संगीत हे मानवाच जीवनावश्यक असे घटक आहे. कारण भारतीय अभिजात संगीत हे पुरातन काळापासून देव दैत्य दानव अशा प्रत्येक व्यक्तीला आवडणारे व त्यात प्राविण्य असणारे असे हे संगीत आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि तोच वारसा घेऊन आम्ही हे संगीत पुढे नेत आहोत. ज्यात आमच्या म्हणजे मानवाच्या प्रत्येक एक्टिविटी मध्ये संगीते अत्यावश्यक आहे .
मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं ...त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर...
मेनू साधारण असा असावा-
वरण- भात, तूप, मीठ, लिंबू - त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण.
मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक...
पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,
सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.
पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसाळ्याची भजी.
ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी मोजक्या प्रमाणात दाण्याचा कूट व दही घातलेली कोशिंबीर.
चवी पुरतं पंचामृमत.
गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.
मठ्ठा.
आता काही सूचना....लक्षपूर्वक वाचा..
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...
उगीचच गळेपडू आग्रह नसावा ( विनाकारण आग्रह करून वाढल्यास अपमान करण्यात येईल ) .
अळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावेत, उगाच तुकडे तुकडे टाकू नयेत...
तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नकोत.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...
आता पान वाढावयाच्या सूचना -
पाट मांडून त्यासमोर छान (आटोपशीर) रांगोळी घालावी.. रांगोळी स्पर्धा असल्यासारखे वागू नये.
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि
त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे
वाढावे...
उणे 90 अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.
मध्यभागी भाताची मुद असावी व सगळं वरण भसकन वाढू नये... वरणाचा ओघळ अजिबात येता कामा नये...
मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...
वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.
मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.
बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या असे समजू नये. प्रत्यक्ष जेवताना असतीलच.
आपला , ( नम्र वगैरे म्हणून मान खाली घालणे आवश्यक नाही )
"काटेकोर" पुणेकर
Copyright © 2025 | Marathisrushti