नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मुक्ती बाहिनी (वाहिनी) प्रसिद्ध नेता बागा सिद्दिकी किंवा टायगर सिद्दिकी अब्दुल कादीर सिद्दीकी म्हणून तो प्रसिद्ध होता. (श्रीलंकेचा तामिळ नेता प्रभाकरनप्रमाणे) तो फक्त २७ वर्षांचा तरुण होता. इतिहास शिकतानाच मुक्ती बाहिनीचा नेता बनला. त्यावेळच्या बांगलादेशामध्ये त्याची जबरदस्त क्रेझ व पावर होती. तेव्हा त्याच्या हाताखाली सतरा हजार तरूणांची सेना होती. शासनामध्ये कुठल्या पदावर नव्हता. पण प्रचंड दबदबा होता. सगळं शासन त्याच्यासाठी खुलं होतं. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचे दरवाजे त्याच्यासाठी कायम खुले होते.
९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती.
परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न केला होता. थेट सिमल्याहून बेणे आणल्याचं आठवतं. त्यानंतर काही काळ घरात केवळ चर्चा होती ती बटाटयाच्या शेतीची. अखेर एकदा घरात बटाटे आले. त्यांचा प्रत्येकी आकार फार तर खेळातल्या गोट्यांएवढा असेल. त्यानंतर बटाट्याची शेती मागे पडली ती कायमचीच; पण जेव्हा जेव्हा माझे काका घरी यायचे तेव्हा शेतीचा विषय निघायचाच. त्या वेळी आम्ही कोपरगाव तालुक्यातल्या कोळपेवाडी या साखर कारखान्याच्या गावी राहत असू. तेथून फार तर पन्नास किलोमीटरवर गंगापूर तालुक्यात माझं गाव होतं. मांजरी हे गावाचं नाव. लहानपणी या गावात गेलेलो, खेळलेलो. तिथलं देवीचं मंदिर, गावकऱयांनी तयार केलेला तलाव, आमच्या घरातलं रेशनचं दुकान आणि त्यासमोरचं पोस्ट, या त्यातल्या आठवणीच्या खुणा. शेतावर जायची कधी वेळ यायची नाही; कारण तिथं धड ना सावली ना पाणी. स्वाभाविकपणे नगर जिल्ह्यातील हिरवीगार शेती पाहिलेल्या मला ते शेत वैराणच वाटायचं. फार तर विसाव्याला एक चिंच होती. चिंचेच्या खाली पीर होता. त्यामुळं तिथं आम्हाला फारसा प्रवेशही नसायचा. तर, काका शेती करायचे आणि ते घरी आले की ज्या चर्चा होत त्यात शेतीचा विषय खूपच कमी असायचा. कुठे कर्ज घेतलंय, कुठलं पीक जळालं, या वेळी खायला दिढीनं दोन पोती घेतलीत (दिढीनं म्हणजे या हंगामात घेतलेलं एक पोतं धान्य दुसऱया हंगामात दीड पोतं द्यायचं) ही पोती कधी उत्पन्न आलं आणि परत करता आली, असं झालं नव्हतं. प्रत्येक वेळी वडील काही ना काही पैसे काढून देत. काकांचं आमच्या घरातलं वास्तव्य बरचसं तणावाचंच असे; पण माझ्या दृष्टीनं मात्र थोडा वेगळा अनुभव असायचा. काका परत जायला निघाले की मी त्यांच्याबरोबर स्टॅन्डवर जायचो. काकाला मिसळ आणि जिलेबी खूप आवडे. त्याच्या दृष्टीनं ती चैनच होती. आमच्याकडे आल्यावर बहुधा त्याला ती करता यायची.
शेती हा एकूणच विषय माझ्या आईच्या दृष्टीनं फारसा उत्सुकतेचा किंवा आत्मीयतेचा नसायचा. तिला घरात वाचविलेल्या पैशातून शेतीसाठी काही द्यावं लागायचं हे त्यामागचं कारण असावं; पण मला आठवतं, त्या वेळी शेती हा उत्साहाचा विषय बनला होता. सुरुंग, ब्लास्टिंग असे एरवी वापरात नसलेले शब्द चर्चेत असायचे. पैशाचा विषयही यायचाच, पण त्या चर्चेत निराशा-नाराजी नसायची. उत्साह असायचा. स्वप्नं असायची. एके दिवशी कळलं, की आपल्या शेतावर विहीर काढायची ठरलीय. विहीर आणि पाणी यांचा संबंधच इतका अभिन्न, की या कल्पनेनंच आम्ही भारावून गेलो होतो. चार-आठ दिवसांनी बातमी यायची. खोदकाम सुरू झालंय, एक परस झालं. दोन परस खोदलेत पण जमिनीला ओलावाही नाहीये. एके दिवशी काका आले ते चेहरा एवढासा करूनच. विहिरीत पक्का दगड लागला होता. पाच परस खोदल्यानंतरही पाण्याचा पत्ता नव्हता. गेले काही दिवस सातत्यानं पैसे गावी जात होते. आज ना उद्या पाणी लागेल ही आशा होती. पाणी रोज स्वप्नात पाहिलं जात होतं त्यावर आजचा दिवस सुखाचा होत होता. त्या रात्री केवळ विहीर अन् पाणी एवढाच विषय चर्चेला होता. काका निराश होता, तर वडील काहीतरी मार्ग निघेल, अशा प्रयत्नात. अखेरीला औरंगाबादेतून चार माणसं सुरुंग काढायला न्यायचं असं ठरविलं, तेव्हा पहाट झाली होती. सकाळी-सकाळी काका गावी गेला. आमची मिसळ-जिलेबी झालीच नाही. त्या दिवशी वडील दिवसभर काही मोठ्या बागाईतदारांशी बोलत होते, काही ठरवीत होते. अखेर ठरलं. गुरुवारी निघायचं. गाडी घेऊनच जायचं. कोपरगावहून ब्लास्टिंग मशिनची गाडी येईल. हे सारं तपशिलानं लक्षात रहायचं कारण म्हणजे त्या गाडीबरोबर मलाही नेणार होते. मी केवळ गुरुवारची वाट पाहत होतो. अखेर गुरुवार उजाडला आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शेतावर पोहोचलो तेव्हा मजुरांनी विहिरीच्या खड्यात किमान दीड-दोन फूट खोलीची नऊ बिळे तयार केली होती. त्यात स्फोटके भरण्यात आली. त्याला जिलेटीन म्हणत. या सुरुंगाचं सारं नियंत्रण या गाडीतून होणार होतं. सारं काही सज्ज होतं. सर्वांना विहिरीपासून दूर जायला सांगण्यात आलं. आता लवकरच स्फोट घडविण्यात येणार होते. उत्कंठा वाढत होती. सारे विहिरीपासून किमान शंभर मीटरवर होतो. काकाही मागे झालेला होता. इशारा झाला आणि बार उडाले. किती बार झाले कळलं नाही; पण विहिरीतून दगड उडाले, खपल्या उडाल्या. `थांबा।़ एवढ्यात पुढे जाऊ नका,' असं गाडीतून सांगण्यात येत होतं; पण आता बार थांबलेत म्हणून काका पुढे झाला तेवढ्यात एक स्फोट झाला. दगड उडाले. छोटे अन् मोठेही. एक कपटा उडाला तो काकाच्या कपाळावर. त्यानं कपाळाला हात लावला. तो ओला झाला होता. रक्त येत होतं. काका तसाच विहिरीकडे धावला अन् ओरडला, `दादा।़ पाणी!' कपाळाची खोक विसरून पाण्याचं ते निर्मळ रूप तो पाहत होता. विहिरीला तीन जिवंत झरे लागले होते. झऱयाच्या मुळाशी स्वच्छ पाणी मातीत मुरत होतं. आमचा आनंद कष्ट, वेदना थिट्या करीत होता.
आज हे सारं आठवलं ते वृत्तपत्रातल्या एका छोट्या बातमीवरनं. बातमीत म्हटलं होतं, `22 मार्च हा जागतिक जलदिन आहे.'
-- किशोर कुलकर्णी
एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल.
मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव.”
… म्हणून ज्या पद्धतीने आपण घरातील लोकांना आपलं म्हणून माफ करतो त्या पद्धतीनेच या समाजाला देखील आपल्याला माफ करता आलं पाहिजे.
पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांग बागलाणचे महत्व
Copyright © 2025 | Marathisrushti