तू भासतोस जलदांसारखा, संजीवन बरसवणारा,
अविरत निष्काम सेवेला,
दिनरात अंगिकारणारा,
तू वाटतोस पावसासारखा,
चिंब भिजवून टाकणारा,
परिसरच काय, ओलेता,
तनमनही धुवून काढणारा,
तू असशी वाऱ्यासारखा,
करारी, स्वयंभू विचरणारा,
माहित नाही दिशा रस्ता,
सरळ जाऊन थडकणारा,
तू विस्तीर्ण समुद्रासारखा,
अथांग अपार उफाळणारा, भरती-ओहोटी ना कुणाला, किंचितही घाबरणारा,
तू झऱ्यागत नाचणारा ,
निर्मळ, अवखळ खेळणारा, सेवाव्रत निभावताना,
आनंद तुषार उडवणारा,
प्रतीत होशी नदीसारखा,
गावांनाच कुशीत घेणारा,
दूर सारत अस्वच्छता,
देखभाल शेतांची करणारा,
तू आधारच हतबलां,
धीरगंभीर खंबीर उभा,
सोडवत साऱ्या समस्या,
मदतीचा वसा जपणारा,
तू अगदी पर्वतासारखा,
अचल निश्चल राहणारा,
स्मरून नीर - क्षीर विवेका, जगण्याला तोंड देणारा,--!!!
© हिमगौरी कर्वे.
जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले
परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले...१,
वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती
ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती...२,
षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो
सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,
पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती
गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती....४,
थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां
जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रफुल्लित ते भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं
गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं...१
खेळत होता दिवसभर तो, इतर चिमुकल्या मित्रांसंगे
खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे...२
सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली
भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३
निद्रेच्या तो आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने
येणाऱ्या त्या दिवसा विषयी अजाण होता संपूर्णपणे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बरस बरसता, पाऊस धारा
मन हे, श्रावण होऊनी जाते...
चिंब, चिंबल्या आठवणींची
शब्दगीता, अलवार प्रसवते...
ओंजळ भावरंगल्या शब्दांची
अंतरातुनी मनांगणी पाझरते...
ओला ओला हा श्रावण सुंदर
तनमनांतर सारे भिजूनी जाते...
अवीट आगळी ही श्रावणीगंगा
चराचरालाच या शांतवुनी जाते...
जणू प्रीतीचेच डोहाळे सृष्टीला
दशदिशांना तृप्तीचे भरते येते
रचना क्र. ५५
२३/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय.
शेलकाव्य रचना - वर्ण ८
विषय - सुवास
मज आवडे सुवास
सुवास रातराणीचा
ही दरवळते रात्री
रात्री बाग सुगंधाचा
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
बर्याच वेळा आपले अक्षर चांगले नसते आणि एखाद्या परीक्षेत अक्षराला जास्त मार्क असतात आणि तेथे आपण कमी पडतो. चांगले मार्क मिळत नाहीत आणि जे इप्सित साधायचे असते ते साधले जात नाही आणि आपण निराश होतो. सातत्य आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर सगळ्या गोष्टी सहज होतांना दिसतात. मुख्य म्हणजे देवावर, सदगुरुवर आणि स्वत:वर विश्वास पाहिजे. अक्षर मग ते कोठल्याही भाषेचे, लिपीचे असले तरी ते कसे काढावे, त्याचे तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावे किंवा सराव करावा.
रूद्राक्षाच्या माळा घालूनी, भस्म लावीले सर्वांगाला
वेषभूषा ती साधू जनाची, शोभूनी दिसली शरिराला
खर्ची घातला बहूत वेळ, रूप सजविण्या साधूचे
एक चित्त तो झाला होता, देहा भोंवती लक्ष तयाचे
शरिरांनी जरी निर्मळ होता, चंचल वाटले मन त्याचे
प्रभू मार्गास महत्त्व देतां, विसरे तोच चरण प्रभूचे
विधी कर्मात वेळ दवडता, प्रभू सेवेसी राहील काय ?
देहाच्या हालचाली बघूनी, समाधानी तुम्हीं होत जाय,
सोडून द्या हे सारे सारे, जे मनास गुंतवी भलतीकडे
केवळ तुमचे शांत चित्त, ते पोहचवील तुम्हां प्रभूकडे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो
भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग तो करूनी घेतो...१,
पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे
भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे
व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति ती दाखविती
धर्माचे ते नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती
पुरोहित तो असा असावा, धर्माची तो करि उकलन
भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग ते देयी दाखवून,
प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें, चिंतन करण्या सांगावे
चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्र करण्या शिकवावे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
तुजविना करमेना मज होई लाही
जयदेवी जयदेवी ......... !!
तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या
जयदेवी जयदेवी..... ।।१।।
अर्धांगी गायी ते अंगाई गीत
होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत
अखेरी वाचीत बसतो कविता
तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
जयदेव जयदेवी.... ।।२।।
व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
बेरके कवडे काहीही बोले
परंतु तुजला दयेचा लेश
तुजला लाजला शिव महेश
जयदेवी जयदेवी .......।।३।।
आता मात्र बाबा कमाल झाली
निद्रेवाचून होई जीवाची लाही
घेऊन हातात कवितेचे बाड
माझेच बसलो करीत लाड
जयदेवी जयदेवी ..... ।।४।।
लागली लागली तुझी चाहूल
तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
वाचीत वाचीत झोपून गेलो
दिव्याची आठवण विसरून गेलो
जयदेवी जयदेवी ..... ।।५।।
-- द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)
Copyright © 2025 | Marathisrushti