हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासोबतच, संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी बॉलिवूडला दिलेली दिग्गज गायकांची पिढी. १९७० आणि ८० च्या दशकात जेव्हा चित्रपटसृष्टीतील मोहम्मद रफी, मुकेश यांच्यासारख्या महान गायकांचे पर्व संपत आले होते, तेव्हा या संगीतकार जोडीने देशाच्या कानाकोपऱ्यातून नव्या प्रतिभेचा शोध सुरू केला. केवळ गाणी बनवण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी नवीन कलाकारांच्या सुरांना पैलू पाडले आणि त्यांना स्टार बनवले. त्यांनी सुरू केलेला ‘लिटल स्टार्स’ (Little Stars) आणि ‘लिटल वंडर्स’ (Little Wonders) हा मुलांचा ग्रुप म्हणजे संगीत विश्वातील नव्या ताऱ्यांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरला.
August 3, 2026
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी नावे आहेत, ज्यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. या यादीत सर्वात अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे ‘निळू फुले’. भारदस्त आवाज, डोळ्यांतील तीक्ष्ण भाव, चेहऱ्यावरील हुशार आणि धूर्त हावभाव आणि संवादफेकीची अफाट शैली यांच्या जोरावर निळू भाऊंनी तब्बल चार दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या जिवंत असायच्या की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचा. हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा विजय होता.
July 19, 2026
१९९० चे दशक हे भारतासाठी आर्थिक उदारीकरणाचे (Liberalization) वर्ष होते. केबल टीव्ही आणि एमटीव्ही (MTV) संस्कृती भारतात आली होती. यामुळे चित्रपट संगीताचा बाज अधिक आधुनिक आणि कॉस्मोपॉलिटन झाला. परंतु, याच काळात गाण्यांमधील शब्दांवरून आणि कोरिओग्राफीवरून अनेक मोठे सामाजिक आणि राजकीय वादही निर्माण झाले.
August 20, 2026
अवचित काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात घडत असतात.त्या आपल्याला कायम आठवणीत रहातात. एखादी मैफल असेल,तर त्याची रंगत काही औरच असते. तसा माहोल पुन्हा जमून येईलच,असं नाही.आपापसातील आनंद,प्रेम,आस्था वृध्दींगत करण्यासाठी एकत्र यायचं असतं,तिथे. नाहीतर एखादं विशिष्ठ निमित्त असतं. ते गुपित घोषित करण्यासाठी हा सारा जामानिमा असतो. अशातच कुणीतरी “खास” अवतरलंच तर,त्याला विशेष महत्त्व असतं.तो आल्यापासून मैफिलीला एक वेगळाच रंग चढलेला असतो. त्याच्या येण्याने “प्रफुल्लीतपणा” सर्वदूर पसरत जातो. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आणि आकर्षक असतं की,सर्वांची नजर त्याच्याकडे आपसूक वळत असते.त्याचा रुबाब,त्याचा थाट हा त्याचा जलवा असतो.
November 26, 2023
हिंदी चित्रपटसृष्टीत (बॉलिवूड) ‘आयटम साँग’ हा केवळ गाण्याचा एक प्रकार नसून तो संपूर्ण भारतीय सिनेमाचा एक अत्यंत महत्त्वाचा, मनोरंजक, ग्लॅमरस आणि व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला भाग आहे. तांत्रिक किंवा ढोबळ भाषेत सांगायचे तर, ‘आयटम साँग’ म्हणजे चित्रपटाच्या मुख्य कथानकाशी थेट किंवा कोणताही संबंध नसलेले, एक अतिशय वेगवान, तालबद्ध, आकर्षक आणि नृत्याभिमुख गाणे असते. हे गाणे प्रामुख्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी, बॉक्स ऑफिसवर तिकिटांची विक्री वाढवण्यासाठी आणि चित्रपटाच्या जोरदार प्रसिद्धीसाठी (Promotion) एक हुकमी एक्का म्हणून वापरले जाते.
August 5, 2026
भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात बर्मन घराण्याचे योगदान अतुलनीय आहे. वडील सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) आणि मुलगा राहुलदेव बर्मन (आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा) या पिता-पुत्राच्या जोडीने मिळून भारतीय संगीताला पारंपारिक लोकसंगीताच्या सुरांपासून ते आधुनिक पाश्चात्य फ्युजनपर्यंतचा एक विहंगम प्रवास घडवून आणला. निसर्ग, अथांग सागर आणि मानवी भावनांचा मिलाफ या पिता-पुत्राच्या गाण्यांमध्ये प्रकर्षाने जाणवतो.
July 14, 2026
भारतीय चित्रपट संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) हे केवळ एक थोर संगीतकार नव्हते, तर त्यांचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारी एक अद्भूत अनुभूती होती. बर्मन दादा व्यावसायिक पार्श्वगायक नसले, तरी त्यांनी चित्रपटाच्या पार्श्वभूमीत (Background) स्वतः गायलेली गाणी कथेला आणि पात्रांच्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. गाण्यातील भाव आणि वातावरण हुबेहूब जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या या संगीतवेडाचे पडद्यामागील काही अत्यंत रंजक आणि भावनिक किस्से
July 17, 2026
खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.
१९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.
July 7, 2026
मोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.
July 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti