नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.
कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते.

आम्ही विहिरीपाशी पोहोचलो तेव्हा, राजसाहेब जरी विहिरीत पडले तरी त्यांना फारसं लागलं नसावं याचा आम्हाला अंदाज आला आणि अर्धा तासांत गण्या अॅब्युलन्स, दोरखंड आणि माणसं घेवून आला आणि त्यांनी राज साहेबांना बाहेर काढले. सुदैवाने जाळी असल्यामुळे आणि त्यावर गवताच्या पेंड्यांचे थर असल्यामुळे, राजसाहेब इतक्या उंचीवरून पडले तरी त्यांच्या जीवाला धोका झाला नाही.
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नारायण पेठेतील संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत होतो. एके दिवशी दुपारी कुरळ्या केसांना भांग पाडलेला, सावळ्या रंगाचा, उंचापुरा माणूस समोर येऊन उभा राहिला. अंगात पांढरा झब्बा, त्यावर निळ्या रंगाचं जाकीट, खाली पांढरी सुरवार व पायात चपला. त्यांना मी ‘या, बसा’ म्हटलं. सुमारे सव्वीस वर्षांनंतर गफूरभाई पुणेकर मला भेटत होते.
सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक अशोक शेवडे यांच्या 'सूर तेच छेडिता' या कार्यक्रमाच्या अनेक प्रयोगात मी गायलो. माझ्याबरोबर मनोज टेंबे, मीनाक्षी गुणाजी, अलोक काटदरे, नीलाक्षी पेंढारकर, पुष्पा पागधरे असे अनेक कलाकार असायचे. निवेदनात अशोकजींच्या बरोबर प्राची देवस्थळी असायच्या. अशोकजींचे किस्से, विनोद आणि इतक्या कलाकारांच्या सहवासामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच मजा यायची. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या समारंभात माझे गाणे झाले. लवकरच मुंबई युनिव्हर्सिटीसाठी मी हिंदी गझलची मैफल आणि त्यावरील चर्चासत्र असा कार्यक्रम केला. हा माझा ६५० वा जाहीर कार्यक्रम होता. धीरे धीरे मगर निश्चित रूपसे माझी 'मुक्काम पोस्ट एक हजार'च्या दिशेने वाटचाल सुरू होती. मंजिल अजूनही बरीच दूर होती. पण गुरुजनांचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद पाठीशी होता. माझी पत्नी प्रियांका आणि दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी यांचा भावनिक पाठिंबा होता. वादक मित्रांची मोलाची साथ होती आणि अगणित रसिक श्रोत्यांचा आधार होता. त्यामुळे आत्मविश्वास मात्र खूपच वाढला होता.
गाण्याच्या कार्यक्रमांबरोबरच आमची केमिकल कंपनी व्यवस्थित सुरू होती. दोन नवीन जागा मी विकत घेतल्या होत्या. शेअर मार्केटमध्ये ऑप्शन्स अँड फ्यूचर्स ट्रेडींग सुरू झाले होते. पण त्यात गुंतवणुकीसाठी फक्त आर्थिक कंपन्यांना परवानगी होती. या क्षेत्रात काम करण्यासाठी माझा मित्र उमेश गद्रे याच्याबरोबर मी आर्थिक कंपनी सुरू केली. शेअर बाजार हे काम करण्यासाठी माझे आवडीचे क्षेत्र होते. या नव्या कंपनीमुळे आम्ही आर्थिक उलाढाल बरीच वाढवू शकलो.
कविवर्य निरंजन उजगरे माझे चांगले मित्र होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह माझ्या आई-वडिलांनी निशीगंध प्रकाशनतर्फे प्रकाशित केला, तेव्हापासून आमचे जवळचे संबंध होते. माझ्या गाण्याचे ते चाहते होते आणि पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या माझ्या गायनक्षेत्रातील वाटचालीचे ते साक्षीदार होते. काहीतरी निराळे करायचे हा त्यांचा ध्यास होता. संत कबीरांच्या रचनांचा त्यावेळी मी अभ्यास करत होतो. एकदा त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. निरंजनजी फारच खूष झाले आणि अखिल महाराष्ट्र युवा संमेलनासाठी गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात त्यांनी माझा संत कबीरजींच्या भजनांचा खास कार्यक्रम आयोजित केला. उषा तांबे यांचाही या आयोजनात मोलाचा वाटा होता.
६ जानेवारी २००५ रोजी कोकण मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित कला महोत्सवामध्ये मी गझलचा कार्यक्रम सादर केला. दुसऱ्याच दिवशी ७ जानेवारी २००५ रोजी कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या सुरूवातीसाठी लिहिलेले खास स्वागत गीत आणि कोकण गीत मी गायले. जानेवारीतच पुण्याला एक गझलचा जाहीर कार्यक्रम केला. त्सुनामी रिलीफ फंडासाठी ठाण्यातील सर्व कलाकारांनी मिळून एक जाहीर कार्यक्रम केला. हा कार्यक्रम रात्री संपवून दुसऱ्या दिवशी पहाटेच मी औरंगाबादला रवाना झालो. त्या रात्री अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामध्ये माझा गझलचा कार्यक्रम झाला. मराठी गझलचे नामवंत गायक भीमराव पांचाळे यांची भेट झाली. भीमरावांबरोबर गझलवर चर्चा करणे ही आनंदाची पर्वणी असते. भीमरावांनी एका व्यक्तीशी माझी ओळख करून दिली. ते होते गझलकार दिलीप पांढरपट्टे. काही दिवसांपूर्वीच 'ऋतुरंग संगतीला' या सीडीसाठी मी त्यांची गझल रेकॉर्ड केली होती. पण त्यांची प्रत्यक्ष भेट आज होत होती. "ठाण्याला गेल्यावर सावकाशीने भेटू. घरी जेवायलाच या,” दिलीपजी म्हणाले. “आपणही ठाण्यालाच राहता?" मी विचारले. “अहो, मी ठाणे महानगरपालिकेचा डेप्युटी कमिशनर आहे." मी चाटच पडलो. इतक्या मुलायम गझल लिहिणारा हा गझलकार दिवसभर महापालिकेच्या रूक्ष फाईल्स हाताळत असेल, असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते.
व्हीपीएम पॉलिटेक्नीक आयोजित करिअर फेअरसाठी संगणकतज्ञ अच्युत गोडबोले यांच्याबरोबर मला आमंत्रित करण्यात आले. संगणक क्षेत्रातील संधींबाबत अच्युत गोडबोले बोलले आणि साऊंड टेक्नॉलॉजी आणि म्युझिक इंडस्ट्रीतील संधींबाबत मी भाषण केले. भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गाण्याचा आग्रह केला. तेव्हा एक गाणे त्यांच्यासाठी गायलो. अच्युत गोडबोले गंमतीने म्हणाले, “अनिरुद्ध, तुझं हे बरं आहे की भाषणाचा शेवट तू गाण्याने करू शकतोस. आम्ही काय करायचं?" मी त्यांना म्हणालो, “अहो, तुमचे भाषण इतके परिणामकारक असते की इतर काही करण्याची तुम्हाला गरजच रहात नाही. एक मात्र इथे मी मान्य करतों की गाण्याइतकेच मला भाषण करायला, थोडक्यात बोलायलाही आवडते. गप्पा-संवाद आणि किस्से मला अत्यंत प्रिय आहेत. नातेवाईक आणि विशेषतः मित्रमंडळींबरोबर रात्रभर गप्पा मारणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असते.
डॉ. शुभा चिटणीस 'यशवंत' या पुस्तकाचे लिखाण करीत होत्या. त्यासाठी त्या अनेकांच्या मुलाखती घेत होत्या. एक दिवस त्यांनी माझी मुलाखत घेतली. अनेक मान्यवरांच्या मुलाखतींमधून "यशवंत' हे त्यांचे पुस्तक आकार घेत होते. 'परचुरे प्रकाशन मंदिर' या प्रख्यात प्रकाशन संस्थेतर्फे १० एप्रिल २००५ रोजी गडकरी रंगायतन, येथे या पुस्तकाचे भव्य प्रकाशन झाले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अरुण गुजराथी, महापौर राजन विचारे यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. कारण यशवंत पुस्तकाचा मी एक भाग होतो. गझलगायक अनिरुद्ध जोशी असा माझ्यावरील लेख या पुस्तकात होता. ही गोष्ट माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होती. याबद्दल मी डॉ. शुभा चिटणीस यांचा कायम ऋणी राहीनच. पण अजूनही एका गोष्टीसाठी मी त्यांचा आभारी राहीन. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर त्यांनी मला समाविष्ट केले होते. याच दिवशी 'जगावेगळ्या' या त्यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. त्यासाठी एक खास गाणे संगीतकार विनय राजवाडे यांनी माझ्या आवाजात रेकॉर्ड केले होते. एकूणच हा दिवस मला बरेच काही देऊन गेला.
-अनिरुद्ध जोशी
ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ मिळाली नसती.
मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो. कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि गुरू जेरे स्वामी यांचे आभार मानले. त्यांना साष्टांग दंडवत.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल.
मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव.”
पुलंच्या अपूर्वाईमध्ये मी मादाम तुसाद बद्दलचे त्यांचे मत वाचले होते. त्यामुळे मला तशी फार अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख ही माझ्या वाट्याला आले नाही.आलोच आहोत तर, रॉयल परिवाराबरोबर फोटो घ्यावा म्हणून तिथे फोटो घेतला.
ही सगळीच माणसे सर्वार्थांनच धार्मिक ! साहित्यिक ! राजकीय ! सामाजिक ! न्यायिक ! शैक्षणिक ! उद्योजक ! बैंकिंग !
अशा क्षेत्रातील मोठ्ठी ! विद्वान ! उच्च पदस्थ असून किती निर्मोही होती !… किती सन्यस्त वृत्तिची होती !…. किती लाघवी आणी अत्यंत साधी रहाणीमान असणारी होती !… किती परोपकारी होती…याची आज प्रकर्षाने जाणीव होते ..अशा आदर्श व्यक्ती आज खुपच दुर्मिळ झाल्या आहेत. हे मात्र खरे . यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला..हे माझे पूर्वकर्म …एवढेच मी म्हणेन !
जन्मताच स्त्रीची सर्वांगीण ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तिच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तिचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti