Year: 2026
लंडनमध्ये जाम, आला घाम
Category:
लेखसंग्रहआता ३५ वर्षे उलटली तरी अजूनही तो अनुभव स्पष्ट आठवतो. अर्थात आता मागे वळून पाहताना गम्मत वाटते हेही खरे.
गोष्ट आहे ऑक्टोबर १९८६ मधली. फिलीप्समधील कामासंबंधात हॉलंडमधील आईन्धोवेन या गावी दोन आठवड्यांसाठी जाण्याचा योग आला. तेव्हा ‘द नेदरलंड’ असे न म्हणता त्या देशाला हॉलंड असेच संबोधत असू. माझी यूरोपची ही पहिलीच वारी होती. दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे मला मधल्या शनिवार रविवारची सुट्टी मिळणार होती.
डेंग्यू: ताप उतरला म्हणजे धोका टळला असे नाही!
Category:
आरोग्य शैक्षणिकताप उतरला म्हणजे रुग्ण बरा झाला” असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात ताप उतरल्यावरची पुढील २४–४८ तासांची वेळ सर्वाधिक धोकादायक असू शकते. याच काळात रक्तवाहिन्यांमधून द्रव बाहेर जाऊन रक्तदाब कमी होणे (शॉक), रक्तस्राव किंवा इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
लेक
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह व्यक्ती-परिचयकाही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
सौभद्र’ ची ऐतिहासिक जुगलबंदी
Category:
मनोरंजन लेखसंग्रहसौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.
१९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.