काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का?सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का?
"मी कुणाला कळलो नाही"
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही..
सोडून गेले माझेच मला
"मी कुणाला कळलोच नाही.."
"मी कुणाला कळलोच नाही"
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दूजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्तेक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासुर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।
स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।
एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।
छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।
जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।
त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।
ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।
आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।
चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।
बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।
झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।
मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।
गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।
सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
चिमण्या आल्या दोन कोठूनी, घरटे बांधून गेल्या त्या
खेळूनी नाचूनी उड्या मारूनी, चिव चिव करित गात होत्या
झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवीती हलके हलके
दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके
संसार चक्र ते भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी
नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी
पिल्लांना त्या पंख फूटता, उडूनी गेल्या घरटे सोडूनी
अल्प काळाचे बंधन तोडीत, जगण्या पुनरपी स्वच्छंदानी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुटलेल्या नात्यांचे
जरतारी पदर
त्या ना मायेची उब
प्रेमाची कदर
गाठीगाठीत फक्त
बोचरे आठव
कशास मिरवायचे?
भरजरी पाटव !……… १
तो पाठीवर हात अन
डोळ्यात पाणी
ते तुडुंबलेलं मन
श्वासात गाणी
क्षणाक्षणाने दिलं
जीवनाचं दान
उघडेल का कोणी ते?
मिटलेलं पान !………… २
.....मी मानसी
क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी ।।
फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं ।।
शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं ।।
प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते ।
आनंदी लहरी, मनां सुखावते ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti