त्याचा जलवा असतो.
November 26, 2023
मोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.
July 11, 2026
सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.
१९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.
July 7, 2026
१९५० च्या दशकातील भारतीय सिनेमा हा सामाजिक जाणिवा, स्वातंत्र्यसोहळ्यानंतरचा नवा भारत आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित होता. या काळात चित्रपटातील मुख्य अभिनेत्री (Heroine) ही अतिशय सुसंस्कृत, सोशिक, पारंपरिक साडी किंवा सलवार-कमीज नेसणारी आणि भारतीय सती-सावित्रीच्या प्रतिमेत बसणारी असायची. साहजिकच, अशा नायिकेला पडद्यावर मादक हालचाली करणे, पाश्चात्त्य शैलीत नाचणे किंवा क्लबमध्ये जाऊन मद्यधुंद गाणी गाणे पूर्णपणे वर्ज्य होते. या सामाजिक चौकटीतूनच बॉलिवूडमध्ये एका नव्या पात्राचा जन्म झाला, ज्याला ‘व्हॅम्प’ (Vamp) किंवा ‘खलनायिका/नर्तिका’ म्हटले गेले.
August 6, 2026
भारतीय चित्रपट संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) हे केवळ एक थोर संगीतकार नव्हते, तर त्यांचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारी एक अद्भूत अनुभूती होती. बर्मन दादा व्यावसायिक पार्श्वगायक नसले, तरी त्यांनी चित्रपटाच्या पार्श्वभूमीत (Background) स्वतः गायलेली गाणी कथेला आणि पात्रांच्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. गाण्यातील भाव आणि वातावरण हुबेहूब जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या या संगीतवेडाचे पडद्यामागील काही अत्यंत रंजक आणि भावनिक किस्से
July 17, 2026
‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात.
June 16, 2026
२०१० चे दशक हे बॉलिवूडमधील आयटम सांग्सच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात स्पर्धात्मक दशक मानले जाते. या दशकात गाण्यांच्या लोकप्रियतेवरून दोन मोठ्या अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये उघड स्पर्धा पाहायला मिळाली.
August 28, 2026
१९९० चे दशक हे भारतासाठी आर्थिक उदारीकरणाचे (Liberalization) वर्ष होते. केबल टीव्ही आणि एमटीव्ही (MTV) संस्कृती भारतात आली होती. यामुळे चित्रपट संगीताचा बाज अधिक आधुनिक आणि कॉस्मोपॉलिटन झाला. परंतु, याच काळात गाण्यांमधील शब्दांवरून आणि कोरिओग्राफीवरून अनेक मोठे सामाजिक आणि राजकीय वादही निर्माण झाले.
August 20, 2026
१९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.
एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.
July 4, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti