(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पाखरांची शाळा

    पाखरांची शाळा भरे पिपळावरती
    चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ! ॥१॥

    उतरते ऊन, जाते टळूनी दुपार
    पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ॥२॥

    बाराखड्या काय आई, घोकति अंगणी?
    उजळणी म्हणती का जमूनी रंगणी? ॥३॥

    तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
    भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत ! ॥४॥

    खेळकर मुले, नको कराया अभ्यास
    परीक्षेत का न आई व्हायची नापास? ॥५॥

    लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत
    मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ॥६॥

    पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
    गळकी न शाळा यांची, भिजती सगळे ! ॥७॥

    रविवारी, सणवारी आमुच्यासारखी
    यांना नाही सुटी, भली मोडली खोड की ! ॥८॥

    यांच्याहून आम्ही आई ! शहाणे, नव्हे का?
    गप्प शाळेमधी, कधीं धरितो न हेका ॥९॥

    होतो पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
    मौज काय सांगू? मिळे सुट्टीही शाळेस ! ॥ १०॥

      June 19, 2026


  • पाप वा पूण्य काय ?

    काय पूण्य ते काय पाप ते, मनाचा हा खेळ जाहला

    ज्यास तुम्ही पापी समजता, कसा काय तो तरूनी गेला....१,

    कित्येक जणाचे बळी घेवूनी, वाल्या ठरला होता पापी

    मनास वाटत होते आमच्या, उद्धरून न जाई कदापी....२,

    मूल्यमापन कृतिचे तुमच्या, जेव्हा दुसरा करित असे,

    सभोवतालच्या परिस्थितीशी, तुलना त्याची भासत असे.....३

    तेच असते पाप वा पुण्य, आमच्या अंत:करणी वाटे

    आतूनी आवाज सत्य येई, तोच तुमच्या मनास पटे....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 24, 2020


  • आम्ही साहित्यिक आहोत

    आम्ही साहित्यिक आहोत
    रमू सदैव लेखणीत
    लिखाणात भाव असोत
    चलाख शब्द पेरणीत

    सौ.माणिक शुरजोशी

      January 14, 2020


  • सासरी जाताना

    हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला

    विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला.... ।। धृ ।।

    खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,

    पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी

    सैल कर तू पाश आपला...१,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

    संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी

    कुठे लोपला आज विश्वास तो, जागृत होता सदैव मनी

    नकोस देवू वाव शंकेला...२,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

    ते तर केवळ घर निराळे, मायेने परि आहे भरले,

    जसे मिळवले प्रेम माहेरी, वाटीत जाईन सासरी सगळे

    आठवण करिता येईन भेटीला...३,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 3, 2019


  • खरे ग्रह

    तुमचे जीवन अवलंबूनी, ग्रहराशीच्या दशेवरती

    तेच होई जीवनी तुमच्या, जसे ग्रहमंडळ फिरती...१,

    मित्र मंडळी सगे सोयरे, शत्रू असोत वा प्रेमाचे,

    जीवनातल्या हालचालीवरी, परिणाम ते होई सर्वांचे...२,

    हेच सर्व ते ग्रह असूनी, सतत स्थान ते बदलती

    परिस्थिती बघूनी तुमची, वागण्यात तो फरक करती...३

    अपयशाला कारणीभूत तो, असतो कुणीतरी नजीकचा

    राहू-केतू शनि वा मंगळ, ग्रहमान बनतो त्या घडीचा...४,

    यशाची चालता घौडदौड ती, मदत लाभते काही जणांची

    हे तर सारे इष्ट ग्रह ते, फूलवी सुमने जीवनाची...५

    डॉ.भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 22, 2019


  • भावशक्तीची देणगी

    भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले

    करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१

    जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम

    उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२

    भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी

    पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३

    भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन

    नाचत गांत राहिली, केले तुझ पावन ।।४

    दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले

    त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले ।।५

    सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी

    भावनेची ज्योत पेटतां, कदर तुच करिसी ।।६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 2, 2021


  • ऐलमा पैलमा गणेश देवा

    ऐलमा पैलमा गणेश देवा,
    माझा नवरा बदलून दे,
    करीन तुझी सेवा.

    जन्मोजन्मी कसल एका जन्मी झाले बो......र
    मी नाही गुंडाळायची वडाला आता दोर,

    कोणे एकेकाळी कसा फिदा होता माझ्यावर,
    ओफिसातून थेट कसा घरी यायचा भरभर,

    न चुकता घेऊन येत असे फूल आणि गजरा
    व्हेलेंटाईन डे तर रोज व्हायचा साजरा.

    ह्यांच्या नजरा ......त्यांच्या नजरा,
    लागल्या आमच्या संसारा.

    घर ,पाहुणे ,मुलांमध्ये मी झाले दंग,
    बघता बघता रोमान्साचा झाला बेरंग,

    क्षुल्लक कारणावरून उडू लागलेत खटके,
    सासुबाईंचे मधे मध्ये शाब्दिक फटके.

    ओफिसातून घरी हल्ली रोज येतात लेट,
    तुमच्यासाठी कमावतोय ही वरती भेट.

    लोळण,पेपर,मित्र पत्ते हाच ह्यांचा रविवार,
    मुलांसंगे बाहेर जायला नाही म्हणे जमणार.

    दहा वर्षात देवा माझी झाली अशी दैना
    ह्यांनाच धडा शिकवायच आलय माझ्या मना

    म्हणून म्हणते हात जोडून गणेश देवा ,
    एक्सेंज ओफरचे तेव्हढे मनावर घ्याना.
    मीच काय किती जणी करतील तुमची सेवा,

    ऐलमा पैलमा गणेश देवा.........

    -- सरिता मुकादम

      September 30, 2017


  • तुला लाभलेली निसर्ग देणगी

    खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते

    आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते ।।१

    इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि

    लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी ।।२

    मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या

    बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या ।।३

    इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला

    चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला ।।४

    चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी

    दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 3, 2020


  • रंगाच्या उधळूनी लाटां

    रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका,
    आज पंचमी, रंगात नाहली,
    विलक्षण गोकुळाची कळा,||
    श्रीहरी नावातच हिरवा,
    निळा रंग गगनाचा,
    आभाळभर पसरलेला,
    रंग शोभे तो निळ्या'चा,
    अस्तित्त्व' त्याचे आसमानी,
    आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ ||
    गोपिका आज नाचल्या
    टाकुनी सगळ्या बंधना
    जिवाशिवांचे' बनले ''अद्वैत'''',
    विसरून साऱ्या तनांमनां,
    कृष्णा'सम तो कोण सवंगडी,
    मिळेल त्यांना नेमका,---???
    रंगवुनी टाकती, भान विसरती,
    माखवुनी टाकती एकमेकां,
    समर्पणा'ची 'तऱ्हा'च न्यारी,
    गोकुळीचाच, वाजे डंका,---!!!! || ४ ||
    सगळ्या एकजीव, एकतान,
    एकरूप एकप्राण'
    एकमेव ध्येय आणि
    एकच ते 'पंचप्राण',----!!!
    शरीरे अनेक रंग खूप,
    रुपे' -- वेगळी तयांची,
    आत्म्या' मधला, एकच कान्हा,
    एकच दिसे फक्त श्रीरंग,''''----!!! || ५ ||
    खेळती बेधुंद' गोपिका
    जशा रमुनी गोकुळा,
    तशीच भोगती सर्व,
    इंद्रिये इह'-- सुखां,
    अतृप्त'खेळे आत्मा,
    त्यात सतत सारखा,
    होई देहा'चेचगोकूळ'
    आत्मा'कृष्णसखा''',!!

    हिमगौरी कर्वे. ७७७ ५०८५६५७.

      March 10, 2020


  • गावाकडची खाद्य संस्कृती

    आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

    ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

    पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

    एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

    मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे.

    गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

    हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

    अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

    शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

    लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

    त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

    हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर मीठ घालून परतायचे. चांगले खरपूस भाजायचे. हे भाजलेले हरबरे खाताना खुप चविष्ट लागायचे. खाक्या चड्डीच्या खिश्यात हारबरे भरून मी चवीचवीने हारबरे खात असे.

    हे हरबरे खाता खाता मोठ्या माणसांच्या गप्पांच्या मैफली रंगत. त्यात रात्री भुतांच्या गप्पा ऐकताना मी भेदरुन जात असे. तरीही भुतांच्या गप्पा संपूच नयेत असे वाटे.

    गावी रात्री आम्ही खेकडे पकडायला जात असू.नदीच्या किंवा ओढ्याच्या भल्या भल्या काळ्या खेकडी आम्ही आणत असू. काही खेकडाच्या कुड्या व नांगोडे तव्यात मिठाच्या पाण्यात शिजवून आम्ही सर्वजण त्यावर ताव मारत असू.ह्या कुड्या नांगोड्याची अप्रतिम चव अद्यापही जशीच्या तशी आहे.

    नागपंचमीला महिला वरईच्या पीठाचे गुळाचे पाणी घालून लाडू करत. हे लाडू सुध्दा खुप चविष्ट लागत असत.

    सर्वात आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे पेजवळया. (घावने) तांदूळ भिजवून सावलीत वाळत घालायचे.नंतर ते जात्यावर दळायचे.पेजवळ्या करण्यासाठी एक खास लोखंडी भांडे असायचे त्याला कहाल म्हणत असत. या कहाली मध्ये पेजवळ्या बनवल्या जाई. मटणाचा रस्सा बोंबील किंवा वाकटीचे कालवण पेजवळ्यां बरोबर खूपच छान लागत असे. काही लोक गुळवण्या बरोबर पेजवळ्या खात असत.

    गावाकडे त्याकाळी अनेक देवलशी असत.कुणावरूंन तरी बकरे कोंबड्या ठरलेल्या असत. शिवाय लोक देवाला,शेतात किंवा रानात दरवर्षी कोंबड्या,बकरे कापत असत. रात्री बेरात्री आम्ही त्याठिकाणी जात असू.

    भगताच्या अंगातील देव लोकाना सूचना देत असे. त्याप्रमाणे उतारा ठेवला जाई. पोटात भुकेचा डोंब उसळे. कधी एकदा जेवतोय असे होई. सर्व आटोपल्यावर पंगती बसत.त्या भयाण अंधाऱ्या रात्री नीरव शांततेत आम्ही मटणाचा रस्सा भरपूर मटनासह भाताबरोबर खात असू.काय सांगू? या रानातल्या रश्शाची चव काही औरच असायची.

    गावाला सगळ्याकडे बोंबील,वाकट,सुकट,ढोमेली व खारामासा हे सर्रासअसायचे. दर आठवडयाला काही बाया हे सर्व विकायला घेऊन येत असत. हे सर्व भातावर खरेदी केले जाई.

    बोंबलाची चटणी खुपच टेस्टी असायची.आम्ही बोंबलाचे तुकडे चुलीतल्या आहारात भाजून खात असू.शिवाय तव्यावर तळलेला खारामासा भाकरी बरोबर खाताना वेगळीच चव रेंगाळत असायची.

    लसणाची चटणी हा एक फेवरेट atam असायचा. लसणाच्या पाकळ्या व लाल मिरची व मीठ पाट्यावर बारीक वाटून ते मिश्रण अगदी थोड्याशा तेलात तव्यावर तळायचे. झाली लसणाची चटणी तयार.खूपच छान चव होती.

    गावात लग्न किंवा पूजा असेल तर आमटी भात व जोडीला शाकभाजी असायची. गावठी हारबरे,वाटणे,बटाट्याच्या फोडी इत्यादी पासून बनवलेली शाकभाजी आमटी भाताबरोबर छानच लागायची.

    तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

    उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.

    तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.

    उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.

    पूर्वी दुपार नंतर कातकरनी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायच्या. छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

    हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

    गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

    गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू सुध्दा छानच चवदार लागायचे.

    पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

    फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.

    श्री.रामदास तळपे मंदोशी

      July 27, 2024