मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
रानपाखरा, रोज सकाळीं येसी माझ्या घरा
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी. ॥१॥
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला ?
रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर
तूही त्याच्या संगें येसी गात गात सुस्वर ।।२।।
वाट चालुनी संध्याकाळी रवि सोडी अंबरा
आणि तूहि मग पंख उभारुन जासी अपुल्या घरा
सूर्यासंगे जासी येसी सदाकदा का बरे?
शेजारी आहेत काय रे परस्परांची घरे? ।।३।।
देह एवढा, अपाय कोणी करील तुजला इथें
म्हणून का तुज रवीबरोबर माय तुझी धाडिते ?
सांगतोस का तिला कसा हा छानदार बंगला ?
होते का रे कधी आठवण माझी सखया तुला ? ।।४।।
तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी
नेशिल का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनि पंखावरी ?
माय तुझी येईल, सूर्यही येइल भेटायला,
मजाच होइल सख्या पाखरा, नेह एकदा मला ।।५।।
एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.
पाखरांची शाळा भरे पिपळावरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ! ॥१॥
उतरते ऊन, जाते टळूनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ॥२॥
बाराखड्या काय आई, घोकति अंगणी?
उजळणी म्हणती का जमूनी रंगणी? ॥३॥
तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत ! ॥४॥
खेळकर मुले, नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायची नापास? ॥५॥
लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत
मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ॥६॥
पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी न शाळा यांची, भिजती सगळे ! ॥७॥
रविवारी, सणवारी आमुच्यासारखी
यांना नाही सुटी, भली मोडली खोड की ! ॥८॥
यांच्याहून आम्ही आई ! शहाणे, नव्हे का?
गप्प शाळेमधी, कधीं धरितो न हेका ॥९॥
होतो पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
मौज काय सांगू? मिळे सुट्टीही शाळेस ! ॥ १०॥
दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.
घे कुठार ! कर उगार
घाव आता घाली । धृ. ।।
धरणीने पोशियले
रविकिरणे वाढविले
राहियला सतत मरुत
आजवरी वाली ।।१ ।।
किती विहगा खांद्यावरी
खेळविले बाळांपरि
शांत गुरे छायेमधि
आजवरी झाली ।॥२॥।
प्रेमामृत तरुण तरुणि
गेल्या ओतून इथुनि
संकेतस्थळ होणे
आजवरी भाळी ।।३।।
काळाचा कठिण घात
वस्तूचा होत पात
आनंदे पाहत मी
प्रकृतीच्या चाली ।।४॥।
होऊ देत देह छिन्न
शकलांवर शिजवी अन्न
मन निवेल ऐकुनिया
तृप्ती तुला आली ! ।॥५॥
एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती. राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली । धृ ।।
तांबे कुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती
मर्दानी राणी लक्ष्मीबाई
मूर्त महाकाली ।।१।।
घोड्यावर खंद्या स्वार,
हातात नंगी तरवार
खणखणा करित ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
बीर इथे आली ।।२।।
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुचि लष्करे थिजली,
मग कीर्तीरुप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
इतिश्रीच झाली ।३।।
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर
तरु, झरे ढाळतिल नीर
या दगडा फुटतिल जिभा
कथाया कथा सकळ काळी ।!४॥।
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली ।।५।।
बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।
सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।
दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
बहुतां जनालागी जीवी भजावे ।
भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।
प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
बहु सज्जला नेटका साज केला ।
विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।
भला रे भला बोलती ते करावे ।
बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।
ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.
खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’
Copyright © 2025 | Marathisrushti