(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • परमात्मा

    पुण्यपावन हे दत्तधाम
    कृष्णाकाठी, भक्तीचे
    त्रैलोकी शाश्वत कृपाळू
    स्वर्गद्वार ते मोक्षमुक्तीचे।।

    निश्चिन्ततेच्या महासागरी
    दर्शन आगळेच पंचत्वाचे
    दत्तगुरू, अखंड कृपाळु
    माहेर लडिवाळ गुरुकृपेचे।।

    तृप्तीचे श्वास तिथे निरंतर
    मनी कारंजे श्रद्धाभक्तीचे
    जीवास नाही, घोर चिंता
    ध्यास मनहृदयी विरक्तीचे।।

    मन ब्रह्मानंदी विरुनी जाते
    सत्य, दर्शन होते आत्म्याचे
    परमात्मा! तो परमकृपाळु
    रूप! भवसागरी दत्तकृपेचे।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ४३.

    ११ - २ - २०२२.

  • पुन्हा नवी झेप घे

    मित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.

  • भावनेच्या आहारीं ।

    नको बनूस अविचारी
    जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।

    प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले
    विवेक करण्या मनी यश तुला साधले
    नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।

    जाऊनी भावनेच्या आहारी
    प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची
    विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची
    नको बनूस अहंकारी ।।२।।

    जाऊनी भावनेच्या आहारी
    बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी
    राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी
    नको जाऊस दारोदारी ।।३।।

    जाऊनी भावनेच्या आहारी
    प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी
    ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी
    कां मनाचा गोंधळ करी ।।४।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

    विवीध-अंगी ***२८

    एकदा माझ्या तोंडून शिवी बाहेर पडली, तेंव्हा मुलांने टोकलं.

    शिकवल्यापैकीं फक्त चागलंच त्यानी घेतलं, हे मला जाणवलं

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

  • नशीब

    का असा धांवतोस तूं ,
    नशिबाच्या मागें मागें,
    यत्न होता भगिरथी,
    नशीब येईल संगे ।।१।।

    प्रयत्न होतां जोमाने,
    दिशा दिसताती तेथें,
    यशाचे ध्येय सदैव,
    योग्य मार्गानें मिळते ।।२।।

    प्रयत्न करूनी बघा,
    ईश्वर देखील मिळेल,
    इच्छा शक्ती प्रभावानें,
    नशीबही बदलेल ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ,

    आमचे नितीन नांदगावकर साहेब आजवर सदैव अन्यायाशी लढा देत आले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे . त्यांच्यावर केलेली एक कविता----
    तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ, अन्यायातला पाठीराखा,
    काय म्हणावे तुला तेजा,
    तुझ्यासम,-- या सम हा-!!!

    जनता जनार्दन भक्त होता,
    तुला पाठिंबा सकलांचा,
    दोस्त तू रंजल्या-गांजल्या,
    जुलमीना दाखवीत बडगा,--!!!

    दिप्त प्रदीप्त होशी,
    अन्याया समोर पाहुनी,
    सलाम मराठी अस्मितेला,
    विरोधात कार्यवाही करशी,--!!!

    निर्भिड निडर धच्चोट काम, जसे उधळत यावे तूफान,
    समोर कोणीही उभे न राहती
    ते पुरुषार्थाचेच काम,--!!!

    स्त्रीला संरक्षण तुझे,
    गरीब, गरजू बनती समाधानी, दुःखितांचे अश्रू पुसत,
    प्रेषित तू अंतर्यामी,--!!!

    फणसांगत वाटशी तू ,
    वरून किती काटेरी दिसतो, काळीज तुझे, गोड गरा, अनुभवणारा चक्रावतो,--!!!

    मदतीचा हात तुझा,
    चटकन पुढे येतो,
    व्यथितांना देत दिलासा,
    अत्याचारा नाहीसा करतो,-!!!

    अगतिक हतबल ते,
    तुला शोधीत येती,---
    रुपात तुझ्या मग सारे,
    प्रत्यक्ष भगवंत बघती,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • महाशिवरात्री

     

  • आतंकवादी

    आजी वादी माजी वादी
    समाजवादी प्रजा समाजवादी
    लोकशाहीवादी हुकूमशाहीवादी
    मवाळवादी जहालवादी
    आस्तिक वादी नास्तिक वादी
    धर्मवादी अधर्मवादी
    भोगवादी चंगळवादी
    राष्ट्रवादी राष्ट्रीयवादी
    देशीवादी विदेशीवादी
    खादी वादी विलायतीवादी
    धर्मवादी धर्मनिरपेक्षवादी
    आचार वादी भ्रष्टाचारवादी
    जातीयवादी वंशवादी
    वर्णवादी वर्णद्वेषवादी
    काळेवादी गोरेवादी
    अणुवादी अणुयुद्धवादी
    वादी वादे जायते आतंकवादी

    (प्रसिद्धी लोकप्रभा साप्ताहिक ७ मार्च २००३)

    -- विनायक अत्रे.

    दिनांक: ११/२/२००३.


    ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेचे वर्ल्ड ट्रेड सेंटर आतंकवाद्यांनी विमानात घुसवून जमीनदोस्त केले. त्यामागे ओसामाचा हात आहे असे अमेरिकेने जाहीर केले. आणि त्याला जिवंत किंवा मृत पकडण्याची घोषणा प्रे. बुश यांनी केली. एकविसाव्या शतकातील भयंकर आतंकवादी.

  • असामान्य व्यक्ती

    सामान्यांतून असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
    कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे ।।१।।

    उदार होऊनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
    परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,

    जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
    व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,

    जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
    अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,

    निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
    हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,

    सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
    सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • परावलंबी

    जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी
    व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी

    नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या
    शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या

    माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता
    तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता

    घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी
    समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी

    वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा
    हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा

    मृतदेह जर तसाच पडला, किडे मुंग्या खाती
    त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती

    जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन
    कुणी तरी दिले तुजसाठीं, हे घे जाणून

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मातृभूमीच्या शूर जवाना तुला सलाम !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    स्वातंत्र्या आधी आणि नंतर

    आमच्यासाठी किती खस्ता खाल्यास

    याचा इतिहास विसरलो नाही आम्हीं !

    मातृभूमीच्या शूर जवाना आप्तांसाठी

    ऊन, पाऊस, बर्फाच्या वादळात

    सीमारेषेचे डोळ्यात तेल घालून

    चोवीस तास राक्षण करतोस !

    शत्रूने केलेल्या मातृभूमीवरील भेकड हल्याचे

    सर्जिकल स्ट्राईकने चोख उत्तर देतोस

    आपल्या आप्तांचे रक्षणकरण्या

    वीर मरण पतकरतोस !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    तुझा जागता पाहारा आहे सीमेवर

    म्हणून दैनंदिन व्यवहार सुरळीत होतात

    आणि रात्री आप्त निश्चिंत झोपतात !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    उत्सव आणि सणवाराला कुटुंबियांसमवेत नसतोस,

    कारण तू सीमेवर मातृभूमीच्या रक्षणाचे

    कर्तव्य पार पाडत असतोस !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    आम्हीं काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे?

    मातृभूमीचा शूर जवान म्हणतो

    करण्यासारखे बरेच आहे !

    आपल्या आजूबाजूला काही

    संशयास्पद वाटले तर

    कायदा हातात न घेता

    पोलिसांना कळवा !

    मेल, फेसबुक, ट्वीटर, वॅाटसप

    सोशल मिडियाचा वापर करण्यास शिका,

    पण त्याचा गैरवापर होणार नाही

    याकडेही लक्ष असू द्या !

    डिझास्टर मॅनेजमेंटचे शिक्षण घ्या,

    आपल्या बहादूर जवानांवर विश्वास ठेवा,

    वीरमरण आलेल्या जवानांच्या

    कुटुंबियांना आधार द्या !

    देशाच्या अखंडतेला कुठे तडा जाईल

    असे एकमेकांशी वागू नका

    युद्ध प्रसंगी अफवा पसरवू नका

    अफवांवर विश्वास ठेऊ नका !

    -- जगदीश पटवर्धन