(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • लग्नाच्या कराराचा कागद

    अनेक महिन्यांनी नोकरी सोडल्यावर मी मित्राला भेटण्यासाठी म्हणून साईटवर गेलो.सहज गप्पा मारता मारता मला ती दिसला , तिचा बाप ..मी मित्राला म्हणालो हा इथे कसा आणि त्याची मुलगी ..ती पण इथेच आहे …आठवते ना…मी ते कधीच विसरू शकत नव्हतो …

  • सुटका

    काही दिवसांनी समोरच्या सोसायटीत एक अ‍ॅम्ब्युलन्स आली .. कोणीतरी दोघे उतरले .. बिल्डिंगमधल्या बाकीच्यानी त्यांच्या त्यांच्या खिडकीतून टाळ्या वाजवल्या .. आनंदानी कसल्याश्या घोषणा दिल्याचे आवाज ऐकू आले.

  • चूक

    विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.

  • हुशारपक्षिणी

    एक शेतकरी होता. त्याने दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतात भाताचे पीक लावले होते, कारण त्या भागात चांगला पाऊस पडायचा. त्या वर्षीही चांगलाच पाऊस पडला व हळहळू भाताचे पीक चांगले आले. त्या भाताच्या पिकातील एक मोकळी जागा पाहून एका पक्षिणीने आपल्या पिलांसाठी घरटे केले. ती पक्षीण आणि तिची चार-पाच पिले तेथे मजेने रहात होती, कारण शेतकर्‍याला त्या घरट्याची कल्पनाच नव्हती. भाताचे पीक चांगलेच वर आल्यानंतर त्या शेतकर्‍याने कापणी करायचे ठरविले व एकेदिवशी आपल्या मुलाला त्याने सांगितले की, उद्या आपल्या सर्व नातेवाइकांना कापणीसाठी बोलव. त्याप्रमाणे त्या मुलाने सर्व नातेवाइकांना कापणीसाठी निरोप दिला. शेतकर्‍याने त्याच्या मुलाला काय सांगितले हे त्या पक्षिणीच्या पिल्लांनी ऐकले होते. त्यामुळे सायंकाळी पक्षीण येताच त्यांनी तिला शेतकर्‍याचे बोलणे सांगितले व आपल्याला आता आपले घरटे सोडावे लागणार याचे त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्या तरी कोणीही कापणी करायला येणार नाही त्यामुळे लगेच आपल्याला घरटे हलवावे लागणार नाही. दुसऱ्या दिवशी शेतकरी कापणीसाठी नातेवाइकांची वाट पाहत बसला मात्र कोणीही आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा मुलाला म्हणाला, ' 'नातेवाइकांचे काही खरे नाही, तू उद्या आपल्या आजुबाजूच्या शेतकर्‍यांना निशेप दे म्हणजे आपणच कापणी करू. ' ' मुलगा हो म्हणाला व निरोप द्यायला गेला. शेतकरी व मुलाचे हे संभाषणही पिलांनी ऐकले व सायंकाळी पक्षीण आली की तिला ते सांगितले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्याही कोणी येणार नाही. त्यामुळे उद्याचा दिवस तरी घरटे आपले शाबूत राहील. दुसर्‍या दिवशीही कापणीसाठी कोणीच आले नाही त्यामुळे शेतकरी वैतागला व आपल्या मुलाला म्हणाला, आता आपणच उद्या घरातील सर्व जण भाताची कापणी करून टाकू. हेही पिल्लांनी ऐकले व आपल्या आईला ते सांगितले. तेव्हा मात्र पक्षीण त्यांना म्हणाली, आता मात्र आपल्याला दुसरीकडे घरटे करावेच लागेल. त्याप्रमाणे सायंकाळीच तिने आपल्या सर्व पिल्लांना दुसरीकडे तात्पुरत्या घरड्यात हलविले. इकडे दुसर्‍या दिवशी सकाळीच शेतकरी आपल्या कुटुंबासह आला व त्याने भाताची कापणी सुरू केली.

  • करुणा

    (जैन लोककथा)

    एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.

  • जुई

    किस्ना पेंटर मंजे एक दिलदार अन तितकचं अवली व्यक्तीमत्व व्हतं.कुंचल्यानं जसे चित्रात रंग भरायचा तसेच जिवनात बी रंग वतायचा.त्यामुळं त्याचा गोतावळा लय मोठा व्हता.कुंचल्याच अन त्याच्या हाताचं एवढं घट्ट नातं व्हतं की त्यानं काढलेली चित्र अक्षरशः जिती व्हयाची.असा हा अवलीया जिथ जायचा तिथं रंग भरायचा..

  • चैत्र गौरी

    पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते. पाटावर बसवून तेल लावून गरम पाण्याने न्हाऊ घालून खणाची साडी नेसवली जाते. दोन्ही बाजुच्या कडेला पाच बांगड्या अडकवून. मंगळसुत्र एखाद्या दागिना घालून नथ अडकवून पाटावर बसवली जाते. मग यथासांग पुजा करुन गुळाची पोळी खीर असा नैवेद्य दाखवला जातो. समोरच्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवले जाते. कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हे वैशिष्ट्य असते.आज आमच्या घरी सून बाईंनी चैत्र गौरीची पुजा केली आहे.

  • स्पर्शतृष्णेची पाणपोई

    एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.

    मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.

    सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
    माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.

    पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.

    काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.

    अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.

    कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.

    कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
    जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
    यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
    विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.

    हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण... अजून...

    आज सकाळी पावणेआठचा सुमार.
    बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
    ''तुम्ही वैशाली पंडित का?'' तिने विचारलं.
    ''हो. आपण? या ना.. '' मी.

    यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?

    ''प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ''

    नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.

    शेवटी आवाज चढवला.

    ''बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?''
    आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.

    '' मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ''

    अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.

    मी सुन्न.

    थोड्या वेळाने ती सावरली.

    जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
    माझा हात हातात घेतला.
    मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.

    ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
    इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
    माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?

    -- वैशाली पंडित

  • गान गुणगान

    प्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले.

  • कॅफे डेस्टिनी

    एका मॅट्रिमोनिअल साईटवर दोन दिवस चॅटिंग केल्यानंतर निकिता आणि निखिल दोघे रविवारी संध्याकाळी हॉटेल कॅफे डेस्टिनीला भेटायचे ठरवतात. ठरल्याप्रमाणे निखिल निकिताला भेटण्यासाठी त्याचा मित्र निहारला सोबत घेऊन आणि निकिता तिची मैत्रीण नेहाला सोबत घेऊन येते. चौघांचे हाय – हॅलो झाल्यावर निखिल आणि निकिता हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर एकमेकांशी बोलण्यासाठी जातात आणि निहार आणि निकिता तिथेच एका टेबलवर बसून कॉफी ऑर्डर करतात.