नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले.
September 9, 2018
बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना.
इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता.
उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती.
सगळीकडे फुललेल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या.
सर्वप्रथम ज्येष्ठ वयोवृद्ध काकासाहेब आणि काकींनी उभयतांचं स्वागत केलं.
त्यानंतर आश्रम व्यवस्थापकांचं स्वागतपर परंतू सकारात्मक भाषण झालं.अनुभव कथन,मौज मजा मस्ती ह्यावर प्रत्येकानी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
सजीव चित्ररथातून जगण्याचा मुलमंत्र दाखवण्यात आला.आणि शेवटी मिष्टान भोजनाचा आस्वाद,मुखशुद्धी होताच नविन समाविष्ट झालेल्या दाम्पत्याला पायघड्या घालून त्यांंच्या खोलीत रितसर पोचवण्यात आलं.
एक एक करून सगळेच ज्येष्ठ आपापल्या खोल्यांमधे परतले.
संध्याताई,सुधाकरराव आज एकवर्षापुर्वी आयुष्याच्या सांजवेळी बरोबर तिन्हीसांजेला या आश्रमात आले होते.
निराश मनाला,हताश जगण्याला नवसंजिवनी मिळाली ,ती ह्याच आश्रमात .
आज मात्र दोघेही या आश्रमाचे सुत्रधार होते. सांजवेळेला प्रभातवेळेत बदलवण्याचं कसब ते शिकवण्यात तरबेज झाले होते.स्वत:चे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रु पुसावे ह्याचं साधं सरळ सोपं सुत्र ते साऔजवेळी सगळ्यांना शिकवत होते.
ही "मंतरलेली सांजवेळ" आज सगळ्यांनाच हवी हवीशी होती.
सौ.माणिक शुरजोशी.
नाशिक
January 10, 2020
चार वर्षानंतर माझी मुलगी माहेरी आली होती. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे तीला येणे जमले नव्हते. माझ्या नातीला म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ती येणार असल्यामुळे, आम्ही सर्वजण उत्सुक होतो. मी आरामखुर्चीवर बसून त्यांची वाट बघत होतो. बेल वाजली. त्या दोघी सामानासहीत आल्या. नातीने आत येताच माझ्याकडे कटाक्ष टाकून " हाय " म्हणत स्मित केले व ती आत बाथरुममध्ये गेली. हात पाय धुऊन Fresh झाली व बाहेर आली. " हाय आजोबा " म्हणत माझ्या जवळ आली. आपला हात पुढे करीत शेक हँड करण्याची इच्छा प्रदर्शीत केली. मी मनांत थोडासा निराशलो होतो. तीने येताच पाया पडावे व माझा आशिर्वाद घ्यावा ही मनातील इच्छा. पण कसचे काय ? ती इतक्या वेगाने आली व मला भिडली की मला तीच्या शेक हँडला प्रतिउत्तर देत स्वागत करावे लागले. ती बराच वेळ माझा हात धरुन हालवित राहीली. मग तीने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले व चक्क गळ्यात पडली. " Oh my great grand-pa- आजोबा. माझेच दोन्ही दंड हाताने धरीत म्हणाली. कसे आहात आजोबा. Health is OK आहे ना ? आहो Be active आणि Smart. माणसाने कसे टवटवित असाव आणि दिसाव. You have to reach the Century of life man. आणि ती मोठ्याने हासली. नंतर ती मजकडे मिश्किलतेने पहात राहीली.
तीच वागण माझ्या मनासारख, माझ्या कल्पनेप्रमाणे नव्हत. म्हणून ते माझ्या पचनी पडत नव्हते. परंतु ते जास्त प्रेमदर्शक, आपूलकीचे, आणि मनावर सुखकारक घावघालणारे मात्र होते. माझ्या वैचारीक ठेवणीतील नव्हते. माझ्या स्वताःच्या, आणि वडीलोपार्जीत परंपरेनुसार नव्हते. ज्यांत निश्चीत असायचे प्रेम, व्यक्त व्हायचा आदर, वडीलधाऱ्याना भरपुर सन्मान देणारे. आणि ही नात, व्यक्त करीत होती तेच प्रेम भिन्न प्रकारे. तशीच आपुलकी जवळीक साधून. ती मनाच्या खोलीत शिरत होती. मात्र तेथे आदर, सन्मान ह्या श्रेष्ठत्वाच्या भावनीक दऱ्या नव्हत्या. " जशी माझी आई, तसेच माझे आजोबा " ह्या स्थरावर तीने उडी घेतल्याचे जाणवले.
माझे डोळे तीच्या व्यक्त प्रेमाणे पाणावले. मी तीला जवळ केले. पठीवरुन डोक्यावरुन हात फिरवला. ती जवळ समोरच्या स्टूलवर बसली. " मी आता ५ वीत गेले. English medium आहे. मराठीपण शिकते."
"छान. तुला एखादी कविता पाठ आहे कां? "मी" अं नाही, मी पहीली पर्यंत शिकताना Twinkle Twinkle little star, Ba Ba Black Sheep, Humpty Dumpty,पाठ केलेले होते. ते आजूनही पाठ आहे. ते म्हणू मी आजोबा" "नको, त्या कविता आता नको. सध्याच्या कोणत्या कविता पाठ केलेल्या आहेत कां ? "मी." नाही एकही पाठ नाही. आमच्याकडून तसे पाठांतरही करुन घेत नाहीत. " ती गप्प झाली. मला तीच्या ह्या वैच्यारीक ठेवणीची खंत वाटली."अग पाठांतर तर हवेच ना. माझ्या शाळेच्या वेळी ज्या कविता आम्ही पाठ केल्या होत्या त्या आजही आठवतात." मी लगेच कविश्रेष्ठ वामन पंडीताची शार्दुलविक्रीत चालीवरली कविता म्हणून दाखविली. कवितेतील शब्द, भाषा, उच्यार साधून, हातवारे करुन, ती खड्या आवाजात म्हणून दाखवली. नातीच्या चेहऱ्यावर आश्चर्य व कौतूक उमटल्याचे जाणवले. "You are a Great आजोबा.
मी हे कधीच ऐकले नव्हते. हे वामन पंडीत कोण होते, मला माहीत नाही. पण खुप आवघड आहे सारे. मला तर कांहीच कळले नाही, ते काय म्हणाले." त्याच क्षणी मीपण मनातून चरकलो. कारण माझे पाठांतर, शब्द जंजाळ, जरी परीणामकारक व भारदस्त वाटले तरी त्याचे अर्थ, काव्यभाव मला केव्हांच कळलेला नव्हता. अनेक कविता, श्लोक, रामरक्षा, भगवतगीतेमधले कांही अध्याय आम्ही मुखोद्गत केले होते. धाड धाड ते उच्चारत आम्ही म्हणत असू. सांगणारांनी पण आमची क्षमता दुर्लक्षित करीत ते पाठांतर कसे होइल ह्याकडेच लक्ष केंद्रित केले. सध्या पाठांतर करा. अर्थ समजण्याच्या मागे लागू नका. पुढे मोठे झाल्यावर सर्व अर्थ कळतील. ही त्यांची वैचारीक शैली. पाठांतर होत गेले. अर्थबोधसाठी मात्र आज तागायत वंच्छीत राहीलो.
माझी वैचीरीक तंद्री नातीनेच मोडली. " आजोबा तुम्हाला English कवी Wordsworth माहीत आहे कां ? " हो " मी म्हटले. " आहो तो खरच काय Great Poet होता. त्याला निसर्ग कवी म्हणतात. त्याने एक Butterfly वर कविता लिहीली. टिचरनी आम्हाला सांगीतली. पण मला ती पाठ नाही. काय म्हणतो तो कवी. सांगू तुम्हाला. "- - - हे बघा किती सुंदर आहे हे फुलपाखरु. - - - कसे रंग बिरंगी त्याचे पंख आहेत. - - - त्यावर कसे टिपके टिपके काढलेले दिसतात. देवाची ही महान कला बघताना, किती आनंद होतो. आणि ते फुलपाखरु नाजुक नाजुक आहे. फुलांच्या नाजुक पाकळ्यावर किती अलगद बसते. फुलपाखरु स्वताःला जपते, तसेच त्या फुलाना देखील. कारण दोघेही नाजुक असतात म्हणून. - - - किती छान कल्पना आहे, त्या कविची आजोबा." नात, तीने तीच्या टिचरकडून ऐकलेले सारे रसग्रहण, तन्मयतेने मला सांगतले. कांहीही न पाठ केलेले, परंतु संपूर्ण समजलेले. नव्हे तीने हे जाणलेले.
मी नातीकडे लक्ष केंद्रित करीत, सारे ऐकत होतो. कवितेप्रमाणेच तीलाही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी कवितांच्या पाठांतरा भोवती घिरटिया घालीत होतो. ती मात्र तीचे मैदान कविता सार, त्यातील भाव, त्यातील तत्वज्ञान, ह्यावर रपेट मारीत होती. हे सर्वसामान्याना सोपे नव्हते. त्यांत मेहनत, एकाग्रता, आणि समज ह्याचे प्रचंड एकीकरण होते.
माझी धाव फक्त मनापर्यंत, जेथे विचारांची गर्दी असते. तर नात अप्रत्यक्ष आत्म्यापर्यंत झेप घेत असल्याचे जाणवले जेथे फक्त भावनीक साम्राज्य होते. बदलत्या पिढीला काय हवय असत ? "तुमच फक्त चांगल असण " To set an example that you are a good great. कारण प्रत्येकजण चांगल आणि मोठ ( A good great ) होण्याचा प्रयत्न करीत असतो.
- - - मात्र तुमच चांगल बोलन, चांगला उपदेश, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मज्ञान, वागणूक, घराण्याच्या परंपरा इत्यादी , ह्या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात.
जीवन चक्र सतत चालते. रोजचा दिवस नवा. रोजचा विचार नवा. कोणत्या विचाराला योग्य वा चांगले समजणार.? फक्त श्रेष्ठत्वाचा द्दष्टीकोण बाळगत असाल, तर प्रत्येकाला त्याचेच आचार विचार आग्रही वाटतील. मग जगाला थांबावे लागेल. निसर्गाला हे केंव्हाच मान्य नसते. कारण नाविन्य हेच जीवनाचे वैशिष्ट.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान नागापूरकर
November 7, 2014
माझे माहेर’ या दोन शब्दात किती प्रेम, माया, आपुलकी, अणि आदर सारं काही भरुन राहीलं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन’ या कवितेत म्हटलंच आहे की ‘मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरु, व्हत आता भुईवर गेलं क्षणात आभायात ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मन एका क्षणात जसं जमिनीवरून आभाळात जात अगदी तस्सच माझं मन एका क्षणात अलिबागला पोचतं.
July 15, 2024
जगात अनेक जण पैजा लावत असतात. काही चांगल्या तर काही वाईट असतात. पण दोन मित्रांनी आपल्या वयाच्या पंच्च्याहत्तरीत अशी एक आगळीवेगळी पैज लावली आणि ती पुर्णही केली. जी, शिक्षणाचे स्वप्न अर्धेवट राहीलेल्या अनेक तरूणं-तरूणींना शिक्षणाची नवउमेद आणि प्रेरणा देईल.
April 25, 2021
नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.)
May 5, 2022
... मी लहान होतो तेव्हा चांदोबा या पुस्तकाचा अगदी जवळचा वाचक होतो. त्यावेळी वर्तमानपत्रांची संख्या फार कमी होती ठराविक मासिके ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये वाचाव्यास मिळत होते. वाचनालये शहराच्या ठिकाणी होती शिवाय करमणुकीची साधने सुद्धा अतिशय कमी होती. गावामध्ये काही लोकांच्या घरात हरकुलस कंपनीची सायकल असायचे ठराविक लोकांच्या घरात रेडिओ असायचा. ज्याच्या घरामध्ये रेडिओ आहे त्याला गावामध्ये श्रीमंत माणूस आहे असे लोक समजायचे. साधने कमी होती परंतु माणसाच्या मनामध्ये एकमेकांविषयी अतिशय प्रेम होते. बाहेर गावचा माणूस एखाद्या वेळी पाहुणा म्हणून आला तर त्याचे जंगी स्वागत व्हायचे. बाहेरचा पाहुणा आल्यामुळे जिव्हाळा प्रेम व घर भरल्यासारखे प्रत्येकाच्या मनाला वाटत असे. त्यावेळी ची माणसे व आत्ताची माणसे यामध्ये भरपूर फरक झालेला दिसून येतो. सध्या तर शेतीच्या वाटपावरून भाऊ भावाचा वैरी झाला आहे अशी ही नवीन पिढी पोलीस स्टेशनमध्ये अजूनही सळ्या मोजत आहेत. केस करणारा व केस घेणारा ही दोन्ही माणसे मेली तरी शेतीचा निकाल लागला नाही. अशी कितीतरी उदाहरणे मी डोळ्यांनी पाहिली आहेत....।
... सध्या तर काही माणसांची बुद्धी मतिमंद झाली आहे आपला कोण दुसऱ्याचा कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. जुन्या रूढी पद्धती दिवसां दिवस कमी होत चालल्या आहेत एकमेकांवर प्रेम करणारी माणसं निघून गेली परंतु चांगली शिकवणार याची संख्या हल्ली फारच कमी झाली आहे असे एकंदरीत जाणवते. दुसऱ्याचे वाईट कसे होईल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे असा हा कलियुगातील करमत स्वभावाचा माणूस. दिसून येत आहे याचीच मनाला खंत वाटते आमच्या वेळी मानसी तर प्रेमळ होतीच परंतु एकमेकांविषयी आदर फार मोठा होता. हे चांदोबाची पुस्तक बरेच काही सांगून जाते भले मी म्हणतो यातील कथा काल्पनिक असतील. परंतु याच कल्पनेतून भयंकर मोठे ज्ञान होते म्हणून असे पुस्तक त्यावेळी राहून राहून मी वाचत असे. कल्पकता विषय असल्याशिवाय माझा येत नाही गंभीर कथा किंवा कादंबरी जास्त कोण वाचत नाही. त्याच्यासाठी कल्पनेची काही वेळा झालर ही लावावी लागते या पुस्तकातील रंगीबेरंगी बोलकी चित्रे मनाला बरंच काही सांगून जातात. आणि चित्रावरूनच एखादी कथा जन्म घेते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.....।
.... पूर्वी ग्रामीण भागामध्ये वाचण्यासारखे तसे काहीच नव्हते परंतु हा चांदोबा हातात आला म्हणजे. मला फार आनंद व्हायचा हा चांदोबा शिरटेकर दादांच्या घरी महिन्याला पोस्टाने येत होता. चांदोबाची पार्सल कधी येते मी वाट पाहत आहे दादांच्या घरी शक्यतो चांदोबा कोणी वाचत नसे. पण मी मात्र आवडीने वाचतो म्हणून दादांनी मला एकदा सांगितले होते आम्हाला आमच्या कामामुळे चांदोबा वाचायला वेळ नाही. तुला वाचनाची आवड आहे तूच वाचत जा म्हणून मी आवडीने चांदोबा वाचत असे. त्या पुस्तकातील विशेष मला वेताळ राजाची गोष्ट आवडत असे ही गोष्ट वाचताना मला भीती वाटून अंगावर काटे सुद्धा येत होते. प्रत्येक वेळी विक्रमानादित्याला मेलेला माणूस नवीन गोष्ट सांगत होता गोष्ट जुनीच होती पण मनाला भावून जात होती. प्रत्येक वेळी विक्रमादित्य राजा मेलेले प्रेत स्वतःच्या खांद्यावर घेऊन पुढे पुढे जात असे. आणि ते प्रेत राजाला गोष्ट सांगत असे हा जो सीन आहे तो स्मशानभूमीतला आहे असे वाचताना जाणवते. झाडाच्या खाली मयत झालेले प्रेत व झाडाच्या फांदीवर बसलेली भुते हे पाहिले की भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. वेताळाची गोष्ट वाचताना भीती तर वाटतेच परंतु पुढे काय याची उत्सुकता मनाला राहिल्याशिवाय राहत नाही हेच खरे......।
..... या पृथ्वीवर खरच भूत आहे का याचा अंदाज बांधणे कठीण आहे काही लोक म्हणतात भूत आहे तर काही लोक म्हणतात भूत दिसत नाही मग आहे कसे म्हणायचे. हा एक वादाचा प्रश्न आहे हे दिसते ते वास्तव आहे गुरु भक्ती करणाऱ्या माणसांना भूत दिसते असा काही माणसांचा समज आहे. प्रत्येक महिन्याला चांदोबा वेगवेगळी गोष्ट घेऊन पोस्टातून येत होता. पुस्तकाच्या वरील रंगीत सुंदर चित्र व आतील रंगीत चित्रे यामुळे चांदोबा हे पुस्तक अतिशय उठावदार असे दिसत होते. मृत आत्म्यात घुसलेला वेताळ जणू प्रत्येक माणसांची प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगत होता. या गोष्टीतून पुष्कळ विचार घेण्यासारखे होते माणसाच्या जीवनातील सार कळत होते माणसाने कसे वागावे व कसे बोलावे याचा सुद्धा बोध या कथेतून होत होता. कथा काल्पनिक असली तरी वाचकाला एक दिशा देणारी अशी होती म्हणून पूर्वीचे चांदोबा हे पुस्तक मला फार आवडत असे. आता ही पुस्तके बंद झाली आहेत मार्केटमध्ये नवीन नवीन पुस्तके येत आहेत परंतु जुन्या पुस्तकासारखी सर नवीन पुस्तके करीत नाहीत एवढे मात्र निश्चित....।
.... जग हे बारा भानगडी चाहे आणि या जगातील माणसे सुद्धा त्याच पद्धतीची आहेत. दुसऱ्याचे अगोदर चांगले व्हावे नंतर माझे चांगले व्हावे ही पूर्वी लोक म्हणत असे. पण आता सध्या असे कोणीही म्हणत नाही आपलीच घोडे पुढे कसेदामटायचे या विचारात ही मंडळी असते. अशी ही मंडळी वागते त्याला आपण माणूस म्हणायचं का हा प्रश्न नेहमी मनाला पडतो. माणसाचा स्वार्थ नक्की कुठे व कशात आहे हा विचार हल्लीचा माणूस करत असतो. रात्री उगवणारा चांद सर्वांना शितल प्रकाश देतो आणि या शितल प्रकाशामध्ये एक प्रकारचा आनंद तर रडत असतो. झाडावरची सळसळणारी पाणे चंद्राच्या शीतल प्रकाशात एक प्रकारचा आनंद घेतात शांत वातावरणामध्ये. झाडावरच्या पक्षाची चालू असलेली धडपड आणि निशब्द वातावरण खोलवर मनात रुजल्याशिवाय राहत नाही एवढे मात्र निश्चित. चंद्र हा प्रेमळ आहे अंधाऱ्या रात्री प्रत्येकाला शितल प्रकाश देतो आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण वातावरण आनंदी करून सोडतो. याच्याशिवाय दुसरा आनंद कोणता मोठा असू शकतो प्रत्येक माणसाने आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे चालले पाहिजे. प्रत्येकाला प्रेम दिले पाहिजे प्रत्येकाशी गोड बोलले पाहिजे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे असे मला वाटते....।
........ पूर्णविराम.....।
--दत्तात्रय मानुगडे,
ग्रामीण कथा लेखक.
September 19, 2022
संसारीक जीवनाशी तीळ मात्र सबंध नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळतं नाही . राशी ग्रह , जन्म कुंडली , राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतंच नाही जशी निसर्गानी मानवाची निर्मिती केली . तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांची झाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यत्मिक कल्पना करतं बसने किती मूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच .
August 18, 2018
स्वयंपाक करणारी स्त्री ही जर का सुगरण असेल तर ती भाताचे विविध प्रकार करुन वाढते. मग तो नारळी पौर्णिमेला केलेला नारळीभात असेल, कधी सणासुदीच्या निमित्ताने केलेला मसाले भात असेल, कधी टोमॅटो भात, कधी विविध भाज्या वापरुन केलेला व्हेज पुलाव असेल, मटारच्या सीझनमध्ये मटार पुलाव असेल तर कधी जिरा राईस!
February 17, 2022
सांगलीत वालचंदला असताना आम्ही “चम्बल की कसम ” नामक एक पडेल चित्रपट पाहिला तो खय्याम आणि साहिर या जोडगोळीच्या एका हळुवार प्रेमगीतासाठी ! अन्यथा राजकुमार, त्याला प्रतिकूल मौशुमी आणि होडीवाला ठोकळा शत्रुघ्न असलं कॉम्बिनेशन बघणं नजरेला फारसं आल्हाददायक नव्हतं.
February 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti