(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • जगाने उरी जी धरावी गझल

    जगाने उरी जी धरावी गझल
    अशी एक मजला सुचावी गझल
    मला लोक हे गुणगुणू लागले
    कुणी लाख माझी न गावी गझल

    —- प्रदीप निफाडकर

  • पर्जन्ये कारणे सिंधु (सुमंत उवाच – १०३)

    सुमंत जयंत परचुरे. 

    क्षितीजाच्या पलीकडे जाऊन वाहणाऱ्या सिंधु चे म्हणजेच समुद्राचे गुणगान गावे तेवढे थोडेच. पृथ्वी वरचा 70% भाग पाण्याने व्यापलेला असल्याने त्याचा शिवाय ही पृथ्वी टिकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.

  • मंगलदिन

    आता या मालिकेत प्रत्येक भक्ताला अडचणीतून सोडवले आहे. वाईट लोकांना धडा शिकवला आहे अशावेळी ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यावेळी हाताने आशीर्वाद देताना पाहिले की मलाच धीर येतो.

  • पुरून उरिन! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ५

    खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर—!

  • “थोडं अजून” … ते …. “Unlimited”

    Unlimited…???… Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे .. आणि तितकीच फसवी देखील ….जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच.

  • अकल्पित 

    साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता.

  • चैत्र गौरी

    पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते. पाटावर बसवून तेल लावून गरम पाण्याने न्हाऊ घालून खणाची साडी नेसवली जाते. दोन्ही बाजुच्या कडेला पाच बांगड्या अडकवून. मंगळसुत्र एखाद्या दागिना घालून नथ अडकवून पाटावर बसवली जाते. मग यथासांग पुजा करुन गुळाची पोळी खीर असा नैवेद्य दाखवला जातो. समोरच्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवले जाते. कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हे वैशिष्ट्य असते.आज आमच्या घरी सून बाईंनी चैत्र गौरीची पुजा केली आहे.

  • मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग ३

    गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल  योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा.

  • चमचेगिरी

    चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो.

  • यक्षप्रश्न

    वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.