नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “)
January 6, 2022
पाणी अंगावर उसळत होते . पण कमी भिजण्याचा नादात… पार एकत्र झालो होतो.
September 10, 2021
आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती.हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था पाने : 68, किंमत : 80 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन, नागपूर 9225210130
September 29, 2012
“भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती.
August 6, 2021
“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.”
January 23, 2023
“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! ” चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान !
November 5, 2021
आमची संस्कृती नष्ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्या संस्कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्हणूनच आमची संस्कृती व आमची भाषाही नष्ट होण्याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं.
March 14, 2019
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 5, 2020
चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही.
April 12, 2024
मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी पडली होती. ” हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले.
July 30, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti