नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं.

अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही!
ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव….
“श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि ‘वास्को’ लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!” सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या ‘स्वीटी’ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला.
लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खेड्यातून ६० एक कुटुंबाना नक्षलवादींनी घराबाहेर काढून देशोधडीला लावलेले आहे. त्यांचे परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकलेले आहेत. सधन कुटुंबातील मंडळी साधे रोजी पगार मिळणारे कामगार म्हणून जीवन कंठीत आहेत.
लांबलचक रस्ता, आजूबाजूला फक्त आणि फक्त गर्द हिरवी झाडे आणि वर ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि त्याने झालेले शांत आणि कुंद वातावरण! सुरवातीला तर चालायला मजा वाटत होती. पण बराच वेळ झाला तरी सेंटर कोर्टचा मागमूस नाही कुठे!
मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ' मनोरुग्ण ' हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ? तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ? गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ? त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाला गम्मत वाटत असेल नाही का ? कुणी स्वतःला श्रीमंत समजत तर कुणी अधीकारी वा नेता समजून तशा पद्धतीने हातवारे करुन बोलत असेल ? कुणी रडत असेल तर कुणी हसत असेल ? कुणी तासंतास एकाच ठिकाणी हलचाल न करता बसलेला असेल ? कुणी अंगावरचे कपडे काढून फेकून देत असेल नाही का ? कितीतरी वैचित्रपूर्ण वागण्याचे नमुने दिसत असतील ना ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारुन माहीती घेणारे अनेक भेटतात. आम्हाला पण एकदा मेंटल हॉस्पिटल बघावयाचे आहे. मिळेल कां त्यासाठी परवानगी ? इत्यादी. ह्या सर्व चौकश्यामध्ये जे दिसून येते ती केवल करमणूक, विनोद, मनोरंजनाची भावना. बंदीस्त झालेल्या प्राणी वा पक्षांच्या संग्रहालयाप्रमाणे.
त्यांचा काय दोष ?
दुर्दैवैने आणि नशीबाने त्यांच्यावर ' मनोरुग्ण ' ? होण्याची पाळी आणली आहे. नियतीच्या खेळाला बळी पडलेली ही मंडळी आहेत. ह्यांचा ह्यात काय दोष असेल ? गुन्हा असेल ? हे एक निसर्गालाच माहीत. कारण कुणीही मनोरुग्ण होऊ शकतो. कदाचित् सभोवतालच्या परिस्थितीमुळे मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीला, ती परिस्थिती हानीकारक म्हणून बोट दाखविता येईल व तो योग्य प्रकारे सामना करु न शकल्यामुळे दोष देता येईल. परंतु कित्येक मनोरुग्णाच्या माहीतीनुसार त्याच्या जन्माच्या वेळची परिस्थिती, आई वडीलातील वा अनुवंशीक दुर्गुण, रक्तातील गुणदोष इत्यादी प्रामुख्याने कारणीभुत असलेले दिसतात. त्यावेळी ह्या रुग्णाबद्दल एक वेगळीच भावना येते की, ह्यात त्या रुग्णाचा स्वतःचा कोणता गुन्हा की ज्यामुळे त्याच्या नशिबी 'मनोरुग्ण' होण्याचे आले आहे. ? परंतु सामान्य माणसे मनोरुग्णाच्या, त्यांच्या मनोरुग्ण होण्याच्या कारणमिमांसेविषयी, परिस्थितीविषयी कुणीही फारसे खोलांत जाऊन तसदी घेत नाही. खरे म्हणजे त्यावर होणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल कुणीही सहानुभूतीने विचार करीत असल्याचे दिसून आले नाही.
अर्थात ज्याच्या नात्यागोत्यामधली व्यक्ती मनोरुग्ण असेल व त्याना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने मनोरुग्णाचा मानसिक वा शारीरिक त्रास होतो, त्यांची मात्र मनोरुग्णाकडे बघण्याची द्दष्टी निराळी असते. ज्याचे ' जळते त्यानाच कळते ' ह्या उक्ती प्रमाणे ते मनोरुग्णाकडे सहनुभूतीने बघतात. त्यांच्याविषयी चौकशी करतात. अशा रुग्णाच्या उपचारासाठी व आरोग्यासाठी ते उत्सुक असतात. ह्यात शंकाच नाही.
आजकाल बऱ्याच सामाजिक संस्था, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती निरनीराळ्या सामाजीक समस्यांकडे आपली शक्ती, कौश्यल्याचा वापर आणि सहानुभूती व्यक्त करतात. जसे कुटूंब कल्याण, बाल कल्याण, वृद्धाश्रम, अंध व्यक्ती, अपंग, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स विषयी जाण निर्माण करणे, स्त्रियांवरील अत्याचार, इत्यदी समस्यांचा सामाजीक संस्था अभ्यास करुन त्याबद्दल निरनीराळ्या प्रचार माध्यमाद्वारे सर्व नागरिकांना त्याची माहीती देतात. चर्चासत्र होऊन सहानुभूतीपूर्वक मदत करतात. मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीने मनोरुग्णाबद्दल लोकजागृती करण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात.
सहानुभीतीची गरज.
ज्या कुटूंबात दुर्दैवाने एखादा मनोरुग्ण असेल, त्याचा त्या कुटूंबाला त्रास तर होतोच. परंतु सर्व शेजारी पण त्याच्या विषयी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करतात. त्याला कुणाचीच सहानुभूती मिळत नाही. अशा मनोरुग्णास कसेही करुन त्या वातावरणातून काढून मनोरुग्णालयांत दाखल करण्याचा प्रचत्न होतो. ह्याचा अर्थ त्या मनोरुग्णाच्या विक्षिप्त वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्याला घरीच ठेवावे असे नाही. परंतु त्याच्या आजाराकडे इतर आजारा प्रमाणे बघीतले जात नाही. एक ब्याद म्हणून समजले जाते. शिवाय अशा मनोरुग्णाला मनोरुग्णालयांत दाखल केले की, संबंधित नातेवाईकापैकी बहूतेक मंडळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्याच्या भेटीस येण्याचे टाळतात. तो बरा होत असेल व त्याला घरी नेण्यास सांगीतले तरी कित्येकजण ते टाळतात असे दिसते. मनोरुग्णास उपेक्षित वागणूक दिल्याचे जाणवते. ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही सामाजिक संस्था भाग घेऊन मनोरुग्णाच्या पुनर्वसनाकडे फारसे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. हे चित्र निश्चितच निराशजनक आहे.
मनोरुग्णाचे प्रकार
मनोरुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोगी आलेले दिसतात. १) कांही रोगी येतात. उपचारानी बरे होतात व पुन्हा समाजात कार्याकत होतात. २) कांही रोगी अल्पकाळासाठी बाहेर चांगले राहू शकतात. परंतु पुन्हा आपले मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनोरुग्णालयांत येतात. ठराविक काळानंतर त्यांचे येणे जाणे चालूच असते. तिसऱ्या प्रकारातील रुग्णामध्ये बुद्धीची वा मेंदूची जन्मापासूनच परिपूर्णता नसते. आजच्या घडीला असलेल्या उपचारपद्धती त्यांच्यात मुळीच सुधारणा करु शकत नाही. असे मनोरुग्ण हे मनोरुग्णालयांत वर्षानुवर्षे जगत असलेले दिसतात. ह्या वर्गामध्ये असलेल्या रुग्णाची संख्यापण बरीच आहे. कित्येकजण तर २०ते ३५ वर्षे ह्या रुग्णालयांत आहेत. कुणी तरी त्यांना येथे आणून सोडले. कुणाही त्याना बघण्यासाठी येत नाही. त्याना आणताना दिलेल्या पत्यावर कुणीही मिळत नाही. कित्येकजण वेडे, अज्ञानी, न बोलणारे, रस्त्यावर पडलेले, अशा कितीतरी वेगवेगळ्या परिस्थीतीत, लहान वयांत पोलिसानी आणलेले, रुग्ण आहेत की ज्यांचा ठावठिकाणा नाही. मग त्याना कोण बघणार. त्याना कुणाकडे सोडले जाणार. ही सर्वजण मंडळी गरीब आहेत म्हणून नव्हे, तर ते मनोरुग्ण आहेत म्हणून. आज तरी अशा असंख्य रुग्णाना सरकार आसरा देत आहे. येथे मानसिक रोगतज्ञ आहेत. वैद्यकीय मंडळी आहेत. परिचारक वा परिचारीका, आणि इतर सेवक मंडळी आहेत.
सारेजण आपल्या शक्ति व कर्तव्यानुसार काळजी घेतात. त्या सर्व मनोरुग्णाना जगवितात. म्हणूनच आज कांहीजण ३० वर्षापेक्षाही जास्त काळ मनोरुग्णालयांत रुग्ण म्हणून जीवन जगत आहेत. त्यांच्या शारीरिक प्रकृतीची, खाण्यापिण्याची, इतर नैसर्गिक विधींची काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे रुग्ण जीवन जगत आहेत.
भयानक वातावरण
मी येथे उल्लेख करीत असलेल्या माझ्या विचाराला प्रथम समजा. ते खो़डण्यापूर्वी, टिकात्मक दृष्टीकोण घेण्यापूर्वी, सहानुभूती, भूतदया इत्यादी उच्यप्रतीच्या मुल्याधिष्टीत भावनिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. त्या विरोधक व्यक्तीनी मला प्रत्यक्ष भेटून मनोरुग्णालयातील त्या मनोरुग्णाच्या सहवासांत अल्पसा काळ घालवून स्वतः हे जाणून घेऊन मगच माझा विचार योग्य आहे कां हे ठरवावे. मी हे त्या रुग्णाबद्दल बोलतो ज्यांची परिस्थिती जनावरापेक्षाही वाईट आहे. त्याना फक्त मानव म्हणावे लागते कारण ते माणूस म्हणून जन्मले आहेत. त्यांच्यात बुद्धीचा भाग मुळीच नसल्याप्रमाणे असतो. त्याना भावना विचार इत्यादी असतात हे समजण्यापलीकडचे असते. कित्येकजणाना तर पाणी पाजावे लागते. जेवण चक्क भरवावे लागते. पाणी वा जेवण जरी समोर ठेवले तरी ते घेणार नाहीत. दिले तर ते सांडून देतील. अंगावर कपडे ठेवणार नाहीत. कुठेही संडास लघवी करतील. सारे शरीर बरबटून घेतील. जनावराप्रमाणे दुसरा रोगी ते चाटेलही. कोठेही ओकतील. झोपतील. बैल म्हशींच्या गोठ्यांत चांगले वातावरण अशू शकेल, इतके भयानक वातावरण ह्या रोग्यांच्या सहवासांत असते. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल असे नाही. अशा रोग्यासाठी चार चार कर्मचारी एका एका वॉर्डत असतात. रोग्याना खाऊ-जेऊ घातले जाते. नियमित वेळवर पाणी दिले जाते. स्वच्छता राखली जाते. स्नान घातले जाते. कपडे बदलले जातात. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाचे सर्व कांही करते,त्याप्रमामेच येथील कर्मचारी रुग्णासाठी सर्व ते करीत असतात. येथे रुग्णाच्या शारिरीक वाढीचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु ते मेंदूच्या विकारांनी त्रस्त आहेत. एक कधीही बरी न होणारी नैसर्गिक व्याधी. ते आहेत तसेच जगणार. एका कष्टमय, भयानक विकलांग परिस्थितीमध्ये जीवन कंठणार. फक्त अन्न-पाणी मिळते म्हणून जगणार. ह्या पलीकडे कोणतेही सत्य द्दष्टीक्षेपांत नाही.
केवळ भोग भोगणे हेच जीवन
जेंव्हा असल्या संपूर्ण वाया गेलेल्या रुग्णांना वा बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णाकडे बघीतले जाते तेंव्हा विचार पडतो की, ह्यांचे जीवन कशासाठी ? हे केवळ मनुष्य आहेत म्हणून ? त्याना कायद्याने कुणी मारु शकत नाही म्हणून ? नरकवास भोगणाऱ्या ह्या मानवाकडे वेगळ्या भुमिकेतून कुणी बघणार नाही कां ? त्यांच्या पोटांत दुखत असेल, त्यांना असंख्य वेदना होत असतील, तर कळण्यास मार्ग नाही. ते आपले दुःख व्यक्त करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. केवळ भोगणे हेच त्यांच्या नशीबी आलेले दिसते. एक अत्यंत असमाधानी, भयावह, आणि ज्याची उकल करण्याची शक्ती कुणांत नाही, अशी ही परिस्थिती. त्यांच्या ह्या नर्क यातना त्यांच्या मृत्युमुळेच सुटलेल्या आम्ही बघतो.
स्वतंत्र यंत्रणा असावी
आपण सारी सुसंकृत, शिक्षित आणि समाज मुल्यांची जाण असलेली माणसे आहोत. ह्या अशा दुर्दैवी व्यक्तीसाठी दयामरण हेच आजच्या घडीला उत्तर आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा. सरकारने अशा दुर्दैवी जीवांची सुटका भूतदया ह्या जाणिवेमधून करावी. अशासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. ज्यामध्ये मानसोपचार तज्ञ, उच्य न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत बुद्धीवादी नागरीक, समाजसेवक इत्यादींचा समावेश असावा. सर्वानी स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपला अहवाल सादर करावा. दयामरण मान्य करण्याचे त्यानुसार ठरवावे. केवळ विरोधासाठी विरोध करु नये. असा खऱ्या दुर्दैवी व्यक्तीची मुक्तता ही त्यांच्या आत्म्याला मुक्त केल्या सारखे ठरेल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा
त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे,
एक अजब सोहळा
फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे,
उरलाच वेळ तर स्टडी डे
कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ,
युवामहोत्सव, नाटयमहोत्सव,
घरच्या कार्यापेक्षा जास्त
बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार,
पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार
SMS चा चाळा, फॅशनचा लळा,
हेच ह्यांचं रुटीन
अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन
नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स,
क्लासेसच्या जीवावर, टक्क्यांचा कॉन्फीडन्स
कॉलेजचे प्रोफेसर्स तर
ह्यांच्या जणू खिशात,
धाक आणि आदर,
शब्दच नाहीत कोषात
अश्शी आजची कॉलेजची, तर्हाच आगळी,
वरच्या पिढीला
ती नेहमीच वाटणार वेगळी
नेहमीच वाटणार वेगळी
-- सौ. अलका वढावकर
"अनिरुद्धजी, इंडियन आयडॉल सुरू होणार आहे. त्यांचा 'कास्टिंग प्रोड्यूसर' या पदासाठी शोध सुरू आहे. या संदर्भात मुलाखतीसाठी ताबडतोब अंधेरीला येऊ शकाल का?"
"मी येतो. पण माझे नक्की काम काय असणार आहे ते समजू शकेल का?" मी विचारले.
“सगळी माहिती तुम्हाला देते. तुम्ही लगेच अंधेरीला या." माधवी उत्तरली. या मुलाखतीसाठी मी व्हिजक्राफ्ट या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. माझी प्रदीर्घ मुलाखत झाली. इंडियन आयडॉलसाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या विभागात मला ऑडिशन्स घ्यायच्या होत्या. या विभागातील ऑडिशन्स गझल गायकाने कराव्या असा आग्रह या स्पर्धेचे पॅनल परीक्षक सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केल्याने एक गजल गायक म्हणून मला बोलावण्यात आले होते. हे काम तीन महिने चालणार होते. त्यासाठी अनेक वेळा प्रवास करावा लागणार होता. मला हे काम अत्यंत आव्हानात्मक वाटले. यामुळे भारतातील या प्रांतातील उत्तम तरुण गायक-गायिकांची गाणी ऐकण्याची संधी मला मिळणार होती. माझी संमती मी कळवली. पण ते माझ्याबरोबरच इतरही काही जणांशी बोलत होते. त्यामुळे मुलाखतीच्या अनेक फेऱ्या झाल्या. कधी सोनी चॅनलच्या लोकांबरोबर, तर कधी फ्रीमेंटलच्या टीमबरोबर तर कधी व्हिजक्राफ्टच्या टीमबरोबर माझे भेटणे सुरूच होते.
अशा अनेक मुलाखतींनंतर २१ जानेवारी २०१० ला संध्याकाळी सात वाजता मी व्हिजक्राफ्टबरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन केले आणि २२ जानेवारी २०१० रोजी सकाळी दहाच्या विमानाने मी दिल्लीला रवाना झालो. घटना अत्यंत वेगाने घडत गेल्या. माझ्या अनुपस्थितीत स्वर-मंच ॲकॅडमी प्रियांका आणि माझी विद्यार्थिनी अश्विनी चव्हाण यांनी सांभाळली. इंजिनियर झाल्यानंतर मी कुठेच नोकरी केली नव्हती. स्वतःचेच काम केले होते. 'इंडियन आयडॉल' ही पन्नास कोटी बजेटची मोठी स्पर्धा होती. त्यात सोनीबरोबर अजून दोन मोठ्या कंपन्या काम करत होत्या. त्यामुळे कॉर्पोरेट पद्धतीच्या कामाचा अनुभव मला मिळत होता. या तीन महिन्यात मी ५२ वेळा विमानप्रवास केला. दिल्ली, चंदीगड, कलकत्ता, लखनौ, अलाहाबाद या ठिकाणी अनेक वेळा गेलो. माधवी, पार्थ, पुनीत, परम आणि कॅमेरामन अमोल अशी आमची टीम होती. या काळात सहा हजार गायक-गायिकांच्या ऑडिशन्स मी केल्या. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक, ख्यातनाम गायिका सुनिधी चौहान यांची अनेकदा भेट झाली. चर्चा झाल्या. आघाडीचा गायक सोनू निगम याच्याबरोबर ऑडिशन घेण्याची संधी दिल्लीला मिळाली. रिऍलिटी शोची नवी दुनिया पहायला मिळाली. बरेच काही नवीन शिकायला मिळाले. आम्ही निवडलेले शंभर कलाकार मुंबईला आले आणि माझे काम संपले. या सर्व मंडळींबरोबरचे ऋणानुबंध मात्र अजूनही टिकून आहेत.
- अनिरुद्ध जोशी
Copyright © 2025 | Marathisrushti