महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य :
सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ,
२ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून)
पारी साठी : २ कप रवा (बारीक), १ टे स्पून तूप (मोहनसाठी) मीठ चवी प्रमाणे,
१/२ कप दुध व लागेल तसे पाणी, मोदक तळायला तूप.
कृती :
नारळ खवून घ्या, त्यामध्ये साखर व दुध मिक्स करून शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट होई परंत शिजवावे मग त्यामध्ये वेलची पावडर गुलकंद, काजू, बदाम घालून मिक्स करावे.
बारीक रवा थोडा मिक्सरमध्ये थोडा ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करा. दुध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैल सर भिजवावा. (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील.) रवा भिजवल्यावर १० मिनिट झाकून बाजूला ठेवा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे बनवावे. एक एक गोळा पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून गोळा बंद करावा. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा.
कढई मध्ये तूप गरम करून विविध आकाराचे मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
प्रथम एका भांड्यात गाजर, बेबी कॉर्न, भोपळी मिरची(हिरवी,लाल व पिवळी), कॉर्न, मशरुम्स, कांदा हे २ चमचे तेलावर मंद आचेवर परतून घेणे. चवीनुसार मीठ घालणे.
साहित्य : पालक, उडदाची डाळ,हिरवी मिरची, कांदा, जिरे, चवीनुसार मीठ.
कृती : आदल्या रात्री उडदाची डाळ पाण्यात भिजवत ठेवा.
प्रथम पालकाची जुडी छान पाण्याने धुवून, चिरुन थंड पाण्यात ठेवून द्या. (पालक थंड पाण्यात ठेवला असता त्याचा हिरवा रंग तसाच छान राहतो.) त्यानंतर एका वाडग्यामध्ये रात्रभर भिजवलेली उडदाची डाळ आणि एक - दोन हिरव्या मिरच्या थोडेसे पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्या. व त्यामध्ये चिरलेला पालक, जिरे, बारिक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून या मिश्रणाचे पळीने गोल गोल गोळे तेलात सोडून हे वडे छान तळून घ्या. आणि हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
साहित्य : कुरमुरे, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली), ४ हिरव्या मिरच्या, खारे शेंगदाणे, कैरीचे बारिक तुकडे, फरसाण, बारीक शेव, लिंबाचा रस, चवीपुरते मीठ,बारिक चिरलेला टोमॅटो.
कृती ः कुरमुरे २-४ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे म्हणजे कुरकुरीत राहतील. परतताना चमच्याने ढवळत राहावे म्हणजे कुरमुरे जळणार नाहीत. परतलेले कुरमुरे मोठ्या परातीत काढावे.
कुरमुरे जरा गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो.
Ingredients :
Desi Paan leaves 5
Vanilla ice cream
Ice cubes 4 -5
Milk
Colourful sauf 1 tsp
Gulukand 2 tsp
Sugar 1 1/2 tsp
Tutifuti
Coconut powder
Illachi powder 1/4 tsp
Green colour optional
Mehod:
1.wash and tier paan leaves into small pieces.
2.Take a jar add paan leaves ,illachi powder,sugar,Gulukand, sauf,2-3 ice cubes and blend it to make a paste if need add some milk to make a fine paste.
3.Now strain the paste with help of a strainer nicely.
4.Take a shake jar add strained paste and milk, green colour 1 drop ,ice cream and ice cubes and blend it .
5.Serve in a glass top with ice cream decorate with tutifuti, coconut powder, coloured sauf and enjoy.? its delicious taste.?
मैदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कन्डेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठीसाखर १ मोठा चमचा.
आपल्या जिभेचे कौतुक पुरवण्याचे काम आपण सर्वच जण करतो. आणि त्यात दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उपयोगी ठरतात. ब्रेकफास्टला किंवा कधीतरी हलके अन्न म्हणून डोसा, इडली असे पदार्थ खातच असतो. यातही पौष्टीक असे दाक्षिणात्य पदार्थ आपण घरच्या घरी करु शकतो. त्यातील एक म्हणजे मिश्र डाळींच्या इडल्या. त्याचे साहित्य आणि कृती..
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकाची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात. मराठीत पालक, इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेमध्ये स्पिनासिया एॅलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे. पालक हा वर्षभर उपलब्ध असतो पण मार्च ते मे आणि सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात येणारी भाजी जास्त चांगली. हा पालकाचा हंगाम असल्याने, भाजी चवदार येते. पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात. आपण सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो. विलायती पालक हा प्रकार आशियामध्ये आढळतो. औषधी गुणधर्म पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅेसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.
पालकाचे उपयोग
आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात. म्हणून मासांहर न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन हे वरदानच आहे. पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अॅेनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो. स्पिनाशिया ओलेराशिया असे या कुलाचे शास्त्रीय नाव आहे. हिरवीगार, मऊ नाजूक पाने असलेल्या पालकाच्या भाजीतून भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये मिळतात. भरपूर पोषक द्रव्ये देणारी ही भाजी, उष्मांक मात्र अत्यंत कमी देते. त्यामुळे वजन वाढत नाही; पण ही भाजी जीवनसत्व, खनिज आणि इतर द्रव्यांनी युक्त असते. त्यामुळे ही भाजी सगळेजण खाऊ शकतात. तसेच ती सर्वत्र सहज उपलब्ध होते.
पालकापासून बनवलेले पदार्थ.
मोगलाई शाही पालक
साहित्य. १ लहान पालक जुडी, १ मोठा कांदा (किसून), १ इंच आले (किसून), २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), एक छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा जिरे पावडर, अर्धा छोटा चमचा मिरे पावडर, एक मोठा चमचा खसखस, २ मोठे चमचे दूध, २ मोठे चमचे फ्रेश क्रीम, मीठ चवीनुसार, १ मोठा चमचा साजूक तूप.
कृती. प्रथम पालक धुऊन बाजूला ठेवा. आले व हिरवी मिरची बारीक करा. कांदा किसून घ्या. खसखस गरम करून दुधामध्ये भिजत घाला व नंतर बारीक वाटा. तूप गरम करून कांदा, आले-मिरची, गरम मसाला गुलाबी रंगावर परता. नंतर पालक घालून हलवून जिरे पावडर, मिरे पावडर व मीठ घालून घट्ट झाकण ठेवा. (पाणी घालू नये. पालकाचे पाणी सुटते.) १०-१२ मिनिटाने गॅस बंद करावा. ७-८ तास तसेच ठेवावे. नंतर पालक वाटून घ्यावा. त्यात खसखस व क्रीम घालून एक वाफ देऊन काढावे.
पालकाचे खारे शंकरपाळे
साहीत्य. मैदा २ वाट्या, रवा १/४ वाटी, पालक प्यूरी १/२ वाटी, मोहन २ टेस्पून, मीठ चविनुसार, हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून, ओवा १/४ टीस्पून, धना-जीरा पावडर १ टीस्पून, हींग चिमूटभर, तिळ ऐच्छिक, तळणीसाठी तेल.
कृती. प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यात घ्या. त्यामधे रवा व वरील इतर सर्व कोरडे साहीत्य घालून नीट मिक्स करा. आता मोहन घाला.परत मिश्रण हाताने नीट सगळीकडे चोळून घ्या. आता शेवटी पालक प्यूरी अंदाज घेऊन बघत बघत मिश्रणात घालावी.पुरीच्या किवा नेहमी शंकरपाळ्या करतो, त्या कणकेप्रमाणे घट्ट कणिक मळावी. पंधरा मिनिट झाकून ठेवा. पंधरा मिनिटानंतर तयार कणकेची पोळी लाटावी. सुरीने अथवा पिझ्झा कटरने चौकोनी तुकडे कापून गरम तेलात खरपूस तळा. खारे शंकरपाळे तयार.
वाफवलेली पालक वडी.
साहित्य. एक जुडी पालक , एक कप बेसन (डाळीचे पीठ) , आवडीनुसार हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले-लसूण - वाटण केलेले, गूळ किंवा साखर, आंबटपणासाठी एक चमचा चिंचेचा कोळ किंवा दोन चमचे दही, एक चमचा तेल (वरून फोडणी द्यायची असेल तर. फोडणीसाठी तीळ, मोहरी व हिरवी मिरची) वरून पेरण्यासाठी कोथिंबीर आणि ओलं खोबरं.
कृती. सर्वप्रथम पालकाच्या पानांच्या शिरा काढून तो मोठ्या तुकड्यात चिरून घ्या. - बेसनात म्हणजेच डाळीच्या पीठात दही किंवा चिंचेचा कोळ मिसळून घ्या. इतर मसाले या पिठात घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट मिश्रण भिजवून घ्या. कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा. त्यावर पालकाच्या पानांचा एक थर द्या आणि बाकीचे पालकाचे तुकडे बेसनात घोळवून घ्या. बेसनात घोळवलेले तुकडे कुकरच्या डब्यात वर पसरत जा आणि त्याचे थर करा. वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता. आता कूकरला शिट्टी न लावता त्याचे झाकण लावून २० मिनिटे वाफ येऊ द्या. व्यवस्थित वाफ आल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. आवडीप्रमाणे त्याच्या वड्या पाडा. पथ्यासाठी या वड्या नुसत्या कोथिंबीर घालूनही खाता येतील. इतर वेळी मोहरी, तीळ, जिरे, मिरची घालून तेलाची फोडणी करून त्यावर घाला. खोबरे, कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा आणि वड्या सर्व्ह करा.
पालक खिचडी.
साहित्य. दोन वाट्या बासमती तांदूळ, एक वाटी पालक प्युरी, दोन कांदे, आठ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा गरम मसाला, दोन हिरव्या मिरच्या, फोडणीचं साहित्य.
कृती. प्रथम बासमती तांदळाचा मोकळा भात करून घ्या. अगदी प्रत्येक शीत वेगळं दिसेल, असं पाहा. पालकाची पानं स्वच्छ धुऊन ती दोन मिनिटं बर्फाच्या थंडगार पाण्यात बुडवून घ्या. नंतर प्युरी करा. बर्फाच्या पाण्यामुळे प्युरी केल्यानंतरही रंग हिरवाच राहातो. तापलेल्या तेलात हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावे. उभा चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालून परतावा. त्यात पालकाची प्युरी घाला. नंतर त्यात भात घालून अलगद हातानं ढवळा. एक वाटी पाणी व मीठ घालून झाकण ठेवावं. सणसणीत वाफ आल्यावर सर्व्ह करावा. आवडत असल्यास भातावर चीज किसून घाला.
मिक्स पालक सूप
साहित्य. १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती. पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. मीठ-मिरपूड-दूध घालून उकळी काढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होतं. जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो.
केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते. तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते. गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते.
नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो. नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषींनी आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतलं. म्हणूनच बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व त्यातून आरोग्य टिकण्यासाठी नियमितपणे च्यवनप्राश सेवन करावा. आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.
आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात. उष्णता वाढल्याने नाकातून रक्त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो. अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.
ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्वदगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आवळा बी चूर्ण
आवळ्याच्या बिया वाळवून त्याची वस्त्रगाळ पूड करावी. त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्याला व अंगाला लावली असता चेहरा व त्वचा मऊ होते.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३
घराच्या घरी च्यवनप्राश
साहित्य:- एक किलो डोंगरी आवळे, एक किलो साखर, दोनशे ग्रॅम चांगला मध, पन्नास ग्रॅम नवसारी लेंडी पिंपळी, पन्नास ग्रॅम अश्वगंधा मूळ, पन्नास ग्रॅम शतावरी मूळ, पन्नास ग्रॅम गुळवेल कांड, पन्नास ग्रॅम ज्येष्ठमध कांड्या,गाईचे तूप.
कृती:- नवसारी लेंडी पिंपळी, अश्वगंधा मूळ, शतावरी मूळ, गुळवेल कांड, ज्येष्ठमध कांड्या या पाच द्रव्यांचे अत्यंत बारीक चूर्ण करावे. प्रथम आवळे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये उकडून घ्यावेत. उकडल्यानंतर आवळ्यामधील बी काढून टाकावी. राहिलेल गर मिक्सरमध्ये वा पुरणयंत्रात चांगला मऊ, एकजीव करून घ्यावा. नंतर तो गर, गाईचे तूप थोडे थोडे घालून खरपूस परतून घ्यावा.
एक किलो साखरेत पुरेसे पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा. या पाकात आवळ्याचा परतलेला खवा घालून मंदाग्नीवर ते मिश्रण पुन्हा शिजवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात पाच द्रव्यांचे बनवलेले वरणगाळ चूर्ण हळूहळू मिसळून मधही घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे व काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे.
टीप.मुंबई-कोकणच्या दमट हवेत नंतर एखाद्या वेळेस थोडी बुरशी आली तर या च्यवनप्राशास तापवून चटका द्यावा, म्हणजे झाले. हा च्यवनप्राश दोन वर्षांपर्यंत उत्तम गुणकारी राहतो.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३
आवळ्याच्या चटपटीत वड्या
साहित्य:- दहा ते बारा चांगले मोठे आवळे, एक छोटा चमचा हिंग पूड, अर्धा छोटा चमचा लाल तिखट व तेवढेच मीठ, दोन छोटे चमचे ओवा व जिरे पूड, अर्धा छोटा चमचा शेंदेलोण व पादेलोण.
कृती:- प्रथम आवळे चांगले मऊ शिजवून घ्यावेत. त्यातील बी काढावे. सर्व आवळ्याचा गर अगदी बारीक कुस्करावा किंवा वाटण करावे. त्यात बाकीचे सर्व साहित्य घालून खूप कालवावे. तयार लगद्याचे आपण सांडगे घालतो तशा लहान लहान वड्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून उन्हात वाळवाव्यात. खडखडीत वाळल्या, की बाटलीत भरून ठेवाव्यात. या वड्या चविष्ट लागतात व तोंडाला रूची आणतात.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३
आवळ्याची सुपारी
साहित्य:- १ किलो आवळे, २५ ग्रॅम सैंधव मीठ, १० ग्रॅम काळी मिरी,
कृती:- आवळे स्टीलच्या किसणीने किसून घ्यावेत. सैंधव मीठ कुटून त्याची पूड करावी. मिरी बारीक कुटावी. हे दोन्ही एकत्र करून आवळयाच्या किसाला ते लावून ठेवावं. किस फडक्यात घेऊन ते स्टीलच्या पातेल्यात रात्रभर ठेवावा. हा कीस सकाळी फडक्यावर पसरून सावलीत वाळवावा. या सुपारीनं तोंडाला चवच येते.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३
आवळा सुपारीच्या गोळ्या
साहित्य:- ५०० ग्रॅम आवळे, १५ ग्रॅम आलं, २ चमचे जिरेपूड, अर्धा चमचा काळी मिरीपूड आणि चवीप्रमाणे मीठ.
कृती:- प्रथम आवळे चांगले उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. आल्याचं वरचं साल सोलून घ्यावं. आवळ्याच्या पाकळ्या बारीक वाटाव्यात. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून त्याच्या बोराएवढय़ा गोळ्या करून उन्हात वाळवाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३
आवळ्याची गोड सुपारी
साहित्य:- १ किलो आवळे, चवीप्रमाणो सैंधव मीठ, १० ग्रॅम काळी मिरीपूड, १० ग्रॅम ओवापूड, १० ग्रॅम आल्याचा रस आणि ५०० ग्रॅम साखर
कृती : सर्वप्रथम आवळे चांगले उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. साखरेचा पाक घट्ट करावा आणि त्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, आल्याचा रस, ओवापूड हे सर्व साहित्य एकत्र करावं. चार दिवस भिजत घालावं. नंतर भिजलेल्या आवळ्याच्या पाकळया चाळणीनं चाळून घ्याव्यात. पाकळया ताटामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर उन्हात वाळवाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti