(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजा, ससा आणि माकड

    एकदा एक राजा राज्य करीत होता. त्याने एका झाडावर एक मधाचे पोळे राखून ठेवलेले होते. एके दिवशी एका सशाने उंदराशी मैत्री केली. त्याच्या मदतीने त्याने त्या मधाची चोरी करायचे ठरविले. सशाने त्या झाडाखाली आगीचा जाळ केला. त्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. तोपर्यंत तो उंदीर झाडावर चढून गेला आणि त्याने ते मधाचे पोळे आपल्या अणकुचीदार दातांनी कुरतडायला सुरवात केली. राजाने तो धूर पाहिला.

  • यी तेजदेवता

    कुणी एके काळी आद्यदेव सृष्टी निर्माता बाईमी यांनी पशुपक्षी, जलचर, कीटक, फुले, वृक्ष अशी सारी सृष्टी निर्माण केली. परंतु ही सारीसृष्टी चित्रासारखी स्तब्ध होती. निर्जीव होती. या सृष्टीत चैतन्य नसल्यामुळे जमिनीतून रोपांना अंकूर फुटत नव्हते. तळ्यातील पाण्यावर बर्फाचे दाट थर असल्यामुळे जलचर बंदिवान झाले होते. अतिथंडीमुळे पक्षी गारठले.

  • चतुर कोल्हा

    एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला.

  • पर्वताची केली छत्री

    त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.

  • राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती

    त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’

  • धौम्य व उपमन्यू

    फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.

  • इंद्रधनुष्य

    (गढवाली लोककथा)

    वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!

  • सूर्य आणि चंद्र

    सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ. सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता. त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली. घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते. आई काबाडकष्ट करून दोघांना भरवत होती. पण तिच्या मिळकतीत एकवेळचे पोटभर जेवणही मिळत नव्हते.

  • खुळा पाऊस

    पाऊस खुळा । किति पाऊस खुळा |!
    शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ।।धृ।।

    नाचे किती वेड्यापरी,
    बडेबडे काहीतरी
    झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।1।।

    दीनवाणी वेलीबाई,
    पांघधराया नाही काही
    काय करु, उघडा हा राहे छकुला ! ।।2।।

    उचलून आणू काय,
    पुसू डोके, अंग, पाय?
    काकडून गेला किती
    बघ माकुला ! ।।3।।

    निजवू या गादीवर,
    पांघरुण घालू वर,
    देऊ काय, सांग आई,
    आणुन तुला? ।।4।।

    काय - "नको तोडूं फूल,
    वेल - पावसाचें मूल ?
    ऊन येतां चमकेल
    त्याचा डोळुला? ।।5।।

    आणि 'येऊ मी घरात?
    भिजू नको अंगणात ?'
    नको आई - ! चमकेन
    मीही आपुला ! ॥6॥

    मज वेडा म्हणतील ?
    फूल शहाणें होईल?
    मग वेडी म्हणतील
    सगळे तुला ! ।।7॥

  • होळीविषयी लोककथा

    गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.