बघता तुला प्रिया रे ,--
जिवा बेचैनी येते,
कासाविशी होता हृदयी,
आत मोरपीस हलते,--!!!
विलक्षण ओढ तुझी,
काळजाला किती छळते,
मूर्त माझ्या अंतरीची,
अढळ अढळ होतं जाते,--!!!
स्पर्श होता तुझा सख्या,
माझी न मी असते,
बाहूंत तुझ्या विसावण्या,
किती काळ मी तरसते,--!!!
तुझ्यातच सारे विश्व माझे,
जगही तोकडे भासे,
तुझ्याचसाठी राजसा,
मन्मनीचा चकोर तरसे,--!!!
उषा आणि संध्या,
आपले रंग उधळती,
प्रेम रंगाचाच वर्षाव,
भास्करावरती करिती,--!!!
रात्र येते चंदेरी ती ,
जेव्हा जवळ तू असशी,
जिवापाड जाऊन तूही,
प्रीत" माझ्यावर करशी,--!!!
धुंद रात्रीची मदमस्त किमया,
प्रेमात नखशिखांत नहाते,
आभाळीची चटोर चांदणी,
प्रेम--लीलेसाठी धडपडते'--!!!
हिमगौरी कर्वे©
लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं...
लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरीमिळवायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसंकित्येकांना वाटत असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं
© कवी – निलेश बामणे
लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर ।
आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर....१,
विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार ।
परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार...२,
परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी ।
ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही....३,
विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो ।।
अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो...४
डॉ. भगवान नागापूरकर
प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई
सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१
दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२
चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण
यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३
पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हातीं
प्रयत्नाची दिशा बदलतां, जुळून सहजच सारे येती...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला ।
चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।।
किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा ।
गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।।
सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी ।
पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।।
पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची ।
शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची ।।
निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे ।
उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षकवर्गांच्या मनामध्ये एकच काहूर माजलेला असतो ते म्हणजे बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली. अर्थहीन संहिता, चुकीची मांडणी पद्धत अशा गोष्टींमुळे काही चित्रपट एक आठवडा सुद्धा सिनेगृहात चालत नाहीत. भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मूळ तत्वांना विसरून विनाशाकडे वाटचाल करीत आहेत.चित्रपट पाहताना काय घ्यावे आणि काय नाही याबद्दल सजग राहणे आमची आणि तुमची जबाबदारी आहे.
अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन!
हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!!
तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की,
उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन!
गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची
तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन!
सवे माझिया तू असली की, असे वाटते....
स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन!
श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम
अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन!
मला न वाटे जीवन-मरणाची या भीती
जोवर आहे नाम:स्मरणाचे हे इंधन!
पहा लागलो बहराया मी दिशादिशांना
तुझ्या कृपेचे जेव्हा झाले अविरत सिंचन!
शब्द अता बोलतात माझे तुझीच भाषा
करतो आता तुझेच वाचन, तुझेच चिंतन!
हयात माझी गझलमय जणू झाली आहे
झोपेमध्ये सुद्धा चालू विचारमंथन!
कळते मजला तुझ्याविना मी अपूर्ण आहे
तू माझा स्वर, मी तर साधे आहे व्यंजन!
प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
आव्हानांना पेलत पेलत
आता फक्त जगत रहावे
कयास सारे कलियुगाचे
ओळखुनी सतर्क जगावे
व्याख्या जगण्याची बदलली
तीच उमजुनी जगत रहावे
भुरळ आता नावीण्याची
जगताना सावध असावे
जुने जे, ते सोने असते
ते मना समजवित रहावे
मन:शांती हेची सुख खरे
याचे सदा स्मरण असावे
*******
--वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१३
२९/११/२०२२
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें
विलंब न करता क्षणाचा, जायी दुजा टोका वरती,
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते,
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी,
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti