नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कोणी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट करू नये, त्यात मनाला कसं वाटतयं याचा विचार झाला पाहिजे. सक्तीने भक्ती करून त्यातून काहीच मिळत नाही.
काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे. बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या?
चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो.

विजयच्या घराची बेल वाजल्यावर विजयने दरवाजा उघडला तर दरवाज्यात त्याच्या इमारतीतील काही तरुण गणपतीची वर्गणी गोळा करायला आले होते. विजयने सुरुवातील १०० रुपये वर्गणी दिली पण आम्ही सर्वांकडून १५१ रुपये वर्गणी घेत आहोत म्हटल्यावर विजयने आणखी ५१ रुपये वर्गणी दिली. वर्गणी देताना विजयला मनस्ताप वगैरे होत नाही. पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असावा असे विजयला प्रामाणिकपणे वाटते.त्यामुळेच विजय कोणालाही वर्गणी देताना कमीत कमीच देतो कारण एका वर्षी आपल्याला जास्त वर्गणी द्यायला परवडत असेल तरी ती द्यायला प्रत्येक वर्षी आपल्याला परवडेलच असे नाही ना ? माणसाने धार्मिक कार्यात सहभाग नोंदवायलाच हवा !
अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते.
‘ससा कासव शर्यतीची परंपरा’ पुन्हा सुरु करण्यासाठी, आम्ही कुठला ही त्याग करायला तैयार आहोत. आम्हाला सस्यांनी सुचवलेले फेर-बदल मान्य आहे. स्पर्धेत, ससा जिंको किंवा कासव, परंपरा अक्षुण, राहिली पाहिजे, हे महत्वपूर्ण. सर्व सभासदांनी साधु-साधु म्हणत, कासव राजाच्या उदात्त विचारांचे स्वागत केले. नंदन वनात शर्यतीची तैयारी सुरु झाली…या वेळी कोण जिंकणार ????
नक्षत्रांचे देणे नंतर कार्यक्रम आयोजकांना हे एकदम पटले की फक्त हिंदी मी चांगला गाऊ शकतो. मग मराठी भावगीते, हिंदी चित्रपटगीते यांचे अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. "हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रमात तुला गाताना पाहून खूप आनंद होतो." माझे गुरू श्रीकांत ठाकरे म्हणाले, "तू एक हजार कार्यक्रमांचे स्वप्न पहातो आहेस हे मला ठाऊक आहे. पण कधी कधी थोडी शंका वाटायची. आता मात्र तुझे स्वप्न नक्की पूर्ण करशील अशी खात्री वाटते.” श्रीकांतजींच्या या शब्दांनी मला जे समाधान लाभले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. मी चटकन त्यांना वाकून नमस्कार केला.
“तुमचा आशीर्वाद असू द्या, मग मी प्रयत्नात कसूर करणार नाही." त्यावर श्रीकांतजी म्हणाले,
“अरे गुरुचा आशीर्वाद शिष्याबरोबर कायमच असतो. शिष्याने त्यावर अढळ विश्वास ठेवायचा असतो आणि तो सार्थ करायचा असतो.
श्रीकांतजींची तब्येत अलीकडे ठीक नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष गाणे शिकणे थांबले होते. पण वेळोवेळी भेटून त्यांचे मार्गदर्शन मात्र मी घेत होतो. त्यांच्या शब्दांनी नवा हुरूप आला. क्लॅरिअंट इंडिया लिमिटेडसाठी प्रीतमजी घनश्यामानी यांनी माझा गज़लचा कार्यक्रम फरियाज़ हॉटेल, लोणावळा येथील लॉनवर आयोजित केला. ही माझी अत्यंत आवडती जागा आहे. या लॉनवर कार्यक्रम करतांना समोर एक मोठी दरी दिसते आणि पलीकडे चमचम करणारे लोणावळ्याचे अनेक दिवे तर आकाशात तितकेच तारे दिसतात. प्रख्यात निवेदिका मंगला खाडिलकर यांच्यासाठी शिवसेना शाखा बोरीवलीसाठी एक कार्यक्रम केला. माझ्याबरोबर मृदुला दाढे-जोशी, रवींद्र बिजूर आणि सोनाली कर्णिक असे कलाकार होते. कार्यक्रमानंतर खूप उशिरा घरी परतल्यामुळे दुसऱ्या दिवशी बराच उशिरापर्यंत झोपलो होतो. फोन खणखणला आणि मला जाग आली. पलीकडून कोणीतरी सांगत होते. "संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन झाले. लगेच दादरला ये." माझा विश्वासच बसेना. केवळ आठ दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो होतो आणि आज? ताबडतोब दादरला पोहोचलो. माझे मेहुणे विद्याधर यांच्याबरोबर घरी गेलो. वहिनी, जयू, राज सगळे दुःखात बुडाले होते. अनेक मान्यवर मंडळी अंतिम दर्शनासाठी येत होती. भाजपचे केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन माझ्याबरोबरच प्रवेशले. “फारच धक्कादायक आहे हे," ते म्हणाले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगणित शिवसैनिक आणि असंख्य संगीतप्रेमी यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
महाराष्ट्राने एक मोठा संगीतकार गमावला. माझे तर अपरिमित नुकसान झाले होते. श्रीकांतजींबरोबरचा बावीस वर्षांचा सहवास संपुष्टात आला होता. एका वर्षामध्ये माझे दोन्ही गुरू काळाच्या पडद्याआड निघून गेले. घरी परतताना श्रीकांतजींचे शब्द कानात घुमत होते. 'अरे, गुरुचा आशीर्वाद शिष्याबरोबर कायमच असतो. शिष्याने त्यावर अढळ विश्वास ठेवायचा असतो आणि तो सार्थ करायचा असतो.' संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना सांगितीक श्रद्धांजली वाहणारे दोन कार्यक्रम आम्ही आयोजित केले. एक प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली येथे तर दुसरा गडकरी रंगायतन ठाणे येथे. या कार्यक्रमांमुळे हे जाणवले की आता श्रीकांतजी नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेले संगीत मात्र कायम जिवंत असणार आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना कायम आनंद देणार आहेत. नाही तरी कलाकार त्याच्या कलाकृतीत कायम जिवंत रहातो हेच खरे. आजही श्रीकांतजींनी स्वरबद्ध केलेल्या गझल गाताना श्रीकांतजी पुन्हा भेटतात. प्रत्येक गझलबरोबर असंख्य आठवणी जाग्या होतात आणि श्रीकांतजींबरोबरचा संवाद पुन्हा सुरू होतो.
- अनिरुद्ध जोशी
नक्षत्रे आपापल्या स्थानी असतात- त्यांचे चमकणे, उदयास्त सारे ठरलेले असते. एकाचवेळी नभी असंख्य नक्षत्रे झळाळत असतात- थोडी मागेपुढे. त्यांतील काही एकत्र येणे आणि त्यांनी आपल्याला रिझवणे हे आपले गतजन्मीचे सुकृत असते.

तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे. माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे .
Copyright © 2025 | Marathisrushti