नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…
बिंदूने १९८५ सालापर्यंत अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यातील ‘इम्तिहान’, ‘हवस’, ‘कामशास्त्र’ चित्रपटातील भूमिका व्हॅम्पीश होत्या. ‘अभिमान’, ‘अमरप्रेम’ सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका, दुसऱ्या टोकाच्या होत्या. ‘हम आपके है कौन’ सारख्या चित्रपटांतून तिने मावशी, आत्याच्या भूमिका केल्या. आजवर २०० हून अधिक चित्रपटात कामे करुन तिने आता चित्रसंन्यास घेतलेला आहे. तिच्या भूमिकांचं कौतुकही झालं, मात्र सात वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळूनही, तो पुरस्कार काही तिला मिळाला नाही..

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.
पं. जवाहरलाल नेहरू याच्यानंतर भारताची समर्थपणे धुरा सांभाळणारे लालबहादूर शास्त्री यांचे व्यक्तीमत्त्व कमालीचे सोज्वळ शांत व तेवढेच कणखर होते. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनाही अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते नैनी कारागृहात असताना घडलेली एक घटना.
कारागृहात असताना त्यांची पुष्पा अचानक आजारी पडली व थोड्याच दिवसानी तिची प्रकृती गंभीर झाली. घरून निरोप आल्यावर कारागृहातील सहकाऱ्यांनी त्यांना पॅरोलवर सुटून घरी जाण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शास्त्रीजींनी पॅरोलसाठी अर्ज केला. त्यांचा पॅरोल मंजूरही झाला.
मात्र तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्यांना अट घातली की, पॅरोलवर असताना बाहेरच्या सत्याग्रहींना कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. शास्त्रीजींना ती अट मुळीच मान्य नव्हती. त्यामुळे पॅरोलवर सुटून घरी जाण्यास त्यांनी नकार दिला. तिकडे मुलीची प्रकृती जास्तच गंभीर झाली तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यानेच अट काढून टाकली व शास्त्रीजींची विनाअट पॅरोलवर सुटका केली. मात्र घरी जाईपर्यंत मुलीचे निधन झाले होते.
शास्त्रीजींनी शोक आवरून तिच्यावर अंत्यसंस्कार गेले. मात्र नंतर ते घरी गेले नाहीत. तर थेट तुरुंगात जाण्याची त्यांनी तयारी केली. आजुबाजूच्या लोकांनी त्यांना पॅरोलची अजुन मुदत आहे, त्यामुळे तुम्ही घरी राहू शकता असे वारंवार सांगितले. त्या लोकांना शास्त्रीजी म्हणाले, ज्या कारणासाठी मला पॅरोल मंजूर झाला ते कारणच आता राहिले नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे मला थेट तुरुंगातच गेले पाहिजे आणि सर्वाचा निरोप घेऊन शास्त्रीजी थेट तुरुंगातच गेले. त्याच्या या निर्णयामुळे तुरुंगाचा अधिकारीही विस्मयचकित झाला.
आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास एखादा मोठा कौटुंबिक सोहळा किंवा कार्यक्रम सर्वात उत्तम जागा आहे. अश्या सोहळ्यांमध्ये आपण पूर्णपणे जागरूक अवस्थेत व विनोदबुद्धी दक्ष ठेवल्यास मानवी स्वभावाचे अनेक नाव-नवीन प्रकार अनुभवायास मिळतात.
"तत्वज्ञानी नातेवाईक " या प्रकारातील लोक नेहमीच दुसर्यांना स्वतःचा कधी न मागितलेला सल्ला देण्यास तत्पर असतात . कोणत्याही गोष्टीत व कामात बारीक-बारीक चुका दाखवून आपले उच्च विचार मांडण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळ योग्यच वाटत असते, थोडक्यात सांगायचे म्हणजे या लोकांना वेळेचे भान नसते. यांची देहबोली देखील स्वभावाला पूरकच असते. विषय कोणताही असो राजकारण, अर्थकारण, देश, विदेश, विज्ञान इ.. प्रत्येक विषयात आपला सखोल अभ्यास असल्याचा गोड गैरसमज बाळगून आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत उच्चतम शिखरावर ठेवणे हे यांचे वैशिष्ट्य, छंद म्हणाल तर युवकांना जबरदस्तीचे मार्गदर्शन करणे. अश्या लोकांना ऐकण्याची मज्जा वेगळीच असते परंतु एक ठराविक अंतर ठेवुनच.
"जावई " नावाचा प्राणी, हा प्राणी दोन पायांचाच असतो, अगदी सर्वसाधारण माणसासारखाच दिसतो परंतु तरीही हा प्राणी पृथ्वी या ग्रहावरचा नसून बाहेरून आला आहे असा भास झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. नातेवाईकांमध्ये हा प्रकार अतिशय मौल्यवान, नाजूक व जतन करून ठेवण्याचा असतो. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात या प्राण्याच्या आजूबाजूला नेहमीच दोन-चार डोकी निव्वळ मनोरंजनासाठी व तोंडातून पडलेला शब्द झेलण्यासाठीच तत्पर असतात. यांचे झेलण्याचे अप्रतिम कौश्यल्य अर्थातच घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच लाभते. जावयाच्या प्रत्येक गोष्टीत होकार पुरवणे, उगाचच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे, सतत आग्रह करणे अशी यांची काही ठराविक वैशिष्ठे यांमध्ये अढळतात. या प्राण्यासाठी एवढे करूनही नाराजी व्यक्त करणारी प्रजाती यात सापडते याचा खेद वाटतो.
थोडंसं हटके बघितले तर पारिवारिक कार्यक्रमात आत अजून एक दुसरा कार्यक्रम शांतपणे सुरु असतो, तो म्हणजे "मुली-मुले दाखवण्याचा अघोषित कार्यक्रम" ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा लवकरच बार उडवण्यानचा विचार असतो त्यांच्यासाठी तर हि सुवर्ण संधीच असते. यासाठी पद्धतशीरपणे पेहरावापासून ते चालण्या-बोलण्यापर्यंत नियोजन व रंगीत तालीम करून घेतली जाते, त्यासाठी पालकांकडून विशेष महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन पुरवले जाते. बिचाऱ्या मुलं-मुलींची इच्छा नसली तरी जबरदस्तीने नटून-थटून, हसू येत नसेल तरी चेहऱ्यावर एक हलकासा हसरा भाव ठेवून बुजगावण्यासारखे मिरवावे लागते. काहींची तशी हौसदेखील असते, अशी मुले कार्यक्रमाचा आनंद लुटतात परंतु इच्छेविरुद्ध आलेल्यांची मनाची घुसमट समजण्याची पालकांनी तसदी घेणे थोडेसे मला तरी गरजेचे वाटते.
एक खास वर्ग आपल्याला कोपऱ्या-कोपऱ्याने मिरवतांना, कुठेतरी लोकांपासून लांब शांत बसलेला आणि कधी येथून पाय काढता येईल याची संधी शोधणारा पाहावयास मिळतो. हा असतो "स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा वर्ग" डोक्यात एका बाजूला अभ्यास व परीक्षेचा सतत घोळणारा विचार व दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचे येणारे तीक्ष्ण बाणासारखे प्रश्न यामध्ये हा पिसलेला असतो. लोकांची नजर चुकवून त्यांच्यापासून लांब राहणे हा या मुलांचा स्वभाव नसतो तर मजबुरी असते कारण यश-अपयश हा जरी शेवटच्या दिवसाचा निर्णय असला तरी तितपर्यंतचा प्रवास मोठा आणि कठीण असतो, तरी याचा काहीही विचार न करता काही लोक कळत-नकळत मुलांचा आत्मविश्वास कमी होईल असे बोलून त्यांचा हा प्रवास अजून कठीण बनवतात.
आपण कधी-कधी सहजपणे म्हणतो कि काही लोक साखरेपेक्षाही गोड असतात, याचा संबंध त्यांच्या स्वभावाशी असतो. परंतु काही लोक फक्त तोंडावर बोलण्यापुरतेच गोड असतात ते नेहमीच तोंडात साखर ठेऊन बोलतात कि काय असे वाटते. असले नातेवाईक कार्यक्रमात फक्त स्वतःचे चाहते वाढवण्याच्या हेतूने मिरवत असतात. काहीही असो समोरून आपला गोडपण सोडायचा नाही असा पक्का निश्चय असतो. परंतु पाठीमागे दुसयांच्या नावाचे खडे फोडण्यात देखी यांचाच अव्वल क्रमांक असतो.
एकीकडे रुसलेले चेहरे तर दुसरीकडे प्रफुल्लित हास्य, कुणीकडे नव्या नात्यांची सुरवात तर कुणीकडे जुन्या नात्यांची सावरासावर, एकीकडे भावनाशून्य मन तर दुसरीकडे भावनिक झालेले मन, एकीकडे नवीन वादांची सुरवात तर दुसरीकडे जुन्या वादांवर पांघरून असा हा नात्यांचा गेट-टु -गेदर रंगीबेरंगी व्यक्तिरेखांनी रेखलेला व असंख्य भावनांनी बहरलेला.
-- विवेक विजय रणदिवे

खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.
१९३७ मध्ये सावरकर पुण्याला आले होते.तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक निघाली. श्री शं. ग. चापेकर त्यावेळी वर्ग चालवत. त्यावेळी त्यांनी सावरकरांना हार घातला.व वंदन केले. सावरकरांनी त्यांना विचारले “आपण कोण ?” ते म्हणाले “मी चापेकर” सावरकर म्हणाले “ चापेकरांनी सावरकरांना हार नाही घालायचा. मीच चापेकराना हार घालायचा कारण मी चापेकर बंधुंपासून स्फूर्ती घेतली. असे म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील हार श्री शं. ग. चापेकर यांना घातला. १९३८ मध्ये सावरकर पनवेल येथे गेले होते. तेथे त्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतण्याने त्यांना हार घातला. व सांगितले कि फडक्यांची पत्नी जवळच शिरढोण येथे राहतात. व्याखान झाल्यावर सावरकर शिरढोण येथे गेले, त्यांना लवून नमस्कार केला. व पायावर हार घातला. १९३९ मध्ये सावरकर कलकत्याला गेले होते. त्यांच्या सत्कारावेळी त्यांना हार घातले गेले. त्यावर ते म्हणाले “याच पावन भूमीत क्रांतिकारक झाले. तेव्हा मला त्यांची आठवण येते आहे.” त्यानंतर त्यांच्यासोबत अंदमान मध्ये हृषीकेश, भूपेश गुप्ता, आशुतोष लाहिरी यांनी शिक्षा भोगली होती. त्यांचाही सन्मान व्हायला हवा म्हणून आपल्या गळ्यातील हार काढून त्यांना घालून मिठी मारली.
मादाम कामा सावरकरांची दुसरी आई होत्या. त्यांच्या बद्दल सावरकरांना अत्यंत आदर होता. त्यांनीसुद्धा सावरकरांवर पोटच्या मुलाप्रमाणे माया केली. १५- १२ १९१४ ला भावाला लीहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात “कामांना भेटायची उत्कंठा मला किती आहे मी सांगू शकत नाही. त्या तुला नियमित पत्र पाठवतात. हे वाचून आनंद झाला. त्यांच्या उदात्त चरित्र याबद्दल अत्यंत आदर आहे. मी त्यांना समक्ष भेटू शकत नाही याचा मला खेद आहे तेव्हा आपल्या आप्ता आधी मादाम कामांना माझा प्रणाम सांग.” १९२५ मध्ये सावरकरांचे अत्यंत जवळचे स्नेही अय्यर निधन पावले. त्यावेळी लिहिलेल्या मृत्युलेखात ते लिहितात “अति दु:खामुळे माझे जीवन असह्य झाले होते. अनेकदा जीवनही नकोसे वाटे. तुझ्या निधानानी माझ्यावर ताण पडला आहे, ज्यांच्यासाठी तू सोसलेस त्यांनी तुझ्याशी सबंध ठेवले नाहीत. तू जी गुप्त कामे केलीस ती लिहावीशी वाटतात पण लिहू शकत नाही. तुला जिवंतपणी कधीच शांतता लाभली नाही ती आता तुला लाभो.“
-- रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई).

नरभक्षकांची शिकार साधताना त्याला विलक्षण खडतर तपश्चर्या करावी लागली. हिमालयाच्या थंडीवाऱ्यात, पावसात, उघड्यावर रात्रंदिवस जागत, निश्चित अन्नपाण्याशिवाय दिवसामागून दिवस काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका वेळी तर गळू झाल्याने त्याचा डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. कानाच्या पडद्याला भोक पडल्याने ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत काहीवेळा दिवसरात्र झोपेशिवाय केवळ चहा बिस्किटांवर राहून काढल्यावरच त्याची नरभक्षकाशी गाठ पडली. तो म्हणतो, "नरभक्षकांच्या छायेत आपण किंवा आपल्या निकटवर्तीयांनी जगण्यासारखी भयंकर आपत्ती नाही.” नरभक्षकांच्या मागावर असताना नरभक्षक आपल्या मागावर असणार व आपली शिकार करण्याची संधी शोधत असणार, याची त्याला पूर्ण कल्पना असे. नरभक्षकाची शिकार हा खरे तर नरभक्षक आणि शिकारी यांच्यातील परस्पर शिकारीचा सामनाच असतो व परिस्थिती नरभक्षकाला पूर्ण अनुकूल असते. पण हा धोका पत्करूनही व त्याचप्रमाणे ज्या संपूर्ण कुमाऊँला नरभक्षकांच्या भीषण छायेतून वाचवण्याचा मान मिळवूनही या अत्यंत सुस्वभावी व विनयी माणसाच्या जंगल व जंगलवासींकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काहीही बदल झालेला नाही. म्हणून तो चुकाचा नरभक्षक या आपल्या कथेत लिहू शकतो - "The thought of disabling an animal and a sleep-ing one at that simply because he occsionally liked a charge of diet was hatefull."
वन्य प्राण्यांच्या सवयीची त्याला पूर्ण जाण होती. त्यांचे माग पाहून तो अचूक निदान करू शकत असे. प्राण्यांचे लिंग, वय, आकार एवढेच काय त्यांची मन:स्थितीसुद्धा तो ओळखू शके. सर्व वन्य प्राणी लाजाळू असतात. परिस्थिती त्यांना आक्रमक, हल्लेखोर बनवते. आज निसर्ग समतोल न्यायाच्या संदर्भात कोणताही प्राणी भुकेसाठी, भुकेपुरते व भूक लागेल तेव्हाच किंवा संरक्षणासाठी दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करतो ही वस्तुस्थिती मांडली जाते. या विचाराचा उगम कॉर्बेटच्या लिखाणात आढळतो. इतकेच नाही तर बलिष्ठ प्राणी दुबळ्या प्राण्यांचे संरक्षण करतात, त्यांना कधीही त्रास देत नाहीत व हाच जंगलचा कायदा आहे, असे कॉर्बेट निक्षून सांगत असे. जिम कॉर्बेटने आपल्या ‘माय इंडिया' या पुस्तकात एक अनुभव/गोष्ट सांगितली आहे. दोन अजाण बालके जंगलात हरवतात. त्या जंगलात वाघ, बिबटे, अस्वले तसेच अन्य वन्य श्वापदांचे वास्तव्य होते. ३ दिवसांनी जेव्हा ती मुले सापडली तेव्हा त्यांच्यावर नखाचा ओरखडासुद्धा नव्हता. या तीन दिवसात प्राण्यांनी ती मुले पाहिली नाहीत केली असे होणेच शक्य नाही पण कुणाही प्राण्याने त्या मुलांना कसलीही इजा नव्हती. कॉर्बेटने सांगितलेल्या गोष्टीमुळे त्याच्या विचारांना निश्चिती मिळते. जिम कॉर्बेटच्या ज्ञानाचे, अनुभवाचे, अनुमानाचे, निष्कर्षाचे प्रतिबिंब त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला स्पष्टपणे पहायला मिळते.
जिम कॉर्बेटने नरभक्षकांच्या दहशतीच्या क्रौर्याच्या कथा रंगवल्या पण निसर्गातील समतोल शाबूत ठेवण्यासाठी सहाय्यभूत होण्याचे कार्य वाघाला पार पाडायचे असते व त्यासाठी वाघांच्या अस्तित्वाचे महत्त्व पण तो जाणून होता. वाघांची भलावणी तो 'सहृदय सद्गृहस्थ' अशी करत असे. वाघ नरभक्षक का बनतात व त्यात माणसांचा सहभाग किती, याची तो कारणमिमांसा करत असे. तो म्हणतो, "वाघ नरभक्षक होण्याची कारणे म्हणजे असह्य वेदना देणाऱ्या किंवा अपंगत्व आणणाऱ्या जखमा, वृद्धत्व किंवा अपुरे नैसर्गिक खाद्य! साळिंदर हा छोटासा प्राणी. हे वाघाचे आवडते खाद्य! पण साळिंदराचे काटे वाघाच्या पायात घुसत. त्या काट्यामुळे पायाला खोल जखमा होत. त्याला चालणे मुश्किल होई. त्याचे नैसर्गिक खाद्य मिळवणे मुश्किल होत असे. अशा परिस्थितीत जर चुकून त्याच्या हातून नरहत्या झाली तर हे सुद्धा एक खाद्य आहे हे त्याच्या लक्षात येई व तो नरभक्षक बने.” जिमने मारलेल्या बऱ्याच नरभक्षकांच्या पायातून त्याने साळिंदराचे काटे बाहेर काढले होते तर मुक्तेश्वरची वाघिण एका डोळ्याने आंधळी होती.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे नरभक्षकांच्या मोहिमेवर असताना त्याला एक आंतरिक संवेदना होत असे व त्यामुळे त्याचे संरक्षण होत असे.
पण त्याला आलेला एक अद्भुत अनुभव म्हणजे पूर्णागिरीच्या पहाडावर त्याला दिसलेले दिवे! हा अनुभव त्याने आपल्या 'तालादेसचा नरभक्षक' या कथेत सांगतला आहे. टणकपूरपासून २५ कि.मी. अंतरावर माता भगवतीचे 'पूर्णागिरी' हे शक्तिपीठ आजही उत्तर भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. पूर्णागिरी मंदिराच्या समोरील पहाडावर, देवीची कृपा असलेल्या श्रद्धाळू भक्तांना, त्या परिसरातील लोकांचे भले करणाऱ्या व्यक्तींना दिव्य ज्योतीचे दर्शन होते, अशी आजही ह्या परिसरात वदंता आहे आणि विशेष म्हणजे जिम जेव्हा तालादेसच्या नरभक्षकाच्या मोहिमेवर होता तेव्हा त्याला व त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांना या दिव्य ज्योतींचे दर्शन झाले होते. त्या संबंधी त्याने एका स्थानिक पत्रकात लेखही प्रसिद्ध केला होता. तो लेख जेव्हा पूर्णागिरीच्या मुख्य पुजाऱ्याच्या ते वाचण्यात आला तेव्हा हे दिवे पाहिलेला पहिला युरोपियन माणूस म्हणून स्वत: जिमला भेटण्यासाठी आले होते. या दिव्यांची वस्तुस्थिती त्यांना माहित होती तर जिमने ते प्रत्यक्ष पाहिले होते.
वाघ वाङ्मयाला व शिकारकथांना प्रसिद्धी मिळाली ती केनेथ अँडरसन व जिम कॉर्बेटमुळे! पण जिम कॉर्बेटचं लिखाण अतिशय सुंदर आहे. या लिखाणात त्याने केलेली निसर्गाची वर्णने, प्राण्यांच्या सवयी, लोकांच्या भावना, त्यांचे स्वभाव, त्याला स्वत:ला आलेले अनुभव हे सर्व वाचताना या सर्व घटनांचे आपणही एक साक्षीदार आहोत असे वाटू लागते व त्यात आपण गुरफटू लागतो.
जिम कॉर्बेटने लिहिलेल्या पुस्तकांना जगात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषात त्याची भाषांतरे झाली. अनेक आवृत्त्या निघाल्या. विक्रीचे उच्चांक मोडले. त्याच्या 'मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ' या पुस्तकाचा तर भारतात सिनीअर केंब्रिजच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला होता. या पुस्तकांनी जिम कॉर्बेटला लक्षाधीश बनवले व निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसाला निसर्ग भरभरून देतो ही त्याची श्रद्धा खरी ठरली. पण हे मानधन माझे नाही तर हे पैसे निसर्गाचे आहेत या भावनेने मिळालेले सर्व मानधन त्याने भारत व ब्रिटनमधील वन्यप्राण्यांच्या रक्षणाच्या योजना आखण्यात, गिरीजनांना, गोरगरिबांना, युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांना, अंधांना मदत करण्यात खर्च केले.
--प्रकाश लेले
गणपती विसर्जन झालं होतं. आतां सर्व नवरात्रीची वाट पहात होते. देवीचे पूजन अनेक ठिकाणी घट बसवून होई.
देवीची मंदिरे तर देवीचा महोत्सवच करतात. अशा वेळेला यशवंतांकडे एका देवीच्या मंदीराचे विश्वस्त (Trustee) आले होते. ते चौघे होते.
Copyright © 2025 | Marathisrushti