(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मैत्रीण आणि प्रेम (कथा)

    ओंकार साधारण पस्तीशीच्या आतला तरूण. एका प्रतिथयश साॅफ्टवेअर कंपनीत कामाला. नुकताच प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळालेला. राधा चोवीस वर्षांची तरुण उत्साही मुलगी. त्याच्या टीममधील एक लीडर. काॅलेज संपून तीन-चार वर्ष झाली असतील. अत्यंत हुशार, कामाला सदैव तयार आणि खास करून टीमचे अंतर्गत प्रश्न सोडवायला एक पाऊल पुढे.

  • होके मजबूर मुझे

    १९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

  • मनाची श्रीमंती

    उत्तर प्रदेशातला एका नदीच्या खोऱ्यातला एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाचे काही गुपित त्याने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्या मुलास सांगत असे, “अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडून खडी फोडायला जाशील. असं होऊ नये म्हणून मी सांगतो त्याच ठिकाणी तू आयुष्यातली पहिली चोरी कर." असे म्हणून त्य दरोडेखोराने आपल्या मुलास एका जंगलात नेते व समोरच असलेली एका साधूची झोपडी त्याला दाखविली आणि म्हणाला, "हे तुझ्या पहल्या चोरीचं ठिकाण.” ती झोपडी पाहू मुलाने आश्चर्याने विचारले, "या झोपडीत गरी करून काय मिळणार?" त्यावर दरोडेखोर म्हणाला, "अरे, त्या झोपडीत चोरी केलीस तर तिथे पोलीस येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्या साधूला लोकं सोनं, चांदी, फळं, पैसे इ. भरपूर भेटवस्तू देतात आणि तो साधू त्या वस्तू लोकांना वाटत असतो. जर तो सगळं लोकांना वाटणारच आहे तर त्या आपण का चोरून आणू नये? गेली पस्तीस वर्षे मी तिथे चोरी करतो आहे तरीही त्या साधूने कधीही पोलिसात तक्रार केली नाही.” हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षे चोरी करूनही त्या साधूला काहीही कमी पडलेले नाही. आणि तुम्हाला मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही चोरी करावी लागते. याचा अर्थ असाच होतो की, सज्जनपणाने जगल्यानेच श्रीमंती प्राप्त होते. मग हा चोरीचा व्यवसाय करण्यापेक्षा मी त्या सांधूकडेच जाऊन राहतो.” असे म्हणत तो मुलगा साधूच्या झोपडीकडे चालायला लागला.

    तात्पर्य: कोणत्याही संकटात सज्जनांचे समाधान, श्रीमंती कधीच कमी होत नाही कारण ते मनाने श्रीमंत असतात.

  • जे घडते ते मान्य ईश्वरा (सुमंत उवाच – ६८)

    सुमंत जयंत परचुरे. 

    जीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो.

  • मज सवड नाही कशाची (सुमंत उवाच – ३४)

    सुमंत जयंत परचुरे. 

    आभासी जगात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला, वास्तवात असलेले मित्र कधीच टिकवता येत नाहीत.

  • उगाच काहीतरी – २५

    बाईकवर असताना फोनची रिंग वाजते. आपण घेत नाही,
    परत वाजते काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून आपण गाडी बाजूला घेतो. रेनकोटच्या आत ट्राउझरच्या खिशात ठेवलेला मोबाइल बाहेर काढतो. घरून दोन मिस्ड कॉल्स आलेले असतात. लगोलग दोन कॉल्स म्हणून आपण थोडे धास्तावतो म्हणून मग हेल्मेट काढून किंवा वर करून फोन डायल करून कानाला लावतो. रींग वाजत असते आणि मग आवाज येतो.
    " कुठे आहात? "
    " रस्त्यात"
    " अहो रस्त्यात म्हणजे नक्की कुठे ? "
    " हायवे ला"
    " तुम्ही हायवेनेच येताना? मग हायवेवर कुठे ते सांगा ना? "
    तुम्ही विचारात पडता की आता ही ला एक्झॅक्टली कुठे आहे ते कसं सांगायचं? काही जरी सांगितले तरी तिला त्या रस्त्यावर काय काय लागतं ते माहीती नाही.
    तरीपण तुम्ही सांगता- "कुठल्यातरी ढाब्याजवळ"
    " कुठे आहे तो? "
    मग अचानक तुम्ही तिला माहिती असलेल्या एरीयाचे नाव सांगता.
    " बाणकोली च्या अलिकडे "
    वास्तविक तुम्ही त्याच्या पासून ५ किमी दुर असता पण तिला ओळखता येणारा तोच एक एरिया असतो.
    वरुन पावसाच्या सरी वर सर सुरू असते.
    " काय झालं? "
    " अहो आज ऑफिस मधुन घरी यायला पावसामुळे बराच वेळ लागला. त्यात त्या कुलकर्णी मॅडम भेटल्या. त्यामुळे अजून ऊशीर झाला. एकदम बारीक झाल्या आहेत. कुठलं डाएट करताहेत काय माहिती. तुम्ही केव्हापासून एक्सरसाइज सुरू करताय? ऐका न आमच्या गृप च्या सगळ्या रविवारी माळशेज ला जायचं म्हणताहेत. मी त्यांना हो सांगितलं. जाऊ न? "
    " आता जर तू हो सांगितलं तर मला का विचारते आहे?
    " तुम्ही म्हणाल तर नाही जाणार. असंही तुम्ही पण कुठे नेत नाही"
    " जाऊन ये, जाऊन ये"
    " तुम्ही वाटच बघा मी कुधी बाहेर जाते ते. म्हणजे तुम्हाला रान मोकळं"
    एव्हाना दहा मिनिटे होऊन गेलेली आणि सरींची साइज वाढलेली असते.
    "हे सांगण्यासाठी फोन केला का तू? घरी नव्हतं का सांगता येणार? ए बाबा तु फोन कशासाठी केला ते सांग. मी इथे भर पावसात रस्त्यावर उभा राहून बोलतोय"
    " अरे हो, मी कशासाठी फोन केला तेच आठवत नाहीये"
    " ठीक आहे ठेवतो. आठवले की घरी आल्यावर सांग"
    " थांबा थांबा, येताना दुध आणायला जमेल का? मी विसरले आणायला "
    " ओके आणतो"
    " ऐका न जमलं तर आणा उगाच भर पावसात इकडे तिकडे नका जाऊ. उद्या सकाळ पर्यंतचा चहा होईल. नाही आणलं तर मी उद्या येताना घेऊन येईल. "
    " ठीक आहे " - आता तुमच्या आवाजात चिडचिड असते. तुम्ही हेल्मेट घालायला हात उचलता
    " किती वेळ लागेल यायला? "
    " तू बोलणं थांबवलं तर पाऊण तासात पोचेन नाहीतर तू जेव्हा थांबतील त्याच्या पुढे पाऊण तासाने"
    " उशिरा निघाले का आज? "
    " अरे काय लावलय. रस्त्यावर मी एकटाच गाडी वाला आहे का? पावसामुळे ट्राफिक मरणाची आहे.वरून पाऊस पडतोय. त्यात परत तुझं काय नाटक चाललंय? "
    " तसं नाही हो. पिठलं भाकरी करायचा प्लान आहे. केव्हा पोहचाल ते कळलं तर त्या हिशोबाने बनवेल म्हणजे तुम्हाला गरमागरम खायला मिळेल. "
    तुमची चिडचिड जरा कमी होते.
    तुम्ही फोन ठेवता आणि तयार होऊन गाडी सुरू करता आणि रस्त्यावर पाहता. आतापर्यंत बर्यापैकी मोकळा असलेल्या रस्त्यावर गाड्यांची रांग लागलेली असते. कुठल्यातरी गाडीवान दादाने काहीतरी कांड केलेले असते त्यामुळे फुल्ल ट्राफिक जाम झालेले असते.
    तुम्हाला माहीती असते की आता आपल्याला पाऊण नाही तर दिड तास लागणार आहे, पिठलं भाकरी थंड झाल्याचे खापर तुमच्यावर फुटणार आहे आणि वरून पुन्हा " मला माहीती आहे, मी फोन केला तेव्हा तुम्ही ऑफिस मधून निघाले पण नव्हते" हे ही ऐकावं लागणार आहे.
    --अमोल पाटील
  • मारेकरी!

    “श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि ‘वास्को’ लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!” सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या ‘स्वीटी’ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला. 

  • भाऊबीज

    डोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं.

  • फोटो

    असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! ” ” तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन

  • द अदर साईड ऑफ सोल !

    अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .