आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा
रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला १
विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी
कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला २
प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस
विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला ३
प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा
भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला ४
II शुभं भवतू II
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें
एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।।
कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ?
कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ?
सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।।
काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी
काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ?
जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें ऐसें नव्हे !
तूं ज़री नाहींस पुढती, राहसी नयनीं तरी
तूं ज़री नाहींस ज़वळी, आठवण ज़वळी परी
राहते, राहील कायम स्मृति तुझी माझ्यासवें ।।
एकादा भेटून माझी तृप्ति नाहीं व्हायची
विकलता, त्या भेटिनें ज़ाईल वाढत हृदयिंची
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ मजला ज़वळ घे ।।
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ तूं स्वप्नांत ये ।।
- - -
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
रुजविता बियाणें अंकूर फुटती
असतील दाणे जसे तेच उगवती
पेरता आनंद आनंदचि मिळे
प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे
शिवीगाळ करुनी आदर येई कसा
शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा
घृणा दाखवूनी कसे येई प्रेम
क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम
पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा
सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हृदयात वणवा होता
नजरेत ती होती
मंद गारवा हवेत
मनात उब होती
डोक्यात विचार होता
ओठावर कविता होती
मंद गारवा हवेत
शब्दात उब होती
भोवती प्रेम होते
सुंदर ती होती
मंद गारवा हवेत
तिच्यात उब होती
जगणे सुरू होते
जीवनात मजा होती
मंद गारवा हवेत
जगण्यात उब होती
जवळ ती नाही
फक्त कल्पनेत होती
मंद गारवा हवेत
स्वप्नात उब होती
© निलेश बामणे
पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
दिवस हे चालले असे
ऋतु हे प्रसवती जसे
श्वास हे जगता जगता
आंसवे ही झरतात कां?.
जल जीवनी वाहिले असे
मनभाव सारे विरले जसे
निर्माल्य सहज होता होता
भावतरंग मनी जागतात?
दैवयोगे, मनप्रीत उमलता
मूकमनभाव गुंतता गुंतता
प्रीतसुगंध दरवळता दरवळता
भावकळ्या तू तोडल्यास कां?
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११९.
१८ - ४ - २०२२
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अरडी ग बाई, परडी
रस्त्यावरती गर्दी
ही गर्दी कशाची
ही गर्दी बसची
बस आली बस आली
पकडा पकडा
पुढच्याला मागे ढकला ढकला
असेच होतात अपघात
टाळणे तुमच्या हातात
थांब्यावरती थांबा थांबा
शिस्तीत लावा रांगा रांगा
उतारूंना उतरू द्या
पुढच्याला पुढे होऊ द्या
प्रवास तुमचा होईल छान
समूहाचे ठेवा भान
अंगी बाणा शिस्त शिस्त
शिस्तीवरती ठेवा भिस्त
Copyright © 2025 | Marathisrushti