नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
जकार्ता हुन निघाल्यावर साडे सहा ते सात तासात मुंबईत लँड झाले आणि अर्ध्या तासात इमिग्रेशन आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्हाला राज्य सरकारच्या ताब्यात दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या वाशीच्या हॉटेल मध्ये जायला साडे बारा वाजले.
आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच.
जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता.
सुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती.
दोन दिवस झाले.मी हॉस्पिटल मधून आमच्या घरी आले.आमचं घर त्या हॉस्पिटलपेक्षा एकदम वेगळं आहे बरं! इथे पांढऱ्या कपड्यातली नरसं नाही व कॉटवर पण पांढर्या चादरी नाहीत.आणि मुख्य म्हणजे इथे संध्याकाळी सात वाजता कर्कश घंटा वाजत नाही व भेटायला आलेल्या माणसांना इथे कुणी हाकलून पण देत नाही!!
आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे.
साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यावी लागत नाही, पाहता क्षणी मी लिहिणारा आहे, “कवी तर नक्कीच आहे ” ही ओळख करून देते ती माझी प्रिय सोबती- सखी आणि जिवलग मैत्रीण-
एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड गोंधळ , गुंता करून ठेवा . देश केव्हा उद्ध्वस्त होईल हे कुणाला कळणारही नाही . हे कुणी म्हटलं होतं कुणास ठाऊक , पण ते सत्य होतं . अगदी पूर्वनियोजित कारस्थान असावं तसंच चाललं होतं . विद्यार्थी केंद्रीभूत शिक्षणव्यवस्था , बक्कळ पैसा देणारी इंडस्ट्री केव्हा झाली , हे धुरीणांच्या लक्षात सुद्धा आले नाही . त्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे स्थान केवळ कच्चा माल या स्वरूपाचे झाले आणि त्यांचे पालक कच्च्या मालाचे वाहक झाले .
त्यात विद्यार्थी कुठं होता ?
त्याच्या मनाचा , बुद्धीच्या स्तराचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कुठं होता ?
त्याच्या अंगभूत गुणांचा विचार कुणी , कधी केला होता ?
शारीरिक विकासासाठी मोकळी मैदाने लागतात , त्याचा विचार कुठं होता ?
चार भिंतींची शाळा आणि एकत्रित शालेय सहजीवन खूप काही शिकवत असते , याचा विचार कुठं होता ?

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती . पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.
गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात 'ए.क.कवडा' या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा 'ए.क.कवडा' नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहिर केले की 'ए.क.कवडा' म्हणजे ग.दि.माडगूळकरांचे हे लेखन होते.यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!.
पु.ल.देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक,त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते,त्यावर गदिमा भाष्य करतात
"पाया पडती राजकारणी,करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर"
गो.नी.दांडेकर तर दुर्गप्रेमी,चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती,त्यांच्या बद्दल
"चाले त्याचे दैव चालते,चढतो,त्याचे चढते
माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!"
कविवर्य मंगेश पाडगावकर,काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे,त्याकाळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत त्यावर गदिमा चिमटा काढतात
"तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले
घेऊ धजती इज्जत कैसी 'लिज्जत पापडवाले'"
दुर्गाबाई भागवतांबद्दल...
"जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां
दुर्गे,दुर्गे,सरले दुर्घट,आता हो शान्ता"
गोमंतक निवासी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता,त्यावर
"बोरीच्या रे बोरकरा,लेक तुझी चांगली
गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?"
राजा निलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली सुंदर कविता होती पण खाली लेखकाचे नाव होते 'रा.नि.बढे' आधी गदिमांना लक्षात येईना की हे कोण लेखक,मग आठवले की अरे हे तर आपले 'राजा बढे',पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले,त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे 'राधे तुझा सैल अंबाडा' हे गाणे गाजत होते त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदार पणे मान डोलावत म्हणू लागले...
"कुणी ग बाई केला? कसा ग बाई केला?
आज कसा राजा बढे,रानी बढे झाला?"
रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत
"गिरीशांची ही गर्द 'आमराई'
त्यात उघडी यशवंत पाणपोई"
स्व:तालाही त्यांनी सोडले नाही!,गदिमांना गीतरामायणामुळे 'आधुनिक वाल्मिकी' म्हणत असत,शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते,त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते,म्हणून स्वतः बद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं,गदिमांच्या हातात कुर्हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..
"कथा नाही की कविता नाही,नाही लेखही साधा
काय वाल्मिके,स्विकारिसी तू पुन:श्व पहिला धंदा?"
-- सुमित्र माडगूळकर
Copyright © 2025 | Marathisrushti