नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एकदा मी आणि माझी आई लिफ्टमध्ये असताना खांगटे काका आणि निळू फुले लिफ्ट मध्ये आले. आधी आमच्या भेटी झालेल्या होत्या. मी आईला म्हणालो आई हे निळू फुले…डायरेक्ट आई लिफ्टच्या बाहेर जायला निघाली. मग आम्ही तिला अडवले. इतका निळूभाऊंचा ‘ दरारा ‘ होता पडद्यावर .
आता मी तो फोटो नीट निरखून पाहिला, तर आजोबा वाटतील असे प्रेमळ भाव स्वामींच्या चेहऱ्यावर होते. खूप दिलासा आणि आपुलकी निर्माण झाली माझ्या मनात. मनोमन मी फोटोला नमस्कार करुन आईजवळ आले.
नुकताच
दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी असे
वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि
नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली,
क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी
श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपांनी
स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन
येत होतं.
मी 1977 ला इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत नोकरी करण्यासाठी राणीगंज जवळच्या परसिआ या खाणीत 18.1.1977 ला जॉईन झालो.तो दिवस मला महत्वाचा वाटला होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे कमवू देऊ शकणारी पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी सोडून मी इतक्या दूर बंगालमध्यें आलो होतो.
मोहन – कसं असतं मित्रा, कलाकार एखादी भुमिका करत असताना त्या भुमिकेशी एकरुप असणं गरजेचं असतं, परंतु त्याच क्षणी त्याला हे कळलं पाहिजे की त्याची व्यक्तिगत आयुष्यातली भुमिका वेगळी आहे. नाहीतर त्याचा मनावर परिणाम होतो, याला सरळ साध्या सोप्या भाषेत, वेड लागणं असं म्हणतात.

“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?” दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले….
गवयाचे पोर सुरातच गायचे या उक्तीनुसार मला उपजतच संगीताचा कान आणि गळा लाभला होता. मी छोटा शाहीर म्हणून समरगीते, लोकगीते गाऊ लागलो आणि रंगमंचावर पहिले पाऊल 1961-62 साली टाकले. आज 53 वर्षे मी रंगमंचावर गायक, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतो आहे.
‘मनगट आणि बुद्धीच्या जोरावर जगातल्या सर्व समस्यांवर मार्ग काढता येतो’, या अर्थाचं एक विवेकानंदांचं वाक्य आहे. मी काही ते वाचलेलं नाही. विवेकानंदांचं नसलं, तरी जागतल्या बऱ्याच विचारवंत, तत्ववेत्त्यांनी अशाच अर्थाचं काही न काही, कधी ना कधी सांगीतलेलं आहे.
अतिशय श्रध्देय असणारे जागृत देवस्थान आहे. देऊळ चौसोपी असून भक्तांच्या वंदन पूजन, अर्चन, भजन, किर्तन, पादसेवन आदि सेवांच्या परिपूर्तीसाठीच मुख्यत्वे बांधलेले असल्यामुळे त्याची रचना, उभारणी अतिशय साधी आहे. देवळाचा अलिकडेच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे करताना देवळाच्या मूळ धाटणीत बदल करण्यात आलेला नाही. देऊळ आंग्रे कालीन (वा कदाचित त्या पूर्वीपासून) अस्तित्वात असावे असे पुरावे उपलब्ध आहेत.
पंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून जीवनात खूप यशस्वी झाला!! तो बंडखोर मुलगा म्हणजेच ‘आकाशवाणी, पुणे’चे सुप्रसिद्ध निवेदक, विनोदी एकपात्री कलाकार, विडंबन गीतकार, कवी, विनोदी लेखक.. बण्डा जोशी!!
Copyright © 2025 | Marathisrushti