नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जीवनमार्गाचा जर आलेख काढला तर त्यावर टप्या टप्याने जीवनांत शारीरिक व मानसिक बदल होत असलेला जाणवतो. ह्याला माईल स्टोन्स Mile Stones अर्थात जीवन मार्गातील मैलांचे दगड म्हणतात. ह्या खूणा तुमची जीवन पद्धती, वैचारीक जडन घडन कशी बदलत जाते. ह्याचे वर्णन करते.
तिसर्या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती .
कृषि विदयालयात मित्रांच्या खुप बढाया मारल्या जायच्या मी हे केलं मी ते केलं हे तर काहीच नाही त्यापेक्षा मी जास्ता करु शकतो वगैरेवगैरे. एकाने हरभराच्या झाडावर चढवायचे दुस-याने उतरवायचे अश्या बोलण्यातच एकदा आमच्या मित्रांमध्ये पैज लागली.
एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा तुम्ही तुमचे कार्य न चुकता सुरु केले खरेच तुमच्या धैर्यास मनापासून सलाम.
घनघोर पावसात सुकमा जिल्ह्यातील घनदाट जंगलात निर्णायक विजय मिळविण्याचे जिकरीचे कार्य केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जूलै २०१८ करून ८६ नक्षलीना ठार मारून निर्णायक यश मिळविले आहे.देशाच्या इतर भागात २०० नक्षली मारले गेले आहेत.
(लेखक – ऍड. कृष्णा पाटिल, तासगाव, सांगली) साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरवशाचा कार्यकर्ता. आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूने. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलुख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव सत्तू….
खरं तर त्यांच्या प्रत्येक कथेवर चित्रपट निर्मिती होऊ शकते.. मात्र तसं काही फारसं प्रत्यक्षात घडलं नाही. त्यांच्या साहित्यावर इनमीन, तीनच मराठी चित्रपटांची निर्मिती झाली.. १९७० साली वपुंच्या कथेवर ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट, २०१२ साली त्यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवर आधारित ‘पार्टनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१५ साली वपुंच्या ‘बदली’ या कथेवरुन ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती झाली होती..

हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर 'जोशीमठ' हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव 'ज्योर्तिमठ'! जोशीमठ हा अपभ्रंश आहे.
जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी जेव्हा पांडव हिमालयात आले, तेव्हा त्यांनी बराच काळ आपल्या ह्या जन्मभूमीत वास्तव्य केले होते. पंडू राजा व माद्रीचे त्यांनी या ठिकाणी क्रियाकर्म केले. पंडू राजाच्या स्मरणार्थ त्यांनी शिवमंदिर बांधले. तेच मंदिर पांडुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. भगवान विष्णूनी या स्थळी तपध्यान केले, योगसाधना केली म्हणून या ठिकाणच्या बद्रीस्थानाला, ध्यानबद्री किंवा योगबद्री म्हणून ओळखले जाते. पंचबद्रीमध्ये विशालबद्री नंतर हे स्थान महत्त्वाचे समजले जाते.
अलकनंदेच्या काठावर कत्युरी शैलीतील पांडुकेश्वर व ध्यानबद्रीची मंदिरे फार विलोभनीय दिसतात. या मंदिरांना तटबंदी होती. आता मात्र प्रवेशद्वारापाशी दोन भिंती उभ्या आहेत. योगबद्रीच्या मंदिरात विष्णूची योगध्यानस्थ मुर्ती आहे. ही मुर्ती गंडकी नदीतील निळसर झाक असलेल्या पाषाणाची आहे, असे सांगतात या ठिकाणी अष्टधातूंची श्रीकृष्णाची एक अप्रतिम मूर्ती आहे. इंद्राने ही मूर्ती पांडवांना दिली व तिची द्रौपदी पूजा करत असे अशी श्रद्धा आहे.
या मंदिराचे कळससुद्धा देखणे आहेत. कळसावर बभ्रुवाहनाचे शिल्प आहे. तर चार दिशांना सिंहाची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्राकारात दगडी स्तंभ उभे आहेत. पांडुकेश्वर महादेवाच्या मंदिरात महादेवाची मूर्ती आहे. या मूर्तीखाली रत्नजडित शिवलिंग आहे, अशी श्रद्धा आहे. मंदिरात लक्ष्मी-नारायण, उद्धव, द्रौपदी, भूदेवीच्या मूर्ती आहेत. ही मंदिरे नवव्या शतकाच्या आरंभी बांधली असतील असा एक अंदाज आहे. दरवर्षी या ठिकाणी 'जानकीमेळा' भरतो. ह्या शिवाय पांडुकेश्वरामध्ये कुबेरथात, घंटाकर्ण, शेषनागतीर्थ अशी इतर स्थाने आहेत. येथील घंटाकर्ण, वादळ, गारा, अवर्षणापासून सर्वांचे रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे. कत्त्युरी राजासंबंधी माहिती सांगणारे काही ताम्रपट अलीकडील काळात येथे सापडले आहेत.
-प्रकाश लेले
मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
असं म्हणतात की प्रत्येक मराठी माणसाला नाटकाची ओढ असतेच. एकदा तरी नाटकांत काम करावं ही सुप्त इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असते. खरं सांगा, तुम्हालाही कधी ना कधी असं वाटलं होतं की नाही? खरं म्हणजे नाटकवेडेपणा हा कांही फक्त गडक-यांवर (राम गणेश) प्रेम करणा-या मराठी माणसाचा किंवा शेक्सपियरवर प्रेम करणा-या इंग्रज माणसाचाच वारसा नाही. तो सर्व मानवजातीचा वारसा आहे. जगांतली कुठलीही भाषा बोलणा-याला आणि कोणतेही तत्त्वज्ञान मानणा-याला कोणत्या ना कोणत्या नाट्यप्रकारांत गोडी असतेच.
Copyright © 2025 | Marathisrushti