अशाच सुरम्य संध्याकाळी
आत्ममग्नि एकांती निवारा
सृष्टिचा हा अगम्य सोहळा
लोभस दृष्टांत हा साजिरा
निरवतेत इथे हरवुनी जावे
उलगडावा , आत्मगाभारा
सत्य ! जीव जगतो एकटा
या किनारी शाश्वती सहारा
लोचनी आज सांजसावळी
ओघळे अनामिक तारणारा
चराचरी या भास हरिहराचा
जीवाजीवा, सदा सावरणारा
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५२
१८ - ६ - २०२२
खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही
आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे
गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु
झाडावर चढते सुरु सुरु सुरु
पानाआड लपते, लपाछपी खेळते
चलाख खारूताई अैटीत बसते
मुलांना बघून खुष होते
-- सुधा नांदेडकर
मराठी शायरी
डांबले उरी, मी दुःखवेदनांना
आज विकल अव्यक्त भावनां
संवेदनांचे सारे स्पर्श वेगवेगळे
दाह अंतरी सोसू कसा सांगना
विधिलिखित! जरी हे ललाटी
भोगूनी संपणार कां? सांगना
सत्कर्मी! चालतोही मी विवेके
तरी अस्वस्थ मन हे कां सांगना
क्षण! तू तर सारेसारे जाणतेस
तरीही तू कां? अबोल सांगना
मीच शोधितो, स्वतःला अंतरी
जीवन! कधी उमगणार सांगना
जीव! हा व्याकुळ आज सारा
कृपावंत! कधी भेटणार सांगना
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ५४
२१ - २ - २०२२.
मंदिरात दिवे पेटवले,
पण मनात अंधारच दाटला असेल,
ओठांवर प्रार्थनेचे शब्द असतील
आणि हृदय मात्र रिकामंच असेल,
तर सांग, असा देव कशाला?
हात जोडून उभं राहिलो,
पण तेच हात कुणासाठी पुढे आले नाहीत,
डोळे मिटून नमस्कार केला,
पण डोळ्यांत करुणेचे थेंब दाटले नाहीत,
तर अशी भक्ती कशाला?
भुकेल्या माणसाला भाकरी न देता
देवाला फुलांचा हार अर्पण केला,
रडणाऱ्याच्या खांद्यावर हात न ठेवता
मंदिरात घंटांचा गजर केला,
तर असा देव कशाला?
देव जर खरोखर कुठे असेल,
तर तो माणसांतच सापडतो
एखाद्या हसण्यात,
एखाद्या मदतीच्या हातात,
एखाद्या निरागस प्रेमात
तो शांतपणे फुलत असतो.
म्हणून मंदिर दूर कुठे नाही,
ते आपल्या वागण्यातच उभं असतं.
एखाद्याच्या अश्रूंना हात लावला,
एखाद्याच्या वेदनेला आधार दिला,
एखाद्याच्या भुकेला भाकरी दिली,
तिथेच देव शांतपणे उभा असतो.
आपण जर माणुसकी जपली,
तर देव शोधायला कुठेच जावं लागत नाही,
कारण माणसाच्या हृदयातच
देवाचा खरा पत्ता लिहिलेला असतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
जेथे जातो,
तेथे मी खातो,
संपूर्ण खात्याला
मी बरबटवतो,
ओळखा पाहू मी कोण?
भाषणबाजी करतो,
नारेबाजी करतो,
लोकांना भडकविण्याचे
काम मी करतो,
ओळखा पाहू मी कोण?
लोक येतात,
लोक जातात,
मागितलेली माहिती
देण्याचे टाळतात,
ओळखा पाहू मी कोण?
-- मयूर तोंडवळकर
दोन्हीं दारीं मारामारी
खानेसुमारी पानसुपारी.
खालीवर तागडी जुळली फुगडी
हुशारला गडी फुशारला गडी.
आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की
लाल-दिव्याची गाडी !
- सुभाष स. नाईक
आयुष्य पुढे धावत असते,
वय सारखे वाढत असते,
पण......
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते ,,,,,
उच्छृंखल आणि समंजसपणा,
यामधली मर्यादा कळते,
अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
जगण्याची परिभाषा,
थोडी थोडी बदलू लागते,
काय हवे अन् काय नको,
हे नेमकेपणे कळू लागते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
मन जोडीदाराचं,
न बोलताच कळू लागते,
गोडी संसारातली,
एक पायरी वर चढते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
जगणे समजुन घेण्याचे,
हेच खरे वय असते,
याच वयात आपण स्वत:साठी, जगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
आयुष्याच्या चित्रपटातील,
हेच मध्यंतर असते,
इथूनच पुढे,
शेवटच्या क्लायमेक्स कडे
जायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
म्हातारे होण्याआधीचे,
हे शेवटचे तरूणपण असते,
ते, आपण मनापासून उपभोगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
चाळीशीनंतरही पावसात
भिजावेसे वाटणे,
हे मन अजुन हिरवे असल्याचे
लक्षण असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
चाळीशीपुढच्या मित्र मैत्रिणींनो, एकदा तरी अवश्य वाचाच....
खरंतर हेच वय आहेन आयुष्याला चॅलेंज करायचे.
त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याचे.
आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्ता तर कुठे "सिट बेल्ट ऑफ" ची साईन आली आहे.
ही वेळ आणि वय आहे "क्रूझ" करायचं, नवी क्षितिज गाठायचं, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं..!
कारण चाळीशी / पन्नाशी म्हणजे नृसिंह अवस्था.!
ना तरुण ना म्हातारा,
ना नवशिका,
ना पूर्ण अनुभव संपन्न,
ना खूप आसक्ति
ना पूर्ण विरक्ति,
ना पूर्ण सौष्ठव,
ना गलित गात्र,
आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा....
अरे जमवा मित्र दर महिन्याला,
घेऊन जा घरच्यांना फॉरेन ट्रिपला,
नसेल परवडत तर शक्य असेल तिथे करा एखादी "हनीमून स्पेशल" टूर वर्षातून एक दोनदा....
जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा.
आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा,
पोरांचे मित्र व्हा,
त्यांच्या मित्र मैत्रिणींचे Buddy व्हा,
सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या,
सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त फ्लर्ट करा,
गॉसिप करा,
शाळेची गेट टुगेदर आयोजित करा,
ट्रेकला जा,
रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यावर दादागिरी करून "आवाज कुणाचा" चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा.
बर्फी वहिनी किंवा पेढा शेजारी दिसला तर हळूच कटाक्ष टाका.
औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या, पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा.
पावसात भिजा,
जॉगिंग करा,
सूर्यनमस्कार घाला,
लाँग ड्राइव्हला जा,
सिनेमे पहा,
काका / काकू म्हणतील त्यांचे काका / काकू व्हा,
दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा,
अनुभवाचं ओझं इतरांना वाटून थोड हलक करा.
मुख्य म्हणजे हसत रहा.
एकदा मनाशी पक्के बांधले की चाळीशीचा / पन्नाशीचा घाटमाथा म्हणजे, पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. पन्नाशी टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते.
आणि मग चाळीशी / पन्नाशी हा फक्त एक आकडा रहातो...
जस्ट अनदर ब्लडी नंबर...
म्हणूनच म्हणतो .....
ENJOY YOUR
चाळीशी पुढे ......
-- From Whatsapp share for you
झोपेतून उठताच बाबा बाबा करी
हाती माझ्या आहे तुझ्या पाळण्याची दोरी
रडू नको बाळा तुला देतो मी झुला
आभाळाच्या उंची वरी नेतो मी तुला
तेथूनच बाबा ला तू न्याहाळत रहा
हाता मध्ये आहे त्याच्या खेळणी पहा....
ना ना ना ना ना ना.... ना ना ना ना ना ना....
उगी उगी बाळा आता थांब ना तू जरा
वाटी मध्ये आणतो मी दूध आणि शिरा
तुझ्यासाठी बाबा घोडा बनून धावेल
पाठीवर तुला त्याच्या रोज खेळ वेल
दुडू दुडू तुझ्या संगे धावत तो जाईल
ठेच लागताच तुला सावरून घेईल....
ना ना ना ना ना ना.... ना ना ना ना ना ना....
आता गेलो आहे पोरी पुरता थकून
कुठून मी आणू तुझ्या आई ला शोधून
गेली आहे देवा घरी दूर तुझी आई
कधीच मी तिला आणू शकणार नाही
आठवण येता तिची रडू नको बाई
तुझ्या साठी आहे मीच बाबा आणि आई.….
ना ना ना ना ना ना.... ना ना ना ना ना ना....
कवी :भैय्यानंद वसंत बागुल
Copyright © 2025 | Marathisrushti