मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.
एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.
सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.
राजा पे-चौ व त्याचा प्रधान, दोघेही राजमहालात बसले होते. त्यांचे सारे लक्ष सिंहासनाला दोन साखळ्या (लहान लहान घंटाघुंगरे लावलेल्या) जोडलेल्या होत्या तिकडे होते. त्यातली एक साखळी सोन्याची होती, तर दुसरी होती चांदीची. त्यांना बोलायलाही सुचत नव्हते. बरोबर राणी यावेळी प्रसूतिगृहात होती, बाळ होणार होते. मुलगा झाला तर सोन्याची साखळी ओढली जाणार ! मुलगी झाली तर चांदीची ! त्यांचे डोळे साखळ्यांवर गुंतलेले होते.
फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.
एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.
भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दाबीत सतत रुप आगळे ।।
वसंत वनात जनात हसे
सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट
चैत्र-्वेशाखाचा ऐसा हा थाट ।।१॥।
ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी
कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान
पूर अमृताचा सांडे वरुन
गगनी नर्तन कृष्ण मेघांचे
भूतली मयूर उत्तान नाचे ।।२।।
श्रावणी पाऊस हास्याचा पडे
श्रीकृष्ण-जन्माची दंगल उडे
बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे
कामिनी धरणी वैभवी लोळे ।।३॥।।
समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
Copyright © 2025 | Marathisrushti