नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.
July 3, 2025

सहा महिन्यांनंतर बरेच प्रयोग, औषधे आणि व्यायामाचे प्रकार सातत्याने केल्यावर आता कोठे विजयचा पाय दुखायचा कमी झाला होता म्हणजे तो आता पायऱ्या सहज उतरू लागला होता. पायाच्या निमित्ताने विजयला सहा महिने सक्तीचा आराम करावा लागला होता तरीही या सहा महिन्यात त्याने त्याचा आर्थिक भार दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर पडू दिला नव्हता. त्याचा खर्च निघावा इतके छोटे मोठे काम तो करतच होता पण याकाळात त्याला घराला आर्थिक हातभार लावता आला नाही त्यामुळे त्याचे बाबा थोडे थोड वैतागल्यासारखे वागू लागले होते कारण आता कुटुंबाचा सर्व आर्थिक भार त्यांच्यावर येऊन पडला होता.
September 2, 2022
नुकतीच वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली होती त्याने. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आता जॉब मध्ये देखील तो स्थिर स्थावर झाला होता. त्याच्या आई-वडिलांना आता त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायची होती. स्थळ बघायला सुरुवात करण्याआधी वडिलांनी मित्रत्वाच्या भावनेने त्याला एकदा विचारून घेतले की त्याच्या मनात कोणी आहे का?
December 31, 2019
बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।
सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।
दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
बहुतां जनालागी जीवी भजावे ।
भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।
प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
बहु सज्जला नेटका साज केला ।
विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।
भला रे भला बोलती ते करावे ।
बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।
June 11, 2026
मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली .
June 11, 2018
व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगाला प्रेरणा देणारा भविष्यातील एक महान चित्रकार म्हणून त्यांचा वारसा जपला गेला आहे . त्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतर वाढत गेली. त्याची गणना जगातील महान चित्रकारांमध्ये केली जाते . आधुनिक कलेच्या संस्थापकांपैकी एक असे त्याला मानले जाते.
October 23, 2021
बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश.
July 27, 2022

मी अनेक वर्षांनी पुन्हा डेहराडूनला जाणार होतो. पाश्चात्य देशांत जाऊन मी नशीब काढलं होतं आणि मी डेहराडूनमधील मित्रांना विशेषतः माझा शाळासोबती मोहन इनामदारला भेटायला उत्सुक होतो. मी डेहराडून सोडल्यावरही अनेक वर्षे त्याचा आणि माझा पत्रव्यवहार चालू होता. सर्व पत्रव्यवहारांमध्ये होतं तेच आमच्या बाबतीत झालं. पत्रव्यवहार प्रथम कमी कमी झाला आणि मग तो कधी बंद पडला ते माझ्या लक्षांतच आलं नाही.
March 20, 2022
दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
January 9, 2024
चांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार?
December 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti