नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.
आधी मुंबईमध्ये आणि नंतर नव्या मुंबईत जागांच्या किंमती कशा आणि किती पटींत वाढल्या याच्या गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी ज्येष्ठ नेहमीच ऐकवत असतो. त्या अरेबियन नाईटस् मधल्या गोष्टीप्रमाणे सुरस आणि चमत्कारिक वाटतात. सीबीडीला आजच्या रद्दीच्या किलोच्या भावाने म्हणजे एक चौरस फुटाला दहा बारा रूपयेप्रमाणे लोकांनी जागा चाळीस वर्षांपूर्वी घेतल्या आणि आजच्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीत विकून पैसा केला. अशा त्या गोष्टी.
आप्पांची सहचारीणी, माई, सोडून गेल्याला दोन महिने झाले होते.
आप्पांनी आपला बेत सर्वांना सांगायचा निश्चय केला. आप्पा ६७ वर्षांचे होते आणि माई त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान. त्या गेल्या त्या दिवसापासूनच आप्पांचे मन संसारावरून उडाले. घर भरलेले होते.
नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे.
ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती.
संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते.
“पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥
पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले.
मग त्या तोडीचा कवी न मिळाल्याने अनामिका हे नाव (डावीकडून दुसऱ्या बोटाचं) सार्थ झालं.
बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं.
तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते.
तिथेच त्यांची दोस्ती झाली होती.
त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे.
मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर.
तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे.
तिघे बाईकवरून फिरत असत.
जस्ट मॉल मध्ये कॉफी ढोसत होतो. समोर ते दोघे बसलेले दिसत होतं. खूप खुश होते. मधूनच एकमेकांना घास देत होत,
मित्रानो ‘समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या, या जगात नाही!’ हे सत्यच आहे. फक्त ‘समस्या!’ नक्की काय आहे, हे कळले पाहिजे. नसता पैसे, वेळ वाया जातोच, पण त्याही पेक्षा ‘गाढवपणा’ पदरी पडतो! पण वाईटातहि काही तरी चांगले असतेच. कालांतराने हाच ‘गाढवपणा’ ‘अनुभव’ म्हणून, अभिमानाने चार लोकांना सांगता येतो.
मुळात, कोणताच माणूस ‘गुन्हेगार’ म्हणून जन्मत नाही. परस्थिती त्याला घडवत असते, असं म्हणतात. खूप पूर्वी ‘जेल रहित राज्य!’ हि कल्पना माझ्या वाचनात आली होती. कदाचित त्याची मूळ या कथेत असावीत.
कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!
परमेश्वर या ना त्या रूपाने मदतीला धावून येतच असतो. पण खरे सांगू तो, आपल्यातल्याच कोणाला तर त्या क्षणापुरता आपले ‘देवत्व’ देत असतो. त्या क्षणी ती व्यक्ती ईश्वराची भूमिका जगते. समोरच्या माणसाची मदत करते. तुमच्याही जीवनात असे क्षण आले असतील, आणि येतीलही. आपणच, बरेचदा ‘मीच का करू?’ म्हणून ती भूमिका टाळून देतो. अशी ‘मदत श्रुंखला’ पैश्याने भरपाई करून, किंवा फक्त ‘धन्यवाद’ म्हणून, खंडित करून टाकतो.
Copyright © 2025 | Marathisrushti