नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे. बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या?
ही गुलाबी हवा साक्षात चराचराला मोहजालात फसवू लागली.तिची माया प्रेमी युगलांना मोहजालात फसवूू लागली. रजईची उब,शेकोटीची उब,मायेची उब,दोहडची उब . सारं सारं फिके पडले. सगळीकडे एकच एक नशा होती ती या ,”गुलाबी हवेची”
काळाचा हा पडदा इतका गडद, गहिरा आहे, पण तो न दिसणाराही आहे… आपण उद्या कधीच पाहू शकत नाही.. ओशो रजनीश म्हणतात, ‘आज वही कल है, जिस कल की फिक्र तुम्हे कल थी…!’
ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे...
आजच्या चर्चासत्राचा विषय आहे :
१."मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे
२. "अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय निर्माण होईल का"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे
३. "फिजी बेटावरील आर्थिक समस्या आणि त्यावर गोंगझाऊ प्रांतातील चिनी अर्थतज्ज्ञांनी सुचवलेले उपाय"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे -
४. "पचनसंस्थेतील प्रक्रियेत प्लीहा, यकृत, जठर आणि आतडे यांची भूमिका"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे -
५. "सांबार आणि रसम् मधला फरक आणि त्याचा मसाला बनविण्याच्या पद्धतीतील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेश यातील फरक"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
आजच्या प्राईम टाईम चर्चेचा विषय आहे :
६. "एरंडावर पडणारी कीड व त्यावरील उपाय"...
आणि या विषयावर चर्चा करायला तज्ज्ञ आहेत...
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी !!!!!!
सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना?
तुम्ही म्हणाल काय हे लावलंय डबा पुराण. पण मला खरंच असं वाटतं खरंच त्या स्वयंपाकघरातील वस्तू गृहिणीच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या असतील. एखाद्या मैत्रिणीला आपण फोन करतो, एखादीला नाही तेव्हा दुसरी म्हणते, ‘‘ती कशाला मला फोन करेल. ती तुझी खास.’’ तसंच हे डबे किंवा भांडी म्हणत असतील का एकमेकांना, ‘‘तू तिचा आवडता आहेस म्हणून तुलाच ती ऑफिसमध्ये घेऊन जाते.
शुद्ध मराठी भाषा, म्हणी व वाक्प्रचार वापरायची प्रचंड हौस आणि लहानपणापासून काला करून जेवायची सवय.
त्यामुळे अनेक म्हणी एकत्र करून वेळेवर जिभेवर येईल ती आपली…….
मुंबई ‘….. तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान पेलून सक्षम पणे मार्गक्रमण करण्याची जिद्द येथील मनुष्याला असते.
जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..!
बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना.
इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता.
उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती.
सगळीकडे फुललेल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या.
सर्वप्रथम ज्येष्ठ वयोवृद्ध काकासाहेब आणि काकींनी उभयतांचं स्वागत केलं.
त्यानंतर आश्रम व्यवस्थापकांचं स्वागतपर परंतू सकारात्मक भाषण झालं.अनुभव कथन,मौज मजा मस्ती ह्यावर प्रत्येकानी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
सजीव चित्ररथातून जगण्याचा मुलमंत्र दाखवण्यात आला.आणि शेवटी मिष्टान भोजनाचा आस्वाद,मुखशुद्धी होताच नविन समाविष्ट झालेल्या दाम्पत्याला पायघड्या घालून त्यांंच्या खोलीत रितसर पोचवण्यात आलं.
एक एक करून सगळेच ज्येष्ठ आपापल्या खोल्यांमधे परतले.
संध्याताई,सुधाकरराव आज एकवर्षापुर्वी आयुष्याच्या सांजवेळी बरोबर तिन्हीसांजेला या आश्रमात आले होते.
निराश मनाला,हताश जगण्याला नवसंजिवनी मिळाली ,ती ह्याच आश्रमात .
आज मात्र दोघेही या आश्रमाचे सुत्रधार होते. सांजवेळेला प्रभातवेळेत बदलवण्याचं कसब ते शिकवण्यात तरबेज झाले होते.स्वत:चे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रु पुसावे ह्याचं साधं सरळ सोपं सुत्र ते साऔजवेळी सगळ्यांना शिकवत होते.
ही "मंतरलेली सांजवेळ" आज सगळ्यांनाच हवी हवीशी होती.
सौ.माणिक शुरजोशी.
नाशिक
Copyright © 2025 | Marathisrushti