युवा-विश्व

प्रेरणा अंध नसतें

Category:

 

अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.

युवा-विश्व

कार्तिक वजीर: लोकशाहीवरचे भाषण

Category:

 

एखादं कौशल्य जनसामान्यात ओळख होण्यास पुरेसं असतं. कौशल्यानं वैगुण्यावरही मात करता येते. कौशल्य ओळखली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत. भाषण पाठ असून ते नजरेत भरत नाही; पण त्याचं सादरीकरणाचं कौशल्य लोकांच्या नजरेत भरतं, लक्षात राहातं. नुकताच दूरदर्शनवर एका लहान शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी शाळेच्या ध्वजारोहण समारंभात त्याने आपल्या विनोदी भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘भारतात आजपासून लोकशाही लागू झाली असून लोकशाहीत आपण काहीही करू शकतो. मला स्वतःला मूर्ख बनवायला आवडते.’ त्याने लोकांना अक्षरशः मोठ्याने हसवले.

कथा

ओळख

Category:

 

गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती.

युवा-विश्व

कीर्ती श्रेष्ठ की मूल्य?

Category:

 

मूल्यं पुस्तकातच असतात असे नाही, वर्तनातही असतात. मूल्यं रुजली तरच ती वर्तनात येतात. शाळेत मूल्यं शिकवली जातात. रुजणं आणि रुजवणं हा ज्याचा त्याचा प्रांत. वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिकवलं जातं, पण एखादाच नरेंद्र दाभोलकर व त्यांच्यासारखे ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणतात.

कथा

स्थानबध्द

Category:

 

माधव ! गाडी वेगात धावतेय. डोंगर, शेतं, झाडं सगळे मागं पळत आहेत. त्यांच्याबरोबर माझं मन ही मागंच पळतंय. शरीर गाडीबरोबर पुढं, मन मात्र मागं, कोल्हापूरच्या त्या माझ्या वाड्यात. त्या शाळेत, त्या देवळात, त्या तलावावर. खरंच, माधव, मन अजून तिथंच रेंगाळतंय रे. वयाची बावीस वर्षं तिथंच काढली ना मी. लग्नानंतर तुझ्याबरोबर तिथून आले. नंतरही अधूनमधून मी जायचे ना तिथं. तूही असायचाच बरोबर कधी कधी. नागपूरला आपला संसार थाटला होता. नागपूर-कोल्हापूर अंतरच किती मोठं रे ! इतक्या लांब सारखं सारखं नाही जमायचं. आपल्या पहिल्या बाळाच्या, हर्षदच्या वेळी मी माहेरी म्हणून आले होते. तेव्हा सलग तीन महिने राहिले, तोच माहेरचा मोठा मुक्काम अन् शेवटचाही.