(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

  • मुलगा आणि अस्वल

    (एस्किमो लोककथा)

    एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.

  • आधारियेचा परिसाचा दृष्टांत

    (महानुभाव ग्रंथातील गोष्ट)

    कव्हणा एका महात्माचिये आधारिये परिसू होता तो कव्हणी एका ब्राह्मणाचे
    घरा वसतीसी जाये. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेणे तयाचे वस्त्र
    आंबट-ओले ऐसे जाले होते.

  • पारितोषिक

    (उत्तर भारतीय लोककथा)

    कामनगरचा राजा विद्वान, मूर्तिकार, चित्रकार यांचा खूप आदर करीत असे.
    त्याच्या राज्यात दरवर्षी एक मूर्तिस्पर्धा होत असे. राज्यातील मूर्तिकार मूर्त्या
    तयार करून राजदरबारात येत आणि स्वतः राजा त्यांचे बारीक निरीक्षण करून
    पारितोषिक घोषित करीत असे.

  • रेव्हनची गोष्ट

    (अलास्कन लोककथा)

    सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा
    सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण
    केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य
    तयार केला नव्हता.

  • पहिला झेब्रा

    (मध्य आफ्रिकेतील कथा)

    पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.

  • माकडांची शाळा

    एक जंगल होते. त्याचे नाव होते चंपकवन. तेथे खूप झाडे, ओढे, डोंगर होते. जंगल म्हटल्यावर प्राणी होतेच. माकड, चित्ते, हरीण, वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे इत्यादी. ते चंपकवनात अतिशय आनंदात राहत. माकडे तर खूपच धडपडी होती. नेहमीच काहीतरी करण्यात दंग असत. त्यातच सर्कशीतून पळून आलेल्या एका माकडाची भर पडली. त्याचे नाव होते ‘विचित्र ‘नावाप्रमाणेच त्याच्याअंगीसुद्धा तसेच गुण होते.

  • एक होती कळी

    एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.

  • मोठा देव कोण बरे?

    एकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता
    (अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही,
    मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत
    म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.

  • लंकादहन

    रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता.

  • सूर्य आणि चंद्र

    (बंजारा लोककथा)

    सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ. सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता. त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली. घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते. आई काबाडकष्ट करून दोघांना भरवत होती. पण तिच्या मिळकतीत एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नव्हते.