नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत.
July 8, 2024
एका दिवसात सौभद्र, सुवर्णतुला, स्वयंवर या तीन नाटकात तीन कृष्ण साकार करणे ही सोपी गोष्ट नव्हती ती त्यांनी केली. त्यांचे ‘ जय जय गौरीशंकर ‘ तर आजतगायत कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी चित्रपटातून भूमिकाही केल्या त्यात व्ही. शाताराम यांचा ‘ माणूस ‘ चित्रपट आपण विसरू शकत नाहीत.
October 23, 2019
वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू.
July 28, 2022
तुम्ही म्हणाल काय हे लावलंय डबा पुराण. पण मला खरंच असं वाटतं खरंच त्या स्वयंपाकघरातील वस्तू गृहिणीच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या असतील. एखाद्या मैत्रिणीला आपण फोन करतो, एखादीला नाही तेव्हा दुसरी म्हणते, ‘‘ती कशाला मला फोन करेल. ती तुझी खास.’’ तसंच हे डबे किंवा भांडी म्हणत असतील का एकमेकांना, ‘‘तू तिचा आवडता आहेस म्हणून तुलाच ती ऑफिसमध्ये घेऊन जाते.
January 7, 2020
माणसाच्या जीवनात स्त्रीचा सहवास सुरु होतो, तो आईपासून. त्यानंतर मावशी, आत्या, काकू, आजी, पणजी, भाची, पुतणी, मुलगी, सून, नात या नात्यांची भर पडत जाते.
जीवनातील प्रत्येक वळणावर स्त्री कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून त्याला आयुष्यभर भेटतच रहाते. काहीजणी, काही क्षणांसाठी भेटतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात. मात्र प्रत्येकीची नोंद ही त्यांच्या मनाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये झालेली असते. जी कधीही ‘करप्ट’ होत नाही.
March 8, 2022
1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले.
June 27, 2022
सकाळी कामावर जाणाऱ्या पतीला खिडकीतून हात हलवून निरोप देणारी पत्नी, शाळेत मुलाला घेऊन जाणारी आई, संध्याकाळी पती कामावरुन आल्यावर त्याला चहाचा कप हातात देणारी पत्नी, रविवारी सकाळी सर्वांसाठी कांदेपोहे करणारी गृहिणी.. आता विस्मरणात जाऊ लागली आहे..
May 24, 2022
नाना झिपऱ्या हेकटच. त्याने पुन्हा खांद्यावर प्रेत घेतले. आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. चार सहा पावले नसतील टाकून तोच नानाच्या नाकाला उंची डिओचा वास आला. लोगोलाग वेताळाने प्रेतात प्रवेश करून संभाषण चालू केले.
September 12, 2018
तुम्ही कधी शेतकरी कामगार यांच्या जेवणाचे बघितले आहे का फडक्यात भाकरीची चळत एकेका भाकरी वर लाल तिखट लसणाची चटणी. मोकळी डाळ. त्यामुळे तेल सुटते बरोबर कांदा. शेंगदाणे असतात. एखादी लोणच्याची फोड. हे पाहून वाटते की पंचतारांकित हॉटेलमधील सगळे पदार्थ फिके पडतात.
January 3, 2022
काळ बदलला खूपच आणि आता आपली पूर्ण प्रतिमा दिसेल एवढे आरसे. शिवाय मोबाईल मध्ये. गाडीवर. कुठे कुठे नसतो आरसा. एवढे असूनही सेल्फीत सारखे बघायचे चालूच. आणि वरताण म्हणजे मी कशी दिसते? हा प्रश्न विचारला जातोच.
December 7, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti