समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र –
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ॥
काळजाच्या भेटी,
आलीस सई गाठी,
खूण पटता आत्म्यांची,
किती आनंदी दिठी,--!!! ||१||
काळजाच्या भेटी
आलीस सखे राती
पूर गप्पांचा येता ,
वाढत जाय भरती,--!!! ||२||
काळजाच्या भेटी ,
आलीस मैत्रिणी,
जिवांचे दुवे सांधीत,
घट्ट हृदयाची नाती,--!!! ||३||
काळजाच्या भेटी,
आलीस सये पाठी,
सुखदुःखांच्या हिंदोळी,
दोघी बसू एकाच झुली,--!!! ||४||
काळजाच्या भेटी ,
आलीस तू सहेली,
सह राहुनी राहुनी,
केलीस दुःखे हलकी,--!!! ||५||
काळजाच्या भेटी,
आलीस माझ्यासाठी,
तुझ्यातील तू अन् ,
माझ्यातली मी,
द्वैतातील अद्वैतासाठी,--!!! ||६||
हिमगौरी कर्वे.©
देवाने दिली आपणास बाळे जुळी दोन,
पाठीला पाठ लाऊन जन्मास आली
जणू एकाच नाण्याच्या बाजू दोन !
एक बहिण आणि एक भाऊ
नामकरण करती त्यांचे तृप्ती आणि समाधान !
जुळ्यांना समजावून घेतना होते मनाची कसरत,
मीमी तूतू ने गाडी नाही पुढे सरकत !
प्रेम करता एकावर रुसवे दुसरे उगाच,
दुसऱ्यास जवळ घेता पहिले पाहे रागेच !
हरवली तृप्ती मनाच्या घरातून,
बुद्धीम्हणे जुळी खेळताहेत लपंडाव रत्यातून !
जुळ्या भावंडांचे एकमेकावर निस्सीम प्रेम,
समजण्यात भेदाभेद त्यांचे आपल्यावरील प्रेम !
देवास साक्षी ठेऊन सुधारू आपले विचार,
अंतर्मुख होऊन सारू कुतर्क दूर !
जगदीश पटवर्धन, दादर
नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का?सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक ।
प्रत्येक जण स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।।
सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना ।
शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।।
अप्रतिम शहर असूनी, नाव तयाचे असे 'पुरूष' ।
'पुरू' म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे 'ईश ।।
अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी ।
विधात्याची वास्तूकला, अप्रतीम अजोड ठरे खरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.

एक सैनिक ही बापचं असतो
जरी तो घरापासून दूरवर असतो,
तुझ्या जन्माचा आनंद ही घेता आला नाही
बाप म्हणून गावभर मिरवता ही आले नाही,
तुझ्या आठवणीत उश्या खाली रडतो
या सैनिकांचं मन कोण भला जाणतो,
घरी आल्यावर ओळखशील का ग मला..
बाबा बाबा हाक मारशील ना ग मला..
ना बाहुली ना खेळणी आणली मी तुला
आल्यानंतर माफ करशील ना ग मला...
कुशीत घेण्याचा मोह आता आवरेना
भेटण्याची आतुरता कधी संपेल कळेना....
सुट्टीच्या प्रतीक्षेत दिवस ही सरेना
घरच्या ओढीने माझं मन ही रमेना..
एक सैनिक ही बापचं असतो
जरी तो घरापासून दूरवर असतो...
-- सौ. शिल्पा पवन हाके
Copyright © 2025 | Marathisrushti