(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठांनो… नियम पाळा तब्येत सांभाळा

    १) विचारले तर सांगा सांगितले तर विचारु नका.
    २) बाहेर जातांना कुठे म्हणून विचारु नका. सांगितलेच तर कधी येणार हे विचारु नका.
    ३) दिले तर मुकाट्याने खा. न दिले तर मागू नका.
    ४) दाखवले तर छानच आहे म्हणा छान असलेले दाखवा म्हणू नका.
    ५) ऐकू आले तरीही कानाडोळा करा आणि कानाडोळा केलेले परत ऐकू नका
    ६) नात्यात व्यवहार करु नका आणि केलाच व्यवहार त्यात व्यापार करु नका
    ७) आवडनिवड जोपासू नका जोपासली तर मोठेपणा देऊ नका
    ८) आपला काळ विसरून जा त्यांचा काळ बघत रहा
    9)कुणालाही उपदेश करु नका केलाच तर अपेक्षा ठेवू नका.
    10)काटकसर बचत या गोष्टी सांगू नका सांगितल्याच तर वादविवाद वाढवू नका
    11) घरात अलिप्त राहू नका.मदत केली तर उपकाराची भाषा बोलू नका.
    12) देव दान धर्म या बद्दल कामे सांगू नका जे करतात त्याला नावे ठेवू नका.
    13) दुसर्यांची उदाहरणे देऊ नका दिलीच तर तुलना करु नका.
    14) आजाराचे रडगाणे गाऊ नका स्वतःची काळजी इतरांवर सोपवू नका
    15) नेहमी कशात तरी गुंतून रहा. आपले जीवन आपल्या साठी जगत रहा.
    -सौ कुमुद ढवळेकर

      May 11, 2023


  • उगाच काहीतरी – १३

    नेहमी चर्चा होत असतात की बाहेर सहलीला गेल्यानंतर आलेले भयानक अनुभव. आता या अनुभवांसाठी भुतंखेतं काहीतरी विचित्र घटना असलं पाहिजे असं काही नाही. भयानक अनुभव म्हणजे काय की जो तुमची झोप उडवून टाकतो.

      September 1, 2022


  • लेखणीतला, रूपया बंदा

    पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत. राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो. १९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला!

      February 22, 2022


  • सुटीतले घर आणि घरातली सुटी

    सुटीची चाहुल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं? दोन,व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करुया. यातले 'पालक वारे' कुठले व 'मूल वारे' कुठले हे तुम्ही ओळखलंच असेल. 'सुटीत करायचं काय?' असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा असो वा नसो त्याला कुठल्यातरी शिबिरात किंवा छंदवर्गात डांबून ठेवलं जातं. जे पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात. आपलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आाशा, आकांक्षा किंवा त्याच्या आवडी निवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे व त्याचा आत्मसन्मान जपला पाहिजे. सुटी ही एक संधी आहे,मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करुन देण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची पण सक्तीने शिकविण्याची नव्हे. विनोबांनी म्हंटलं आहे,'शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे.' मुलांच्या शिकण्यासाठी आपण हेच सूत्ररुपात वापरणार आहोत. मुलांना चाळीस दिवस सुटी आहे असं समजून मुलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उफमांची आखणी करणे शक्य आहे ते पाहुया. पण एक लक्षात ठेवा, यासाठी आपण ही मुलांना आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि तो ही न चिडचिडता. हे सगळे उफम मुलांना शिकविण्यासाठी नाहीत तर त्यांना त्यातून काही नवं शिकायला मिळावं म्हणून आहेत. मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ देत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करु दे. यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ दे. आणि आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो हा विश्वास ही त्यांच्या मनात रुजू दे. तुमच्या मुलांना नवीन चुका करण्याची संधी तर द्याच पण चुकांतून शिकण्याची उमेद ही त्याच्या मनात चेतवा. पण कृपया.. .. तुमच्या इच्छे खातर व तुम्ही ठरवले आहे तेच तुमच्या मुलांना 'शिकविण्याचा प्रयत्न' करू नका किंबहुना तसा अट्टाहास ही करू नका.

    1. आपण स्वयंपाकघरापासून सुरुवात करुया. स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा असतो. यातील प्रत्येक पदार्थाचे नाव मुलांना माहित असू शकते पण ते कधी व का वापरायचे याची त्यांना ओळख करुन द्यायला हवी. उदा. फोडणी करताना मोहरी व जिरे कधी घालायचे? का? भाजी शिजताना तिखट घालायचे? की शिजल्यावर? की त्याआधीच? फोडणीचे प्रकार किती? तडका म्हणजे काय?

    2. कोणकोणत्या पदार्थांसाठी फोडणी करताना हळद वापरतात? का? ताकाची कढी करताना एकदा फोडणीसाठी हळद वापरून व एकदा न वापरता केली तर चवीत काय फरक पडतो?

    3. भाज्यांचे मुख्य चार प्रकार आपण वापरतो. फळभाजी, फूलभाजी, पालेभाजी व कंदमुळे. हे प्रकार मुलांना ओळखता येतात का? त्याचा एखादा तक्ता तयार करता येईल का? त्या तक्त्यात कोणकोणत्या प्रकारची माहिती भरता येईल?

    4. आपण ज्या भाज्या घरात आणतो 'त्या ताज्या आहेत व चांगल्या पण आहेत' हे ओळखण्यासाठी आपल्या अनुभवावर आधारित आपण काही कसोट्या तयार केलेल्या असतात. त्या कशा केल्या? का केल्या? त्यात काही सुधारणा कराविशी वाटते का? यासाठी मुलांना त्या कसोट्या दाखवा. त्यांना त्याचा अनुभव घेऊ दे. त्यात त्यांना काही सुधारणा सुचवाव्यासा वाटतात का? याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचं म्हणणं जरी चुकत असेल तरी लगेच त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना समजून घ्या. त्यांना पुन्हा पुन्हा सुधारण्याची संधी द्या. उदा.ताजी पालेभाजी कशी ओळखावी? नारळ घेताना तो हलवून व वाजवून ही पाहतात? यापैकी कुठलीही एकच ा*ीया करुन चालेल का?का? बाजारात ताजी भाजी महाग असते व शिळी भाजी स्वस्त असते. पण नवीन बटाटे स्वस्त असतात व जुने बटाटे महाग असतात,असे का? (नविनच्या मानाने जुने बटाटे लवकर शिजतात.)

    5. निरनिराळ्या फळांची वेगवेगळ्या तऱ्हेने ओळख करुन देणे. उदा. प्रत्येक फळ कापण्याच्या विशीष्ट पध्दती असतात. पपई, कलिंगड, फणस, पपनस, अननस, टरबूज अशी फळे मुलांना आवर्जून कापायला द्या. त्यांच्या चुका होतील ही ,पण त्यातूनच त्यांना शिकायला प्रोत्साहित करा.

    6. वेगवेगळ्या फळांच्या बिया जमवा. त्या साफ करून ठेवा. त्याचं वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बिया डोंगरावर रुजवण्याचा प्रयत्न करा.

    7. फळ ताजे च चांगले कसे ओळखावे? याबाबत मुलांशी चर्चा करा. संत्र व आंबा हातात घेतल्या नंतर त्याचा ताजेपणा व चांगलेपणा ओळखण्यासाठी काय काय कसोट्या असू शकतात याची एक तौलनिक यादीच तयार करा. वेगवेगळ्या फळांसंदर्भात अशा याद्या करणं सहज शक्य आहे.

    8. काही फळांची चव ओळखण्यासाठी त्यांचा आधी वास घ्यावा लागतो. अशी फळे कोणती? त्याची सूची बनवा. वास नेमका कुठे घ्यायचा असतो? फळाच्या सर्वच ठिकाणी सारखाच वास येतो का? उदा. आंब्याच्या डेखाजवळ, मध्यभागी व त्याच्या टोकाजवळ सारखाच वास येतो का? अजिबात वास न येणारी फळे कोणती याची पण एक यादी तयार करा.

    9. फळांचा एक तक्ता तयार करा. यातील रकाने असे ही असू शकतील : 1.फळाचे चित्र. 2.फळाचा रंग.. बाहेरुन. 3.फळाचा रंग.. आतून. 4.चव. 5.खाताना सालीसकट खाता येते का? 6.फळात बी दिसत नाही असे फळ. 7.एकच बी असणारे फळ. 8.अनेक बिया असणारे फळ. 9.फळाबाहेर बी असणारे फळ. 10.वर्षभर सहजी उपलब्ध असणारे फळ. 11.फळाचा हंगाम. 12.फळाचा ताजेपणा ओळखण्यासाठीच्या कसोट्या. 13.फळाचा चांगलेपणा ओळखण्याच्या कसोट्या. 14.फळाचे पान. 15.फळाचे अंदाजे वजन. 16.फळाचा औषधी उपयोग. 17.फळापासून तयार होणारे विविध गोड पदार्थ. 18.फळाचा रस काढून तो पितात का? 19.फळाचा उपयोग लोणची किंवा चटणी अशांसाठी होतो का? 20.घरातल्या कुणाकुणाला हे फळ आवडतं? इत्यादी. यापुढील रकाने तुमचे.

    10. निरनिराळी फळे, भाज्या व कंदमुळे यांच्या पासून आपणास वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करता येतात.उदा. आंबा, जांभूळ, बीट, पालक, कोथिंबीर,चिंच इत्यादी. या संदर्भातला एक सुंदर रंगीत तक्ता तयार करता येईल.

    11. नैसर्गिक रंग वापरुन वेगवेगळी चित्रे रंगविता येतील.

    12. सकाळपासून ते रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रक्रीया घडत असतात. अशा प्रक्रीयांची एक यादी तयार करायला हवी. उदा. कापणे, चिरणे, मळणे, तिंबणे, उकडणे, वाटणे, कुटणे, उलथणे, परतणे, घोळवणे, भिजवणे, उपसणे इत्यादी.

    13. स्वयंपाकघरातील विविध प्रक्रीयांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना मिळालाच पाहिजे. हे अनुभव मिळत असताना जशा मुलांच्या काही चुका होतील तशाच काही गोष्टी वाया जाण्याची पण शक्यता आहे. पण आपले मूल शिकण्यासाठी हे आवश्यकच आहे याची कृपया नोंद घ्यावी. कणिक मळणे,पोळी लाटून बघणे, पापड भाजणे, कच्चा व उकडलेला बीट किसणे, नारळ खवणणे, तव्यावरचे ऑम्लेट, पोळी किंवा घावन उलथणे इत्यादी.

    14. मुलांसोबत गप्पा मारत भाजी निवडणे, भाजी चिरणे सहज शक्य आहे. गप्पा मारताना हळू-हळू मुलांनाही भाजी निवडण्यासाठी/चिरण्यासाठी सहभागी करुन घेता येईल. आई/बाबां सोबत हा अनुभव घेताना त्यांना ही आनंद होईल,

    15. कुठलाही एक पदार्थ जर तयार करायचा असेल तर त्यावेळी किती प्रक्रीया घडत असतील याची एक यादी तयार करायला हवी. उदा. भेंडीची भाजी करायची आहे किंवा चहा करायचा आहे तर क्रमवार घडणाऱ्या प्रक्रीया कोणत्या? याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घ्यावा आणि मगच लिहावे.

    16. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मुलांनी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पदार्थ तायर करावा. उदा. भेळ, गाजराची कोशिंबीर, कांदा पोहे, दही पोहे, चिकी इत्यादी.

    17. आपल्या घरात एका महिन्यासाठी किती किराणा सामान लागते याची यादी मुलांनी करावी. शक्य असल्यास, मुलांनी घरातल्या कुणा मोठ्या माणसासोबत बाजारात जाऊन ते खरेदी करावे. सर्व सामानांचे बाजारभाव टिपून ठेवावेत.

    18. आई/बाबांच्या मदतीने 'आमच्या रेसिपी' नावाचे छोटे रेसिपी पॉकेट बुक तयार करावे. त्याचप्रमाणे काका/काकू किंवा मामा/मामी यांच्या मदतीने 'मामाज् रेसिपी बुक' किंवा 'अंकल्स रेसिपी' अशी पुस्तकांची मालिका पण तयार करता येईल.

    19. घरातला फ्रीज स्वच्छं करणे. त्यातील शेल्फची रचना बदलून पाहाणे. (अशावेळी घरातल्या मोठ्या माणसांची मदत अपेक्षित आहे. 'मदत याचा अर्थ सहवास'; सहभाग नव्हे.)

    20. घरातील कुठल्याही कामाबद्दल घृणा किंवा तिटकारा वाटणे योग्य नाही. श्रममूल्य व श्रमानंद याची जाणीव असणे गरजेचे आहे. एखाद दिवशी आई/बाबांसोबत घरातील भांडी घासण्याचा / कपडे धुण्याचा अनुभव सुध्दा मुलांनी घ्यायला हवा.

    21. थोडेफार सामान इकडे तिकडे हलवून स्वयंपाकघरातील किंवा घरातील रचना बदला येईल का? जर अशी रचना बदलायची असेल तर, ती का बदलायची? याबाबत चर्चा करता येईल. ही रचना बदलण्याअगोदर ज्या वस्तू सरकवायच्या असतील त्यांची मापं घ्यावी लागतील. मापं घेण्यासाठी काही वेळा दोऱ्याचा, काठीचा किंवा पट्टीचा उपयोग करावा लागेल. मुलांच्या सल्ल्यानुसार रचना एकवेळ बदलून पाहायला काहीच हरकत नाही.

    22. घरातील सर्वांनी मिळून सर्वांचे कपड्यांचे,पुस्तकांचे खण आवरणे.

    23. खण आवरत असताना बटण शिवणे, हुक शिवणे, फाटलेला कपडा शिवणे, उसवलेल्या ठिकाणी टिप घालणे यासाठी मुलांची मदत घ्यावी.

    24. कपड्याचा खण आवरत असताना प्रत्येक कपड्याचा पोत कसा वेगळा असतो याची मुलांना ओळख करुन द्यावी. उदा. सिल्क साडी, कॉटन साडी, टी शर्ट, टॉवेल या गोष्टी आपण डोळे बंद करुन केवळ स्पर्शाने ओळखू शकतो कारण या कपड्यांचा पोत आपल्याला स्पर्शाने समजतो. घरातच असणारे वेगवेगळे 80 पोत ओळखायला मुलांना मदत करा. त्यांची एक यादी बनवा. उदा. सनमायका, लाकूड.खिडकीची काच, बाथरुमच्या दरवाज्यावरची काच, ओटा, सिंक, आरसा, जमीन, भिंत इ.

    25. तसेच कपड्यांचे वेगवेगळे रंग व डिझाइन्स याबाबत ही मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. प्रत्येक घरात किमान वेगवेगळ्या प्रकारच्या चार ते पाच साड्या असू शकतात. हे प्रकार नेमके कशामुळे पडले? त्यांची खासियत काय आहे? हा प्रकार कुणापेक्षा स्वस्त व कुणापेक्षा महाग असू शकतो? आणखी कुठले प्रकार असू शकतात? याबाबत मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा.

    26. एखाद्या संध्याकाळी मुलांना साडीच्या दुकानात घेऊन जा. तेथील निरनिराळ्या साड्या,त्यांचे रंग, काठ, पोत, डिझाइन्स, त्यांची अनोखी खासियत याची मुलांना ओळख करुन द्या. (यासाठी त्यावेळी नवीन साडी विकत घेण्याची गरज नाही. हे तुम्ही ओळखले असेलच.)

    27. त्याचप्रमाणे पॅण्ट,शर्ट व ब्लाउज यांना कशाप्रकारे इस्त्री करावी लागते याचा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे. प्रत्येक कपड्याची घडी करण्याची पध्दत वेगवेगळी असते याची त्यांना जाणीव करुन द्यावी. घड्या करण्याचा सराव द्यावा. त्यातील बारकावे दाखवावेत. उदा. साडीची घडी करताना आधी हातात फॉल धरावा लागतो. साडीच्या निऱ्या कशा करतात? याबाबतची त्यांची उत्सुकता चाळवावी. त्यांना प्रयत्न करू द्यावा.

    28. कपडे धुतल्यानंतर हँगरवर लावायची पध्दत व कपड्यांना इस्त्री केल्यावर ते हँगरवर लावायची पध्दत वेगवेगळी आहे,याबाबत त्यांना सजग करणं.

    29. दोन मोठे ड्रॉइंग पेपर एकमेकांना चिकटवावेत. घरातल्या सर्वांनी मिळून त्यावर एक चित्र काढावे व सर्वांनी मिळूनच ते रंगवावे. भिंतीवर किंवा कपाटावर हे चित्र लावून ठेवावे. चित्राचा विषय हा निसर्गचित्र,डिझाइन किंवा सर्वांना आवडेल व सोपा वाटेल असा असावा.

    30. '100 टक्के कॉपी चित्रांचे प्रदर्शन.' सुटीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांच्या समोर बसून त्यांचे चित्र काढावे. त्यानंतर मोठ्या माणसांनी लहान मुलांसमोर बसून त्यांचे चित्र काढावे. चित्र कुणाचे आहे याचे चित्राखाली नाव लिहू नये;पण चित्रकाराच नाव अवश्य लिहावे. अशा 100 टक्के कॉपी चित्रांचे घरातच प्रदर्शन लावावे.

    31. वेगवेगळ्या प्रकारची शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी या सुटीचा उपयोग करता येईल. उदा. रंगात भिजवलेला दोरा वापरुन, ठसेकाम करुन, पाकळ्या किंवा पेन्सिलीची सालं चिकटवून, कोलाज, सुलेखन, स्प्रे पेंटिंग, जलरंग इत्यादी.

    32. रविवारचे दोन तास भटकंती व शोधाशोध. आजपर्यंत आपण आपल्याच गावातल्या किंवा जवळच्या गावातल्या ज्या रस्त्यावरुन गेलो नाही किंवा जो रस्ता वा जो विभागच आपल्याला माहित नाही अशा ठिकाणी जाणे. नवीन रस्त्याचा/विभागाचा मुलांच्या सोबत शोध घेणे. मुलांसोबत शिकण्याची/शोधण्याची प्रक्रीया सुरू ठेवणे.

    33. आपल्या घरापासून स्टेशन पर्यंत / घरापासून शाळेपर्यंत / घरापासून एस टी डेपो पर्यंत चालत जाण्यास उपयुक्त ठरेल असा नकाशा काढणे. वाटेत बँक, लोहमार्ग, देऊळ, मशीद, चर्च, मेडिकलचे दुकान, हापशी अशा आणि इतर गोष्टी असू शकतात. यासाठी विशिष्ट खुणांचा वापर करणे. शक्य असल्यास प्रमाणित स्केलचा वापर करणे. (पावलांनी अंतर मोजणे. पन्नास पावले म्हणजे एक सें.मी. यापध्दतीने स्केल घेऊन नकाशा काढणे.)

    34. फक्त एक महिना घरातल्या सर्वांनी रोज झोपण्याच्या आधी 'रोजनिशी' लिहिणे. किमान एक ओळ तरी रोज लिहिलीच पाहिजे असा संकल्प करुन तो तडीस नेणे. (आपण आपल्या कामाची व आपण जे काही नवीन शिकलो त्याची नोंद ठेवता येणे गरजेचे आहे. रोजनिशी हा त्यासाठी उत्तम सराव आहे.)

    35. आपल्याला पत्त्यांचे वेगवेगळे खेळ येत असतात. हे खेळ मुलांसोबत खेळावेत. आजी आजोबांच्या किंवा इतर कुणाच्या मदतीनेसुध्दा मुलांना पत्त्यांचे नवनवीन खेळ शिकवावेत. उदा.बदाम सात, गुलाम चोर, नॉ ऍट होम, लॅडीज, झब्बूचे वेगवेगले प्रकार, मुंबरी, मेंढीकोट, तीनशे चार, पाच तीन दोन, सात आठ इ.

    36. मनोरंजक पण तरीही डोक्याला चालना देणारे अनेक खेळ बाजारात मिळतात. बाजारातून नुसते खेळ विकत आणून ते मुलांसमोर टाकले (म्हणजे गुरांसमोर चारा टाकतात तसे) तर मुले अशा खेळांशी फारवेळ खेळत नाहीत. आपणाला मुलांसोबत खेळावे लागते. वेळप्रसंगी हरावे लागते. तेव्हांच आवडीने मुले त्या खेळाशी खेळू लागतात. उनो, स्पेलो फन, ब्रेनव्हिटा, चायनीज टॅनग्राम असे काही खेळ चांगले आहेत.

    37. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके आता उपलब्ध आहेत. मुलांच्या मदतीने जर का त्याचे वाचन केले तर त्यातील सोपे प्रयोग मुले स्वत:हून करू शकतील.

    38. एखादा खेळाडू किंवा आपली आवडती व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अनुशंगाने सर्व माहिती गोळा करून त्याचीच एक स्वतंत्र चिकट वही तयार करता येईल. उदा. सानिया मिर्झा, सचिन तेंडुलकर, राष्ट्रपती कलाम, आंबेडकर, गांधी, डॉ.अभय व राणी बंग, मेधा पाटकर, नानाजी देशमुख, जे.के.रोलींग इत्यादी.

    39. काही समारंभाच्या निमित्ताने किंवा सहल, वाढदिवस अशावेळी काढलेले खूप फोटो घरात असतात. काहीवेळा ते नुसतेच पाकीटात कोंबलेले असतात. सगळे फोटो अल्बम मधे लावणे.प्रत्येक फोटोच्या मागे तारीख घालणे. तारीख आठवत नसल्यास शोधून काढणे. व प्रत्येक फोटोच्या खाली,सर्वांनी मिळून एक गोड गोड, किंवा चमचमित वा झणझणित कॉमेंट लिहिणे.

    40. गणितातल्या अपूर्णांकाविषयी काही मुलांना भीती असते. किंवा त्याचा मुलांनी धसका घेतलेला असतो. सुटीचा उपयोग अपूर्णांकाची भीती पूर्णपणे घालविण्यासाठी करता येईल. आपल्या घरातच कितीतरी पूर्णांक अपूर्णांक असतात. त्यापासूनच खेळायला सुरुवात करता येईल. हाफ पॅण्ट व फूल पॅण्ट. खिडकीचा पडदा हा दाराच्या पडद्याच्या अर्धा असतो. खिडकी व दरवाजा. मुख्या दाराची कडी व बाथरुमची कडी यातील फरक. हाफ बनियन व फुल बनियन. टी पॉय,छोटे टेबल व मोठे टेबल. पाण्याची अर्धा लिटरची व एक लिटरची बाटली. एक किलोची व अर्ध्या किलोची बरणी. छोटी बादली व मोठी बादली अशी उदाहरणे घेऊन मुलांना पूर्णांक व अपूर्णांकाचा प्रत्यक्ष अनुभव देता येईल. प्रयोगातूनच मुले शिकतील,समजून घेतील.

    41. घरात (व शेजाऱ्यांकडे) येणाऱ्या वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका त्यांचे काम झाल्यावर फेकून न देता साठवून ठेवाव्यात. सुटीत त्यापासून विविध आकारांचे बुकमार्कस् करता येतील.

    42. काही निमंत्रण पत्रिकांचा कल्पकपणे वापर करुन सुंदर शुभेच्छा पत्रे तयार करता येतील.

    43. एका पोस्टकार्डच किंमत पन्नास पैसे आहे. चाळीस दिवस सुटी आहे असे जर गृहित धरले तर आपणास चाळीस पोस्टकार्ड लागतील. म्हणजे खर्च फक्त वीस रुपये. मुलांनी रोज एक पोस्टकार्ड लिहायचे आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना. एखादी बातमी किंवा लेख वाचून वर्तमानपत्राला, साप्ताहिकाला, मासिकाला. पुस्तके वाचून आपल्या आवडत्या लेखक/लेखिकेला. मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षकांना.

    44. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मस् मुलांकडून भरून घेतले पाहिजेत.मनीऑर्डरचा फॉर्म. रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्याचा फॉर्म. बँकेत पैसे कसे भरावे, चेक कसा भरावा, पैसे कसे काढावेत यासाठी भराव्या लागणाऱ्या स्लीपस् .

    45. घराजवळच्या बँकेत मुलाच्या नावाने खाते सुरू करता येते. त्यासाठी मोठ्या माणसांनी त्याच्या सोबत बँकेत जावे. खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी प्रा*या मुलानेच पार पाडावी. अगदी आवश्यकच असेल अशा ठिकाणी पालकांनी मुलांना मदत करावी. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून प्रत्येक महिन्याला थोडीफार बचत करावी.

    46. घरातील टेलीफोनच्या जवळ एका रफ वहीची गरज असते.पटकन पत्ता लिहून घ्यायला किंवा एखादा नंबर टिपून ठेवायला त्याचा उपयोग होतो. शाळेतल्या वापरलेल्या वह्यांमधील कोरे कागद काढून, ते एकत्रितपणे शिवून रफ वही तयार करता येईल. थोड्याशा सरावाने चांगली वही पण तयार करता येईल.

    47. घराजवळ जर एखादा ओळखीचा व्यावसायिक असेल तर त्याच्या दुकानात जाऊन काही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि काही गोष्टी स्वत:हून शिकणे. यासाठि त्या व्यावसायिकाची परवानगी घेणे, त्याच्या सोयीनुसार आपली वेळ जुळवून घेणे गरजेचे आहे. उदा. शिंपी कपड्यांची मापे कशाप्रकारे घेतो. कापड कसे बेततो. शिलाई मशीन, काजे मशीन व ओव्हरलॉक मशीन यातील नेमका फरक काय. एखादे जुने कापड घेऊन कुठल्याही मापाचा एखादा शर्ट शिवण्याचा घरी प्रयत्न करणे. (हा प्रयत्न म्हणजेच भूमिती व अंकगणिताचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.)

    48. त्याचप्रमाणे घराजवळील किराणामालाचे दुकान, लॉन्ड्री, बेकरी, डेअरी, औषधाचे दुकान, दवाखाना अशा ठिकाणी रोज दिवसांतून एक तास मुलांनी मदत करण्यासाठी जावे. अशावेळी परवानगी मिळविण्यासाठी,कामाचे स्वरुप ठरविण्यासाठी, वेळ निश्चित करण्यासाठी घरातील मोठ्या माणसांनी मुलांना मदत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी घरी आल्यावर 'आज काय नवीन शिकलास?' असे त्यांनी मुलांना विचारणे ही अपेक्षित आहे. (कृपया एक गोष्ट लक्षात घ्या. 'दुकानात एक तास जाणे म्हणजे पुड्या बांधायला जाणे' असा गैरसमज करुन घेऊ नका. काहीही काम न करता सुध्दा मुलाने एक तास दुकानात बसणे हे ही शिकणे आहे.)

    49. गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, आकार, त्यावरील चित्रे इ. याचे मुलांनी कालजीपूर्वक निरीक्षण करावे. त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शीर्षके पण काळजीपूर्वक पाहावित. विशिष्ट वस्तूचा किंवा गोष्टिंचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सुलेखन. मुलांनी एक सुलेखन वही तयार करावी. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले, निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पध्दतीने लिहावित. म्हणजेच 'जीराफ' ज्या प्रकारे लिहिले असेल त्यापेक्षा 'ससा' वेगळ्याप्रकारे लिहिलेले असेल.

    50. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी शक्यतो टाकाऊ वस्तूंचाच वापर करायचा आहे. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही चित्र काढावे / आकृती काढावी / ठिपक्यांची रांगोळी काढावी व त्यात रंग न भरता त्याऐवजी रंगीत टाकाऊ वस्तूंचा उपयोग करावा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, गवत, सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, प्लास्टीकचे तुकडे, लाकडाचा रंगीत भुसा, शेंगांची टरफले, पालेभाज्या निवडून झाल्यावर उरणारी मुळे बारीक चिरुन, चहाचा चोथा इत्यादी.

    51. तुमच्या परिसरातील काही दुकानदारांकडे तुमच्या ओळखी असतील. दुकानदाराच्या आणि तुमच्या मुलाच्या सोयीने, दिवसातील दोन तास मुलाने दुकानात काम करायला हरकत नाही. मुलाने त्याला आवडेल ते काम करावे व नवीन काम ही शिकावे.

    52. आपल्या घरात पंखा, इस्त्री, मिक्सर, टेपरेकॉर्डर अशा वस्तू असतात. या वस्तूंच्या आत काय असतं? त्या कशा काम करतात? याबाबत मुलांना प्रचंड कुतुहल असतं. ज्या दुकानात अशा वस्तू रिपेअर केल्या जातात अशा दुकानात मुलांना घेउन जावं. दुकानदाराच्या परवानगीने मुलांना निरीक्षण करण्याची व प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.

    53. याचप्रकारे मुलांना जवळच्याच गॅरेज मधे घेऊन जाता येईल.

    54. आंबा, फणस, अननस, पपई, कलिंगड, सिताफळ, रामफळ ही फळं कापण्याची पध्दत वेगवेगळी आहे. मुलांना त्याचा अनुभव मिळणे जरुरीचे आहे. मुलांसोबत फळं कापण्याचा अनुभव घ्या.

    55. गाजर, मुळा, काकडी, टॉमेटो किंवा बीट यांची कोशिंबीर करणे मुलांना जमू शकते. आठवड्यातून दोन दिवस मुलांनी कोशिंबीर करावी यासाठी पालक मुलांना मदत करतील. (मुलांनी केलेली कोशिंबीर,पालक आनंदाने खातील)

    56. महिन्यातल्या एखाद्या संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून भेळ तयार करावी. कुणी कुठले काम करायचे याचे नियोजन मुलांनी करावे.

    57. 'चटकदार भेळेची रंगीत तालीम' झाल्यावर, पालकांनी आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावे व त्यांना भेळ खिलवावी.

    58. मुलांना गोष्टीची पुस्तके किंवा वर्तमानपत्रातील वेगळ्या बातम्या, पुरवणी मधील एखादा लेख अवश्य वाचून दाखवा.

    59. या सुटीत खाल्लेल्या फळांच्या बिया जमवा. सुटी संपल्यावर पावसाळ्यातल्या पहिल्या रविवरी मुलांसोबत गावाबाहेर जा. मुलांच्या मदतीने छोटे-छोटे खड्डे खणून या बिया त्यात पसरुन टाका.

    60. गावाबाहेर जंगल करण्यासाठी आपल्या नातेवाइकांकडून, शेजाऱ्यांकडून, बाजारातून किंवा जिथून मिळतील तिथून बिया गोळा करा. मुलांच्या मदतिने घरात 'बी बँक' तयार करा.

    61. सुटीतल्या एका रविवारी घरातल्या सर्वांनी 'आपले कपडे आपणच धुवायचे' असं ठरवा. कपडे धुण्याचं तंत्र व मंत्र मुलांसोबत शिका. मुलांसोबत पाण्यात थोडा दंगा पण करा.

    62. महिन्यातून एक दिवस मुलाने आईसोबत स्वयंपाकघरात काम करायचे आहे.

    63. फक्त सुटी पुरती घरातली काही रचना बदलता येईल का? कॉट, कपाट किंवा शोकेस सरकवून घराची रचना बदलता येते. याबाबत मुलांकडे काही कल्पना असू शकतात. त्याचा विचार करा. मुलांच्या मदतीने घराला वेगळा चेहरा द्या.

    64. घरातील लाकडी स्टूल किंवा दरवाजा घासून ते रंगवणे मुलांना आवडते. तसे करण्याची मुलांना मुभा द्या. काम सुरू करण्याअगोदर ते काम मुलांना नीट समजावून सांगा. पण मुले काम करत असताना त्यांना हज्जारवेळा सूचना देऊ नका. (नाहीतर मुले वैतागुन काम अर्धवटच सोडतील) त्यापेक्षा त्यांच्या सोबत काम करा. रंगवताना मुलांसोबत रंगून जा.

    65. आपले नातेवाईक व ओळखीचे यांचे पत्ते व फोन नंबर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वह्या मुलांच्या मदतीने तयार करा. या वहीत मुलांच्या मित्रांचे पत्ते व फोन नंबर असतील याची काळजी घ्या

    66. घरातील शिवणाचा डबा यासाठी एक दिवस राखून ठेवा. बटण लावणे, हूक लावणे, शिवणे, टीप घालणे, धावदोरा घालणे याचा अनुभव मुलांना घेऊ दे.

    67. आपल्या परिसरात काही खास वेगळी मुले असतात. अंध, अपंग मुले असतात. शाळा सुरू असताना या मुलांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. सुटीच्या दिवसात त्यांच्यासाठी थोडावेळ देता येईल. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं किंवा त्यांना बागेत घेऊन जाणं अस करता येईल.

    68. मुलांनी आणि पालकांनी मिळून एक गट तयार करावा. या गटाने मिळून एखाद्या रविवारी गावातील बाग स्वच्छं करावी. किंवा नगर वाचनालयातील पुस्तके आवरुन, साफ करुन द्यावीत.

    69. मुलांच्या वहीतील कोरे कागद फाडून घ्यावेत. मुलांच्या मदतीने हे कागद शिवून त्याची वही करावी. रफ वही म्हणून ही वापरता येते.

    70. घरी येणाऱ्या निमंत्रण पत्रीका, किंवा काही जाहिराती जमवाव्यात. हे पाठकोरे कागद एका आकारात कापावेत. वरच्या बाजुने शिवावेत किंवा स्टेपल करावेत. पटकन काही लिहिण्यासाठी या पॅडचा चांगला उपयोग होतो.

    ही यादी आणखी पण वाढविता येईल, पण त्यासाठी मुलांची सुटी वाढविता येणे शक्य नसल्याने आता इथेच थांबावे म्हणतो. मी जरी तुम्हाला सत्तर गोष्टी सुचविल्या असल्या तरी यातूनच तुम्हाला आणखी शंभर गोष्टी सुचतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि यासाठी काहीही मदत हवी असल्यास मला अवश्य कळवा. मी तुमच्या सोबतच आहे.

    मी तुमच्या शंबर नंबरी पत्रांची वाट पाहतोय. कळावे.

    मुलांवर लोभ असावा हीच एक विनंती.

    ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

    राजीव तांबे.

      July 6, 2015


  • साबुदाण्याची खिचडी

    असा कोणी आहे का की ज्याला साबुदाण्याची खिचडी माहिती नाही ?माहिती तर सगळ्यांनाच असते पण हं, प्रश्न आवडीचा असतो. काहीजणांना खूप आवडत असते तर काहीजण आवडत नाही असं नाक मुरडून सांगतात. खरे तर साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे होत नाही, पण माझी खात्री आहे की ज्यांना ती आवडत नसते त्याचे मूळ कारण दातातल्या फटी असतात. त्या फटींमध्ये साबुदाणा किंवा शेंगदाणा अडकला की असह्य वेदना होतात आणि खिचडी न आवडण्याचे ते मुख्य कारण असू शकते. आपल्याकडे एक म्हण आहे ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसला हा प्रकार. असो.
    साबुदाण्याची खिचडी म्हटले की "उपास"आलाच. हा उपास पण कधी जबरदस्तीने तर कधी आवडीने तर कधी वजन उतरविण्यासाठी,व अलीकडे तर detox साठी सुद्धा केला जातो. काहीजण तर खिचडी हक्काने खाता यावी म्हणूनही उपास करतात. आमच्या लहानपणी तर खिचडीच्या लालसेनेच आम्ही उपास करत असू. पण कसे आहे ना वय वाढत जाते तसा उपास होत नाही. मग डायबिटीस चे कारण असो की दातांच्या फटीचे.

    उपासाची आणखीन एक गंमत असते बर कां मित्रांनो, सहलीसाठी चार दिवस गेलो तरी एक उपास तर येतोच. व सवयीप्रमाणे आपण तो करतोच. बहुतेक ठिकाणी उपासाची खिचडी खायला मिळतेच नाहीतर वेफर्स तरी मिळतात त्यामुळे फारसा विचार करण्याची वेळ येत नाही.

    खिचडीचा एक मजेदार प्रसंग आठवतोय. 1977 मध्ये आम्ही भावनगरला होतो. आम्हा काही कुटुंबीयांची बरोबर बरोबरच बदली झाली होती. आमच्या एका मैत्रिणीला ताबडतोब स्वयंपाक वाल्या बाई मिळाल्या होत्या. ती बाई स्वयंपाकपाणी चवीक करत असे. एकदा आम्ही काही मंडळी दुपारच्या वेळेस मैत्रिणीकडे रमी खेळायला गेलो. शनिवार होता. मॅडमने अस्सल मराठ मोळा साबुदाणा खिचडीचा बेत केला. आम्हा सर्वांना गरम मिळावी म्हणून बाईला 5 च्या सुमारास फोडणी घालायला बोलावले. बाई येण्यापूर्वी तिने सगळी जय्यत तयारी करून ठेवली अगदी मिरची बटाटे कोथींबीर चिरण्यापासून ते नारळ खवण्यापर्यंत सगळे. बरोबर पावणे पाचला बाई आली. खेळण्यात गर्क असलेल्या मैत्रिणीने बसल्या जागून ऑर्डर सोडली "कमला बेन सगळी तयारी करून ठेवली आहे खिचडी फोडणीला घाला ". रमीचा डाव व सोबत गप्पांनी रंग पकडला होता. काही वेळाने कुकरची शिट्टी ऐकू आली... एक... दोन... तीन.. मैत्रीण गोंधळली. कुकरची शिट्टी ?.. तिने हातातले पत्ते टाकले व किचन कडे धाव घेतली.. तिच्या सोबत आम्हीही. स्वयंपाक खोलीतला प्रकार पाहून अक्षरशः कपाळाला हात लावला. बाईने भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, तूप, जिरे व चिरलेल्या सगळ्या जिनसा व चवीला गूळ आणि पाणी घालून मस्त मऊ मऊ साबुदाण्याची खिचडी, हं, खिचडी नाही तिखट गोड लापशी बनवली होती. ह्यात बाईंची काही चूक नव्हती तिच्याकडे खिचडी म्हटले की अशीच करतात. पण आम्ही ही कधीही न विसरणारी लापशी कम खिचडी खाल्ली. आहे की नाही गंमत ?

    काश्मीरची तर अजून मजेशीर खिचडी. ह्या काश्मिरी लोकांना आपल्या केसरी ट्रॅव्हल्स वाल्या मंडळींनी साबुदाणा खिचडी करायला शिकवली आहे. तिथल्या लोकांनी त्यामध्ये आपल्या पद्धतीने सुधारणा केली आहे. शेंगदाणा कुटा ऐवजी अक्रोड बदामाचा मिक्स कूट, शुद्ध केसर, वेलची पावडर, व लवंगीवर फोडणी घातलेली "special kashmiri sabudana khichdi "अतिशय प्रेमाने आम्हाला खाऊ घातली आहे.

    वैष्णव देवीची हळद, बडीशोप घातलेली उपास special साबुदाणा खिचडी तर आपल्यापैकी बहुतेकांनी खाल्ली असेल.
    आणखी एक प्रसंग. .. एकदा बालीला जाण्याचा योग आला. आठवडाभराच्या वास्तव्यात चतुर्थी येणार हे नक्की होते. बालीची संस्कृती खूपशी हिंदू संस्कृतीच्या जवळची आहे असे ऐकले होते. त्यामुळे तिथे उपासाचे काही ना काही नक्कीच खायला मिळेल ही खात्री होती. आमच्या एका फॅमिली friend ची कर्मा क्लब ची मेम्बरशिप होती. त्यांना भलामोठा 3 बेडरूम, स्विमिंग पूल, पॅन्टरी असलेला व्हीला दहा दिवसांसाठी मिळाला होता. आम्ही तीन कुटुंबे गेलो होतो. ही राहण्याची जागा गावापासून बरीच लांब होती त्यामुळे तिथेच खात होतो. अक्षरशः तिप्पट किंमत मोजावी लागत होती. जितके पदार्थ खात होतो त्यातल्या कुठल्याच पदार्थाची चव आपल्या पदार्थाच्या जराही जवळची नव्हती infact त्या चवीचा व आपल्या चवीचा दूर दूर पर्यंत काही संबंध नव्हता. इतकेच काय फोडणीचे तेल सुद्धा माशाचे. त्यामुळे चतुर्थी कडक करावी लागणार हे लक्षात यायला वेळ लागला नाही.

    आमच्या समोर गहन प्रश्न उभा राहिला. त्यातून आम्ही सगळे सिनियर सिटीझन, काही न खाता राहणे शक्यच नाही. दुपारी restaturant मध्ये बसून ह्या गहन प्रश्नावर आमची जोरदार चर्चा सुरु होती. उत्तर काही सापडत नव्हतं. शेवटी बाप्पालाच साकडं घातलं नाहीतर उपास सोडावा लागेल अशी त्याला warning पण देऊन टाकली.

    अचानक मागच्या टेबलावर बसलेले दांपत्य उठून आमच्या जवळ समोरच्या खुर्चीवर विराजमान झाले. ते भारतीय असल्याचे आमच्या पटकन लक्षात आले. ते म्हणाले "नमस्कार मंडळी. मी करंदीकर व ह्या माझ्या सौ. मीना करंदीकर. आम्ही पुण्यावरून आलो आहोत "आम्ही नमस्कार करून आमचीही औपचारिक ओळख करून दिली.करंदीकर म्हणाले, "खरे तर आम्ही अजून चार दिवस राहणार होतो. पण घरी काही emergency आल्यामुळे आम्हाला आज रात्री जावे लागणार आहे. मुद्धा तो नाही. विषय तुमच्या पेक्षा थोडा वेगळा आहे. आमचाही चतुर्थीचा उपास असतो. आमच्या सौ. ने घरून येताना साबुदाण्याच्या खिचडीची सर्व कोरडी तयारी सोबत आणली आहे अगदी साजूक तुपापासून ते खोबर्यापर्यंत सगळे. आमच्या पुढे असा प्रश्न आहे की हे सामान परत माघारी न्यावे की काय ?इथल्या लोकांना तर देण्यात अर्थच नाही त्यांना तर हे काय ते समजणार सुद्धा नाही. व फेकून देणे मनाला पटत नाही. त्यामुळे आम्ही सकाळपासून बाप्पाला आळवत होतो "त्यांना मध्येच थांबवत सौ मीना ताई म्हणाल्या, तुमची हरकत नसेल तर ते सामान तुमच्या व्हीला वर पोहचवतो. तसे थोडे जास्तच सामान आहे. तुम्हाला पुरेसे होईल "त्याच क्षणी आमची त्यांच्या सोबत दाट मैत्री झाली. म्हटले "अहो चालेल काय पळेल. बाप्पाने इतके मोठे solution आपल्या सगळ्यांना दिले आहे. त्याचा मान तर ठेवावाच लागेल. हो की नाही "ह्यावर आम्ही सगळे मोठ्याने हसलो.

    पुढील अर्ध्या तासाच्या आतखिचडीचे साहित्य व्हिला वर पोहचले. मग काय, दुसऱ्या दिवशी आनंदी आनंद. जोरदार खिचडी करून त्यावर ताव मारला. मनोमनी करंदीकरांचे आभार मानले. आम्ही तर खूषच पण कदाचित बाप्पा ही खुश झाला असेल. त्याने काय जोरदार डील घडवून आणले होते.

    त्या दिवशी घरापासून हजारो किलोमीटर दूर खालेल्या त्या खिचडीचा आस्वाद लहानपणी हट्ट करून खालेल्या खिचडी पेक्षा फारच सुंदर आणि निराळा होता.

    अशा ह्या साबुदाण्याच्या खिचडीच्या गमती जमती........

    --सौ वैजयंती गुप्ते

    गांधीनगर गुजरात

      September 20, 2022


  • ती आठवण, ते सूर आणि मी

    क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस – सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नव वळण देते. निराश मनात आशेचा संचार करते. असाच एक अनुभव.

      May 22, 2011


  • गझल रियाज मैफिली

    एकूण या तिन्ही मान्यवरांनी मला रियाजाकडे वळविले. पण एखादी गोष्ट जोरात सुरू होण्यासाठी एखादा जोरदार धक्का लागतो

      July 4, 2022


  • पुडिंग (अलक)

    विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत.

      January 20, 2024


  • हॅास्पिटलमधून बाळ गायब

    गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.

      February 2, 2026


  • अलविदा

    हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.

    पण असं ही कसं म्हणता येईल? या दहा बारा वर्षात, समजायला लागल्यापासूनच्या गेल्या सहा सात वर्षात, मला जे भोगावे लागले, सहन करावे लागले, ते सगळं मला मोठं करणारच तर होतं. माझं वय अकाली वाढवणार, जे या वयात अनुभवाला येऊ नये त्याचा धाडसाने सामना करायला लावणारच तर होतं. अन हे सगळं कुणी माझ्या ओंजळीत टाकलं? जन्मदात्या आईवडिलांनीच! त्यातही मुख्यत्वेकरून जिनं नऊ महिने मला पोटात वाढवलं, कळा सहन केल्या, मला जन्म दिला, त्या आईनंच. मला अजूनही विश्वास बसत नाही. एखादी जन्मदात्री आईच अशी कशी वागू शकते? आपल्या पोटच्या पोरीची नाळ तटकन तोडू शकते? पण ममी तू ते केलंस. माझ्याच बाबतीत हे सारं घडलं. फक्त तुझ्यामुळे. तुझ्या हटवादी, जिद्दी स्वभावामुळे. तुझ्या स्वैराचारामुळे. अविचारामुळे. मला ठाऊकाय ममी, माझं हे स्पष्ट बोलणं, लिहिणं, तुला आवडणार नाही.तसाही तुझा राग आहेच माझ्यावर! कारण तुला मी नकोशीच होते आधीपासून. तुझ्यासाठी अॅक्सिडेंटल डॉटर. अपघाताने जन्माला आलेली मुलगी होते मी. पोराबाळाची जबाबदारी, घरची जबाबदारी, कामाची जबाबदारी, हे सारं तुला ओझं वाटायचं पूर्वीपासून. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, ते दिसतच होतं,पपा ना, आजीला, घरच्या सगळ्यांना. तसंही हे घर तू आपलं घर मानलंच नाही कधीही. या घरात एक ओझ्याखाली, परक्यासारखीच राहिलीस तू. नेमकं काय हवं होतं तुला? हे कधीच कळलं नाही कुणाला. मला शंका आहे, तुला स्वतला तरी कळलं होतं का, तुला नेमकं काय हवंय? तुला स्वातंत्र्य हवं होतं. तुला कसली बंधनं मान्य नव्हती. जसं की पपां नी विचारलं, लग्नच का केलंस तू? या लग्नाच्या बंधनात का अडकलीस तू? तुमचा काही प्रेमविवाह नव्हता. तुला विचारून, तुझ्या संमती नेच आईवडिलांनी, म्हणजे आजी आजोबांनी तुझं लग्न ठरवलं. बाबांनी तर नेहमी लाडच केले तुझे. नको तितके लाड. त्यांच्या काळजाचा तुकडा होतीस तू. अजूनही आहेस. माई आजीनही खूप समजावण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी. तिचा स्वभाव गाईसारखा शांत.तुझ्यामुळे टी नेहमीच हतबल झाल्यासारखी, हारून हात टेकल्या सारखीच वागली. कारण कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही, मेरे मुर्गी की एकही टांग, अशा हटवादी पणानं आपलं तेच खरं करायचं, असा तुझा आततायी स्वभाव. त्यापुढे माई आजी, आजोबांनी तर हात टेकलेच, पण पपांनी सुद्धा शेवटी शेवटी शरणागती पत्करली. तसं पाहिलं तर काय कमी होतं गं तुला या घरात? पपा लहान वयातच केवढ्या मोठ्या पदावर.एका मोठ्या कम्पनीचे व्हॉइस प्रेसिडेंट. त्यामुळे त्यांच्यावर कामाचं प्रेशर होतं जबाबदारी होती.त्याच्या मिटिंग्ज, त्याचे कॉल्स, त्यांचे परदेश दौरे, यात तो नको तितका व्यस्त राहायचा हे खरंय. पण जेव्हा केव्हा तो घरी असायचा, तेव्हा तो आपलाच असायचा. आपल्याला महागड्या हॉटेलात न्यायचा, वीकएन्डला रिसॉर्टमध्ये घेऊन जायचा, कधी कधी दूर फिरायला न्यायचा. तो जे काही करत होता ते तुझ्या माझ्यासाठीच ना? की आणखी कुणासाठी? तो म्हणायचा, वयाच्या चाळीशी पर्यंतच उमेद असते, शक्ती असते, कमवायची, स्थिरस्थावर व्हायची. नंतर तुम्ही आपले राजे.एरवी दोन दोन गाड्या, हा आलिशान बंगला, या घरातल्या अत्याधुनिक सुखसोयी, हे सारं काही आकाशातून पडत नाही.

    हे सगळं तुला मान्य नव्हतं, समजत नव्हतं असं कसं म्हणता येईल? तू ही शिकली सवरलेली.. आधुनिक जगाच्या व्यवहाराशी, चालीरीतीशी, गरजांशी, परिचित असलेली. तू ही एका आय.टी. कंपनीत काम करीत होतीसच. पण पंपाना जसे जम्पस, प्रमोशन मिळत गेले, तसं तुझ्या बाबतीत घडलं नाही. तुला संघर्ष करावा लागला. वाट बघावी लागली. तुझं म्हणणं असं की तुला डावलून दुसऱयाला संधी मिळाली. तुझ्या परिश्रमाची कुणी किंमत केली नाही. तुला तुझ्या योग्यते प्रमाणे हवं ते हवं तेव्हा मिळालंच नाही काही. पण अशा बाबतीत आपणच जज कसे होऊ शकतो? आपणच उमेदवार अन आपणच निर्णायक, हे कसं शक्य आहे? तूच सांग.

    एकूण तुझ्यावर नेहमीच अन्याय झाला, घरच्यांकडून, दारच्यांकडून. तू सारखी तुलना करायचीस पपांशी. त्याचं सरसर वर चढणं, तुझं तिथल्या तिथं फरफटणं. याचा तुला त्रास व्हायचा. खरं तर आपल्याला खूप खूप पैशाची गरज कुठे होती? नोकरीतून मिळणारा पैसा महत्वाचा की समाधान महत्वाचं? पपा कमवतच होते की हवं तेव्हढं. खरं तर आपल्या गरजांपेक्षाही जास्त. पण कधी कधी या जास्तीच्या पैशाच्या नशेची धुंदी देखील बेहोष करते माणसाला. आपल्या योग्यतेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त मिळत गेलं तर त्यामुळे होणार अजीर्ण देखील घातक ठरतं कधी कधी. तुझं तसच झालं असणार.

    गेल्या तीन चार वर्षातील आपल्या घरचं वातावरण.. त्यापेक्षा नरक बरा असं म्हटलं तर वावगं ठरू नये! तू अन पपा सारखे भांडायचे एकमेकांशी. साध्या साध्या गोष्टीतून वाद व्हायचे तुम्हा दोघात. सुरूवातीला तुम्ही दक्षता घेत होता, तुमच्यातली वादावादी माझ्यापर्यंत पोहचू नये याची. पण असल्या गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत. शिवाय आपले चेहरे बोलतातच की स्पष्ट, कधी ना कधी. तसं पाहिलं तर तुला सासरचा त्रास नव्हताच काही. आपण तिघेच होतो इथे. अधूनमधून जायचो आज्जीकडे, आजोबांकडे सणावाराला किंवा ते यायचे आपल्या कडे. पण हे काही दिवसासाठीच. आश्चर्य म्हणजे त्याच्या सहवासाच तुला दडपण वाटायचं. तू कधीच खुश नसायची ते आले की. कारण तुझं वागणं, तुझं बोलणं, मुख्य म्हणजे अत्याधुनिकतेकडे झुकलेली तुझी कपड्यांची फॅशन त्यांना आवडायची नाही. आज्जी तर तसं स्पष्ट बोलूनही दाखवायची.

    तिचंही बरोबर होतं. एकीकडे आजकाल तू मला सारखी टोकायची. हे करू नको, ते करू नको, हे घालू नको, अशी बसू नको.पण तुझं काय? जे नियम गरज नसतांना मला लागू होते, ते गरज असूनही तुला मात्र लागू नव्हते! आज्जी आजोबांसमोर तू चक्क तोकडी हाफ पँट घालून वावरायचीस. कधी कधी त्याच कपड्यात बाहेर जायचीस. मंगळसूत्र न घालणे, कुंकू न लावणे, हे सगळं आजीला आवडत नाही हे माहिती असूनही तू ते सगळं मुद्दाम करायचीस. पपानाही पसंत नव्हती ही नको इतकी टोकाला जाणारी तुझी फॅशन. म्हणजे तू काकुबाई सारखं रहावं अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. काळा बरोबर होणारे बदल प्रत्येकाला मान्य होते. पण तुझं सगळं अतीच होतं. घरात तू मॅक्सी घालून राहायचीस, तीही पारदर्शक! घरच्या नोकराचाकरांसमोर सुद्धा! आज्जीला, पपांना ते बिलकुल आवडायचं नाही. ते काही बोलले की तू हायपर व्हायचीस. डोकं धरून केस ओढायचीस. नाटकं करायचीस. तुझं काहीच घरच्यांना आवडत नाही, तू त्यांना नकोशी झाली आहेस, असा कांगावा करायचीस. पण तसं काही नव्हतं. पपांनी तुला खूप समजावून पाहिलं. आजीने तिच्या पद्धतीने समजावून पाहिलं. पण तू काहीच समजून घेण्याचा मनस्थितीत नव्हतीस. अर्थाचा अनर्थ करायची तुझी सवय. हे सगळं वाचून तू मलाही दोष देशीलच. टोंगळ्या एव्हढी पोरगी मला ज्ञान शिकवते म्हणशील. पण जे कटू सत्य आहे ते आहे. हे नाकारता येत नाही. तुझ्या मानण्याने किंवा न मानण्याने आता काही फरक पडणार नाही. कारण आता तुझा मार्ग वेगळा झालाय, आमचा वेगळा. दोनच आठवड्यापूर्वी तुमच्या लग्नाच्या घटस्फोटावर कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले.गेली दोन वर्षे एकमेकांवर चाललेली चिखलफेक संपली एकदाची. आपण सगळेच एका संक्रमणाच्या काळातून जात होतो, या गेल्या काही काळात. किर्रर्र घनदाट जंगलातला भयावह प्रवास. तुम्ही सगळे मोठे, समजूतदार. तुमची सहनशीलता तुमच्या वया इतकीच मोठी. पण माझं काय गं? हे सगळं सहन करण्याचं माझं वय आहे की नाही, माझ्या भविष्याच काय, या सगळ्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा काहीच विचार केला नाही तुम्ही, खास करून तू? कारण पपांनी विचार केला. त्यांनी स्वत पेक्षाही माझाच विचार केला नेहमी. ते समजून चुकले होते शेवटी, की तुला समजावण्यात काही अर्थ नाही आता. यु वेअर बियोन्ड रिपेअर्स! कोर्टात तुमची घटस्फोटाची केस चालू असताना महत्वाचा प्रश्न पुढे आला तो माझा. माझं पझेशन कुणाकडे जाणार? पझेसिव्ह या शब्दाचा अर्थ मला लहानपणीच समजलेला. मी माझ्या प्रत्येक खेळण्याबद्दल, डॉलसबद्दल पझेसिव्ह होते. कारण या सर्व वस्तू पपांनी मला आणून दिल्या होत्या. कामानिमित्त तो खूप भटकायचा, परदेशात जायचा. तेव्हा प्रत्येक वेळी माझ्यासाठी काही ना काही आणायचाच. त्यात नोव्हेलटी असायची. काहीतरी वेगळे पण असायचे. त्या वस्तूचा शोध घेण्यासाठी तो खूप भटकायचा. खरेदीच्या बाबतीत फार चोखंदळ होता तो. ते मला खूप आवडायचं. तुझ्याही साठी तो काही ना काही आणायचाच. पण तू कधी ना त्या आणलेल्या वस्तूच कौतुक केलं ना ती वस्तू आवडीने, अभिमानाने वापरलीस. तुझ्या मनात का कुणास ठाऊक एक प्रकारची अढीच होती पपांबद्दल. त्याचं काहीच तुला आवडायचं नाही. उलट तू त्याच्यावर डॉऊट घ्यायचीस. त्याला खोदून खोदून नको ये प्रश्न विचारायचीस. ते प्रश्न तुझ्या शंकाखोर मनातून निपजलेले. आगापिच्छा नसलेले. त्याच्यावर अविश्वास दाखवणारे. त्याला नेहमी आरोपीच्या पिंजऱयात उभे करणारे. आधीच त्याच्यावर कंपनीच्या कामाचा ताण, मोठी जबाबदारी. अन त्यात तुझं हे असं रोजचं टोचून बोलणं. कुणाच्याही सहनशक्तीला मर्यादा असतेच ना शेवटी? तू त्याला कोर्टात उभं केलंच शेवटी, आरोपीच्या पिंजऱयात. आपल्या सोयीसाठी, सुखासाठी, सुटकेसाठी, तू नको ते आरोप केलेस वकिलाच्या मदतीनं. त्याचं फार दुःख झालं आजी आजोबांना. अन् मला देखील!

    मला आश्चर्य वाटलं ते माई आजीचं, आजोबांचं, तुझ्या जन्मदात्यांचं. त्यांनीही तुलाच साथ द्यावी? बरोबर आहे त्याचंही. शेवटी तू त्यांच्या काळजाचा तुकडा. आपलेच दात अन् आपलेच ओठ. तू चुकली आहेस, चुकते आहेस हे माहिती असूनही ते हतबल झालेत तुझ्या हट्टापुढे! शेवटी तूच जिंकलीस. पण मीही तुझ्याच काळजाचा तुकडा होते ना ग? मला वाटतं फक्त बायोलॉजीकली अटॅच होतो आपण. काही रेशिमबंध नव्हतेच आपल्या दोघात. कारण पपांनी माझ्या पझेशनसाठी आग्रह धरला कोर्टात, तेव्हा तू फारसा विरोध केला नाहीस. कारण तुला माझी जबाबदारी नकोच होती. माझ्या जन्मानंतर सुद्धा तू ती पार पाडली नाहीसच नीट. माझ्या स्कूलमध्ये सुद्धा यायची नाहीस तू कधी. वेळच नाही मिळायचा तुला तुझ्या बिझी शेड्युलमधून. पपा मात्र यायचे. ते त्याप्रमाणं आपलं शेड्युल अॅडजस्ट करायचे. कधी कधी आजी आजोबा यायचे पालकाच्या मिटींगला. सर्वांना आश्चर्य वाटायचं. पण कुणा कुणाला काय काय सांगणार गं? तुम्ही काय काय पसरवल माझ्या पझेशनच्या बाबतीत. पपांनी म्हणे माझं ब्रेन वाशिंग केलं. माझ्या मनात तुझ्याबद्दल नाही नाही ते भरवलं. खरं सांगू? त्यांनी काहीच नाही भरवलं, उलट नीट समजावलं. मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं निर्णय घेण्याचं. मला माहिती होतं, माझी परवडच होईल तुझ्याकडे. इथे पपाच नाही तर आजी आजोबा आहेत माझी काळजी घ्यायला. वेळ पडल्यास मी उत्तम रेसिडेंशिअल स्कुलमध्ये राहू शकते. पपा तर बाहेर परदेशात देखील पाठवायला तयार आहेत मला. मी त्याची प्रयोरीटी आहे. तू समजतेस तसं बर्डन नाही. पपाजवळ मी जास्त सुरक्षित आहे. तुझं बिझी शेड्युल, तुझी वरवर चढण्याची धडपड, तुझी फॅशन, तुझा स्वार्थी स्वभाव, तुझ्या मित्र मैत्रिणी बरोबरच्या पार्ट्या, तुझं रात्री बेरात्री बाहेर जाणं, तुझं ड्रिंक घेणं या सर्व चक्रव्यूहात मला कुठे स्थान असणार होत? ते आधीही नव्हतंच. अन् घटस्फोटानंतर तर.. तुला सगळं आकाश मोकळं झालं हवं तसं उडायला, खरं सूत्र उंडारायला! टोचत असेल ना ऐकायला? संतापायला होतं ना? होऊ दे. तुझे कान टोचायलाच हवे कुणीतरी. ते तुझ्या मम्मी पपाचं कर्तव्य होतं. पण ते त्यांनी वेळीच पूर्ण केलं नाही. तू त्यांनाही दुबळे करून टाकलं. इमोशनल ब्लॅक मेलिंग, त्यात तर तू एक्सपर्ट! रडून, आकांत तांडव करून आपलंच म्हणणं खरं करून दाखवण्यात, स्वत:ला हवं तसं इतरांना झुकवण्यात, प्रत्येकाला आपल्या तालावर नाचवण्यात तुझा हात कुणीच धरू शकणार नाही! वयात येणाऱया मुलीच्या किती वेगवेगळ्या गरजा असतात. हे कधी उमजलंच नाही तुला. तुही या कोवळ्या अवस्थेतून गेली असशीलच ना? तेव्हा तुझा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलला गेला असणार. पण माझं काय गं? अशा वेळी मुलीला आईच हवी असते. माझ्या वयात येतांना तू फक्त हे करू नको, ते करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको असा ‘ना’चा पाढाच वाचला फक्त. आश्चर्य म्हणजे जी बंधनं वयात येणारी मुलगी म्हणून माझ्यावर घालीत होतीस, ती तुला स्वतला मात्र मान्य नव्हती. ती तुला लागू नव्हती. तू वाट्टेल तसे कपडे घालायला, वाट्टेल तिथे रात्री बेरात्री भटकायला मोकळी होतीस. पार्ट्या, ड्रिंक्स, मौजमजा हीच तुझी आयुष्य जगण्याची, आनंदाची कल्पना होती. खरं तर पंपानाही जावं लागायचं कंपनीच्या पार्ट्याना. त्याही पार्ट्या विथ ड्रिंक्स असायच्या व त्यांनी कधी हात लावला नाही त्या पेल्याला. त्यांना तर नॉन व्हेज देखील चालत नसे. पण म्हणून कुणी त्यांना आग्रह केला नाही. जबरदस्ती केली नाही. असल्या नकारामुळे त्यांच्या स्टेटसला धक्का पोचला नाही. तुलाच का हे स्टेटस सिम्बॉल म्हणून गरजेचं वाटलं? तूच का हे सोशल सिग्मा म्हणून स्वीकारलं? यू हॅड चॉईस टू से नो! पण तू ते केलं नाहीस, कारण ते सगळं तुलाच हवं होतं. ती बेहोशी, तो दुराचार, ते हसणं खिदळणं, ही तुझीच गरज होती.आधी हौस म्हणून मग सवय म्हणून. तू बघता बघता नादी लागली या वाईट सवयीच्या.

    माझी पाळी सुरू झाली तेव्हा आजीने पापाच्या आईनं मला सारं समजावलं. मला सॅनिटरी पॅड पपांनी आणून दिले. हे सगळं तुला करायला हवं होतं ना गं मम्मी?

    मला तुझी खरी गरज होती तेव्हाच तू घर सोडून निघून गेलीस! कोर्टातला अनुभव तर न विसरता येण्यासारखा. ते तारीख पे तारीख, ते सवाल जवाब, ते आरोप, प्रत्यारोप, सगळंच तणावाचे. पपाकडून जास्तीत जास्त कॅम्पेनसेशन उकळण्यासाठीची तुझी केविलवाणी धडपड, त्या दिवसात घरात चाललेल्या चर्चा, शेजाऱयांच्या नजरा, सगळंच सगळ्यासाठी असह्य होतं. तुमच्या अलग होण्याला पर्यायच नव्हता. कारण जखमा आतल्या आत चिघळल्या की विष होतं. ते सगळीकडे पसरत जातं. अशावेळी ऑपरेशन शिवाय, तो तुकडा, ते अंग कापून फेकल्याशिवाय पर्याय नसतो. मुलीचा सांभाळ आईच करेल असा घटस्फोटाच्या केसमध्ये गृहीत पर्याय पडतो. इथे तुलाच माझी गरज नव्हती. आपल्यात काही ऋणानुबंधच नव्हते. नाळ तुटली अन तेव्हाच सगळं काही तुटलं. तुझे जीन्स माझ्यात यावे असं मलाही वाटत नव्हतं. तू स्वखुशीने तयार झालीस माझा ताबा पपाना द्यायला. तसं इन कॅमेरा मला स्वतंत्रपणे सारं काही विचारलं, माझं मत जाणून घेतलं. छान होते त्यांचे प्रश्न. जे त्यांना समजलं ते आई असून तुला नाही उमजलं. काही प्रश्नांची उत्तरे देतांना आपली तारांबळ उडते. प्रश्न कितीही साधे सोपे असले तरीही! शाळेत कठीण प्रश्न सहज सोडविणारी मी जज महोदयांसमोर अबोल, निस्तब्ध झाले.

    त्यांनीही समजून घेतलं, मलाही समजावलं. त्यांना त्यांचं कर्तव्य बजावायचं असतं. कोर्टात भावनेला थारा नसतो. त्यांची भाषा, त्यांचे निर्णय, हे आर्टिकल नंबर, क्लॉज, सब क्लॉज, एव्हीडन्स, यावरच अवलंबून असतात. इथे कोण जिंकलं कोण हरले हा प्रश्नच नाहीये. तसंही तुला पपा बरोबर राहायचं नव्हतच. इथं मला एक प्रश्न पडतो. तुमचं लव्ह मॅरेज नव्हतं ते सेटल्ड मॅरेज होतं. अशा वेळी जी काही तडजोड करायची असते, समजून घेण्याची प्रक्रिया असते, ती लग्नानंतरच. सगळंच काही सगळ्यांच्या मनासारखे होत नाही. कुठेतरी काहीतरी तडजोड करावीच लागते. मी वयाने मोठी नाहीये. मोठ्यांचं सगळं समजून घेण्या इतकी. पण मला प्रश्न पडलेत. ते वयाला साजेसे नसतील. पण पडलेत. तुला नेमकं काय हवं होतं? आयुष्यात तुझ्या तुझ्यापासून काय अपेक्षा होत्या? तुझं सेन्स ऑफ परपज काय होतं? हे तू पपाना बोलली होतीस का? आपल्या आई वडिलांना तुला नेमकं काय हवं हे तू कधी सांगितले का? लग्नानंतर तुझ्यात पपात संवाद होता का? का फक्त वादच होता? पपाचे कुठे काय चुकले? त्यांनी काय करायला हवं होतं म्हणजे तू सुखी समाधानी, आनंदी झाली असतीस? हे असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं मला माहिती नाहीत. जे काही समजलं त्यातून ती उमजली नाहीत. ना मला, ना पपाला. ती मिळाली असती तर पुढे मला उपयोगी पडली असती, माझ्या लग्नाच्या निर्णयावेळी! ती दिल्ली दूर आहे म्हणा. पण तुझ्याजवळ तरी आहेत का या प्रश्नाची उत्तरं? मला शंका आहे, ती नसणार तुझ्याजवळ. असती तर ही परिस्थिती आलीच नसती! उशीरा का होईना सगळं तुझ्या मनासारखं झालंय. आता तुझी तू स्वतंत्र आहेस. हवे ते करायला, हवं तशी वागायला, हेच तर तुला हवं होतं ना? पण हे स्वातंत्र्य तरी तुला पचेल का,आवडेल का? इथंही मला शंका आहे! एक शंका होती,तुमच्या म्हणजे माई आजी, आजोबाच्या मनात. यानंतर माझं कसं होईल, काय होईल? पपांनी दुसरं लग्न केलं तर? पण तुम्ही कुणीही नका करू काळजी. मला खात्री आहे, ते दुसरं लग्न करणार नाहीत. तो म्हणाल्याच मी ऐकलं आहे, दुधाने तोंड पोळले एकदा, की ताक देखील फुंकून पितो माणूस! त्याच्यासाठी मीच आता सर्वस्व आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.तो मला आईचं प्रेम देऊ शकणार नाही कदाचित. आई ही शेवटी आईच असते. पण ती खरी आई तर मी अनुभवलीच नाही कधी. मला तर पपाच्या डोळ्यातच आई दिसते. त्याच्या स्पर्शात ती भासते. अर्थात त्याला त्याच्या पपा पणाच्या थोडं पुढे जावं लागेल, एक्सट्रा माईल.धावपळ होईल त्याची, तारेवरची कसरत करावी लागेल त्याला. मला खात्री आहे, करेल तो सगळं. शिवाय आज्जी आजोबा आहेतच. ते आहेत तोपर्यंत काही प्रश्नच नाही. त्यानंतर मग मीही मोठी होईनच की माझ्या परीनं.मला जरा लवकर मोठं व्हावं लागणार आहे एव्हढंच.हाथ कंगन को आरसी क्या? मला वाटतं. हे तुला उद्देशून लिहिलेलं वाचूनच तू म्हणशील, माझी बबडी, डॉली केव्हढी मोठी झाली? आजी आजोबा तर निश्चित म्हणतील. माझा असा दावा नाही की सगळं काही तुझंच चुकलं. कुठे ना कुठे, कधी न कधी इतराचंही चुकलं असेल. पपा सुद्धा चुकले असतील. प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतात. इथे कोण चुकलं हे महत्त्वाचे नसते. काय चुकलं हे महत्वाचं. मुख्य म्हणजे त्या चौकातून काहीतरी शिकून आयुष्य पुढे न्यायचं असतं. तोच तो कोळसा उगाळून, त्याच त्या जुन्या घटनांचे दाखले देऊन, फक्त हात काळे होतात. हाती काही लागत नाही. मन कलुषित होतात. चूक करण्यात चूक नसते. तीच ती चूक पुन्हा करण्यात चूक असते. आपली चूक मान्य न करण्यात चूक असते. तू कधी पुढे जाण्याचा प्रयत्नच केला नाहीस. मला वाटतं तुला आम्हा सगळ्यांबरोबर पुढे जायचंच नव्हतं. तुला एकटीलाच पुढे जायचं होतं. झालं, सगळं काही तुझ्या मनासारखं झालं. आता तरी निदान सुखी, आनंदी रहा. आपल्या बोलण्या वागण्याने कुणाला दुखवू नकोस. आज्जी आजोबा, किंवा पपा ना जसे उलट बोलायचीस, सारखा त्यांचा अपमान करायचीस, तसं करू नकोस. कुणाला दुखवू नकोस. हा लहान तोंडी मोठा घास नाही, ही नम्र विनंती आहे. आणखी एक, सणासुदीला, माझ्या वाढदिवसाला मला फोनबिन करू नकोस. पुन्हा ती भावनिक गुंतागुंत, इमोशनल ब्लॅक मेलिंग असलं काही नको आहे मला. स्वतच नाळ तोडून टाकलीस ना, त्या आपल्या निर्णयाला जाग. मलाही गरज उरली नाही, अशा खोट्या नाटकी लाड कौतुकाची. तुला कळत नसेल पण आम्हा मुलींना कळतो खऱया प्रेमाचा, लळा जिव्हाळ्याचा स्पर्श. आता ते शिकवायला लागले ना शाळेत, गुड टच, बॅड टच! मला तर स्पर्शाची भाषा आधीच कळायला लागली. वयात येण्याआधीच मी तुझ्यामुळे मोठी झाले, वयात आले. त्याबद्दल निश्चितच आभार मानायला हवेत तुझे! अर्थात मी इतकीही मोठी नाही झाले, की तुला काही सूनवावं, सुचवावे. तू मनातल्या मनात म्हणशील ही कालची परकरी, शेम्बडी पोर मला ज्ञान द्यायला निघाली! छे, तो विचारच मनातून काढून टाका. हे सगळं तुझ्यासाठी नव्हतंच ममी. ही माझीच गरज होती. मनात जी भडभड, मळमळ साचली होती, ती सगळी गरळ मला ओकून टाकायलाच हवी होती. त्याशिवाय बरंच वाटलं नसतं मला.हा एनिमा गरजेचा होता माझ्यासाठी. आतली घाण बाहेर फेकुन देण्यासाठी. स्वत स्वच्छ होण्यासाठी. रविवेक परकरी पोर, बरमुडा घालणाऱया मम्मीला काय उपदेश देणार, कशी उपदेश देणार, तूच सांग! आपला ताबा फक्त आपल्या हातातल्या धावत्या क्षणावर असतो. पुढे काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ते पत्रिका, ज्योतिष, खरं मानलं तर गुण, राशी, नक्षत्र, मिळवून ठरवलेली लग्न यशस्वी व्हायला हवी. पण बत्तीस अन छत्तीस गुण जमलेली लग्न व्रायावर उधळल्या गेलेली आपण पाहतो. तुमची घटस्फोटाची केस चालू असताना घरी आज्जी आजोबाच्या चर्चा व्हायच्या.एकेक किस्से कानावर यायचे. प्रत्येक घरी काही ना काही समस्या असणारच. सुखी जोडपे, सुखी संसार, अपवादात्मक, हे असं का? जे एकेक किस्से कानावरून यायचे, त्यावरून वाटे खरंच या जगात प्रेम, लळा जिव्हाळा या भावना शिल्लक उरल्या नाहीत का? कुठे चाललो आहोत आपण? म्हणजे मोठ्यांनी लहानांना उपदेशाचे डोस पाजायचे. पण स्वत मात्र वेगळे वागायला मोकळे! कसला आदर्श, कसले मॉडेल ठेवता आहात तुम्ही आईवडील आपल्या मुलापुढे? आम्ही आमच्या ड्युटीज, जबाबदाऱया समजून शहाणपणाने वागायचं, पण तुमचं काय? तुम्हाला कुणी शिकवायचे? मुळात तुमची इच्छा, तयारी तरी आहे का? मला शंका आहे. म्हणजे तुम्हीच नीट वागणार नसाल तर तुम्ही आम्हाला काय सुधारणार? तो अधिकार तुम्हाला मिळतो कसा? जेव्हा आजूबाजूचे, शाळेतले माझ्याकडे वेगळ्या दयाद्र नजरेने बघतात तेव्हा मला त्यांचीच कीव येते. ‘हिचं कसं होईल’ हा एकच भाव, एकच प्रश्न त्यांच्या नजरेत असतो. मला त्यांना अन तुलाही सांगावंसं वाटतं, सगळं काही ठीक होईल. काहीही अडणार नाही, बिघडणार नाही. कारण वरचा बाप्पा तुमच्याकडून एखादी गोष्ट हिसकावून घेतो, तेव्हा त्या बदल्यात बरंच काही देऊन जातो. त्या गिफ्टची जम्मत त्या व्यक्तीलाच माहिती असते. मी म्हटलं नाही तुला, तू वेळेआधीच मला मोठं केलंस म्हणून? तू फक्त मोठंच केलं असं नाही, तर मला बरंच काही शिकवलं. त्यामुळे आता पुढे मीच माझी काळजी घेईन. सावध राहीन. ज्या चुका तू केल्यास त्या न करण्याची जबाबदारी माझी. त्यामुळे तू जशी पावलोपावली ठेचाळलीस तशी मी नाही ठेचळणार. मी अवतीभवतीच्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करेन. माझ्या परीनं माझा इगो काबूत ठेवेन. लहान तोंडी मोठा घास कधीच घेणार नाही. एक स्त्राr म्हणून माझ्या ज्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत त्या माझ्या मीच पाळेन. माझ्यासाठी कुणा लक्ष्मणाला लक्ष्मण रेषा आखावी लागणार नाही. ती माझी मीच आखलेली असेन. जर कुणी मला विचारलं की मोठं होऊन तुला काय व्हायचंय? तर मी आत्मविश्वासानं, मला एक प्रेमळ पत्नी व्हायचंय समजूतदार अर्धांगिनी व्हायचंय. अन हो एक जबाबदार, प्रेमळ आई देखील व्हायचंय! पपाचं आवडतं गाणं आहे अनारकलीतले- ये जिंदगी उसीकी है.. जो किसिका हो गया.. प्यारही मे खो गया.. मला त्या गाण्यातला शेवट पिळवटून टाकतो.. तुला अलविदा.. अलविदा म्हणतांना!.. अलविदा मम्मा!

    -- डॉ. विजय पांढरीपांडे.

      January 28, 2022