नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं.
July 25, 2021
त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’
October 5, 2025
जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!
December 21, 2020
दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी-मन प्रफुल्ल झाले
छन् खळ खळ छन्
ढुम् ढुम् पट ढुम् । लेझिम चाले जोरात !
दिवटी फुरफुर करु लागली
पटक्यांची वर टोके डुलली
रांग खेळण्या सज्ज जहाली
छन् खळ खळ.छन्
ढुम ढुम् पट ढुम् । लेझिम चाले जोरात !
भरभर डफ तो बोले घुमुनी
लेझिम चाले मंडल धरुनी
बाजुस, मागे, पुढे वाकुनी
छन् खळ खळ छन्
ढुम् ढुम् पट ढुम् । लेझिम चाले जोरात !
पहाट झाली, तारा थकल्या
मावळतीला चंद्र उतरला
परी न थकला लेझिम-मेळा
छन् खळ खळ छन्
ढुम् ढुम् पट ढुम् । लेझिम चाले जोरात !
June 11, 2026
रानपाखरा, रोज सकाळीं येसी माझ्या घरा
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी. ॥१॥
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला ?
रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर
तूही त्याच्या संगें येसी गात गात सुस्वर ।।२।।
वाट चालुनी संध्याकाळी रवि सोडी अंबरा
आणि तूहि मग पंख उभारुन जासी अपुल्या घरा
सूर्यासंगे जासी येसी सदाकदा का बरे?
शेजारी आहेत काय रे परस्परांची घरे? ।।३।।
देह एवढा, अपाय कोणी करील तुजला इथें
म्हणून का तुज रवीबरोबर माय तुझी धाडिते ?
सांगतोस का तिला कसा हा छानदार बंगला ?
होते का रे कधी आठवण माझी सखया तुला ? ।।४।।
तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी
नेशिल का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनि पंखावरी ?
माय तुझी येईल, सूर्यही येइल भेटायला,
मजाच होइल सख्या पाखरा, नेह एकदा मला ।।५।।
June 20, 2026
आचार्य अत्रे जसे उत्तम लेखक होते, वक्ते होते तसेच ते उत्तम पत्रकारही होते. मराठी भाषेवरच नव्हे तद्दम महाराष्ट्रावर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यांनी सुरु केलेले नवयुग साप्ताहिक आणि मराठा दैनिक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
October 14, 2019
शाळेच्या व मित्रांबदद्लच्या आठवणी किती म्हणून सांगाव्या ..?अजूनही मागे शिल्लक राहतात.सारं आपलं बालपण हे शाळेभोवती गुंफलेलं असतं…शाळेत भेटलेले मित्र,त्यांच्याशी केलेली मैत्री सारं आठवतं…त्यामुळे आपल्यात आलेलं धाडस ,आल्या प्रसंगाला तोंड देणं यातून खूप काही शिकायला मिळतं.आपल्या चुकांमधून हळूहळू शिकत असतो आपण.
May 19, 2021
आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्या म्हाद्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात राघवने खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता .
January 15, 2024
सिंहावलोकन करताना आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे बघताना मनात कृतज्ञता दाटून येते . अर्ज करून , कागदपत्रे सादर करून आणि अनेकदा पैसे भरून पुरस्कार मिळवण्याचा आत्ताचा हा काळ . पण मला जेव्हा पुरस्कार लाभत होते तेव्हा यातील काहीही मी केले नव्हते , हा विचार माझ्या मनाला सुखावून जातो . कारण तेव्हा अनेक संस्था , व्यक्ती , वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यवस्थेतून माहिती मिळवून पुरस्कार देत असत .हा अनुभव अनेकांना त्याकाळात आला असेल .
मला वाटते की लेखन करणाऱ्याला , काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीला , सामाजिक कार्यात अखंड गुंतून पडलेल्या व्यक्तीला किंवा जगावेगळं काहीतरी करणाऱ्याला ऐन उमेदीत पुरस्कार लाभला तर उर्वरित आयुष्यात ती व्यक्ती किंवा संस्था अधिक कार्यप्रवण होऊ शकतात .
सतत लेखन करत राहण्याची उर्मी आणि प्रेरणा मला या पुरस्कारांनी दिली , असे म्हटले तर वावगे ठरू नये .
आपण काहीतरी चांगले काम करत असतो आणि कुणी ना कुणी त्याची दखल घेत असतो , हे मी अनुभवलं आहे .
January 20, 2025

हल्ली मी सकाळी न चुकता पार्क मधे फिरायला जातोच…!! म्हणजे पूर्वीही जायचो.पण त्यात सातत्य नव्हतं..आता आहे. आता असं काय वेगळं घडलंय असे तुम्ही विचाराल ना?
(विचारा हो..!! तसंही मी सांगणारच आहे तुम्हाला..)
July 3, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti