(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

    चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-

  • काच कांगऱ्या

    आईची बांगडी वाढली की तिचे तुकडे करून एक खेळ खेळला होतो आम्ही एकाच रंगाचे चार तुकडे असे घेऊन चौघे जण हा खेळ खेळू शकतात. समोरासमोर बसून. फरशी वर खडूने एक आकृती काढली जाते. तेव्हा समोरासमोर प्रत्येकाचे एक घर असते. म्हणजे चौकटीत फूली मारलेली असते. तिथे आपल्या कांगऱ्या ठेवायच्या. आणि मध्यभागी एक घर असते. खेळाची अशी तयारी झाली की मग बहुतेक कवड्या दिल्या जात नसल्याने चिंचोका घेऊन ते दगडाने फोडून दोन चिंचोक्याचे चार भाग करून त्याचा डाव टाकायचा. उताणे पडतील तेवढे घर कांगरी पुढे सरकवायची. वाटेत दुसर्‍या कांगरीला मारुन किंवा कुणी आपल्या कांगरीला मारले की आपापल्या घरात जायचे. पुन्हा डाव सुरू. अनेक वार झेलत. अनेक वार करत आतल्या चौकटीत गेल्या वर मध्यभागी असलेल्या घरात चारही कांगऱ्या गेल्या की तो सुटला. शेवटी शेवटी दोघात चुरस असते. एक कायमच बाहेर राहतो. खूप छान वेळ जातो. घरात बसून. कसलेही खर्च नको..
    खेळाचे नियम कुणीही मोडत नाही. भांडण नाही. घरात असल्याने घरचे लोक निर्धास्त. खेळ संपला की कांगऱ्या. चिंचोका. खडू एका डबीत आणि फरशी वरची चौकट फडक्याने पुसून टाकली की बस्स. आनंद आणि मजा हा फायदा. या वरुन मला सहजच वाटले की आपणही असेच आपल्या घरात राहतो. जीवनाची वाटचाल करताना अनेक प्रसंग असे येतात की कधी वार करावे लागतात तर कधी वार झेलावे लागतात. परिस्थितीचे वार अनेक प्रकारचे. प्रत्येक खेळ खूप काही शिकवून जातो. बघा ना आता चौघांची चार घरे. आणि शेवटी सगळ्यात मोठे घर यात फरक आहे तो असा विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब याची माहिती आहेच तुम्हाला.कधी कधी एकेक करुन जातात व दोघेच राहताता मग एकटेच रहावे लागते. त्यामुळे अशा वेळी रडायच नाही तर लढायचे असते . नियमानुसार वागले पाहिजे. जशी कांगरी जिला पूर्वी मारलेल असत पण ती त्याच्याच घरी गेल्यावर तर तिथे मारायचे नाही. वैरभाव ठेवू नये ही शिकवण. एकदा तरी एखाद्या कांगरीला मारुन तिला तिच्या घरी पाठवल्या शिवाय मोठ्या घरात जाण्याची परवानगी नसते. म्हणजे जिंकण्यासाठी लढावे लागते. मन मारुन धैर्याने. सगळे मोठ्या घरात एकत्र आले तर जास्त सुरक्षितता असते तसेच एकत्र कुटुंबात असते..
    लॉकडाऊन मुळे घरातील सुरक्षितता आपण समजू शकलो. त्यामुळे आता ही हेच तत्व पाळू या. यात आणखी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना एकमेकांना समजून सांभाळून घेऊन आधार दिला जातो हे मधल्या मोठ्या घराची शिकवण आहे.. तेव्हा खेळ आणि त्यातून काय शिकायचे हे पाहिले पाहिजे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

    –सौ. कुमुद ढवळेकर.

  • वाचन संस्कार

    वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.

  • मराठीत “लागण्याची” गंमत बघा

    मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण

  • माझा पहिला विमान प्रवास

    विमानात बसणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच विमानात बसणार होतो, त्यामुळे रात्रभर झोप म्हणता झोप काही येईना. कधी एकदा हि रात्र संपते, कधी एकदा मी एअरपोर्टला पोहचतो आणि विमानात बसतो असे झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार, काय अनुभव येणार ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली होती.

  • काळी लक्ष्मी

    काळ्या लक्ष्मीची आराधना करणारे हे राक्षसी उपासक आपल्या घरातील लक्ष्मी चोरतात व बाहेरची ड्रग व आतंकवाद रुपी पीडा घरात आणतात. काळ्या लक्ष्मीच्या बळावर रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्य करून कधी- कधी सत्ता ही प्राप्त करतात.

  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – २० – सावरकर आणि सुभाषचंद्र बोस

    सावरकरांचा जन्म १८८३चा तर सुभाषबाबूचा १८९७ चा दोघेही पराकोटीचे देशभक्त,दोघेही लंडनला गेले. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तर सुभाषबाबू आय सी एस ( हल्लीचे आय ए एस ) होण्यासाठी गेले. साल १९२१ मध्ये सावरकरांना भारतात आणले तर सुभाषबाबू आय सी एस चि नोकरी सोडून भारतात आले.

  • ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : भाग – १

    ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते. ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान वगैरे विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे . तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच.

  • ड्रॉवर (कथा – सांगोपांग : १)

    कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते . आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते.

  • ड्रीम होम

    बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते.