(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • खरा भक्त आणि भोंदूबाबा

    अंधश्रध्देवर प्रहार करून जळजळीत सत्य उलगडणारी लघुकथा

  • भक्ती

    माझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही.

  • लग्नाची बेडी – Part 1

    “कसले? अरे लग्नाचे आणि कसले? तू तिकडे लांब एकटा, परदेशात, आता शिक्षणही पुरे झाले, चांगला जॉब आहे, घर आहे. चांगला सेटल झाला आहेस मग आता लग्नाचे कधी मनावर घेणार आहेस? अरे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं. आम्हाला इकडे खूप काळजी वाटते, बरं. चटकन येता पण येत नाही. आता एकाला दुसरा जोडीदार हवाच, शिवाय परका मुलूख म्हणून म्हणते. आपलं माणूस हवं.खाण्यापिण्याचेही खूप हाल होत असतील.”

  • दहा बोटे – दहा वर्षे !

    आम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ' कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम ' ही प्रार्थना म्हणतो.

    एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा कॉलेज, नोकरी, व्यवसाय, संसार, मुले, नातवंडे, इत्यादी हे सर्वसाधारण जीवनाचे चक्र.

    त्यातील त्याच्याच इशारय़ाने हे सारे नव्वद वर्षांत पूर्ण करण्यासाठी असते. ह्या सर्व जीवनाच्या पायरय़ा आहेत आणि सर्वजण त्या आपआपल्या ताकदीने, क्षमतेने, समजूतीने करीत असतो. त्यामुळे ह्या चक्ररुपाने असतात. नैसर्गिक असतात.

    जीवनाची दहा वर्षे मात्र त्याने आम्हास आमच्या पद्धतीने, समजुतीने, खर्च करण्यास मुभा म्हणून दिलेली आहेत. जणू ते आपले पाकीट मनी. व्यक्तीचे व्यक्तीमत्व, कर्तबगारी, मोठेपण, महानता आणि जीवनांत त्यानी केलेला त्याग, संकल्पसिद्धी, इतिहासांत उमटलेला एक ठसा. हे ज्याने त्याने आपल्या पद्धतीने ठरवायचे व मिळवायचे असते. ह्यात ईश्वरी हस्तक्षेप मुळीच नसतो. ह्याचसाठी त्याला मिळालेले हे विषेश दहा वर्षे तुमच्या प्रार्थना आणि तुमची बोटे ह्याचीच सतत आठवण देतात.

    एकदा प्रसिद्ध थोर वैज्ञानिक अलबर्ट आइन् स्टाईन म्हणाला होता की माणसे आपल्या क्षमतेच्या फक्त दहा टक्केच जीवनात कर्तबगारी करतात. खरे बघीतले तर त्यांची क्षमता बरेच कांही करु शकणारी असते. परंतु ते अजाणतेने आपला वेळ दवडतात.

    वैद्यकियशास्त्र देखील हेच सांगते की मनुष्य प्रत्येक कामामध्ये त्याला असलेल्या मेंदूच्या क्षमतेच्या फक्त दहा टक्केच मेदूचा वापर करीत असतो.

    श्री समर्थ रामदासानी म्हटले आहे की मरावे परी किर्तीरुपे उरावे. आपण स्वतःहाचा विकास किती केला, किती कमाई केली, ह्यापेक्षा आम्ही जे कांही इतरांसाठी थोडेफार करुं तेच जगाच्या आठवणीच्या कप्यांत घर करते. आयुष्याचा नव्वद टक्के काळ हा केवळ स्वतःहासाठीच असतो. दहा टक्के मात्र इतरांसाठी व्यतीत करावा ही अपेक्षा.

    हा दहा वर्ष हिशोब तुमच्या शेवटच्या क्षणाला समाधानाची, शांततेची झालर निर्माण करतो. तुमचे मनच सांगते की मी जीवनांत धन्य झालो. जीवनातील दहाचे महत्व, त्या काळाची आठवण सतत यावी हाच आपल्या बोटांकडे लक्ष देण्याचा हेतू.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • ठिणगी

    शेवंता आपल्या पारू नावाच्या मुलीबरोबर एका खेडेगावात रहात होती. दिवसभर मोलमजुरी करुन आलेला दिवस ढकलत होती. गेल्या अनेक रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत तिला आपल्या तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची चिंता वाटायची.

  • आठवण संत कान्होपात्रा नाटकाची

    आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर 'संगीत संत कान्होपात्रा' नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं.

    १९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांचं लाभलं.

    नाटकात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित घडलेल्या काही ठळक प्रसंगांना नाट्य लेखक ना. वि. कुलकर्णी यांनी अधोरेखित केलं आहे.

    असं म्हणतात की संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वकर्मानुसार व संचित पूर्वपुण्यानुसार लहानपणापासूनच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या. त्यांची भक्ती इतकी थोर होती की प्रत्यक्षात परब्रम्ह विठू माऊलीला त्यांची तळमळ पहावली नाही आणि खरोखरच त्याने त्यांचा अंत न पहाता त्यांना हृदयात स्थान दिलं.

    सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढ्यात होते. त्या अत्यंत रूपवान होत्या आणि म्हणूनच कर्नाटकातील बेदर बादशहाने त्यांना पळवून आणण्यासाठी त्याच्या सेवकाला धाडलं. कान्होपात्रा नेमाप्रमाणे एका विठ्ठल मंदिरात वीणा आणि चिपळ्या घेऊन भक्तीत तल्लीन झालेल्या असताना तो सेवक त्या घरी जाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना पळवता येईल या दृष्टीने बाहेर उभा राहतो. बराच काळ बाहेर तात्कळल्यानंतर तो आत प्रवेश करतो आणि कान्होपात्रा यांच्या ध्यानात ती गोष्ट येते आणि त्या गर्भगृहात जाऊन पांडुरंगाच्या चरणांना घट्ट मिठी मारून त्याच्यापासून बचाव करण्याची भाक भाकू लागतात आणि इथेच त्या प्राण सोडतात.

    संत कान्होपात्रा नाटकातील गाणी:

    १)अगा वैकुंठीच्या राया

    २)अवघाचि संसार सुखाचा

    ३)अशी नटे ही चारुता

    ४)जोहार मायबाप जोहार

    ५)दीन पतित अन्यायी

    ६)देवा धरिले चरण

    ७)धाव घाली विठू आता

    ८)नुरले मानस उदास

    ९)पति तो का नावडे

    १०)पतित तू पावना

    ११)शर लागला तुझा गे

    यातील 'अगा वैकुंठीच्या राया' या अभंगात त्यांची आर्तता अधिक दिसून येते. वैकुंठीच्या राया तुझ्या चरणाशी मला अखंड थारा दे, सखया विठ्ठला मला या भवनदीतून पार कर, नारायणा मला भक्तीचं दान देऊन माझ्या नरदेहाला गती दे, वासुदेवाच्या नंदना, रखुमाई वल्लभा आता तू मलाही पदरात घे साधारणतः असा भाव संत कान्होपात्रा यांचा त्यावेळी असावा असं मला वाटतं.

    याच अभंगाची व्हिडीओ लिंक खाली देत आहे.

    (किर्ती शिलेदारांच्या आवाजात)

    https://www.youtube.com/watch?v=7qtZbvCNDxc

    (पं. राम मराठे यांच्या स्वरात)

    https://www.youtube.com/watch?v=azhXqtzIrFw

    -- आदित्य दि. संभूस.

    (अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)

    व्हिडीओ सौजन्य: मुकुंद मराठे व दीप्ती भोगले यांचे यूट्यूब चॅनेल.

    २०/०७/२०२१.

  • संधिप्रकाशातील सावल्या – ५ : या चिमण्यांनो परत फिरा रे …!

    संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .

  • मातीवर मातीच

    निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून "लहान" असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले.

    मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय आहे ते माती बाजूला सारून पाहीले. तीला कळले की ज्ञानेश्वराचा आपल्यावर विश्वासा नाही.

    ती शांतपणे म्हणाली की "ज्ञानदेवा, संन्याशाला सोने आणि माती समान असताना, तू या कृतीतून "मातीवर मातीच" नाही का टाकलीस? का सोन्यात आणि मातीत तुला फरक करता येत नाही?".

    -- दीपक गायकवाड

  • माझी कथा – भाग ३

    पुढे मी त्या कारखान्यातील कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका एका यंत्रावर स्वार झालो. या दरम्यान मला वाचनाची गोडी लागली कारण जाधव आणि जावळे रोज कारखान्यात येताना वर्तमानपत्र आणत आणि मी ही त्यावेळी आमच्या बसमध्ये वर्तमान पत्र वाचणारा मी एकटाच होतो.

  • युगांतर – भाग ७

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्र ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ताईच्या डोक्यात खोलवर गाडल्या गेलेल्या गोष्टींना चिथावणी देत होती. पुष्करणी, पाणी, भैरोबा, लहानसा जीव या गोष्टींनी तर तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते. तिच्या डोळ्यांसमोर एकदम ५० वर्षांपूर्वी च्या घडामोडी जशाच्या तश्या धावू लागल्या.