(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुदामदेवाची गोष्ट

    कृष्ण लहानपणी सांदीपनी गुरूपाशी विद्या शिकत होते, तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर सुदामदेव नावाचा ब्राह्मणाचा एक मुलगा विद्याभ्यास करीत होता. तो कृष्णाचा जिवलग मित्र होता. पुढे कृष्ण मथुरेला गेला, आणि सुदामदेव आपल्या घरी गेला.

      November 15, 2025


  • ओळखा पाहू – होळीमय चारोळ्या

    आोळखा पाहू हे कोण? हे तर भारताच्या राजकारणातले गुरु !!

      March 21, 2014


  • परीसस्पर्श

    स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी किंवा रसिकांच्या रंजनासाठी सादर होणारी कला जेंव्हा भक्तिभावाने परमेश्वरासाठी सादर होते तेंव्हा त्या कलेच्या साधनेतून पुण्याचीच साठवण होते. शाहीर अनंत फंदी यांची अत्यंत प्रज्ञावंत, हजरजबाबी लोककलाकार म्हणून कीर्ती पसरली होती. या लावणीसम्राटाच्या अंगी जन्मजात कवित्व होते. गावोगाव ते आपली कला सादर करीत. असेच एकदा माळव्यात ते आपला फड घेऊन गेले होते तेंव्हा त्यांच्या अलौकिक कवित्वाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा प्रभावित झाल्या. त्यांनी प्रसन्न होऊन अनंत फंदींच्या सन्मानार्थ अलंकार आणि भरजरी पोशाखाची भेट दिली. आणि त्यावेळेस अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या, “फंदी बुवा ! आपण असामान्य प्रतिभावंत आहात. साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विलसत आहे. कोणीही प्रभावित होईल असेच आपले कवित्व आहे. परंतु आपली ही काव्यशक्ती तमाशाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनासाठी वापरण्यापेक्षा हरिकीर्तनासाठी उपयोगात आणलीत तर मोठा लौकिक होईल.” अहिल्याबाईंचे हे उद्गार शाहिर अनंत फंदी यांच्या हृदयाला जाऊन भिडले. “यापुढे गाईन ते फक्त हरिकीर्तनासाठीच" अशी भरदरबारात प्रतिज्ञा करून शाहिर अनंत फंदी निघाले. ही प्रतिज्ञा त्यांनी अखेरपर्यंत पाळली. आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांनी लोकशिक्षणासाठीच केला. त्यामुळे लोकांना फंदी आठवतात ते त्यांच्या कीर्तनामुळे ! आणि त्यांच्या उपेदशपर फटक्यांमुळे.

    तात्पर्य: कोणत्याही कलावंताला जर श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांचा परीसस्पर्श झाला तर त्याच्या कलेचे आयाम बदलतात.

      December 27, 2024


  • शेरास सव्वाशेर

    जमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता.

      January 29, 2018


  • माझे शिक्षक

    ज्यांनी मला शिकवले/ घडवले अशा व्यक्तींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. खरे तर या प्रत्येक व्यक्तीवर विस्ताराने लिहायला हवे तसा विचारही आहे.आज त्यांचा उल्लेख करुन त्यांच्या बद्दल एक दोन वाक्यात भावना व्यक्त करणे अस प्रयत्न आहे. खरोखरीच मी या सर्वांचा ऋणी आहे.

      September 16, 2014


  • एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

    आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू.

      March 23, 2019


  • देव आणि मी…

    आपण माणसे हजारो वर्षापासून फक्त देवावर विश्वास ठेऊन जगत आलो. पण खरंच देव असं काही अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न मला मी अगदी लहान असल्यापासून भेडसावतो ! आज आजूबाजूला जेव्हा मी करोडो रुपये खर्चून लोक देवाची मंदिरे बांधण्याचा अट्टहास करताना दिसतात तेव्हा त्याची कीव येते . स्वतःला समाजाचे सेवक म्हणवून घेणारे नेतेही यांच्यात मागे नाहीत. हा ! एकीकडे देशात लाखो लहान मुले कुपोषणाने मरत असताना आम्ही डिजिटल इंडियाच्या घोषणा करायच्या किती हा विरोधात भास. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कि त्यांची दखल घ्यायची ! स्त्रियांवर बलात्कार झाले मग स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणायचा . खरंच आजच्या जगात पाप - पुण्याचा हिशोब होतो की ती फक्त कल्पना आहे ? आम्हाला दोन वेळ पोटभर खायला मिळतंय तरी आम्ही दुःखी आहोत ! मग आम्ही त्या कुपोषित बालकांची व्यथा कशी जाणून घेणार ? मी , माझे कुटुंब, माझ्या गरजा, माझी स्वप्ने आणि माझे भविष्य जे आज जगात कोणालाच माहीत नाही त्याची काळजी करण्यात आम्ही आमचे आयुष्य खर्ची घालतोय . या पलीकडे पाहायला आम्हाला वेळच मिळत नाही उलट आजच्या स्वार्थी जगात चांगुलपणाने जगणाऱ्या लोकांनाच अधिक त्रास होताना दिसतोय ! मग लोक आपले आयुष्य लोकांच्या भल्यासाठी का खर्ची घालतील ? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही देवाजवळ देऊळातही !
    समाजासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्याची किंमत जर समाज त्याच्या जवळ असणाऱ्या संपत्ती वरून ठरविणार असेल तर समाजसेवेला काही अर्थच उरत नाही ! अजून किती दिवस आपण मंदिर, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम बांधत राहणार आहोत ? हा प्रश्न कधीच कोणाला स्वतःला का विचारावासा वाटत नाही ? देशाची लोकसंख्या गगनाला भिडत असताना फक्त धर्माच्या नावावर लोकांना अधिक पोर काढण्याचे सल्ले दिले जातात ! देशाचे जागरूक नेते यावर ब्र ! काढत नाहीत ! देशात दहा पोरं काढून देशात चांगले दिवस येणार आहेत का ? आपल्या देशात समस्या सोडविली जात नाही फक्त समस्येवर उपाय शोधले जातात दुदैवाने ! आज देशातील खेडी कमी करून नवीन शहरे वसाविण्याचा अट्टहास केला जातोय ! पण भविष्यात शेती कोण करणार ? आणि शेतीच झाली नाही तर करोडो लोक खाणार काय ? यंत्रे ! आपल्या देशातील लोकांनी यंत्रांना जवळ केले स्वतः यंत्रांचे गुलाम झाले पण तरीही त्या यंत्रांची पूजा करताना देव समरणातून जात नाही.
    अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणे हे सरकारचे आणि देवाचं काम आहे पण ते काम ते दोघेही करताना दिसत नाहीत दुर्दैवाने ! विमा योजना ही योजना ती योजना कशाला आणताय ? ज्याच्याकडे हक्कच घर नाही त्याला ते मोफत द्या ना ! विकायची तरतूदच ठेऊ नका ! सर्व वैद्यकीय उपचार शिक्षण मोफत करा ! सर्व जेष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाची सरकारी सोय करा देशातील भ्रष्टाचार, आरक्षणावरून होणाऱ्या मारामाऱ्या चोऱ्या लबाड्या आपोआप कमी होतील ! पण हे सारे होणार नाही कारण हजार लोकांना करोडो लोकांवर मग राज्य करता येणार नाही आणि लोक देऊळात रांग लावणार नाही. आपल्या देशातील चित्रपट म्हणजे मूर्खांचा बाजार आहे त्यात सर्व समस्यांचे समाधान देऊळात होतानाचेच चित्र उभे केले जाते आता तर त्यात सध्याच्या दैनिक मालिका ही मागे नाहीत.
    आपल्या देशातील लोकांना लाटेवर स्वार होण्याची सवय लागलेय आपल्या देशात कधी ह्याची तर कधी त्याची लाट येतच असते ती लाट कधी कधी विचारांची असते. भूतकाळातील एखाद पात्र उकरून काढायचं त्याच्या विचारणा स्वतःच महान करायचं त्याला मोठं करायचं आणि मग लोकांना त्याला मोठं म्हणायला लावायचं अथवा म्हणायला भाग पडायचं आणि मग त्याच्या नावावर वर्षानुवर्षे आपला स्वार्थ साधत राहायचं ! त्यात कहर म्हणजे ज्याची लाट त्याला देवत्व देऊन मोकळं व्हायचं कालांतराने त्यांची देऊळें बांधायची आणि आणि त्यांच्या देवत्वाची किंमत वसूल करायची. आपल्या देशातील देवांची संख्या वाढत चालली आहे त्यात काही माणसेही देव झाली आहेत.
    देव या संकल्पनेला माझा विरोध नाही , देव अस्तित्वातच नाही असे मी म्हणतच नाही . देव नावाची एक अज्ञात शक्ती निसर्गात अस्तित्वात आहेच त्यामुळेच हे जग सुरळीत चालले आहे. पण त्या शक्तीच्या नावावर आज जी लूट चालू आहे, माणुसकीचा गळा घोटाळा जात आह, देवाबाबत विचार करताना माणूस आपली जी सारासार विचार करणारी बुद्धी गहाण ठेवतो ते मला मान्य नाही. एकीकडे मंगळावर जायची स्वप्ने पाहायची आणि मंगळावर जाणारे यान सुरक्षित जावे म्हणून त्याच्या समोर नारळ फोडायचा ! आपल्या देशातील निम्मी अधिक जनता देवभोळी आहे त्यामुळे आपला देश प्रगत राष्ट्र होऊ शकला नाही. आपल्या देशातील लोक कमालीची हुशार आहेत पण आपल्या यशाच श्रेय प्रत्येक वेळी ते त्या देवाला देतात. त्यात गैर काही नाही पण आपल्या
    देशात देवावर किती अवलंबून राहावे याला काही मर्यादाच राहिलेली नाही.
    महाभारताच युद्ध झालं त्यावेळी प्रत्यक्ष देव तेथे असताना त्यांनी महाभारतातील युद्ध होण्यापासून थांबवलं का उलट ते युद्ध टाळण्याचा प्रयत्नात असणाऱ्या अर्जुनाला गीता सांगून लढण्यास भाग पाडलं याचा अर्थ देवाला प्रत्येकाला त्याच्या कर्माचा फळ द्यायचेच असते पण आपल्या देशातील लोक ते घेणे टाळत असतात या सत्याचा स्वीकार करायला घाबरत असतात या घाबरणातूनच ते उठसूट देवाला शरण जात असतात आणि इतके शरण जातात कि माणुसकी विसरतात त्यांना वाटते देवाला खुश केले कि झाले सारे पण तसे काही नसते. देऊळ हि संकल्पना चुकीची नाही त्याची गरज आहे माणसाला आपली मने मोकळी करण्यासाठी ! पण आता देवळांची मटे झाली आणि श्रद्धेला बाजारीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रद्धेत काहीच चुकीचे नाही पण जेव्हा श्रद्धेची अंधश्रद्धा होते तेव्हा ती इतर सामान्य माणसांना त्रासदायक ठरते. प्रत्येक माणसाला आपले मन मोकळं करण्यासाठी एक हक्काची जागा हवी असते आणि आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट घडणाऱ्या घटनांचं खापर फोडण्यासाठी आणि श्रेय देण्यासाठी एक हक्काची जागा हवी असते ती जागा म्हणजे देऊळ असते. या जगात सारे नश्वर आहे त्यामुळे माणसाला काहीतरी अमर असणारे हवे होते आपल्यापेक्षा वेगळे म्हणून माणसाने देवाला जन्माला घातले असे म्हणणे धाडसांचे होईल देवाचे अस्तित्व पूर्णपणे अजून कोणीही या जगात नाकारलेले नाही. त्यामुळे मी हि ते नाकारत नाही कदाचित नाकरणारही नाही. पण आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच जीवन या देवाभोवतीच गुंडाळलेले दिसते. देवळ बांधा ना पण त्यातूनही समाजाचं हित कसं साधत येऊ शकेल याचा विचार करा ना ! तो विचार जोपर्यत केला जात नाही तोपर्यंत फक्त देऊळेच वाढत राहणार पण देवत्व नष्ट होत राहणार यात शंका नाही...
    लेखक - निलेश बामणे
    202, ओमकार टॉवर, जलधारा (एस. आर. ए.) बी - विंग, गणेश मंदिर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
    गोरेगांव ( पूर्व ), मुंबई - ४०० ०६५.
    मो. ८१६९२८२०५८ / ८६५२०६५३७५

      January 17, 2017


  • जिनके घर शिशेके होते है…

    काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम करणारा एक मोठा वर्गही असतो. शास्त्रज्ञ, साहित्य, खेळाडू, कलावंत या क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्या विशिष्ट अशा स्वभावामुळे कायम चर्चेत राहतात.

    बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताक चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.

    या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.

    एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही. दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपटसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.

    मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय अश्सा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले. या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत.मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.

    भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.

    चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत. हमराज, नई रोशनी (१९६७), मेरे हुजूर, नील कमल, वासना (१९६८), लाल पत्थर, मर्यादा (१९७१), पाकिजा, दिल का राजा(१९७२), हिंदुस्तान की कसम(१९७३), ३६ घंटे(१९७४), एक से बढकर एक (१९७६), बुलंदी व चंबल की कसम (१९८०), कुदरत (१९८१), या सर्व चित्रपटापैकी काही वगळता ते मूख्य नायक जरी नसले तरी त्यांची समातंर भूमिका लक्षणीय असे. १९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर” मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.

    ८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला. चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
    # चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है…..,(वक्ता)आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हेंग जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे……. (पाकीजा)
    # हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
    # काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। ('सौदागर')
    # हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं……। (तिरंगा)
    # हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी…¬¬। (मरते दम तक)
    # हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है………..। ('तिरंगा')
    # दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं………….।

    …….आज त्यांचा जन्म दिवस. मन:पूर्वक अभिवादन..

    -दासू भगत

    ( ८ ऑक्टोबर २०१८ )

      October 17, 2018


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३२)

    खरं तर नगरमध्ये बरेच कार्यक्रम झाले त्याचे श्रेय माझे परमस्नेही विद्यमान श्री. सर्वोत्तम क्षीरसागर की जे पुण्यातील आमच्या सप्तर्षी मित्र मंडळ व महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थानच्या अगदी स्थापनेपासून माझ्या सोबतच होते.

      June 26, 2021


  • मोबाईलचे दुष्परिणाम : एक शालेय विरुद्ध खरा संवाद

    बंडयाने परवा मला एक शालेय संवाद दाखवला. मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात हे त्याला आई सांगत असते असा एकूण मजेशीर विषय होता. एकूण विषय देतानाच कर्ता, कर्म आणि क्रियापद वापरून जे काही तयार होते ते खरे असते का, हे तपासण्याची शाळेला गरज वाटली नसावी. असो, तर आपण शालेय संवादाकडे वळू.

      October 21, 2018