प्रिय वाचक वर्ग मंडळीना
भारतीय प्रजासत्तक दिनानिमीत्य शुभेच्छा.
जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता ।।
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा
द्राविड उत्कल बंग ।
विंध्य, हिमाचल, यमुना गंगा
उच्छल, जलधितरंग ।
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिस मागे
गाहे तव जयगाथा
जन गण मंगल दायक जय हे,
भारत भाग्य विधाता ।।
जय हे , जय हे, जय हे
जय जय जय हे ।।
भारतमाता की जय हो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!
नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!
रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
-- ..... मी मानसी
आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे.
गझल ; जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला; मात्रा: ८+८+८=२४ मात्रा
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
गळे अवसान सारे
फुटे कणसाला तुरे
चुलीत घाला तुमचे
वांझ दौऱ्यावर दौरे!
कापसाच्या होई वाती
विम्याचं रिकामे पोते
निवडून दिलेले घोडं
कंपन्याची पेंड खाते !
खतात लूट,बियांत लूट
आडत्याचीही दलाली
खरेदीखताला बघा
महागाई लावी लाली !
कोपतो प्रत्येक ऋतू
तशी काळी अवकाळी
पीठ मीठ भाकरीचं
शिक्षण धरी काजळी!
बनिया येती घरा तेव्हा
बटनी मतदान करा
निवडून गेले आता
शेतकरी फासाने मारा!
-- विठ्ठल जाधव
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
शब्दभावनांची झाली उधळण
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कधी क्वचित मी खचून जाता
उंच भरारी घेते मी
टपकलेच जर अवचित अश्रू
नकळत त्यांना पुसते मी
थोपटते मी माझे मजला
गोंजारते मलाच मी
ऊर्मी माझ्या अंतरातल्या
नजाकतीने जपते मी
दुखता खुपता होता अगतिक
दु:ख झुगारुन देते मी
नव्या दमाने श्वास घेउनी
पुढे पुढे हो जाते मी
मीच असते तेव्हा माझी
भक्ति मी शक्तिही मी
माझ्या साठी माझी प्रेरणा
केवळ मी केवळ मी
प्रदीप निफाडकरांची गझल
Copyright © 2025 | Marathisrushti