नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममान होण्याचा प्रयत्न. माझा प्रयत्न जाणिवेतून होता. त्याचा कदाचित् अजाणतेने. मार्ग मात्र जात होते ते त्या अनंतातील कोणत्यातरी दालनांत.
"ध्वनी " एक ईश्वरी उर्जा ह्यामध्ये.
नामस्मरणाची प्रक्रीय व उद्देश कोणता. परमेश्वर संकल्पनेशी एक रुप होणे. शब्दांत दडला आहे स्वरुप आणि ध्वनी. स्वरुप असेल विचारांचे - कल्पनांचे आकार. जे खोटा आभास निर्माण करतील. उलट ध्वनीत एकरुप होण्याचा अनुभव आनंद व ईश्वरी असेल.
नामस्मरणाच महत्व चांगलच लक्षांत आले होते. प्रथम त्या परमेश्वरला जाणणे, त्याच्यामध्ये एकरुप होण्याचा प्रयत्न हेच जीवनाचे अंतीम ध्येय असावे हे समजलो. कारण तसे आपण सर्व शुन्यातून आलो व शून्यातच एकाग्र होणार. संसार, ग्रहस्थाश्रम इत्यादी सारे मार्ग फक्त देहाच्या वाढीसाठी व अंतीम ध्येयाकडे नेण्याकरीता.
नामस्मरण कुणाचे. तो परमेश्वर तर सर्व व्यापी, सर्व श्रेष्ठ, निर्गुण निराकार. हे जगाने मान्य केले. त्याचे नामकरण हे केवळ मन केंद्रीत करण्यासाठी. मात्र तो एक मार्ग समजुन. ध्येय व साधना यांची स्पष्ट जाणीव सतत असावी. नसता साधनेलाच ध्येयाचे रुप समजून अनेक फक्त मार्गातच रेंगाळतात. इष्ठ देवतेचे नाम व तेही लयबद्धते मध्ये शांत मनाने घेत त्या परमेश्वराची आराधना समाधान देते. तरी खरी शांतता अद्यापी बरीच दूर राहते.
कुठे व कसा आहे तो परमेश्वर. सत् चित् व आनंद किंवा सत्यम् शिवम् सुंदरम् ह्यातच त्या परमेश्वराचे योग्य व निश्चीत असे वर्णन ऋषीमुनीनी केलेले आहे. फक्त " आनंद " हाच ईश्वर असतो. मात्र त्यामध्ये विचार वा भावना ह्यांचा किंचीतसा देखील स्पर्ष नसावा. केवळ आनंद आनंद आणि आनंद. आनंद व्यक्त होत नसतो. व्यक्त आनंद खरा आनंद रहात नाही. समाधान व्यक्त होते. शांतताही व्यक्त वा शरीर मनावर प्रकट होते. जे जे व्यक्त केले जाते, कुठेतरी कृत्रिमता त्यावर अच्छादलेली असते. फक्त आनंद ह्रदयामधून शरीरभर पसरुन जातो. विचार शुन्य, भावना शुन्य तरीही एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती. क्षणिक तरीही अनंत काळ व्यतीत झाल्याप्रमाणे.
मानव हा निसर्गातील एक घटक. मात्र त्यानेच स्वतः आपण सर्व श्रेष्ठ नैसर्गिक कलाकृती असल्याचे चित्र जगासमोर रंगविलेले आहे. त्याला प्राप्त बुद्धीच्या देणगीच्या जोरावर तो हे सारे रंगवितो. ईश्वराने त्याच्या अगणित साधन सामुग्रीमधून फक्त पांचच तत्वांची जाण त्याला दिलेली आहे. आणि ती तत्वे जाणण्यासाठी, समजण्यासाठी पांचेंद्रिये देऊ केली आहेत. फक्त पांच इंद्रीयांच्या साधनांचा हा खेळ. त्याचा आधार घेत मानव प्रगतीच्या अर्थात उत्कर्शाच्या वाटा शोधीत चालला आहे.
२ एक समज मानवाला आलेली आहे. आणि ती म्हणजे ही जी पांच तत्वे त्याला प्राप्त झाली आहेत. त्याच्याच आधाराने त्याला हा निसर्ग वा ईश्वर याला जाणावयाचे आहे. साधन limited परंतु साध्य मात्र अनंत. म्हणूनच मानव सत्यापेक्षा कल्पना जगतात जास्त भराऱ्या घेतो. विशेषकरुन त्याच्या परमेश्वराबद्दलचे विचार.
ध्वनी ही एक ईश्वर निर्मीत उर्जा –शक्तीचे रुप. ध्वनी हे ईश्वरी अस्तित्वाचे रुप. अक्षर, शब्द, ओम् कार ( ॐ ), लय, लहरी, नाद, इत्यादी, वर्णनामधून व्यक्त होतो, तो ध्वनी. ह्या ध्वनीला सर्व अंगानी जाणणे हेच त्या परमेश्वराला जाणण्याचे एक साधन. ध्वनीला निरनीराळ्या रुपांत प्रकट करण्याचा मानवाने प्रयत्न केला. ध्वनीशी एकरुप होत, आनंदात विलीन होणे, हेच तर ईश्वर सान्निध्य होय.
नामस्मरण हा एक प्रकार. नामस्मरणांत आम्ही कोणत्यातरी दिव्य शक्तीची आठवण काढीत, त्याच चक्रांत फिरत राहतो. मुळ हेतू विसरतो. तो असतो त्या ध्वनीचा शोध. नामस्मरण करताना शुद्ध हरपली पाहीजे, स्वतःला विसरले पाहीजे. नामस्मरण गळून पडले पाहीजे. कोणत्यातरी अज्ञात तंद्रीत गेले पाहीजे. भान हरपले पाहीजे. ती स्थिती क्षणीकच असेल. परंतु त्या हरपलेल्या भानाचे वेळेत मोजमाप होऊ शकणार नाही. नामस्मरणाचा तो अत्युच्च क्षण असेल. " आनंद " ज्याच्या अवती भवती असेल शांतता.
त्याच प्रमाणे ध्वनी लहरी, धुंदी आणणाऱ्या सभोवताल-जगाला विसरावयास लावणाऱ्या- दोघांचा अर्थ एकच नव्हे काय ? अस्तित्व विसरुन एकरुप होण्याचे साध्य.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 26, 2017
शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला..
August 19, 2021
आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते.
April 4, 2020
गेले वर्षभर कोरोनाला सहन केलं, नंतर त्याचा प्रभाव कमी झाला. जरा कुठे परिस्थितीत सुधारणा होते आहे असं वाटेपर्यंत पुन्हा त्याने डोकं वर काढलं. सर्व सामान्य जनतेला लाॅकडाऊनच्या ‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेला सामोरे जावे लागले.
February 9, 2022

आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा
त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे,
एक अजब सोहळा
फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे,
उरलाच वेळ तर स्टडी डे
कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ,
युवामहोत्सव, नाटयमहोत्सव,
घरच्या कार्यापेक्षा जास्त
बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार,
पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार
SMS चा चाळा, फॅशनचा लळा,
हेच ह्यांचं रुटीन
अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन
नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स,
क्लासेसच्या जीवावर, टक्क्यांचा कॉन्फीडन्स
कॉलेजचे प्रोफेसर्स तर
ह्यांच्या जणू खिशात,
धाक आणि आदर,
शब्दच नाहीत कोषात
अश्शी आजची कॉलेजची, तर्हाच आगळी,
वरच्या पिढीला
ती नेहमीच वाटणार वेगळी
नेहमीच वाटणार वेगळी
-- सौ. अलका वढावकर
January 28, 2016
दररोज आम्ही वयस्कर म्हणजे सर्वजण सत्तरीच्या पुढे गेलेली, एकत्र जमत असू. गप्पा टप्प्पा होत. आज एकनाथराव फारच मुढमध्ये होते. ते …..
October 5, 2014
कर्म तुमचे भविष्य, नशीब ठरवते हे मानणे महत्वाचे आहे.
November 17, 2021
बालनाट्य ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. जे मुलांमध्ये खेळू शकणार मिसळू शकतात, मुलांची समरस होऊ शकतात अशा मोठ्यांनीच या क्षेत्रात यावे. पैसा देणारे साधन म्हणून जे बालनाट्य क्षेत्राकडे बघतील त्यांची निराशा होण्याची शक्यताच जास्त आहे. बालनाट्य ही आजही एक चळवळ आहे उद्याही राहील असा मला विश्वास आहे.
March 31, 2022
तिचे वडील इटालीतील एका छोट्या गावाचे महापौर होते. त्यामुळे गावातील अनेक लोक आपल्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्यांमधून तिच्या बालमनाला लोकांच्या व्यथा कळायच्या व या व्यथा ऐकून तिचे बालमन कळवळायचे. याच व्यथा तिने शब्दबद्ध करायचे ठरविले व आपल्या साहित्य कृतीमधून त्या सादर केल्या. जीवनाचा वेध घेणाऱ्या या साहित्यकृती एवढ्या जबरदस्त होत्या की, मोठेपणी त्या मुलीला साहित्याचा नोबल पुरस्कार मिळाला.
ग्रोजिया डेलेडा (Grazia Deledda) हे तिचे नाव.१९२६ मध्ये साहित्यविषयक नोबल मिळविणारी ग्रेजिया ही दुसरी महिला होती. ग्रेजियाला लहानपणापासूनच लेखनाचे अतिशय वेड होते. शाळेतील मासिकांमधून तिचे विविध विषयावरचे लेख प्रसिद्ध झाले होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ट्रिब्यून या मान्यताप्राप्त पत्रिकेत तिचा लेख प्रसिद्ध झाला व तिला त्याचे त्यावेळी चक्क ५० लीरा एवढे मानधन मिळाले. त्यामुळे लेखनातील तिचा उत्साह वाढला व ती लिहितच गेली. ती राहत असलेल्या सार्डिनिया या इटलीतील प्रांतातील लोकजीवनाचा अभ्यास करून तिने वयाच्या १७ व्या वर्षी 'फ्लॉवर ऑफ सार्डिनिया' हे पुस्तक लिहिले व लेखिका म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने लिहिलेली 'ऑनेस्ट सोल' ही कादंबरी अतिशय गाजली. अल्पावधितच तिच्या लाखो प्रती खपल्या व ग्रेजिया एक लोकप्रिय लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागली. १८९१ ते १९३१ या काळात ग्रेजियाची ४४ पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आफ्टर द डायव्होर्स, 'द मदर', 'रीड्स इन द विन्ड', 'अॅशेस!, 'ट्रु मिरॅकल्स' आदी प्रमुख कादंबऱ्यांचा समावेश होता. अॅशेस कादंबरीवर निघालेला त्याच नावाचा चित्रपटही खूप गाजला होता. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की तसेच दोस्तोवस्की यांच्या साहित्याचा ग्रेजियावर फार प्रभाव होता. मी इतर कोणासाठी नव्हे तर माझ्या मनाच्या शांतीसाठी लेखन करते असे ती नेहमी सांगायची. १९२६ मध्ये साहित्याचे नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षांनी ( १६ ऑगस्ट १९३६) तिचे निधन झाले.
April 10, 2017
काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे. बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या?
November 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti