नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
नातं’ आणि ‘मैत्री’ दोनही दोन अक्षरी शब्द आहेत. बाराखडीतील एकही अक्षर आणि एकही मात्रा दोन्ही मध्ये सारखी नाहीत. पण तरीही हे दोनही शब्द खूप जवळचे आहेत. ह्या दोनही शब्दातील ‘नातेच’ खूप मजेशीर आहे. यांच्या अर्थाची सीमा कुठे सुरू होते आणि कुठे संपते की, त्याला काही सीमाच नाही हे समजतच नाही.
बघता बघता काय होत आहे हे कळण्यापूर्वीच हातून निसटली ही मैत्रीची माला. विखरून पडला एक एक मोती. निसटलेल्या मोत्यांना पकडण्याचा जिवापाड प्रयत्न केला पण हे सगळे हाती नाहिच आले. काही हाती आलेले हे विखुरलेले मोती आठवणींच्या कुपीत अलगद उचलून दडवून ठेवले आहेत. काही छोटे आहेत काही मोठे आहे. रिकाम्या वेळात कित्येकदा त्या एक एक मोत्याला मी हरवलेल्या मैत्रीच्या माळेत गुंफायचा प्रयत्न करत असते.
संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर पाऊस नुसता भरभरून कोसळत होता. मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात झुमझोड पाऊस आणि ट्रॅफिक अडकून पडणे ही काही नवीन गोष्ट नव्हती.
गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी ताईंची पळापळ सुरु होती. मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हातान्हात बाजारात फिरून फिरून खणाचे परकर पोलक्याचे कापड आणले होते. तसे ते त्यांच्या मनासारखे मिळाले नव्हतेच, पण काही तरी मिळाले याचा त्यांना आनंद झाला होता
जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो.
ऐन थंडीचे दिवस होते, भर दुपारी देखील अंगावरच्या चादरीत गुरफटुन झोपण्याची मजा येत होती. पण भिंतीवरचे घड्याळ साडे चार वाजले असे आनंदाने ठण ठण करुन ओरडले आणि नाईलाजास्तव उठावेच लागले. खरे तर उठून काम करण्याची बिलकूल इच्छा होत नव्हती
भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.
सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते.
इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता.
रोजंदा या जीवनाच्या वाटचालीत खूप वेगवेगळे सुखद दुख:द अनुभव आपल्याला येत असतात. वेगवेगळे प्रसंग आपण बघत असतो. कित्येक प्रसंगाचा आपल्याशी काही सबंध सुद्धा नसतो. केवळ आपल्या समोर तो घडत असतो म्हणून आपण बघत असतो.
ट्रींग ट्रींग फोनची घंटी जोरजोरात घणघणली. मी उठून उभा राहतो तोपर्यंत बंद झाली. बहुतेक राँग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई घाईत घेतला, “काय रे काय problem? ” मी विचारले.
Copyright © 2025 | Marathisrushti