(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मोती पोवळ्याची मोष्ट

    एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.

  • पैली ते सात्वी

    इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली.

  • सफाई कामगार

    भाजपच्या राजकीय दक्षिण मंथनाची दिशा काय, अशा स्वरूपाचं काही लिहायचं म्हणून टिपण तयार होतं… ते लिहावं म्हणून मी

    पेन उचलला. लिहू लागलो. तासभराच्या लेखनानंतर थांबलो तेव्हा लक्षात आलं मी भाजपवर काही लिहिलेलं नव्हतं, होती ती

    हॉटेलमध्ये साफसफाई करणार्‍या त्या महिलेची कथा… यशाचा, बळाचा, विकासाचा, विश्वासाचा मार्ग दाखविणारी कथा!

  • घरटं छोटं

    पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे….

  • रेकॉर्डिंग आणि अल्बम

    ठाणे जिल्हाप्रमुख आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त गाण्याचा कार्यक्रम मी सादर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीतकार चिनार खारकर भेटायला आला. गेल्या वर्षीच्या चित्रपट 'मानसन्मान' नंतर आम्ही एकत्र काम केले नव्हते.

    "सर आपण नव्या पद्धतीच्या हिंदी गाण्यांचा अल्बम करू या. यात गझल नसतील. तुमच्या नेहमीच्या स्टाईलहून अगदी वेगळ्या रचना असतील." चिनार म्हणाला. प्रियांकाही ॲकॅडमीत होती. तिने ही कल्पना उचलून धरली आणि आम्ही एका नव्या अल्बमच्या तयारीला लागलो. लवकरच २० एप्रिल २००९ रोजी या अल्बमचे पहिले गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड झाले. यानंतर कौस्तुभ सोनाळकर या तरुण संगीतकारासाठी मी एक हिंदी गाणे रेकॉर्ड केले. जून २००९ मध्ये चिनार-महेशने दोन नवी हिंदी गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. या रेकॉर्डिंगसाठी बरेच श्रम घ्यावे लागले. कारण ही हिंदी गाण्यांची नवी स्टाईल होती. या पद्धतीने गाणे अजिबात सोपे नव्हते. या सर्व नवीन प्रोजेक्टसमुळे माझी कार्यक्रमांची गती मंदावली.

    १५ सप्टेंबर २००९ रोजी जिल्हा परिषद अभियंता संघटनेसाठी अभियंतादिनानिमित्त मी गाण्याचा कार्यक्रम केला. यामुळे मी इंजिनियरसुद्धा असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. नंतर 'रजनीगंधा' या वैशालीताई सोनाळकरांच्या अल्बमच्या प्रकाशनासाठी गाण्याचा कार्यक्रम आम्ही सादर केला. या कार्यक्रमाला लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, रवींद्र लाटकर आणि शास्त्रीय गायक उपेंद्र भट यांची उपस्थिती लाभली. मग 'सुहाना सह्याद्री अंताक्षरी नवरात्री सेलिब्रिटी स्पेशल'मध्ये मी गायलो. माझ्याबरोबर माधुरी करमरकर, आनंद सावंत, योगिता गोडबोले, दिपक चव्हाण हे इतर कलाकार होते. संगीत संयोजन प्रशांत ठाकरे यांचे होते. हा कार्यक्रम रसिकांना फार आवडल्यामुळे या कार्यक्रमाचे निर्माते विद्युत शहा यांनी दिवाळी सेलिब्रिटी स्पेशलसाठीही आम्हा कलाकारांना परत बोलावले. अजून एक रंगतदार एपिसोड आम्ही केला. या कार्यक्रमाचे निवेदक अभिनेते अतुल परचुरे आणि गायिका नेहा राजपाल होते. नंतर माझे मेहुणे आयोजक विनायक पटवर्धन यांच्यासाठी गीत-गझलचा कार्यक्रम पुण्याला केला.

    २०१० या वर्षाची सुरुवात 'अत्रे कट्टा'च्या कोपरी उद्यान, ठाणे येथील कार्यक्रमाने झाली. हा गझलचा कार्यक्रम अतिशय रंगला. रसिक श्रोत्यांची भरघोस उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. अशी जोरदार सुरुवात झाल्याने या वर्षात काहीतरी चांगले होणार असे मला वाटायला लागले आणि नेमके तसेच घडले. अनेक टीव्ही चॅनल्सवर आता संगीताच्या स्पर्धा सुरू झाल्या होत्या. या स्पर्धांमध्ये ऑडिशन देण्यासाठी स्वर-मंच ॲकॅडमीच्या अनेक मुलामुलींना मी घेऊन जाऊ लागलो. त्यात अनेक जणांना यश मिळू लागले अमी शहा या माझ्या विद्यार्थिनीला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशी अनेक बक्षिसे मिळाली. माझी मुलगी शर्वरी 'रिन मेरा स्टार सुपरस्टार' या स्टारप्लसच्या संगीतस्पर्धेसाठी मुंबईत वीस हजार मुलांमधून निवडली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शर्वरी आणि माझी पत्नी प्रियांका एक महिना अंधेरीला रहात होत्या. कोमल करंदीकर, राधिका जोगळेकर आणि दर्शना घळसासी यांनाही अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली. या निमित्ताने या स्पर्धांच्या अनेक आयोजकांशी परिचय झाला. माधवी ही यातील एक कुशल आयोजक!

    -अनिरुद्ध जोशी

  • चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

    रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

  • स्त्री मुक्ती आभास की आव्हान

    जिच्या पासून एक ‘विश्व’ तयार झाले अशी स्त्री ही अनंत काळाची माता आहे. दैत्यांचा संहार करणारी देवता तिचा आपण सन्मान करतो. माणूस म्हणून स्त्री-पुरुष दोन्हीही सारखेच महत्त्वाचे आहेत. दोघांमध्ये अनेक गुण समान असतात मग असे असताना स्त्री ही पुरुषांइतकी समाजात किंवा कुटूंबात मुक्त आहे काय? माझ्या विचारांती मी प्रथम भारतीय स्त्री मुक्ती आभास की आव्हान या विचार प्रवाहात डोकावणार आहे.

  • जीना यहाँ, मरना यहाँ !

    राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे.

  • विस्मयो आनंदवनभुवनी

    अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.

  • सोंग

    पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.