(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जोडावी – भाग ५

    संध्याकाळी प्रतिभा तिच्याकडील चावीने दरवाजा उघडून स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते … प्रतिभा स्वयंपाकघरातून धावत येऊन दरवाजा उघडते तर दारात यामिनी उभी असते… आता आल्या आल्या यामिनी सोफ्यावर अंग टाकते आणि

      February 19, 2023


  • सोन्याचा उंदीर

    खेड्यात राहणारा सदाशिव हुशार व चुणचुणीत मुलगा होता. मात्र गरिबीमुळे त्याला फार शिकता आले नव्हते. आपल्या आईबरोबर तो छोट्या झोपडीत रहात होता. मोठा व्यवसाय करून श्रीमंत व्हायचे त्याचे स्वप्न होते. म्हणून शेजारच्या मोठ्या गावी जाऊन नशीब आजमवायचे ठरवून व तसे आईला सांगून त्याने घर सोडले.

    त्या गावी एक श्रीमंत सावकार होता. गरजू लोकांना तो कर्ज देतो, असे सदाशिवला कळले होते. त्यामुळे तो त्या सावकाराकडे गेला. परंतु घरात मरून पडलेल्या उंदराकडे बोट दाखवित सावकार म्हणाला की, काहीतरी तारण ठेवल्याशिवाय मी कर्जच काय; हा मरून पडलेला उंदीरही देणार नाही!

    सदाशिव सावकाराला म्हणाला, “हा उंदीर मला द्या. मी त्याची एक दिवस तुमच्याकडे नक्कीच दामदुप्पट भरपाई देईन.”

    सावकाराला वाटले, बरे झाले ही घाण आपोआप घरातून जात आहे. म्हणून त्याने सदाशिवला मेलेला उंदीर नेण्यास परवानगी दिली. सदाशिव तो उंदीर हातात घेऊन रस्ताने निघाला. एका दुकानदाराने ते पाहिले व त्याला म्हणाला, हा उंदीर माझ्या मांजरासाठी दे, मी त्या बदल्यात तुला थोडी ज्वारी देईन. सदाशिवने त्याच्याकडून ज्वारी घेतली व रस्ताच्या कडेला दगडाची चूल बांधून त्यावर भाजून त्याच्या लाह्या केल्या.

    तेथून काही मोळीविके जात होते. लाकडे तोडून त्यांना खूप भूक लागली होती. सदाशिवने कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांना त्या लाह्या दिल्या. मोळीविक्यांनी खूश होऊन त्याला बरीच लाकडे दिली. सुदैवाने त्यात एक चंदनाचेही लाकूड होते. ते विकून सदाशिवला चांगले पैसे मिळाले.

    मग त्याने लाकडाचाच धंदा सुरू केला. सदाशिवच्या प्रामाणिकपणामुळे धंद्याला बरकत आली व थोड्याच दिवसात तो श्रीमंत व्यापारी झाला एके दिवशी सदाशिवने एका सोनाराकडून सोन्याचा उंदीर तयार करून घेतला व तो घेऊन त्या श्रीमंत सावकाराकडे गेला.

    सदाशिव त्याला म्हणाला, काही वर्षांपूर्वी तुम्ही मला कर्ज म्हणून एक मेलेला उंदीर दिला होता. त्याच्या भरपाईसाठी मी हा सोन्याचा उंदीर घेऊन आलो आहे;. तो तुम्ही स्वीकारावा.

    श्रीमंत सावकारालाही तो प्रसंग आठवला व सदाशिव भरपाई म्हणून सोन्याचा उंदीर देत असल्याचेपाहून त्याला आश्चर्य वाटले. नंतर त्याने गावातील समस्त व्यापाऱ्यांना बोलावून खास सभेत ही कथा सांगून सदाशिवचा यथोचित सत्कार केलो.

      December 8, 2017


  • कोंबड्याचे अवेळी आरवणे

    आज सगळीकडे सर्व प्रकारचे प्रदूषण बघावयास मिळते. त्यात वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे वेगवेगळे आजार आणि जीवन पद्धती बदलत आहेत. असाच एका कोंबड्याच्या सवयीत झालेला बदल..!

      September 20, 2014


  • भाताचे रोप

    चिमणे इवलाले बीज
    रम्य त्यात होती शेज.
    दीड वितीचे कुणि रोप
    घेत तिथे होते झोप ।।१॥।

    ऊन म्हणाले, 'ऊठ गड्या.'
    पाउस वदला, 'मार उड्या,
    जगात ये रे ह्या उघड्या.
    करी जळाच्या पायघड्या.' ।॥॥२॥।

    वायु बोलला, 'ऊठ कि रे,
    माझ्याशी धर फेर बरे.
    हसले जर आम्हा कोणी

    दावु वाकुल्या नाचोनी.' ॥३॥।
    भूमि म्हणाली, 'चल बाळा,
    वाजव पाण्याचा वाळा,
    अंगी हिरवी सोनसळा
    घालुनि ही दावी सकळा.' ।॥॥४॥।

    झोप झटकुनी ते उठले,
    नंदबाळ जणु अवतरले.

    पाउस, वारा, ऊन तसे
    जमले भवती गोप कसे. ॥५॥

    अदभुत ह्याचा खेळ अहा
    जरा येउनी पहा, पहा.
    उगवे, चमके, पहा तरी
    मोरपिसांचा तुरा शिरी. ।॥६॥

      July 1, 2026


  • अपघात

    अपघात. ज्या घटनेचं नियोजन करता येत नाही, अशी घटना. वृत्तपत्राच्या दृष्टीनं अपघात म्हणजे एक बातमी. अपघात कसा घडला, कोठे घडला, कोणाला घडला यावरून त्या बातमीची लांबी-रुंदी ठरणार. मी कधी काळी वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टिंग करायचो. अपघात आहे, असं कळलं की फेटल आहे का? असा निर्विकार प्रश्न असायचा. अपघात मोठा असेल, तर त्याचं वर्णन कसं द्यायचं, प्रत्यक्ष घटनास्थळावर जायचं का, असे प्रश्न यायचे. अपघातामागचा धक्का, वेदना त्या वेळी तरी जाणवल्या नाहीत. त्याची बातमी दिली, की आपली इतिकर्तव्यता संपली, असंच काहीसं होतं. वेगळ्या व्यवसायाचा तो परिणाम असावा किंवा आपल्याला काय त्याचं, ही वृत्ती असावी; पण वृत्तपत्रात उमटणाऱया एखाद्या छोट्या बातमीमागे एखाद्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून जातं, याची जाणीव नव्हती. एक अपघात असा पहिला, की त्या दिवशी रात्री मी जेवण नाही करू शकलो. पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या बसने रस्त्यातच पेट घेतला आणि ती भस्मसात झाली. शांताबाई जोग आणि इतर काही नाट्य कलावंतांचा त्यात कोळसा झाला. पाच बाय पाच एवढ्या आकारात चार-पाच जणांच्या मृतदेहाचे ते अवशेष पाहिले अन् गदगदून आलं. या अपघाताची बातमी वर्णनासह लिहिली; पण ती घटना अस्वस्थ करून गेली. त्या दिवशी ना झोप, ना भूक. आता एखादी बातमी वाचली तरी त्या व्यक्तीचं कुटुंब उभं ठाकतं डोळ्यापुढं, आप्तस्वकीय दिसू लागतात. कोणाचा तरुण मुलगा, तर कोणा बछड्याचा बाप. कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ... आयुष्य विस्कटून टाकणारे आपघात.

    हे एवढं सारं सांगण्याचं कारणही तसंच आहे. पत्रकारितेत मनाचा दगडही होऊ शकतो अन् त्याला पाझरही असतो. आता अशी एक घटना... नागपूरला घडलेली. एक महिला पत्रकाराच्या संदर्भातली, माझ्या सहकारी महिलेच्या संदर्भातली. लोकमत नागपूर कार्यालयात `सखी' या पुरवणीचं काम पाहणारी वर्षा पाटील. ती अन् तिचा मुलगा बरोबर राहायचे. दोघांना तेच एकमेकांचे. जिवाभावाचे. ऑफीसमध्ये बसलो होतो. फोन आला. वर्षाच्या मुलाला अपघात झालाय. मेंदूला जबरदस्त मार बसलाय. मी आणि काही सहकारी हॉस्पिटलमध्ये धावलो. काही मदत हवी आहे का, याची विचारपूस केली. डॉक्टरांकडे चौकशी केली. त्याला पाहिलं. वर्षाला भेटलो तिचा चेहरा काहीच बोलत नव्हता. ती धीटपणा दाखवीत होती. तिनं अवसान आणलं होतं, की ती या धक्क्यानं थिजली होती... काही कळेना. अशा वेळी काय बोलायचं ते कळेना. काळजी करू नको, सगळं ठीक होईल हे शब्द तिच्या पशात टाकून परतलो. अपघात गंभीर होता. कोण चुकलं, कोण बरोबर यापेक्षाही शिक्षा अटळ होती. आणखी काही दिवस वर्षाला कामावर येणं कठीण होतं. मी कामाची व्यवस्था पाहिली. दुसऱया सहकाऱयाला जबाबदारी दिली. तो दिवस संपला. दुसऱयाच दिवशी ऑफीसमध्ये गेलो. आता दवाखान्यात जावं असा विचार करून जिना उतरलो, तर वर्षा येत होती. मी थांबलो. तिचा तो तसाच भावनाविहीन चेहरा. मी विचारलं, `इथं काय करत्येस?' ती म्हणाली, मजकुराचं पाहते.' मी म्हटलं, `इथली काही काळजी करू नको. आम्ही पाहू.' ती म्हणाली, `नको, मी पाहीन. तिथं तरी नुसतंच बसायचंय ना?' मी काही बोलले नाही. वर्षानं त्या अंकाचं, पुढच्या अंकाचं काम सुरू केलं. दिवस जात होते. धीर खचत होता अन् वर्षा खंबीरपणे सगळ्यांनाच धीर देत होती. उपचाराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, प्राथर्ना सुरू झाल्या; पण परमेश्वरानं कोणाचं काहीही ऐकायचं नाही, असंच ठरविलं होतं.

    अचानक एक दिवस वर्षाच्या हालचालींना वेग आला. मुलाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये हलवायचं होतं. मुलाच्या किडनी दान करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण केले होते. अवधी कमी होता. तिला तिचा मुलगा कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत पाहायचा होता. त्यासाठी हे रूप संपलं तरी चालेल, या वास्तवाचा तिनं स्वीकार केला होता; पण नागपूरसारख्या शहरातही अशा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारं रसायन उपलब्ध नव्हतं. मुंबई-हैदराबाद फोन सुरू झाले; पण त्यासाठीचा अवधी आणि वर्षाच्या मुलाला देवानं दिलेलं आयुष्य यात कोण जिंकणार, हा प्रश्न होता. अखेर त्याला दुसऱया रुग्णालयात हलविलं. डॉक्टरांचं पथक तयार झालं. ज्याला या किडनीचा लाभ होणार तोही सज्ज होता; पण ते होणे नव्हते. तो गेला होता. मृत व्यक्तीच्या किडनीज् काही कामाच्या नव्हत्या. पेशन्टचं रूपांतर बॉडीमध्ये झालं होतं; पण वर्षा अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिनं नेत्रदानाचं काम तरी पूर्ण करावं यासाठी खटपट सुरू केली. पोलिसांची अडवणूक, वैद्यकीय तत्परता, वेळेची स्पर्धा यातून अखेर डोळे घेता आले. हा अपघात आणि अंत्यसंस्कारापर्यंतच प्रवासच असा होता, की तिथं दुःख, वेदना यापेक्षाही यंत्रणेविरुद्धचा संताप अधिक यावा, अशी परिस्थिती होती. मृतदेह मिळण्यासाठी एखाद्या आईकडून जेव्हा 500 रुपयांची लाच मागितली जाते, त्या वेळी तिला काय वाटलं असेल? पण वर्षा तिथंही घट्ट उभी होती. वर्षा एकटी राहिली. तिचा 18 वर्षांचा मुलगा, तिचं श्रांत होण्याचं स्थळच एका अपघातानं उखडून टाकलं. नियोजन करता येणार नाही त्याला अपघात म्हणावं, हे खरं; पण अपघातातही जेव्हा दृष्टी देण्याचं, जीवन देण्याचं नियोजन करण्याची उमेद येते त्याला काय म्हणावं?
    आजही वर्षाला जेव्हा मी पाहतो, तिच्याशी बोलतो त्या वेळी मला आठवते ती काळापेक्षाही मोठी झालेली वर्षा.

    -- किशोर कुलकर्णी

      March 20, 2006


  • सचिन तेंडुलकर …सिर्फ नाम काफी है

    सचिन बद्दल सांगायला लागले तर खूप लिहावे लागेल. परंतु त्याचे रेकॉर्डस् सर्वाना तोंडपाठ आहेतच तरीपण सांगतो.

      August 25, 2021


  • हॉटेल मॅनेजर गोमु (गोमुच्या गोष्टी- क्रमांक १७)

    गोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही.
    असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं.
    कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं.
    गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता.

      April 7, 2022


  • फूलपाखरे नि फुले

    रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी

    आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी...१,

    नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी

    फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी...२,

    नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक

    मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक...३,

    दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा

    कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      August 4, 2015


  • गायीचे प्रेम

    रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून, जणू तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते.

    तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती. ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.

    एक दहा वर्षाचा मुलगा हातात पिशवी घेवून तेथे आला. त्याने पिशवीतून प्रथम एक मोठा ब्रेड काढला. गाईचे लक्ष जातच ती त्याचावर झेपावली. अतिशय अधाशीपणे तिने तो सर्व ब्रेड क्षणात खावून टाकला. मुलगा बघतच होता. गायीला हात लावून तो निघून गेला. गाय हलके हलके वळून दूर जाण्याऱ्या त्या अनामिक मुलाला बघत होती. तिच्या डोळ्यातून बाहेर पडनार्या नजरेमधून तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद दिले जात असल्याचा संकेत स्पष्टपणे जाणवत होता.

    डॉ.भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 5, 2018


  • प्रवास शब्दकळेचा

    शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते

      January 24, 2022