जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले
जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।
सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची
श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।
शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे
शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।
रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे
सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।
ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे
प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।
शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले
धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।
तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे
समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।
माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी
केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।
चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा
कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।
कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती
प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।
निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला
दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।
मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे
धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।
वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला
ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।
विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे
काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।
चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला
श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई
वाट पंढरिची पावन ही ।।
चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे
दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे
भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं ।।
सोडुन आलो मागुती घर, कुटुंबां जरी
चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी
ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।।
प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास
पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास
रूपडें दिसेल कधि तें, अती मनां घाई ।।
नेते ही वाट सर्वां विठुरायाच्या पदीं
पापांचें करेल क्षालन चंद्रभागा नदी
शुचिर्भूत अंतर्बाह्यच करते सरिता ही ।।
याचि देहिं याचि डोळा पाहुनिया पंढरी
नाद अनाहत हृदयीं अन् अमृतवर्षा शिरीं
नेइल वैकुंठीं विठ्ठल, संशय ना कांहीं ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
केला एवढा अट्टाहास,रसिका केवळ तुझ्यासाठी,
मांडली काव्याची आरास,
तुझ्याच फक्त आशीर्वादासाठी,
दत्तगुरूंचे धरून बोट,
लेक लिहीत गेली,
आईवडील, भाषाईने,
समृद्धी तिज दिधली,--!!!
माया करती मित्रवर्य,
शिक्षकांचे आशीर्वाद मागुती,
असे संस्कार,सहकार्य,
उभे राहिले बघा पाठी,--!!!
काव्यप्रेमी देती दाद,
त्यांची ममताच उदंड,
पावती देती रसिक,
कृपा त्यांची भरभरून, --!!!
त्यांच्या सदिच्छा-भेटी,
पत्रे शिवाय, संदेश खास,
खाऊ, फुले, आशीर्वादाची, मजजवळ जमली रास,--!!!
खरेतर हा सन्मान,
आपुल्या मराठी आईचा,
"मी"तर एक निमित्तमात्र,
माध्यम माझे फक्त समजा,--!!!
राहिले काही चुकून माकून,
तर, मीही एक मानव अपूर्ण, उदार अंत:करणाने माफ,
करावे रसिकजन हो आपण,--!!
6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे.
नयनमनोहर सृष्टी वैभव
निरवताच ही शांत सुंदर
जीव! जिथे जातो गुंतुन
ओघळतो, लोचनी ईश्वर
सभोवताली रम्य परिसर
साक्षी गगन सरीतासागर
लोभस अलौकिक नजारा
हृदयी सुखद अमृती पाझर
अगम्य हा ब्रह्मांड रचियता
चैतन्यात्मा चराचरी निरंतर
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ९५.
२७ - ३ - २०२२.
सर्वांचा विश्वास । सहजी बसेल
ऐसे शुद्ध शील । ठेवीन मी ।॥।१॥।
देव, देश, राजा । गुरु आप्त दृष्ट
यांशी एकनिष्ठ । राहीन मी ।॥।२॥।
अनाथांच्या साह्या । जाईन धावून
त्यासाठी झिजवीन । काया माझी ।॥॥३॥।
सानां कुरवाळीन । वंदीन थोरांना
बंधु सकलांना । मानीन मी ।॥४।।
सौजन्य दावीन । स्त्रिया-बालकांशी
वृद्ध-निर्बलांशी । निरपेक्ष ।।५॥।
मुकी जनावरें । गणूनिया मित्र
भूतदया व्रत । आचरीन ।।६॥।
गुरु, आईबाप । अधिकारी खरे
आज्ञा त्यांच्या त्वरे । पाळीन मी ।॥७॥।
कोसळो संकटे । कर्तव्य कठीण
मनाने प्रसन्न । राहीन मी ।॥८॥।
शरीराने शुद्ध । मनाने निर्मळ
कृतीने सरळ । राहीन मी ।।९।।
एकेकटे पाहून झाडं तोडता तुम्ही
दाटी असता वृक्षाची ......
अटकता ,लटकता ,
भटकता तुम्ही ....!
-- श्रीकांत पेटकर.
कौशल
जन्म हा सुखाचा की दुःखाचा..
कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे..
जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे
कुणाची कुणाला आज ओढ आहे..
बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध
खरे कोण कुणासाठी जगतो आहे..
ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी
सांगा , आज मनःशांती कुठे आहे..
ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली
नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे..
बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे
तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात आहे..
वास्तव ! जे पेरावे तेच जगी उगवते
हे सत्य कुणा केंव्हा कळणार आहे..
कां ? जगण्याचीच हीच रित जगती
जन्म कलियुगी , जीवाला सजा आहे..
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
रचना क्र. ३८
दिनांक :- १३-३-२०२१
मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१,
तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२,
वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३,
बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी
उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी
वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो
सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो
अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो
जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो
विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक
दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित असे एक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti