नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला…..
बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार ...
पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार ...
पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार ...
पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार ...
हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार ...
स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार ...
स्त्री - पुरुष समानतेच्या काळातही स्त्रीच ठरतेय पुरुषाच्या वासनेचा बळी वारंवार ...
स्त्रियांच्या शीलाच रक्षण करण्यानेच पुरुषातील पुरुषत्व सिद्ध होत हे कोण सांगणार या षंड पुरुषांना वारंवार ...
-- निलेश बामणे
पुष्कळदा मला वाटते माझ्यात आणि त्या भिकाऱ्यात काही ही फरक एवढाच तो ….
गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात सहल …..
स्वाईन फ्लूचा भस्मासुर ! सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.
१९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. …..
अन्यायाच्या आणि अत्याचारांच्या निर्दयी पाषाणांनी बांधलेल्या उंच उंच भिंतींमुळे माझ्या मनातल्या आशा गुदमरुन पडल्यात. तिची अस्पष्ट साद भिंतींआडून माझ्या कानावर येऊन आदळते आणि माझे दुःख अनावर होतात. माझी ताई…. माझी ताई… आई बाबा वारल्यानंतर माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण पूर्ण केलं, एवढंच नाही तर माझं लग्नही लावून दिलं. माझ्यासाठी तिने स्वतः लग्न नाही केलं. पुष्कळ त्याग केला रे तिने आमच्यासाठी. आम्ही सगळे सुखी होतो आणि एक दिवस आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली.
चित्रपटातील एखादे नायक – नायिका जेंव्हा आपल्याला आवडत असतात तेंव्हा त्यांच चालणं, बोलणं, ह्सणं, रडणं, नाचणं सारच आपल्याला आवडत असत. पण याचा अर्थ आपलं त्यांच्यावर प्रेम आहे असा होत नाही ना, सांगायच तात्पर्य इतकच आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti