मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
एक राजा होता. तो एकदा आपल्या महालाच्या खिडकीपुढं बसला होता. तिथं त्याला रस्त्यावरून एका फेरीवाल्याची आरोळी ऐकू आली.. ‘भाजी घ्या हो भाजी ! चमत्काराची भाजी! भाजी घ्या भाजी!’ राजाला नवल वाटलं. चमत्काराची भाजी म्हणजे कसली भाजी बुवा? त्यानं नोकराला सांगितलं, ‘जा, त्या भाजीवाल्याला बोलाव.’ भाजीवाला आला तेव्हा राजानं त्याला विचारलं चमत्काराची भाजी म्हणालास काय?
एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.
वासुदेव आला दारी, वासुदेव आला
चिमणा वासुदेव आला ।।धृ ।।
टोपीवर मोरपिसांना
खोवोनि येथें आला,
काही दान करा त्याला ।
दारी वासुदेव आला. ।।१।।
बांधुनिया घुंगुर पायी
थय थय थय नाचत येई
सुखवी गाऊनि तुम्हाला ।
दारी वासुदेव आला ।।२।।
“द्याल जरी पैसा एक,
देव तुम्हां देईल लाख,
माई धर्म करा याला' ।
दारी वासुदेव आला ।।३॥)।
“वडिलांच्या तुमच्या नावे
पैशाचे दान करावे,
माई, पुण्य मिळविण्याला ।
दारी वासुदेव आला ।।४॥।
नाचुनिया आता थकला
द्या एकच पैसा त्याला
खाऊ गोड घ्यावयाला ।
वासुदेव दारी आला ।।५।।
एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.
सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.
छडी लागे छम् छम्, विद्या येई घम् घम्
छम् छम् छम् । छम् छम् छम् । धृ. ।।
मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल
दंताजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।
छम् छम् छम् ॥१॥
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पाने
मोर््या मूर्खा, गोप्या गध्या देतो सर्वा दम ।
छम् छम् छम् ॥२॥
तोंडे फिरवा, पुस्ती गिरवा, बघू नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओम नम: सिद्धम् ।.
छम् छम् छम् ।॥३॥।
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
कोणे एके काळी समुद्राच्या तळाशी एक महाल होता. या महालात विविध प्रकारचे मासे, कासव आणि साप राहत असत. एके दिवशी सापांचा राजा पोटदुखीमुळे इकडेतिकडे सरपटत होता. दिवसरात्र वेदना असह्य झाल्यामुळे तळमळत होता. त्याच्या कुटुंबातील राजकुमार, राजकन्या, राणी, प्रधान सगळेच काळजी करू लागले. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हते आणि राजाच्या वेदनाही कुणाला बघवत नव्हत्या. प्रधान म्हणाले, “आपण आपले मुख्य राजवैद्य माशाला बोलावू.” राजवैद्यांनी राजाची नाडी पाहिली आणि म्हणाले, ”महाराजांना सशाचं हृदय उकडून खायला दिलं तर लवकर आराम पडेल.”
दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.
एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.
घे कुठार ! कर उगार
घाव आता घाली । धृ. ।।
धरणीने पोशियले
रविकिरणे वाढविले
राहियला सतत मरुत
आजवरी वाली ।।१ ।।
किती विहगा खांद्यावरी
खेळविले बाळांपरि
शांत गुरे छायेमधि
आजवरी झाली ।॥२॥।
प्रेमामृत तरुण तरुणि
गेल्या ओतून इथुनि
संकेतस्थळ होणे
आजवरी भाळी ।।३।।
काळाचा कठिण घात
वस्तूचा होत पात
आनंदे पाहत मी
प्रकृतीच्या चाली ।।४॥।
होऊ देत देह छिन्न
शकलांवर शिजवी अन्न
मन निवेल ऐकुनिया
तृप्ती तुला आली ! ।॥५॥
Copyright © 2025 | Marathisrushti