मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
आवडीने भाव हरि-नाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।
नको खेळ करु कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
संकळ जीवांचा करितो सांभाळ ।।
तुज मोकलील ऐसे नाही ।।
जैसी स्थिती आहे तैशा परि राहे ।
कौतुक तू पाहे संचिताचे ।।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपे त्याचा नाश झाला ।।
एकदा एक दहा पायांचे ध्रुवप्रदेशी अस्वल अलास्काच्या उत्तरेला असलेल्या समुद्रकिनाऱ्याजवळ राहत होते. समुद्रातील हिमपर्वत आणि दूरवर तरंगणाऱ्या हिमखंडाच्या पलीकडील सील माशांची शिकार करणे यात त्याचा बहुतांश वेळ ते घालवीत असे. त्यामुळे हे अस्वल एस्किमोंच्या दृष्टीस अगदी क्वचितच पडत असे. त्या अस्वलाला प्रत्येक बाजूने पाच पाच असे पाय होते. जेव्हा ते अस्वल चालत असे किंवा पळत असे तेव्हा ते त्याच्या एका बाजूच्या पाचही पायांवर चालून किंवा पळून पुढे जात असे.
एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.
एकदा एक राजा राज्य करीत होता. त्याने एका झाडावर एक मधाचे पोळे राखून ठेवलेले होते. एके दिवशी एका सशाने उंदराशी मैत्री केली. त्याच्या मदतीने त्याने त्या मधाची चोरी करायचे ठरविले. सशाने त्या झाडाखाली आगीचा जाळ केला. त्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. तोपर्यंत तो उंदीर झाडावर चढून गेला आणि त्याने ते मधाचे पोळे आपल्या अणकुचीदार दातांनी कुरतडायला सुरवात केली. राजाने तो धूर पाहिला.
(जैन लोककथा)
एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.
राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.
(बुशमन लोकांमधील एक पुरातन दंतकथा)
आदिवासींचं म्हणणं आहे, काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा सूर्याला आपली आभाळातली वाट नीट माहीत नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं टक लावून बघणं ही सवय जिराफाला होती. सृष्टीनिर्मात्याला वाटलं की सूर्याकडे लक्ष देण्याची कामगिरी जिराफावर सोपवावी.
फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.
ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट तुम्हा आम्हाला सर्व परिचित आहे. राम गणेश गडकरी यांच्या ‘चिमुकल्या इसापनीती’त ही बीजकथा या संग्रहात दिलेली आहे. पहा (४.५९) नव्या संदर्भात नवी भर घालून अनेकांनी या बीजकथेचा आपापल्या पद्धतीने विस्तार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनीही या बीजकथेचा केलेला विस्तार यापुढील तीन कथांमध्ये दिला आहे. या विस्तार कथांमधून मुलांना शर्यतीपेक्षा किंवा स्पर्धेपेक्षाही मैत्रभाव महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळेच ह्या कथा पारंपरिक कथेपेक्षा कशा वेगळ्या आहेत ते पहा.
एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं.
Copyright © 2025 | Marathisrushti