मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
कोणे एके काळी, एका तळ्यांत कंब्रुग्रीव या नावाचा एक कासव रहात होता. कंबुग्रीव म्हणजे कमानदार मानेचा. तर हा कमानदार मानेचा कासव ज्या तळ्यांत रहात होता, त्या तळयांत दोन हंस पक्षीही रहात होते. त्या तिघांची छान मैत्री जुळली होती नि ते दिवसभर एकमेकांशी खेळण्यात आणि गप्पा मारण्यात रमत असत.
कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली.
खानदेशातील पाटबारा नावाच्या गावात एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. तो भिल्ल समाजाचा असून अतिशय दु:खी, कष्टी होता.
आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.
छडी लागे छम् छम्, विद्या येई घम् घम्
छम् छम् छम् । छम् छम् छम् । धृ. ।।
मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल
दंताजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।
छम् छम् छम् ॥१॥
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पाने
मोर््या मूर्खा, गोप्या गध्या देतो सर्वा दम ।
छम् छम् छम् ॥२॥
तोंडे फिरवा, पुस्ती गिरवा, बघू नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओम नम: सिद्धम् ।.
छम् छम् छम् ।॥३॥।
(गढवाली लोककथा)
वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!
फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.
एके दिवशी कृष्ण वृंदावनात गाई चारीत असता दुसरे गोपाल फार तहान लागली, म्हणून त्याची वाट न पाहता पाणी पिण्यासाठी यमुनेवर गेले. तेथे एक मोठा डोह होता व त्यात कालिया नावाचा एक भयंकर विषारी सर्प राहत होता. त्या सर्पाच्या विषामुळे ते पाणी जहरी झाले होते
समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.
गाई वळल्या घरी
पाखरे बघ गेली कोटरी ।। धृ. ।।
'दिवेलागणी देवाघरची
झाली गगनांतरी
पाखरे बघ गेली कोटरी ।॥॥९॥।
उड्या मारिता धावत जाता.
हरणे आली घरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।॥२॥।
चंचु चंचु हे एक मिळाले
निजली वृक्षावरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।३।।
रजनी आली रिझवायाला
ही चंद्राच्या घरी.
पाखरे बघ गेली कोटरी ।॥४॥।
शांत शांत ही अंगाईची
अंगुलि फिरते शिरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।५॥।
चिऊमाउच्या गोष्टी कथिता
बाळे निजली घरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।६॥।
Copyright © 2025 | Marathisrushti