(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • हसू!

    हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते.

  • अपघात

    अपघात. ज्या घटनेचं नियोजन करता येत नाही, अशी घटना. वृत्तपत्राच्या दृष्टीनं अपघात म्हणजे एक बातमी. अपघात कसा घडला, कोठे घडला, कोणाला घडला यावरून त्या बातमीची लांबी-रुंदी ठरणार. मी कधी काळी वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टिंग करायचो. अपघात आहे, असं कळलं की फेटल आहे का? असा निर्विकार प्रश्न असायचा. अपघात मोठा असेल, तर त्याचं वर्णन कसं द्यायचं, प्रत्यक्ष घटनास्थळावर जायचं का, असे प्रश्न यायचे. अपघातामागचा धक्का, वेदना त्या वेळी तरी जाणवल्या नाहीत. त्याची बातमी दिली, की आपली इतिकर्तव्यता संपली, असंच काहीसं होतं. वेगळ्या व्यवसायाचा तो परिणाम असावा किंवा आपल्याला काय त्याचं, ही वृत्ती असावी; पण वृत्तपत्रात उमटणाऱया एखाद्या छोट्या बातमीमागे एखाद्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून जातं, याची जाणीव नव्हती. एक अपघात असा पहिला, की त्या दिवशी रात्री मी जेवण नाही करू शकलो. पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या बसने रस्त्यातच पेट घेतला आणि ती भस्मसात झाली. शांताबाई जोग आणि इतर काही नाट्य कलावंतांचा त्यात कोळसा झाला. पाच बाय पाच एवढ्या आकारात चार-पाच जणांच्या मृतदेहाचे ते अवशेष पाहिले अन् गदगदून आलं. या अपघाताची बातमी वर्णनासह लिहिली; पण ती घटना अस्वस्थ करून गेली. त्या दिवशी ना झोप, ना भूक. आता एखादी बातमी वाचली तरी त्या व्यक्तीचं कुटुंब उभं ठाकतं डोळ्यापुढं, आप्तस्वकीय दिसू लागतात. कोणाचा तरुण मुलगा, तर कोणा बछड्याचा बाप. कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ... आयुष्य विस्कटून टाकणारे आपघात.

    हे एवढं सारं सांगण्याचं कारणही तसंच आहे. पत्रकारितेत मनाचा दगडही होऊ शकतो अन् त्याला पाझरही असतो. आता अशी एक घटना... नागपूरला घडलेली. एक महिला पत्रकाराच्या संदर्भातली, माझ्या सहकारी महिलेच्या संदर्भातली. लोकमत नागपूर कार्यालयात `सखी' या पुरवणीचं काम पाहणारी वर्षा पाटील. ती अन् तिचा मुलगा बरोबर राहायचे. दोघांना तेच एकमेकांचे. जिवाभावाचे. ऑफीसमध्ये बसलो होतो. फोन आला. वर्षाच्या मुलाला अपघात झालाय. मेंदूला जबरदस्त मार बसलाय. मी आणि काही सहकारी हॉस्पिटलमध्ये धावलो. काही मदत हवी आहे का, याची विचारपूस केली. डॉक्टरांकडे चौकशी केली. त्याला पाहिलं. वर्षाला भेटलो तिचा चेहरा काहीच बोलत नव्हता. ती धीटपणा दाखवीत होती. तिनं अवसान आणलं होतं, की ती या धक्क्यानं थिजली होती... काही कळेना. अशा वेळी काय बोलायचं ते कळेना. काळजी करू नको, सगळं ठीक होईल हे शब्द तिच्या पशात टाकून परतलो. अपघात गंभीर होता. कोण चुकलं, कोण बरोबर यापेक्षाही शिक्षा अटळ होती. आणखी काही दिवस वर्षाला कामावर येणं कठीण होतं. मी कामाची व्यवस्था पाहिली. दुसऱया सहकाऱयाला जबाबदारी दिली. तो दिवस संपला. दुसऱयाच दिवशी ऑफीसमध्ये गेलो. आता दवाखान्यात जावं असा विचार करून जिना उतरलो, तर वर्षा येत होती. मी थांबलो. तिचा तो तसाच भावनाविहीन चेहरा. मी विचारलं, `इथं काय करत्येस?' ती म्हणाली, मजकुराचं पाहते.' मी म्हटलं, `इथली काही काळजी करू नको. आम्ही पाहू.' ती म्हणाली, `नको, मी पाहीन. तिथं तरी नुसतंच बसायचंय ना?' मी काही बोलले नाही. वर्षानं त्या अंकाचं, पुढच्या अंकाचं काम सुरू केलं. दिवस जात होते. धीर खचत होता अन् वर्षा खंबीरपणे सगळ्यांनाच धीर देत होती. उपचाराच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, प्राथर्ना सुरू झाल्या; पण परमेश्वरानं कोणाचं काहीही ऐकायचं नाही, असंच ठरविलं होतं.

    अचानक एक दिवस वर्षाच्या हालचालींना वेग आला. मुलाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये हलवायचं होतं. मुलाच्या किडनी दान करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण केले होते. अवधी कमी होता. तिला तिचा मुलगा कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत पाहायचा होता. त्यासाठी हे रूप संपलं तरी चालेल, या वास्तवाचा तिनं स्वीकार केला होता; पण नागपूरसारख्या शहरातही अशा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारं रसायन उपलब्ध नव्हतं. मुंबई-हैदराबाद फोन सुरू झाले; पण त्यासाठीचा अवधी आणि वर्षाच्या मुलाला देवानं दिलेलं आयुष्य यात कोण जिंकणार, हा प्रश्न होता. अखेर त्याला दुसऱया रुग्णालयात हलविलं. डॉक्टरांचं पथक तयार झालं. ज्याला या किडनीचा लाभ होणार तोही सज्ज होता; पण ते होणे नव्हते. तो गेला होता. मृत व्यक्तीच्या किडनीज् काही कामाच्या नव्हत्या. पेशन्टचं रूपांतर बॉडीमध्ये झालं होतं; पण वर्षा अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिनं नेत्रदानाचं काम तरी पूर्ण करावं यासाठी खटपट सुरू केली. पोलिसांची अडवणूक, वैद्यकीय तत्परता, वेळेची स्पर्धा यातून अखेर डोळे घेता आले. हा अपघात आणि अंत्यसंस्कारापर्यंतच प्रवासच असा होता, की तिथं दुःख, वेदना यापेक्षाही यंत्रणेविरुद्धचा संताप अधिक यावा, अशी परिस्थिती होती. मृतदेह मिळण्यासाठी एखाद्या आईकडून जेव्हा 500 रुपयांची लाच मागितली जाते, त्या वेळी तिला काय वाटलं असेल? पण वर्षा तिथंही घट्ट उभी होती. वर्षा एकटी राहिली. तिचा 18 वर्षांचा मुलगा, तिचं श्रांत होण्याचं स्थळच एका अपघातानं उखडून टाकलं. नियोजन करता येणार नाही त्याला अपघात म्हणावं, हे खरं; पण अपघातातही जेव्हा दृष्टी देण्याचं, जीवन देण्याचं नियोजन करण्याची उमेद येते त्याला काय म्हणावं?
    आजही वर्षाला जेव्हा मी पाहतो, तिच्याशी बोलतो त्या वेळी मला आठवते ती काळापेक्षाही मोठी झालेली वर्षा.

    -- किशोर कुलकर्णी

  • जे केले ते न करायचे (सुमंत उवाच – १६)

    सुमंत जयंत परचुरे. 

    आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच.

  • टूर लिडर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग ९)

    मी जर तुम्हाला सांगितलं की गोमु टूर लिडर म्हणून एका सुप्रसिध्द ट्रॕव्हेल कंपनीतर्फे युरोपला ४९ जणांना टूरला घेऊन गेला, तर तुमचा तरी विश्वास बसेल कां या बातमीवर ? आणि ती खरीच आहे हे कळल्यावर गोमुचे ग्रहच
    त्याच्यावर प्रसन्न झाले असं वाटेल की नाही ?

  • डोंगर

    एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता.
    या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या.
    सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या.
    भाज्यांचे तरारलेले मळे होते.
    मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती.
    बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं.
    या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते.
    डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं.
    या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते.
    तुडुंब भरलेल्या विहिरी होत्या.
    एक छोटसं पण काठोकाट भरलेलं तळं होतं. तळ्यात सुळसुळणारे मासे होते.
    आणि फक्त पावसाळ्यातच कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा होता.
    सगळ्या गावाचं या डोंगरावर फार प्रेम होतं.
    गावात आलेले पाहुणे मुद्दामहून हा डोंगर पाहायला जायचे.
    पाहुणे जंगलात फिरायचे.
    रानमेवा खायचे. विहिरीत पोहायचे.
    फळबागेत फळं खाऊन झाडांखाली निवांत झोपायचे.
    झऱ्यातलं गोड गार पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे.
    डोंगर उतरताना सोबत फळं फुलं घेऊन यायचे.
    मुलं बागेत खेळायची.
    कारंज्यात भिजायची.
    मजा करायची.

    सगळे म्हणत हा, तर अजबच डोंगर आहे!

    पण. . .
    हा डोंगर मात्र मनातून नाराजच होता. बेचैन होता.

    डोंगराला वाटे :
    छोटी छोटी झाडं मोठी झाली की त्यांचं जंगल होतं. त्यांच्या फळबागा होतात.
    लहान लहान झरे मोठे झाले, एकत्र आले की त्यांची नदी होते.
    पाणी ऊंच उडू लागलं तर त्याचं कारंजं होतं.
    पायवाट मोठी झाली की त्याचा मोठा रस्ता होतो.

    पण . . .

    आपण कधीच मोठं होत नाही!
    आपली कधीच वाढ होत नाही.
    आपण सगळ्यांना मदत करायची. सगळ्यांना ऊर्जा पुरवायची.
    सगळ्या-सगळ्यांना आनंदी करायचं.
    पण तरीही . . .
    आपली होते झीज आणि फक्त झीजच!

    मी अशाने हळू हळू खचूनच जाईन.
    . . . माझी कुणालाच काळजी नाही.
    हे असं का? . . .
    डोंगर आपल्याच विचारात गढून गेला.

    डोंगरावरच्या झाडांना..
    डोंगरावरच्या झऱ्यांना..
    डोंगरावरच्या रस्त्यांना
    डोंगराच्या मनातलं कळलं.
    डोंगरावरची झाडं हसली.
    झाडं सळसळली.
    झाडं म्हणाली,
    “अरे डोंगरा, असं काय करतोस? तुझ्यामुळे तर आम्ही आहोत.
    आम्ही आमच्या मुळांनी तुला असं घट्ट धरुन ठेवलंय की तुझी होणारच नाही झीज!
    आणि हे डोंगरा...
    आम्हाला आहे रे तुझी काळजी.
    कडक उन्हाळ्यात जेव्हा ऊन तापू लागतं, तेव्हा आम्ही आमची सारी पानं तुझ्यावर अंथरतो आणि आम्ही मात्र . . .
    निष्पर्ण होऊन उन्हात तापत राहातो . . अतिशय आनंदाने!
    तुझ्या पोटातलं थोडसं पाणी पितो आम्ही, पण तशीच सावली ही देतो तुला.”
    हे ऐकून डोंगराचं मन भरुन आलं.
    डोंगरावरचा झरा जरा खळाळला.
    दगडाजवळ बुडबुडला.
    झरा डोंगराला म्हणाला,
    “अरे डोंगरा, तुझ्याच अंगाखांद्यावरुन आम्ही वाहतो, बागडतो.
    आम्हाला आहेच की तुझी काळजी.
    र डोंगरा...
    आम्ही म्हणजे, तू पाणी पिऊन तृप्त झाल्यावर टाकलेल्या चुळा.
    भर उन्हाळ्यात तुला गारवा वाटावा, म्हणून तर त्यावेळी आम्ही तुझ्या पोटात असतो.
    आणि पावसाळ्यात, तुझ्यावरचा सगळा कचरा,गाळ वाहून नेतो.
    तुला चांगलं स्वच्छं करतो.
    आणि पुढच्या उन्हाळ्यासाठी...
    तुझ्यावरच्या विहिरी भरुन ठेवतो. तळं भरुन ठेवतो.”
    हे ऐकून डोंगराचे डोळे पाणावले.
    डोंगरावरचा रस्ता उधळला.
    डोंगराला बिलगला.
    रस्ता डोंगराला म्हणाला,
    अरे डोंगरा, असं काय करतोस?
    अरे आम्ही,तुझ्यावरच चालतो, तुझ्यातुनच वळतो, त्यातुनच वाट काढतो . .
    आणि वाटसरुंना वाट दाखवितो.
    मग ते फळं खाऊन, पाणी पिऊन समाधानी होतात.
    फुलांचा वास घेऊन ताजेतवाने होतात. तव्हा . . .
    ते सारे तुझंच कौतुक करतात ना?
    तुलाच आशीर्वाद देतात ना?
    आम्हीच काय...
    पण हा सारा गाव सुध्दा तुझ्यावरच प्रेम करतो ना,रे डोंगरा?
    हे ऐकून डोंगराला थोडासाच आनंद झाला!
    भल्यामोठ्या डोंगराचा इवलासा आनंद
    डोंगरावरच्या झाडांना..
    डोंगरावरच्या झऱ्यांना..
    डोंगरावरच्या रस्त्यांना समजला.
    कसं कुणास ठाऊक..पण
    गावातल्या मुलांना पण कळला!
    मुले नाचत नाचत डोंगरावर गेली.
    बागेत खेळली. मातीत लोळली.
    विहिरीत पोहोली.

    आणि मग...
    फुलबागेतली फुलं घेऊन मुलांनी तो अख्खा डोंगर फुलांनी सजवला!

    हे पाहायला सारा गाव जमा झाला.

    तेव्हाच डोंगराला मनापासून..
    अगदी मनातल्या मातीपासून त्याला खूप आनंद झाला!

    सगळे म्हणाले,अजबच आहे हा फूल डोंगर!

    -- राजीव तांबे.

  • गूढ रम्य, निसर्गरम्य — मालवणजवळचा धामापूर तलाव !

    या तलावाच्या परिसरात विलक्षण शांत निसर्ग पसरलेला आहे. तेथे या तलावाबाबत काही गूढ आख्यायिका आहेत. पूर्वी येथील देवीला प्रार्थना केली की एखाद्या गरीब मुलीच्या विवाहासाठी, तलावातून दागिन्यांची परडी वर येत असे. लग्न झाले की हे दागिने परडीत भरून पुन्हा तळ्यात सोडून दिले जात. पण कुणालातरी दागिने परत न करण्याचा मोह झाला आणि नंतर हे दागिने येणे थांबले. दुसरे असे ऐकायला मिळाले की या तलावाला तळच नाही. तलावातील पाण्यात तुम्ही कितीही खाली गेलात तरी तळ सापडत नाही. इथे प्रसादासाठी जेवण आणले असेल तर ते येथेच संपवायचे किंवा वाटून टाकायचे पण घरी परत न्यायचे नाही. या श्रद्धा की अंधश्रद्धा याची तपासणी करण्याचे माझे काम नसल्याने मी हा सर्व सुंदर परिसर फिरून छान आनंद घेतला. भगवती देवीचे साधे पण प्रशस्त मंदिर आणि परिसर मुक्त निसर्ग सौन्दर्याचे एक कोकण लेणे आहे !

    -- मकरंद करंदीकर.

  • मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा………….!!!

    “गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा”

    ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस हा दिवस तिची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.अर्थात गायी-वासराच्या अंगी असणारी उदारता,शांतता व समृद्धीची भावना सामान्य माणसाच्या अंगी वृद्धिंगत व्हावी अशी त्यामागची भावना असते.शेतकऱ्याच्या घरी अशी समृद्धी गायी-वासराच्या आणि दुध-दुभत्याच्या रुपाने सतत नांदत राहावी व त्यातून शेतकऱ्याची सर्व बाजूंनी भरभराट व्हावी ही भावनाही पूजा करण्यामागे नक्कीच असते.हल्ली कोणतीही पूजा सहेतुक होत असली तरी त्यामागे श्रद्धेचा,संस्कृतीचा,परंपरेचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले जाते.

    पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे खूप गायी असायच्या.त्यांची नावेही भवळी,मोरी,कपिली,खिलारी,तांबडी अशी छान असायची.प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच आणि त्यामुळे आहारात हमखास दुध व दुधाचे पदार्थ असायचेच असायचे.जर गावात एखादी गायी व्याली तर शेजाऱ्यांना कच्च्या दुधापासून बनविलेला खरवस खायला लोक आवर्जून बोलवायचे.दही-दुधाचा घरात नुसता पूर असायचा.पण पुढे ‘जिथं पिकतं तिथ विकत नाही’ या म्हणीला छेद गेला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनेंतर्गत स्थापिलेल्या दुध-संघाने दुध घ्यायला सुरुवात केली.एकदा दुध विकण्याची गोडी निर्माण झाल्यावर दरात मनमानी सुरु झाली आणि एकूण व्यवसाय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून दुधाची गुणवत्ता खालावत गेली व मनाचा कोतेपणा वाढत गेला.ज्याच्या घरात चार-पाच गायी आहेत तोही बिचारा बिगर-दुधाचा चहा पिऊ लागला.दह्या-दुधाचा माठ हा शब्दप्रयोग फक्त गाण्यातच(गवळणीत) दिसू लागला.आता त्याची जागा किटली आणि वाटीने घेतलीय.शहरात पूर्वी थोड्या-फार प्रमाणात गायी दिसायच्या पण आता त्यांची संख्या खुपच कमी आहे.शहरात प्राण्यांच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांना प्रतिकृती किंवा चित्राचा आधार घ्यावा लागतो.फार फार तर शहरात एखाद्या मंदिराच्या बाहेर उभी असलेली गाय आणि चारा घेऊन असलेला गोरक्षक दिसतात.भाविक मग त्या गोरक्षकाकडील चारा विकत घेतात.गायीला चारतात आणि गोमातेचे दर्शन झाले या आनंदात घरी परततात.

    शेतकरी मोसमी हंगामामुळे शेतीपासून दूर जात आहे.ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरित लोकांची वाढत जाणारी संख्या आणि त्यातून वाढणारे शहरीकरण यामुळे काही सांस्कृतिक बाबी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.१९९० च्या दशकात शिक्षक,भूगोल किंवा अर्थशास्त्र शिकविताना ग्रामीण भागात ७०% व शहरी भागात ३०% लोकसंख्या राहते असे सांगायचे.आता त्यांनाच ग्रामीण भागात ५५% व शहरी भागात ४५% लोकसंख्या राहते असे अलीकडच्या सर्वेनुसार सांगावे लागते.त्यामागे विविध कारणे आहेत.बदल हा जरी सृष्टीचा नियम असला तरी तो आश्वासक असला म्हणजे पचनी पडायला सोपा जातो.

    अशी ही गाय आणि तिचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.गायीच्या पूजेच्या दिवशी आणि नेहमीच देशी,गावरान आणि एकूण सर्वच गायींचे मानवी जीवनातील नैसर्गिक महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि तिचे गाणेही जोपासले पाहिजे-

    “दिन दिन दिवाळी,गायी-म्हशी ओवाळी;गायी कुणाच्या?...........लक्षीमनाच्या”.

    - भाऊसाहेब लाला टुले
    tulebhausaheb1986@Gmail.com

  • समाजसेवा आणि भुतदया

    थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते.

  • मोठ्या मनाची माणसं

    मोठ्या मनाची माणसं भेटतात आणि आपले विचारही बदलून जातात.एवढ्या लोकांत मला सावरुन घेतले. लोकांच्या मनातील विचार समजून घेऊन त्यांचेही समाधान केले.

  • आडदांड, धटिंग पण- “आपला माणूस !”

    विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा.