नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा - मग तो कोणीही का असेना - बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच लढाया होत. अशाच एका शत्रूराष्ट्राने कान्सवर हक्क चढविला. शत्रू बलाढ्य होता. त्यामुळे लढाईला तोंड फुटण्यापूर्वी राजा फिलीपने आपला राजमुकुट व पवित्र सिंहासन एका मैदानात आणण्याची सैनिकांना आज्ञा केली. सिंहासनावर त्याने राजमुकुट ठेवला व त्याखाली 'सर्वोत्कृष्ट पराक्रम गाजविणाऱ्या वीर पुरुषास' असा मजकूर असलेला फलक लिहून ठेवला व तेथे जमलेल्या सरदार व सैनिकांसमोर भाषण करताना तो म्हणाला, '' या सिंहासनावरील माझा हक्क मी या क्षणी सोडला आहे. या युद्धातके खय पराध्य करून विजयश्री खेचून आणील त्यालाच हे सिंहासन मिळेलच कोच यापुढचा राजा असेल.'' त्याचे ते वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सैनिकांना चेव चढला व अत्यंत शर्थीने ते लढले. अशा सैनिकांच्या सहकार्यानेच स्वत: राजा फिलीपनेही या युद्धात अतिशय मोठा पराक्रम केला व शत्रूराष्ट्रावर विजय मिळविला. सायंकाळी जेव्हा त्याच मैदानात सर्व एकत्र जमले, त्या वेळी सर्व सरदार व सैनिकांनी एकमुखाने त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली व राजा फिलीपचा जयजयकार करून त्यालाच ते सिंहासन पुन्हा बहाल केले.
March 3, 2017

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.
त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती.
सगळी पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं.
तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं.
झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल.
त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल.
झाडाखालचं गवत सुध्दा लहान लहान गोल.
तर मैदानातलं गवत मात्र मोठे मोठे गोल.
पण,
काही झाडं डुलणारी.
काही झाडं सळसळणारी.
काही झाडं लठ्ठं होती.
काही झाडं रोड होती.
काही झाडं जरा ऊंच होती.
काही झाडं जरा बुटकी होती.
काही झाडं फारच लहान होती.
काही झाडं ऊंचंच ऊंच होती.
काही झाडं एकदम सरळसोट.
काही झाडं विचित्र वेडीवाकडी.
झाडांना वाटे,
आपले आकार निरनिराळे.. ..
पण आपल्या पानांचा मात्र एकच एक आकार!
का बरं असं?
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे आकार हवेत.
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे प्रकार हवेत.
प्रत्येक झाडावरची पानंसुद्दा वेगवेगळी हवीत.
प्रत्येक रंगीत पानाची रंगत वेगळी हवी.
प्रत्येक पानाची स्टाइल वेगळी हवी.
आणि खरंच,
दसऱ्या दिवशी. . . . . . .
गाई म्हशी आल्या.
ढकलाढकली करत.. गोल गवत चराचरा चरू लागल्या.
शेळ्या बकऱ्या आल्या..
झाडावरती दोन पाय ठेवून, जवळची पानं बचाबचा ओरबाडू लागल्या.
जिराफ आले..
ऊंचावरची कोवळी पानं खुडून खुडून चघळू लागले.
हत्तींचे कळप आले..
झाडावरची पानं, मैदानातलं गवत मन मानेल तसं रपारप उपटू लागले.
माकडांच्या टोळ्या आल्या..
झाडावरची पानं तोडत आरडाओरड करू लागल्या.
पक्ष्यांचे थवे आले..
घरटं बांधण्यासाठी चोचीने पानं,गवत टुकूटुकू खुडू लागले.
छटेमोठे रंगीबेरंगी किडे आले..
मचामचा पानं खाऊ लागले. कुटूर कुटूर कुरतडू लागले.
कुणी पानं अर्धवट खाई..
तर कुणी मधलं मधलं गवतच तोडी.
कुणी चोचीनं पानं कातरी..
तर कुणी भराभरा पानं ओरबाडी.
कुणी नखानं पानं चिरी..
तर कुणी पंजाने पानं खुडी.
कुणी अर्धवटच पानं खाई..
तर कुणी उगाचंच पानं फाडी.
पण काही पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.
आणि त्यामुळे. . .
काही पानं सरळ,
तर काही पानं लांबुडकी झाली.
काही पानं टोकेरी,
तर काही पानं पसरट झाली.
काही पानं कातरलेली,
तर काही पानं नक्षीदार झाली.
काही पानं विचित्र झाली,
तर काही पानं चित्रविचित्रच झाली.
काही पानं उभी झाली,
तर काही पानं लोंबकळू लागली.
काही पानं अगदी एकसंध राहिली,
तर काही पानं पार फाटून गेली.
पण,
ज्या पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही,
ती पानं मात्र गोलम गोलच राहीली.
तेव्हापासूनच...
सगळ्या पानांचे आकार वेगवेगळे झाले.
प्रत्येक झाडाची पानंसुध्दा वेगवेगळी झाली.
झाडं आनंदाने फुलली
तर
पानं मजेत सळसळली.
-- राजीव तांबे.
August 29, 2015
पूर्वी वैराग्य म्हणजे अलिप्तता धारण केली जायची.
September 9, 2021

फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं.
April 26, 2022
मी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..
October 27, 2021
एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.
सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.
October 22, 2025
१९७२ साली भारतात दूरदर्शन सुरु झाल्यावर, पहिल्याच आठवड्यात एका लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’! हा कार्यक्रम सलगपणे तब्बल २१ वर्षे चालला.
July 29, 2021
कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी)
November 15, 2025
December 13, 2017
सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन. १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी, क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. सावरकर वयाच्या ११ व्या वर्षापासून लिखाण करीत होते. लहानपणाचा काळ यात त्यांनी फटके, पोवाडे, लिहिले.
September 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti