नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी- सिंहासन बत्तीसी जुनी गोष्ट – काळ बदलला, नैतिक मुल्येही बदलली – विसाव्या शतकातली सिंहासन चार पुतळी
November 11, 2010
भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली…
June 8, 2022
एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही?
August 8, 2009
गुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.
January 25, 2021
"लताचा 87 वा वाढदिवस येतोय , काहीतरी लिहिलं पाहिजे " असं परवा एका मित्राला म्हटलं तेव्हा तो माझ्यावर भडकलाच !
" त्या कुठे ? तू कुठे ? ( तुझी पात्रता काय ?) आणि तू त्यांना सरळ एकेरीत संबोधन करतोस ? निदान वयाचा तरी विचार ? "
मी त्याला म्हटलं , ' हे बघ, आपण दोघेही कोल्हापूरात राहतो ! तू कधी म्हणतोस का, 'आदरणीय श्री अंबाबाई यांच्या देवळात चाललोय ' ?
आपण म्हणतो " अंबाबाईला चाललोय " किंवा ' आत्ताच मारूतीला जाऊन आलो !'
' उद्या आमच्याकडे गणपती साहेब येणार आहेत असं म्हणायची आवश्यकता नाही , आपल्या सगळ्या दैवतांना आपण एकेरीत संबोधतो '
लताही दैवतासमानच !
खरं म्हणजे असल्या दैवतीकरणाचा मला मनस्वी राग आहे . पण हिच्या गाण्यापुढे सगळे अभिनिवेष अगदी गळून पडतात .
मध्यंतरी एक मित्र म्हणाला , 'लताला भारतरत्न देणं चुकीचं आहे , तिने आपल्या संगीतात थेट नवीन भर काय घातली ? जे संगीतकारांनी सांगितलं ते तिनं म्हटलं , तिनं काय कुमारजींसारखे नवे राग निर्माण केले काय ? '
मग मी त्याला ' संगीतकारांचे भीष्माचार्य ' - अनिल विश्वास यांच्या एका उद्गाराची आठवण करून दिली -
" लता आली आणि आम्हा संगीतकारांना 'देवदूत' आल्याचा आनंद झाला , ती यायच्या आधी गायकाच्या गळ्याला झेपेल अशीच चाल तयार करायला लागायची . पण ती आली आणि सगळी बंधनं नाहीशी झाली " .
म्हणजे अनेक संगीतकारांची प्रतिभा मुक्त विहार करू शकेल असं आभाळ - असा अवकाश - लताच्या गाण्यानं उपलब्ध झाला , हे तिचं केवढं मोठं योगदान आहे ?
मग मात्र तो निरुत्तर झाला .
एकदा अशीच चर्चा चालली होती - लता आणि आशा यांच्या स्वभावातल्या फरकाबद्दल .. आशाला सगळ्याची हौस ... लता मात्र सदैव पांढ-या सुती ( की सुतकी ) साडीत ! एक जण म्हणाला ' या बाईंनी लग्न पण केलं नाही ... संसार नाही इ. इ.
तेव्हा माझे एक ज्येष्ठ सहकारी म्हणाले, "अहो, लतानं 1956 सालीच एका गाण्यातून आपल्याला सांगून ठेवलंय - 'मेरा छोटासा देखो ये संसार है, मेरा जीवन है ये, मेरा सिंगार है' - संगीत हाच तिचा 'संसार' , सात स्वर हेच तिचं जग, संगीतातले यच्चयावत अलंकार हेच तिचे दागिने ' , उगीच लौकिक फूटपट्ट्या कशाला लावता ? '
' नास्तिक व्यक्तीला देखील आस्तिक बनवण्याची ताकद तिच्या गाण्यात आहे . आपले पाडगावकर तसे निरीश्वरवादीच ! पण तेही म्हणाले ,
' एेकता गायकांना
वानितो मी त्यांच्या स्वरांना
एेकता गाणे 'लताचे'
मानितो मी इश्वराला '
लेख लिहायला म्हणून बसलो आणि लताच्या गाण्यांच्या अथांग सागराकडे एक कटाक्ष टाकला . त्याचा तो प्रचंड पसारा पाहून एकच गोष्ट पक्की समजली ,
" लताचं प्रत्येक गाणं हे परीपूर्ण आहे पण तिच्या गाण्यावरचा प्रत्येक लेख हा अपूर्ण - अधुरा असाच असणार ! स्वतःची मर्यादा लक्षात आली आणि लेख लिहायचा विचार सोडून दिला ! लताच्या स्वरविश्वासमोर नतमस्तक होऊन शांत उभा राहिलो
( धनंजय कुरणे 9325290079)
28.9.2016
September 28, 2016

एके दिवशी सकाळी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी अभिजित सावंत यांचा संगीताला फोन आला. केसमधील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले असून, त्या बाबत पुढे काय पावले टाकायची हे ठरविण्यासाठी तिला ताबडतोब पोलीस स्टेशनवर बोलावले होते.
January 2, 2022
जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे.
June 18, 2022
शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती.
January 18, 2022
हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी!
July 25, 2020
स्त्री सौंदर्याचे मुख्य पैलू म्हणजे शरीरयष्टी, कांती, केस, अवयव आणि यौवन, नायिका तन्वी असावी म्हणजे शेलाटी, प्रमाणबद्ध असावी असा आग्रह सगळीकडे दिसतो. त्यामुळेच तिच्या शरीरयष्टीला फुललेल्या, नाजूक वेलीची उपमा नेहमी दिली जाते. एखाद्या कवीला अशी तनुगात्री पाहिल्यावर बीजेची चंद्रकोर आठवते. हंसीसारखी वा शंखासारखी मान, गोलाकार कोमल बाहु, कमळकळीसारखे किंवा कलशासारखे वक्ष, सिंहकटी, नितळ व सपाट पोटावर नाभीचा खोलसर आवर्त, केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, कमळासारखे तळवे आणि पाऊले, चंद्रकोरीसारखी नखे हा भारतीयांच्या दृष्टीकोनातून स्त्रीसौंदर्यांचा आदर्श होता.
August 2, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti