(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाटकाचे ठेकेदार

    मराठी भाषा मोठी गमतीदार आहे, शब्दांचे अर्थ तुम्ही कोणत्या भावनेनं तो शब्द वापरताय यावरही अवलंबून असतात. 'ठेकेदार' या शब्दाला खरंतर एक नकारात्मक, उपहासात्मक अर्थ चिकटलेला आहे. पण या लेखनाच्या शीर्षकात मात्र तो अतिशय कौतुकाने, आपलेपणाने वापरला आहे. ठाणे शहरात जेव्हा बंदिस्त नाट्यगृहच नव्हते, तेव्हा स्टेज बांधण्यापासून ते रस्त्यावर फिरून नाटकाच्या जाहिराती वाटण्यापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनपूर्वक पार पाडून ठाणे रसिकांची नाटकांची हौस पुरवणाऱ्यांना 'नाटकाचे ठेकेदार' नाही म्हणायचे, मग काय म्हणायचे?

    1960च्या दशकात ठाणे शहरात नाटकांचे प्रयोग होत ते एम. एच. हायस्कूल, आर्य ा*ीडा मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल येथील मोकळ्या पटांगणात. त्या काळात या ओपन थिएटरमध्ये नाटक करायचे म्हणजे काही वेळा स्टेज बांधण्यापासून सुरुवात करावी लागे. ही सगळी मेहनत करून, केवळ व्यापारी दृष्टिकोन न ठेवता, नाट्यप्रेमाने नाट्यप्रयोग आयोजित करणाऱ्या 'रंगवैभव', 'नाट्यनिनाद' आणि 'कलाविद्या' या तीन मुख्य संस्था होत्या.

    यातील 'रंगवैभव' ही संस्था सुरू केली मोहन जोशी यांनी 1967 साली. त्यांचे मेहुणे करंदीकर तेव्हा मुलुंडमध्ये नाटकांचे प्रयोग आयोजित करायचे. तिथून जोशींना प्रेरणा मिळाली. 1 नोव्हेंबर 1969 साल त्यांनी मो. ह. विद्यालयात 'नाट्यसंपदा'च्या 'अश्रूंची झाली फुले'चा प्रयोग आयोजित करून आपल्या वितरण कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे 1979 पर्यंत म्हणजे दहा वर्षे मो. ह. विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल येथे जोशी सातत्याने नाट्यप्रयोग आयोजित करत होते. 'नाट्यसंपदा', 'चंद्रलेखा', 'कलावैभव', 'दि गोवा हिंदू असोसिएशन', 'रंगधारा', 'दुर्वांची जुडी', 'श्रीरंग साधना' या सगळ्या नामवंत व्यावसायिक नाट्यसंस्थांचे नाट्यप्रयोग जोशींनी ठाण्यात आयोजित केले. प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यापासून ते आलेल्या नाट्यकलाकारांचे चहा-पाणी बघण्यापर्यंत सगळी कामे करायला जोशींनी तेव्हा एक टीम उभारली होती. भाऊ डोके, केशवराव फडके, मामा घाग, हेमंत काणे, जगदीश बर्वे, प्रकाश कुलकर्णी, सुनील कातकडे (नंतर डॉक्टर झाले), अभय लेले, दिलीप दातार असे जोशींचे हक्काचे व्हॉलेंटियर्स होते. 'कृष्ण स्टोअर्स'च्या छबूनाना जोशींकडून लाकडी घडीच्या खुर्च्या भाड्याने आणायच्या. नयन रेडिओच्या पाठारेंकडून साऊंड सिस्टिम आणायची आणि शाळेच्या पटांगणाचं रूपांतर नाट्यगृहात करायचं. त्या काळात शाळकरी वयातल्या आनंद दिघे साहेबांनीदेखील व्हॉलेंटियर म्हणून काम केल्याची आठवण जोशी सांगतात.

    1972 साली वादग्रस्त ठरलेल्या 'सखाराम बाईंडर'चा प्रयोग ठाण्यात जाहीर झाल्यावर खळबळ माजली आणि विविध राजकीय पक्षांनी या प्रयोगाला विरोध दर्शवला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ते ठाण्याच्या कलेक्टरपर्यंत अनेकांना भेटून त्यांचे सहकार्य कसे मिळवले आणि 'बाईंडर'चा प्रयोग कसा सुरळीत पार पडला, याची आठवण जोशींच्या मनात आजही ताजी आहे. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर तिथेही पहिली दहा वर्षे जोशींनी नाट्यवितरक, कॉण्ट्रक्टर म्हणून प्रेक्षकांची नाट्यसेवा केली.

    त्या काळातली 'मोरे-कोल्हटकर' ही जोडी प्रेक्षकांना आजही आठवते, ती नाटकाचे ठेकेदार म्हणूनच. रमेश मोरे आणि जयंत कोल्हटकर यांनी 'नाट्यनिनाद' संस्था सुरू करून 1963 ते 1978 या काळात ठाण्यातल्या नाट्यप्रेमींची हौस पुरवली. त्यांच्या जोडीला विष्णुनगर मधले दादा रेडकरही असायचे. 'कथा ही राम जानकीची' हा सचिन शंकर यांचा बॅले आयोजित करून रमेश मोरेंनी ठेकेदार म्हणून काम करायला सुरुवात केली. 'दिवा जळू दे सारी रात', 'गुंतता हृदय हे', 'मला काही सांगायचंय्', 'ती फुलराणी', 'वाऱ्यावरची वरात' अशी त्या काळातली सगळी लोकप्रिय नाटकं मोरेंनी ठाण्यात आणली. एकदा न्यू इंग्लिश स्कूलचा 'वाहतो ही दुर्वांची जुडी'चा प्रयोग संपल्यानंतर रात्री दोन वाजता जेवताना वरण भातावर तूप हवं म्हणून बाळ कोल्हटकर हटून बसले, तेव्हा मोरेंनी लगेच आपल्या घरी घंटाळीच्या 'लक्ष्मी निवास'मध्ये माणूस पाठवून तूप आणले आणि बाळासाहेबांची 'विच्छा' पुरी केली. एकदा मोरेंनी पुण्याच्या श्रीस्टार्स कंपनीचे 'देव नाही देव्हाऱ्यात' लावले होते. पण काही कारणाने बुकिंग झाले नाही. आता गल्लाच जमला नाही तर नाटक कंपनीचे ठरलेले पैसे कसे देणार? मग मोरेंनी घरून आपल्या पत्नीचे दागिने आणले आणि श्रीस्टार्सच्या बाबुराव गोखल्यांसमोर ठेवले. ते पाहून बाबुराव गोखले म्हणाले, 'मोरे, वेडे आहात काय? बायकोचे दागिने काय देता? पुढच्या वेळी पैसे द्या'. अर्थात मोरेंनी न विसरता बाबुरावांचे ठरलेले पैसे थोडे थोडे करून दिले. रंगायतन सुरू झाल्यावर तिथेही नाटकाचे प्रयोग लावणारे रमेश मोरे 1988 साली मोहन वाघांच्या 'चंद्रलेखा'मध्ये मॅनेजर म्हणून रुजू झाले. गडकरी रंगायतनमध्ये पहिला नाट्यप्रयोग चंद्रलेखाच्या 'मृगतृष्णा' या नाटकाचा मोरेंनीच आयोजित केला होता.

    ओपन एअर थिएटरच्या जमान्यात न्यू इंग्लिश स्कूल, एम. एच. हायस्कूल येथे आपल्या 'कलाविद्या' या संस्थेतर्फे नाट्यप्रयोग आयोजित करणारे उत्साही नाट्यप्रेमी म्हणजे विद्याधर ठाणेकर. 31 डिसेंबर 1969 रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर 'वेलकम थिएटर्स'च्या 'निर्माल्य वाहिले चरणी' या नाटकाचा प्रयोग (कलाकार-राजा परांजपे, भारती मालवणकर, सतीश दुभाषी) आयोजित करून ठाणेकरांनी आपल्या नाट्यवितरण कारकीर्दीचा शुभारंभ केला. पुढे
    1978 साली रंगायतन उभे राहीपर्यंत ठाणेकर सातत्याने नाट्यप्रयोगांचे आयोजन करत होते.

    'नाट्यसंपदा', 'रंगधारा', 'कलावैभव', अशा नामवंत नाट्यसंस्थांच्या दर्जेदार, लोकप्रिय नाटकांचे प्रयोग ठाणेकरांनी त्या काळात आयोजित केले. आपण आयोजित केलेल्या प्रयोगांची चर्चा व्हावी, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा, म्हणून ठाणेकर नवनवीन शक्कल लढवत असत.

    पु.लं.च्या 'वाऱ्यावरची वरात'चा प्रयोग त्यांनी लावला होता. तेव्हा प्रवेशद्वारापाशी येणाऱ्या प्रेक्षकांवर सुगंधी फवारणी करायला लग्नाच्या मांडवात वापरतात तसे सेंटचे फॅन उभे केले होते. त्यातून होणाऱ्या थंडगार सुगंधी शिडकाव्यांनी सारे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. 'वरात...'मध्ये भूमिका करणारे श्रीकांत मोघे तर इतके खूश झाले की ते या सुगंधी पंख्यासमोरून हलेचनात. शेवटी त्यांनी सांगितले की, 'ठाणेकर, मी तुमच्या या फॅनचाच 'फॅन' झालो आहे!'
    मराठी रंगभूमीवरील एक बोल्ड, धाडसी विषयावरील नाटक 'दोघी'चा प्रयोग ठाणेकरांनी प्रथमच लावला होता. बाहेर कुठेही या नाटकाला बुकिंग नव्हते. मग ठाणेकरांनी स्टेशन रोडवर आंबेडकर चौकात (सध्याचा अलोक हॉटेलचा चौक) या नाटकाची जाहिरात करण्यासाठी 'ए' या अक्षराचा मोठ्ठा कटआउट लावला आणि त्यावर अक्षरे लिहिली, फक्त प्रौढांसाठी 'दोघी'. या जाहिरातीने खळबळ माजली आणि एम. एच. वर बुकिंगसाठी गर्दी जमली.

    नाटकाच्या दिवशी कंपनीची बस मुंबईहून गोखले रोडवरून एम. एच. कडे जाऊ लागली तेव्हा एम. एच. समोरची गर्दी पाहून मागेच थांबवावी लागली. 'ही गर्दी कसली?' तर नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांची हे कळल्यावर नाटकवाल्यांना धक्काच बसला.

    विद्याधर ठाणेकरांच्या नाट्यसंयोजन पर्वातील एक अविस्मरणीय कार्या*म म्हणजे 28 एप्रिल 1974 रोजी त्यांनी पहिल्यांदाच 'नाट्यसंगीत रजनी' आयोजित केली होती. या रजनीत तेव्हाचे सगळे नामवंत कलाकार म्हणजे प्रसाद सावकार, रामदास कामत, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, शरद जांभेकर, प्रकास घांग्रेकर, प्रकाश कारेकर असे सगळे सहभागी झाले होते. गणेश सोळंकीनी या रजनीचं निवेदन केलं होतं. रात्री सुरू झालेली ही नाट्यसंगीताची मैफील पहाटेपर्यंत सुरू होती. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकरांनी सांस्कृतिक कार्या*मांच्या संयोजनाकडे आपले लक्ष केंद्रित केले. 'स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान' या संस्थेच्या माध्यमातून सावरकरांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचे काम ते आता करतात.

    ज्या काळात एम. एच. किंवा न्यू इंग्लिश स्कूलला नाटके व्हायची, तेव्हा तिकीट दर असायचा रु. 7 , 5, 3, 2. त्या काळात एम. एच.मध्ये बक्षी, पाटकर, दोंदे या तिघीजणी 'त्रिवेणी' नावाने कॅण्टिन चालवायच्या. मध्यंतरात प्रेक्षकांना चवदार बटाटे वडा आणि गरम चहा देण्याबरोबरच नाटक संपल्यावर नाट्यकलाकारंासाठी घरगुती चविष्ट जेवण देण्याची जबाबदारीही 'त्रिवेणी' पार पाडायची.

    रंगायतन सुरू झाल्यावर ही खुली नाट्यगृहे मागे पडणे स्वाभाविक होते. पण एकेकाळी याच नाट्यगृहांनी ठाणेकरांना नाटके बघायची सवय लावली, म्हणूनच या नाट्यसंमेलनात एम. एच. हायस्कूल येथे खास कार्याक्रम आयोजित केले आहेत.

    साभार- ठाणे रंगयात्रा २०१६.

      August 12, 2022


  • सुई-दोरा

    खेड्यामध्ये अजूनही दुपारच्या वेळी चार बायका एकत्र येऊन वापरुन झालेले कपडे, साड्या जोडून वाकळा, गोधड्या तयार करतात. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपड्यांपासून तयार झालेले ते एक प्रकारचे नात्यांचे ‘फ्युजन’च असते.. ज्याला घडविणारा असतो तो.. सुई-दोरा!

      October 14, 2021


  • दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

    मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे, काका मामा आत्या …..

      June 5, 2013


  • भुजंगाची गर्लफ्रेंड! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ – १५

    आजचे त्यांचे ‘लक्ष्य’ होते ‘चार्मी!’ ‘चार्मी’ म्हणजे भुजंगरावांची लेटेस्ट गर्ल फ्रेंड! सुंदर, तरुण, स्मार्ट, मॉडर्न! (बाकी वर्णन तुमच्या कल्पना शक्तीवर सोडतो.)

      December 30, 2020


  • परी कथेतील राजकुमारी

    ही आहे माझ्या परीकथेतील माझी मोठी मुलगी. मला ही पहिली मुलगी झाली होती. आणि नांव काय ठेवायचं असा विचार करत होते. आणि मला वाटलं की माझ डॉ व्हायच स्वप्न माझी लेक पूर्ण करेल म्हणून मी तिच्या नावाचा विचार करताना डॉ हे आधी शोभेल असे काही तरी ठेवावे. आणि डॉ अनुराधा खूपच छान वाटलं म्हणून तेच ठेवले…

      July 16, 2022


  • भेट तुझी माझी

    आज मी तिला, साधारण तीस एक वर्षांनी भेटणार आहे . आज मात्र मी माझी बाजू मांडणार आहे . त्या काळी प्रेम करणं महापातक . घरच्यांच्या नाराजीवर आम्हाला आमचा ‘सुखी ‘ संसार थाटायचा नव्हता . तिनें तिच्या घरच्याना राजी केले . मीच कमी पडलो ! आम्ही शेवटचं भेटलो तेव्हा ‘जमेलसे वाटत नाही ‘ असे सांगितले तेव्हा जाम अपसेट होऊन डोळे पुसत निघून गेली . माझी बाजू ऐकून न घेताच ती गेली होती . मी काय करायचे ठरवले हे तिला सांगणार होतो ! त्यांनतर दिसली नाही ! ती आज भेटतेय ! तीस वर्षांनी !

      November 29, 2017


  • जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ

    आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे.  अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच  नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा  स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह !

      July 30, 2021


  • फेस ऑफ

    तो आणि ती समोरच्या बिल्डींगमध्ये रहात, माझी फारशी ओळख नाही , परंतु येता जाता फक्त ‘ स्माईल’ किंवा हॅलो.

      December 19, 2021


  • बोल अबोल

    जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्‍यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.

    या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्‍या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.

    -- निलेश बामणे

      December 23, 2015


  • कोटी कोटी उड्डाणे तुझी…………

    खरे रूप माणसा तुझे

    कोणते कळेना?

    तूच नगरपालिकेतही तूच

    तुझा सरकारी देखील बाणा……….

      September 10, 2014