तप आणि सत्याची,
महान असे शक्ती,
वाढवूनी बघा तुम्ही,
प्रभूस ती खेचती ।।१।।
तप वाढता तुमचे,
झुकेल तो ईश्वर,
हतबल होत असे,
भक्त जणांसमोर ।।२।।
विश्वाचा तो मालक,
दिसत नाही कुणा,
प्रयत्न होवूनी व्यर्थ,
निराशा येई मना ।।३।।
मिळविण्यास जा तुम्ही,
मिळत नसे केव्हां
तपशक्ती वाढविता,
आपोआप येई तेव्हां ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
छत्रपती शिवाजी महाराज
विचारावे कोणी मला
आणि मी सांगावे
माझा आदर्श कोण ?
छत्रपती शिवाजी महाराज
आणखी कोण ?
इतिहासातील आवडती तुझी
थोर व्यक्ती कोण ?
देवतुल्य शिवराय आणखी कोण ?
इतिहास भिनलाय
माझ्या नसानसात
मराठ्यांच्या शौर्याचा
त्यांच्या चातुर्याचा आणि
धर्मावरील प्रेमाचा...
शिवराय नसते तर ?
मी ही नसतो नाही ?
हा प्रश्न नाही तर
एक विचार आहे...
महाराष्टाला ज्याने
अस्मिता दिली
हिंदुत्वाला ज्याने
संजीवनी दिली
हिंदूंना ज्याने
अभिमान दिला
ते माझे राजे
छत्रपती शिवाजी महाराज...
मी त्यांना रोज मनात स्मरावे
हृदयात जपावे आणि
वर्तनात उतरून दाखवावे
त्यांच्या जयंती दिनी
फक्त करावी याची उजळणी...
हीच आहे माझी त्यांच्या
पवित्र चरणी
पुष्पांजली...
कवी - निलेश बामणे
साद घालती काजवे
अंधार सभोवताली
व्यापलेला नंभ
चाँदण्याची वेली
-- शरद अर्जुन शहारे
(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
तुझा उपयोग नाही काम झाल्यावर
तुला उमजेल का आराम झाल्यावर ?
पुढे घेऊन जाते सायकल साधी
कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर
तुला समजेल बघ आहे किती सुंदर !
तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर
नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर
विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर
तुझा आवाज बाकी गोड आहे; पण
नको बोलूस तू बेफाम झाल्यावर
बदल घडला जरी चिंताजनक मोठा
दखल घेईल जग परिणाम झाल्यावर
-- ॐकार जोशी
सुस्वागतम दोनहजारबारा,घेऊन ये सुख स्वप्नांचा वारा ! प्रत्येक दुख:चा कर निचरा, स्पर्शुनि आपला मोर पिसारा ! नव्या वर्षात पीकपाणी चांगले,जळो जिणे लाजिरवाणे ! शेतकऱ्यांच्या पिकाला मिळो रास्त भाव, नको सरकारच्या ‘पॅकेज’चा डाव !
ग्यानबाची मेख....!!!
कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं,
कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं,
कपडे काढायची अन फाडायची जणु,
चषकी स्पर्धाचं लागली आहे.....!!!
शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत,
शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म,
कॅमेर्यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय,
हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय...!!!
आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं...
कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय,
पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय,
न्यायी धर्मराजा मात्र नर-कुंजरातच फसलाय !!
कलीचाच साया,अन कलीचाच खौफ,
चाणक्यांच्या हाती सत्तेचा गोफ,
़़अनितीघरी निती काम करतेय चोख.
हिच तर खरी, ग्यानबाची मेख!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
ई-बुक स्वरुपात -
(Sachin_Ebook)..................................रु.९९/- (वेब डाऊनलोड) ....
Purchase Now
छापील आवृत्ती (ई-बुक सहित) - महाराष्ट्रात कोठेही घरपोच -
(Sachin-Mah-promo1) ...................... रु.४००/- (पोस्टेज सहित) ....
Purchase Now
छापील आवृत्ती (ई-बुक सहित)- भारतात कोठेही घरपोच -
(Sachin-In-promo2) ..........................रु.४५०/- (पोस्टेज सहित) ....
Purchase Now.....
We Use CCAvenue as our Secured Payment Gateway. If you do not wish to use the Credit / Debit Card Online, you may opt any of the following methods of payment
जवळ वेळ आली ......तयारीस लागा
जवळ वेळ आली ......विलासास त्यागा/
फितूर दिसती येथले लोक छूपे
जवळ वेळ आली...... लढाईस जागा /
कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला
जवळ वेळ आली...... शहाणेच वागा /
बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले
जवळ वेळ आली..... तपासाच धागा /
निर्णयात क्षण दवळावा कशाला
जवळ वेळ आली.... कशालाच त्रागा /
@कौशल(श्रीकांत पेटकर )
२२/ ०२/ २०१९
Copyright © 2025 | Marathisrushti